टीप : माझे डोळे नुकतेच उघडलेत. सर्वांचे उघडावेत या सदिच्छेपोटी हा लेखनप्रपंच. उपरोध, उपहास या प्रकाराशी माझा संबंध येत नसल्याने सर्व लिखाण नम्रतेने वाचावे.
शाळा शिकून जे शिकलो त्यामुळे नोकरीचे विचार सतत मनात घोळत असतानाची गोष्ट. कुणी सरकारात गेला, कुणी मल्टीनॅशनल मधे गेला कुणी नुकत्याच जम बसलेल्या आयटी क्षेत्रात गेला तर कुणी मनपा, रेशन कार्ड, जमीन महसूल खाते अशा ठिकाणी गेला. ज्याला कुठेच काही संधी मिळाली नाही त्यांच्याशी काही वर्षे संपर्क राहीला मात्र त्यांच्या अडचणींची जंत्री वाढत गेल्याने सगळेच सेटल्डस त्यांना टाळू लागले. सहानुभूती मात्र होतीच !!
काही वर्षांपूर्वी स्नेहसंमेलन झालं. रेशन कार्ड सुस्थितीत होतं. त्यांच्यापेक्षाही जमीन महसूल संपन्न स्थितीत होते तर मनपांच्या चेहरीवर निरनिराळ्या कार्सच्या एसीचे राप चढले होते. मल्टीनॅशनल्स वेल सेटल्स पण कोशावस्थेत होते.
मागे पडलेल्या मंडळिंचा विचार मनात आला. ते आलेले दिसले नाहीत. जाताना पार्किंगमधे बीएमडब्ल्यूची ८६ लाखाची एक कार दिसली. मघापासून स्पॉनसरर म्हणून मिरवणारे एक सोनेरी काड्यांचा चष्मा असलेले व्यक्तिमत्व त्या कारमधे बसताना आम्हाला हात हलवून बाय करू लागले आणि अचानक ट्यूब पेटली..
पक्या ??? आणि मग त्याला थांबवून काय , कसं काय या चौकशा सुरू झाल्या.
आणखीही दोघांची ष्टोरी निराळी नव्हती. अकरावीला पोहोचू न शकलेला पक्या जे एम रोडवर तीन मजली ऑफीस बांधतोय. एकाचा स्वतःचा कारखाना आहे. दोनेक हजार कोटींचा टर्नओव्हर आहे. ज्या मुलांना आम्ही टाळत होतो आता त्यांच्याच अपॉइण्टमेण्टस घेऊन त्यांना भेटायला जाऊ लागलो. ( फेका तर मारत नाही ना हे पहायची पण तीव्र इच्छा होतीच ).
पुढच्या वेळी आणखी काही टाळभैरव भेटले. म्हणजे ज्यांना आम्ही टाळत असू असे. एक बडा एजंट आहे. एकाचा सरकार दरबारी कामे करून द्यायचा व्यवसाय आहे म्हणे. या वयात घडलेला जगप्रवास, आलिशान गाड्या, एकाचा असलेला वरळी सी फेसचा फ्लॅट... विश्वास बसत नव्हता !!!
हळू हळू एकेकाची कहाणी उलगडत गेली आणि यांच्या प्रगतीचा समान धागा उलगडत गेला. सगळेच रस्ते बंद झाले कि मनुष्य भिंतीवर धडका द्यायची तयारी ठेवतो अगदी हेच या सर्वांचं झालं. ही मित्रमंडळी प्रातिनिधीक आहेत. सध्या देशात अशी मंडळी जोरात आहेत. ज्यांचे सर्व रस्ते बंद झाले होते अशांच्या कामगिरीचा आलेख पाहून इतरेजन भारावून जाण्याची पद्धत देशात आहे.
एका रिक्षा ड्रायव्हरचं उदाहरण प्रसिद्धच आहे. रिक्षा ड्रायव्हर ते हजारो कोटींची संपत्ती, स्वतःच हेलिकॉप्टर आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षासारखा प्रासाद आहे. दुबईत पेट्रोकेमिकल कंपनीत कामाला गेलेला मजूर आज देशातला सर्वोच्च उद्योगपती बनतो, गावचा सरपंच ते आज राज्याचा अघोषित सर्वेसर्वा.. जाणता राजा !!
काय फरक पडला असावा हुषार विद्यार्थ्यांच्यात आणि या सर्व मंडळीत ? शाळेत न चमकल्याने जगाच्या शाळेत मिळणारं शिक्षण यांना नाईलाजाने घ्यावं लागलं आणि तोच कळीचा मुद्दा ठरला. ज्या वेळी नोकरदार मंडळी इन्कमटॅक्स कॅल्क्युलेशन करून स्वतःच कसे रिटर्न फाईल केले याच्या बढाया मारत होती तेव्हां आमचा पक्या एफएसआय आणि बांधकाम गुणोत्तर यांचा अभ्यास करत होता. कंपनीच्या लेखा परीक्षणामधून खडा निवडावा तशी चूक लक्षात आणून देऊन व्हीपींची कौतुकाची थाप पाठीवर घेऊन आमच्यातला एक सुखावत होता त्याच वेळी आगाश्या मात्र मोकळे भूखंड शोधून त्यावर आरक्षण कसं टाकता येईल यावर मनपाच्या अधिका-यांकडून धडे घेत होता.
यांचं शिक्षण प्रमाणपत्रविरहीत होतं. मात्र आरक्षण टाकून नंतर ते कसं उठवावं, सरकारी जमिनींचे मूळ मालक शोधून काढून त्यांच्याशी अल्पदरात बॅकडेटेड कागदपत्रं कशी बनवावीत आणि नंतर हे भूखंड कनवाळू शासनाने उदार होऊन मूळ मालकाला परत केल्यावर त्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःकडे कसे घ्यावेत हे शिक्षण ना कायद्याच्या पुस्तकात ना शालेय शिक्षणात ! बरं सर्टिफिकेट मिळणार नसेल तर कोण अशा शिक्षणाकडे लक्ष देईल ? आम्हाला हव्यात डिग्र्या !!! डिग्र्या घेऊन सुशिक्षित बेकार हे बिरूद मिरवलं कि संघटना काढून चीडचीड व्यक्त करणे, वर्तमानपत्रात लेख लिहीणे इतिकर्तव्य पार पाडले कि उर्वरीत आयुष्यात आम्ही व्यवस्था बदलण्याचे बरेच प्रयत्न केले पण शेवटी काहीच हाती लागलं नाही असं म्हणायला आंम्ही मोकळे !!!
जगाच्या शाळेत शिकलेले लोक असे पुढे जाताना पाहून डोळे खरंच उघडलेत. आणि मग डोळस नजरेने पुन्हा आजूबाजूला पाहीले. अरब जगतातून भारतात आलेला मुलगा आज बिझनेस आयडॉल आहे. पण हा ही जगाच्या शाळेत शिकलेला. जे कायद्याने करता येत नाही ते करण्यातच खरी मजा असते हे याने ओळखलं होतं. परवान्याच्या किचकट अटी पाहूनच अनेक सामान्य भारतीय इच्छा असूनही उद्योग काढू शकले नाहीत. कर्ज मागूनही कित्येकांना ते मिळाले नाही. यांची बातच और ! धंदा करायचा तर तो आपल्या पैशाने नाही हा महामंत्र त्यांना समजलेला होता. मग मॅनजरचा खिसा थोडा गरम केला तर बिघडलं कुठं ? कापडनिर्मितीसाठी मिळालेल्या परवान्यात शंभर तागे महिन्याला हे प्रमाण परवडत नाहीच मग. पण काढले तीन हजार धागे तर कुणाला कळणार आहे हे त्या मुलाच्या लक्षात आले. पुढे त्याने हर एक आदमी की किमत होती है आपको उसकी पहचान होनी चाहीये हा सिद्धांत रूढ केला. कापडौद्योगात अनभिषिक्त सम्राट बनतानाच अनेक गैरप्रकार करून ( कायद्याच्या दृष्टीने ) आपलं साम्राज्य वाढवत नेलं. सरकारी अधिकारीच आपल्याकडे ओढले. या खेळातच पुण्यातल्या रिक्षावाल्यासारखं आणखी एक नाव पुढे आलं. आणि मग अशा नावांची मादीयाळीच दिसू लागली...
अमरसिंह, नीरा राडीया, बरखा दत्त, हिंदुजा असे असंख्य लोक !!
मग बाँबे हाय मधे ३३ वर्षे संशोधन केल्यानंतर या ठिकाणी नैसर्गिक वायू मिळणार नाही म्हणून हा शोध थांबवल्याचं ओएनजीसी जाहीर करतं काय आणि सहा महिन्यातच रिलायन्सला त्या ठिकाणी तेलविहीरी सापडणे काय असा योगायोग घडून येऊ लागला. हे योगायोग इतके वारंवार घडू लागले कि गोदावरी बेसीनचं क्षेत्र असाच गैरसमजूतीतून शासन विकायला काढतं काय आणि एकच खरेदीदार त्यांना सापडतो काय आणि बिचारा देशाच्या इन्फ्रास्टक्चर विकासाच्या धेयाने झपाटल्यागत तिथे आपलं पाऊल टाकतो काय. पण त्याच्या भावाला मात्र हे पटत नाही आणि तो काडी टाकतो. लाखो डॉलर्सचा गॅस आणि तेल मिळू शकणारं क्षेत्र सरकारने अत्यल्प रॉयल्टी मधे माझ्या भावाल दिलंय म्हणून कोर्टात जातो काय !
वीजनिर्मिती करणे हे तर कुणाचेही कर्तव्यच असते. पण शासनाला जे परवडत नाही ते जर कुणी स्वखर्चाने करत असेल तर त्याला मोबदला दिला पाहीजे कि नाही ? जगच्या शाळेत हे शिकवतात. पण अशा सज्जनांना समुद्रात बुडवायची भाषा करणा-यांनाच पुढे आपण केव्हढी मोठी चूक करत होतो याची उपरती झालेली याची देही याची डोळा आपण सर्वांनी पाहीली. पण गो-या अमेरिकनांनी त्यांच्ञा देशात या सज्जनांना बुडवून टाकले आणि आपले वीजनिर्मितीचे संकट गहीरे झाले.
सरकारला काय परवडते आजकाल ?
रस्ते बांधायला पैसे नाहीत. शाळा बांधायला पैसे नाहीत, कॉलेजेस काढायला जमिनी नाहीत. वीज देता येत नाही. विमानं उडवता येत नाहीत. पोलिसांना बंदुका आणि पगार देता येत नाही. मग जर खाजगी क्षेत्र पुढे येत असेल तर त्यांना नको का मदत करायला ? आमच्या पक्याला हे कळतं. अशी एकमेकांना मदत केली कि संबंध सुधारतात. चार ओळखी होतात. सरकार दरबारी वजन वाढतं. पोलीस सॅल्युट मारतात. कुठे कशात फसलं कि एका फोनवर सुटका होते. एकमेकांच्या उपयोगी पडल्याशिवाय हे होत नाही.
बीएसएनएल फायद्यात चालवून काय मिळणारे सांगा बरं ? रिलायन्सच्या फोनचं उद्घाटन टीव्हीवर दाखवतानाच लँडलाईनचे दर एक रूपया वरून तीन रूपये आणि ते ही लोकल कॉल्स तीन मिनिटांसाठी करताना हे दाक्षिण्य नाही दाखवलं तर कसं चालेल ? उगाच का निवडणुकांना निधी मिळतो ?
टाटांची गाडी स्वदेशी ! देशाच्या भल्यासाठीच ही गाडी त्यांनी निर्माण केली. मग कर माफ केले तर बिघडतं का ? गेली कित्येक वर्षे ते निवडणुका सांभाळताहेत.
कोळशाच्या खाणीत कोळसा सडत पडला होता. मग पक्यासारखे लोक जिंदाल, एस्सार, रिलायन्स, टाटांच्या कानाला लागले. मंत्र्यांच्या कानाला लागले. कोळसा तो. कितीही उगाळला तरी काळाच. मग काढला थोडा थोडा तर काय बिघडलं ?
प्रवासाल निघाल्यावर रस्त्यात दहा रूपयाचा वडापाव पस्तीस रूपयांना घेणा-यांना दान द्यावंसं वाटू नये ? या दानातून कित्येकांचे संसार उभे राहू शकतात. याच उदात्त भावनेने ठिकठिकाणी टोलनाकी उभी राहिलीत.
टू जी स्पेक्ट्रममधे तर काहीच घ्यायचं नव्हतं. सगळं फ्री टू एयर. मग घेऊ द्या ना ज्याला घ्यायचं त्याला. !!
पण या देशात काही लोकांना बोंबा मारायची गरजच आहे. स्वतः मेरीटमधे यायचं, नोक-या करायच्या आणि इतरांकडे ढुंकूनही पहायचं नाही. मग त्यांनी पोटापाण्याचा धंदा आरंभला कि कायदे सांगायचे. च्यायला कायदे शिकून का हे लोक मोठे झाले ? कायदे कसे वाकवायचे याचंच सहज शिक्षण बाहेरच्या शाळेत मिळतं. वसंतदादा विद्यापीठातून बाहेर पडलेल्यांनी अशा शाळेत शिकून देशाचं नाव मोठं केलंय.
पण नोकरदारांना हे मान्य नाही. स्वतः काही करायचं नाही आणि दुस-यालाही काही करू द्यायचं नाही हा यांचा अॅप्रोच ! या पुण्यवंतांना त्यांनी दरोडे टाकणारे दरोडेखोर म्हटलंय. दरोडे टाकले असते तर कारवाई नको का व्हायला ? झाली ??????
नाही ना ! म्हणजेच ज्या अर्थी कारवाई नाही त्या अर्थी सगळं आलबेल आहे. पक्या म्हणतच होता. आधीच वदवून घ्याय्चं कि ब्वॉ उलटी गेम केलीत तर सगळ्यांची नावं सांगणार. विचार तेलगीला !!
हा सगळा आढावा घेतला आणि खात्रीच पटली कि काही होत नाही. आपणही दरोडेच टाकायचे. काही वेडंवाकडं होत नाही. सगळे खूष तर आपण खूष !! सगळा राजी खुषीचा मामला आहे, आपण करायची खोटी आहे. केल्याने होत आहे रे आधी (हात ओले) केलेची पाहीजेत .. बस्स हे लक्षात ठेवायचं.
बघा पटतंय का हे ?
मग... येताय दरोडे टाकायला ??
इब्लिसजी अबू जुंदाल इतक
इब्लिसजी
अबू जुंदाल इतक खाण एका वेळा खाऊ शकणार नाही अस तुम्ही पैजेवार सांगत होता ना मग काय झाल ?
आता पोलिस त्याला इतक खाऊ घालतात तर ते निर्लज्य कसे काय ठरले ?
बर तर आम्ही त्या बातमीत स्वता:च काही जोडत नाही !
त्या मूळे तो रोजा सोडताना काय खातो, सकाळी सेहरीला काय खातो हे पाहीजे असेल तर दिलेली मिड डे ची लिकं
बघावी.
विवेक नाईक प्रत्येक वाक्य
विवेक नाईक प्रत्येक वाक्य पटते व सहमत
दरोडा,,, अरे बाप रे!..मी मनात
दरोडा,,, अरे बाप रे!..मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही!
किरण.. कळकळ पोचतीये रे ..
किरण.. कळकळ पोचतीये रे .. वाईट्टं परिस्थिती होतीच आता दिवसेंदिवस डिटिरियोरेट होताना दिसतीये..झपाट्याने!!!
टीवीवरच्या वर्तमानपत्रात छापून येणार्या डिप्रेसिंग बातम्या .. वास्तवात कितीतरीपटींने अजून भयानक असतील यात शंकाच नाही!!
तुझे सर्व पॉईंट्स पटले.
विवेक नाईक मी काय लिहितो ते
विवेक नाईक
मी काय लिहितो ते तुम्हाला समजत नाही, किंवा तुम्ही मुद्दाम न कळल्यासारखे करता.
सबब,
या विषयावर तुमच्याशी अधिक बोलण्यात रस नाही.
धन्यवाद!
(धन्य झालेला) इब्लिस.
विवेकभाव जाऊ द्या. नाही
विवेकभाव जाऊ द्या. नाही पटायचे काही लोकांना पेपरमध्ये सुद्धा आलेले. हे म्हणजे असे झाले की घोड्यावर बसु देणार नाहीत आणी पायी पण चालु देणार नाहीत.( म्हणजे तुम्ही बातमीचा/ पेपरचा हवाला दिला नसता आणी नुसतेच लिहीले असते ना तर इथे लग्गेच विचारले असते, अहो पण हे तुम्ही मनाने लिहीताय, पेपरमध्ये कुठे छापुन आलेय असे, आम्ही नाही कुठे वाचले/ ऐकले ब्वॉ असे).:फिदी:
असो, पोलीस आपले दोन्ही कडुन मार खाणार, आदेश आला की वरुन आणी इतरवेळेस जनतेकडुन.
मिलीटरी शासन लावा आता या देशाला. इतके वर्ष कुचकामी लोकशाही पाहिली आता हा पण प्रयोग करुन बघावा.
अरेच्चा ! मित्रांनो समजून
अरेच्चा !
मित्रांनो समजून उमजून चर्चा होउद्यात. आग्रह नाही !
अतिरेकी वगैरे ठीक आहे पण त्यांच्याही पेक्षा कुणाची दहशत जास्त आहे आणि त्यांच्याशीच दोस्ती केली कि कसं सगळं आलबेल होतं, व्यवस्था बदलण्यापेक्षा व्यवस्थेनुरूप बदलणे हा दृष्टीकोण ठेवणा-यांची झालेली प्रगती आणि त्यामुळे मूर्खात निघालेले पापभीरू लोक हा लेखाचा विषय आहे.
एक गृहस्थ होते मायबोलीवर.
एक गृहस्थ होते मायबोलीवर. झिलतोडे असा खिताब त्यांनी प्राप्त केला होता.
टुनटुनताई जाऊ द्या. तुमच्या बाहेरचं आहे ते.
ओढवून घेऊ नका उगाच.
नाही ओढवुन नाही घेत, ते
नाही ओढवुन नाही घेत, ते बहुतेक तुम्हीच घेतलेल दिसतय तुमच्या प्रतीसादावरुन. जाऊ द्या वाद नको.:फिदी:
पेपरचा सवंग मिडीया अद्याप झालेला नाही हे बरे आहे.
किरण तुम्ही व्यक्त केलेल्या
किरण
तुम्ही व्यक्त केलेल्या भावना अगदी काळजास भिडणार्या असल्या तरीही माझा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे. हा अन्याय आहे हे कबूल पण मला या मार्गांनी पैसा कमावायचा नाही. ज्या प्रकारे मी आयुष्य कंठले त्यात मला खंत नाही. म्हणून गोष्टी सुधारायला हव्यात पण मला त्या मार्गात स्वारस्य नाही. मला ते प्राप्त करता येणार नाही म्हणून नाही तर माझी स्वभावप्रकृती वेगळी म्हणून.
एक नागरिक म्हणून मी जे काही वैयक्तिक पातळीवर करायचे ते करेन पण पर्याय म्हणून स्वतः दरोडेखोर बनू शकत नाही. तुमच्या म्हणण्याचा तो शाब्दिक अर्थ नव्हता - हे मला पुरेपूर माहित आहे. गैरसमज नसावा.
पेपरचा सवंग मिडीया अद्याप
पेपरचा सवंग मिडीया अद्याप झालेला नाही हे बरे आहे. >>> टाईम्स ऑफ इन्डीया, मिड डे सवंग नाही ?!!
रेव्यु हे एक प्रहसन आहे असं
रेव्यु
हे एक प्रहसन आहे असं समजा. उपहासात्मक शैलीचा वापर केलाय. अशा वेळी जे सांगितलं गेलंय तेच सांगायचं होतं असा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरीही आशय पोहोचला असावा ही आशा आहे.
किरण लेख अतिशय पटला. . पण
किरण लेख अतिशय पटला. . पण मला रेव्हुजीनच म्हणणं पटत. मान्य आहे सगळीकडे अराजकता आहे. पण तरीही मला माझा सन्मार्गाचा मार्ग सोडायचा नाही त्यामुळे दरोडे टाकायला जमणार नाही. बाकी लेख अतिशय अभ्यासू आहे आणि तुमची कळकळ पण पोचली
सुजा +१००० सुसंगती सदा घडो ,
सुजा +१०००
सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो या पंथातले आम्ही
त्यामुळे आजची स्थिती आम्हाला दयनीय वाटत नाहीए
नेहेमी आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती असणार्यांकडे पहावे
कसे?
आणि आपले संस्थानिक याहून वेगळे कसे होते?
@Kiran.. | 19 August, 2012 -
@Kiran.. | 19 August, 2012 - 20:09
>>हे एक प्रहसन आहे असं समजा. उपहासात्मक शैलीचा वापर केलाय. अशा वेळी जे सांगितलं गेलंय तेच सांगायचं होतं असा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरीही आशय पोहोचला असावा ही आशा आहे.<<
हातरुमाल, चादर, सतरंजी, गालिचा वगैरे वगैरे!
भगब, बगभ, मामाआका.
असो.
किरण काळजी वाटते
किरण काळजी वाटते रे,
आपल्यासारख्या माणसांनी अशी वाईट्ट वाईट्ट कामे करायची नसतात.
जे करताहेत, त्यांचा कान देवबाप्पा कापून नेणार आहे, माहितीय्येना ?
दिनेशदा छे ! आपण करायचंच
दिनेशदा
छे ! आपण करायचंच नाहीये ते. मात्र ज्यांना काहीही ऑप्शन राहत नाहीये त्यांना जगण्याचं ट्रेनिंग कसं मिळतं, प्रॅक्टीकल असणं म्हणजे काय, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलाय. आपण जे करतोय ते चूक कि बरोबर याचीही कित्येकदा संबंधितांना कल्पना नसते. बरेच मुद्दे नंतर प्रतिसादात घेण्यासाठी ठेवून दिलेत...
जगाच्या शाळेत शिकलेले असे
जगाच्या शाळेत शिकलेले असे किती जण यशस्वी होतात? त्यापेक्शा डिग्री घेवुन नोकरी हा सोयिस्कर मार्ग मध्यम वर्गीय शोधतात
आजकाल सोपा मार्ग म्हणजे देवुळ काढा आणि खोर्याने ओढा
सुयोग किती जण यशस्वी होतात
सुयोग
किती जण यशस्वी होतात हे महत्वाचं नाही. योग्य ते संस्कार न घडल्याने, नाईलाजाने जगाच्या शाळेत शिकावं लागल्याने गुणांबरोबरच जे अवगुण चिकटतात त्याला यशस्वितेची झालर चढते आणि त्याची परिणती दरोडे टाकण्यात होते..
>>आपण जे करतोय ते चूक कि
>>आपण जे करतोय ते चूक कि बरोबर याचीही कित्येकदा संबंधितांना कल्पना नसते. <<
अतिदानात बलिर्बद्धो, अतिमानात सुयोधनः
तुपफामा. माकारेभ.
मा. प्रशासक मी भास्कर यांना
मा. प्रशासक
मी भास्कर यांना समज देण्यात यावी.
http://www.maayboli.com/node/36811?page=3
इथे त्यांनी वाद निर्माण केलेला आहे. कृपया पहावे. माझी चूक असल्यास माझा आयडी ब्लॉक व्हावा.
भावना बोथट झाल्यात तरीही
भावना बोथट झाल्यात
तरीही कुठेतरी लागले सारे !
रे बापरे .. असं म्हणुन आता २
रे बापरे .. असं म्हणुन आता २ मि. हळहळणार.. तुझ्या लेखाला छान म्हणणार ... आणि मग परत आपल्या कामाला... परत येरे माझ्या मागल्या... साला मुर्दाड झालं आहे जिवन पार ... काही फरक पडत नाही आपल्या आयुष्यात >>>>>>>>>>>++++++++++१११११११११
मी भा दा सु आ ( मी भा
मी भा दा सु आ
( मी भा दामोदरसुत आहेत.)
किरण, अगदी खरंय! पण परिस्थिती
किरण, अगदी खरंय!
पण परिस्थिती बदलेल अशी स्थिती का कोण जाणे, दिसत मात्र नाही!
छान ... यात आणखीएक धंदा राहिला .... बाबा, बापू, महाराज होणे. त्या वरच्या लोकांच्या साखळीतच हेही लोक असतात>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मी २ वर्षांपूर्वीच ठरवलंय, साधारण ३०-३५ नंतर एक आश्रम काढायचा!
त्या लकी माता वगैरे असतात ना, तसला!
दरोड्या साठी लागणारी बौद्धिक कुवत आहे की नाही हे तपासून बघितलं नाहिये अजून..त्यामुळे हे आध्यात्मिक सोंग आणणं सोपं जाईल मला असं आत्ता तरी वाटतंय!
कोणाला भागीदारी मध्ये रस असल्यास संपर्क साधायला विसरू नका!
|| मी स्वतःच प्रसन्न||
>>Kiran.. | 20 August, 2012 -
>>Kiran.. | 20 August, 2012 - 10:43 नवीन
मा. प्रशासक
मी भास्कर यांना समज देण्यात यावी. हे चाणक्य हे याआधी ब्लॉक झालेले ड्युआयडी असावेत असा अंदाज आहे.<<
या पोस्टला माझे उत्तर असे आहे :
मा. प्रशासक,
किरण यांना दुसर्यांच्या आकलनशक्तीबाबत आणि कुवतीबाबत बेछूटपणे लिहिण्याची मुभा आहे काय? त्यावर मी प्रतिक्रीया दिल्यावर त्यांचा अहंकार दुखावला गेल्यामुळे ते माझ्याविरुद्ध आपल्याकडे तक्रार करत आहेत. मला समज देणार असाल तर त्यांनाही ती द्यावी अशी माझी आपल्याला विनंति आहे.
माझ्याकडून हा वाद मी थांबविल्याचे मी त्यांच्या विपुला उत्तर देतांना लिहिले असूनही ही तक्रार त्यांनी का केली ते त्यांचे त्यांनाच माहीत. तरीही माझ्याकडून मी आपल्याला जाहीर आश्वासन देतो की मी वाद थांबवला आहे.
कुणालाही ड्युआयडी ठरवले की बदनाम करता येते असा समज दिसतो. तेव्हा या आरोपाला किती किंमत द्यायची ते आपणच ठरवावे. मी मायबोलीवर वर्षभर तरी वाचकच होतो आणि इतरत्र लिहित होतो.
किरन हे येथे एस्टॅब्लिश्ड आय डी आहेत पण मी नवा आहे म्हणून फक्त मला समज देणे अन्याय्य होईल इतकेच माझे म्हणणे आहे.
कुणालाही ड्युआयडी ठरवले की
कुणालाही ड्युआयडी ठरवले की बदनाम करता येते असा समज दिसतो.
तुमच्या दोस्त लोकांनीच हे शस्त्र वापरायला सुरु केले.. आठवते का??? ते मास्तरे म्हणुन एक होते , ते नवा आय डी दिसला की हात धुवुन मागे लागायचे... मग स्वतःच्याच आय डी वर हात धुवून बसले...
मा. प्रशासक हा बघा किरण यांचा
मा. प्रशासक
हा बघा किरण यांचा मला आलेला विपु.
>>
Kiran..
20 August, 2012 - 10:50
व्यवस्थित मांडले होते हे कुणाला सांगताय ?
त्याला व्यवस्थित मांडले म्हणतात होय ? असो. ज्या माणसाला स्वतःची चूक दाखवून देऊनही समजत नाही अशा महामूर्खाशी मला यापुढे संवाद देखील ठेवण्यात रस नाही. पुन्हा माझ्या बाफवर दिसू नका.
<<
हे कुठल्या सभ्यतेत बसते हे तुमचे तुम्हीच ठरवा.
याला मी काहीच उत्तर देणार नाही कारण मी
तरीही माझ्याकडून मी आपल्याला जाहीर आश्वासन देतो की मी वाद थांबवला आहे.
हे आश्वासन आपल्याला दिलेले आहे आणि केवळ वाद वाढवायचा नाही म्हणून याला माझ्याकडून पूर्ण विराम दिलेला आहे.
निराशाग्रस्त आणि वैफल्यग्रस्त
निराशाग्रस्त आणि वैफल्यग्रस्त व्यक्ती ज्यांच्यापुढे कसलेही भवितव्य नाही हाच या लेखाचा विषय होता. त्याचं ज्वलंत प्रत्यंतर आता येत आहे.
...
...
Pages