उद्या नवरात्र सुरू होतंय!
महाराष्ट्रातील खास नवरात्रीमधील पारंपारिक पद्धतींपैकी एक म्हणजे भोंडला/ हादगा. खानदेशात याला 'भुलाबाई' असंही नाव आहे.
पाटावर हत्ती काढतात. त्याची पूजा करतात, एकमेकींकडे जाऊन फेर धरुन गाणी म्हणतात आणि खिरापत(खाऊ) वाटतात. ही भोंडल्याची गाणी वर्षानुवर्षे आपल्या घरोघरी म्हटली जातात. अतिशय गोड पारंपारिक चालीतील ही गाणी रंजक तर आहेतच, शिवाय काही गाणी उद्बोधकही आहेत. आपल्यापैकी अनेकांना ही गाणी आठवत असतील आणि या उल्लेखाबरोबर बालपणदेखिल आठवलं असेल!
माझी आजी सौ. सुनंदा वैद्य यांनी 'भोंडल्याची गाणी' या पुस्तिकेत पारंपारिक भोंडल्याची गाणी तसेच काही नवरात्रीची गाणी संकलित केली आहेत. यात 'ऐलमा पैलमा' सारखी सर्वांना माहित असलेली गाणी तर आहेतच, त्याचबरोबर 'विजापूरच्या दरबारी' हे शिवरायांच्या बालपणीच्या बाणेदारपणाची एक आठवण कथित करणारं नाट्यपूर्ण गाणंदेखिल आहे. हे गाणं, तसेच कुंतीने केलेल्या 'गजगौरीच्या व्रताचं' वर्णन करणारं गाणंसुद्धा खरंच ऐकण्यासारखं आहे.
या पुस्तकाप्रमाणेच, या भोंडल्याच्या गाण्यांची एक सीडी देखिल उपलब्ध आहे. यात पारंपारिक चालीत गायलेली एकूण २३ गाणी आहेत.
देशात तसेच परदेशात ही पुस्तके आणि सीडीज आत्तापर्यंत अनेकांनी मागवून घेतली आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्कः
सौ. सुनंदा सु. वैद्य +912225402601/ +919869063020
इ-मेलः ashwini_v_t@yahoo.co.in
भोंड्ला
Submitted by ashashwini on 28 September, 2008 - 02:45
गुलमोहर:
शेअर करा
बापू
बापू करन्दिकर
माहितीबद्
माहितीबद्दल धन्यवाद.
भोंडल्याची किंवा भुलाबाईची गाणी यांसारखी 'लोकगीते' कोणी रचली, केंव्हा लिहीली ह्याच्या नोंदी सहसा उपलब्ध नसतात. पण त्यांचे संकलन होणे ऐतिहासिक आणि सासांस्कृतिक दृष्ट्या फार महत्वाचे. डॉ. सरोजिनी बाबर यांचे याबाबतचे कार्य खरोखरच खूप मोठे आहे. आणखीहि कित्येकांनी असे काम करून पुढच्या पिढ्यांसाठी हा अमूल्य ठेवा जतन करून ठेवला आहे. त्या सर्वांना मनःपूर्वक 'सलाम' करावासा वाटतो.
कित्येक पारंपारीक लोकगीतांतले काव्यगुण थक्क करणारे असतात. आजकालच्या, मायबोलीवरच्या 'गझल कार्यशाळे' सारख्या उपक्रमातून पुढे येणारी काव्ये वाचली तर त्या अनामिक, अप्रकाशित, अशिक्षित [किंवा कमी शिकलेल्या] आणि अप्रशिक्षित कवि- कवियत्रींची प्रतिभा किती उच्च दर्जाची होती हे अधिकच प्रकर्षाने जाणवते. त्यांच्यातल्या काव्यगुणांमुळेच, त्या सुंदर-सुंदर रचना मौखिक परंपरेतून एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत राहिल्या. त्या सर्व अनाम शायरांनाहि सलाम!
बापू करन्दिकर