डोळ्यामधे कुणाच्या आणू नकोस पाणी
सांगू नको जगाला माझी-तुझी कहाणी..
जर न्यायचेच होते सारेच न्यायचे ना
तू वादळा कशाला ठेवायची निशाणी..
एकांत पाहुनी ती घेते रडून आता
अन् माणसांत हसते माझी व्यथा शहाणी..
समजू नकोस साधे आहेत शब्द माझे
रक्तास जाळुनी मी लिहिलीत आज गाणी..
रे 'शाम' या जगाची बदलून रीत गेली
राधा न प्रेमवेडी मीरा नसे दिवाणी..
(माझा निरोप घेण्या येऊ नका मुक्याने
कोणीतरी गझल गा कोणीतरी विराणी)
,.................................................शाम



शामभाऊ, आवडलीच अगदीच
>>राधा न प्रेम वेडी मीरा नसे दिवाणी..
नव्या जगातलं विदारक सत्य
तोडलस् मित्रा
मस्त
ही गझलही आवडलीच. व्यथा शहाणी अधिकच आवडला. कोणीतरी गझल आ कोणीतरी विराणी हाही मस्त.
अ भि नं द न
छान गजल.... श्यामराव... मतला ज...रा ठासून पाहिजे होता. शहाणी, विराणी लाजवाब.
छान गजल---
कविवर्य मंगेश पाडगावकरांची गझल आठवली---
*
डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
--
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी
--
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
---
व्यवहार सांगती हा ही माणसे शहाणी
---
मी पापण्यात माझ्या ही झाकली विराणी
----किती साम्य ! व्वा राव....
शाम तुमच्या ग़झलेतली सहजता अतिशय प्रसंशनीय ..........अप्रतिम.
एकांत पाहुनी ती घेते रडून आता
अन् माणसांत हसते माझी व्यथा शहाण,,,,,आहाहा...खल्लास!
जर न्यायचेच होते सारेच न्यायचे ना
तू वादळा कशाला ठेवायची निशाणी..
(माझा निरोप घेण्या येऊ नका मुक्याने
कोणीतरी गझल गा कोणीतरी विराणी)
व्वा!! मस्तच शेर
एकंदरीत सगळी गझलच छान. मतला अजून उंचावायला हवा होता.
मंदार, मयूरी, बेफि, डॉक, अरविंद, उमेश, सुप्रिया आणि पाटील... खूप खूप आभार दोस्तांनो!!!
....................................................................................................
----किती साम्य ! व्वा राव....>>>> अरविंदराव कवाफी सोडता आशय पुर्ण वेगळा आहे असे मला वाटते..
....................................................................................................
पाटील, डॉक- मतल्या बाबत विचार करूया ... तुम्हीही कळवा.
धन्यवाद!!!
सुंदर गझल!!
विराणी, निशाणी फार छान!
गझलच छान
धमकीसाठी हे - उच्च, अलौकिक, अप्रतिम, वाह वाह !
आणि खरं हे - सुरेख. गझलमधलं शुन्य कळतं, पण आशय सुरेख. इतके साधे शब्द कि माझ्यासारख्या पामरांनाही शब्द न शब्द कळला आणि अजुनच भावली गझल. सोपं आणि तरीही इतकं सुंदर आणि अर्थपुर्ण लिहिणं जास्तच अवघड असेल ना. थँक्स !
वाह वाह वाह्..........सिम्पली सुपर्ब............
समजू नकोस साधे आहेत शब्द माझे
रक्तास जाळुनी मी लिहिलीत आज गाणी..
माझा निरोप घेण्या येऊ नका मुक्याने
कोणीतरी गझल गा कोणीतरी विराणी
<< ये बात..!
काय म्हणावे शाम?
सुंदर... अतीव सुंदर
विराणी बेहतरीन!!
आणि खरं हे - सुरेख. गझलमधलं शुन्य कळतं, पण आशय सुरेख. इतके साधे शब्द कि माझ्यासारख्या पामरांनाही शब्द न शब्द कळला आणि अजुनच भावली गझल. सोपं आणि तरीही इतकं सुंदर आणि अर्थपुर्ण लिहिणं जास्तच अवघड असेल ना. थँक्स !>>>>>> येस्स हीच भावना उमटली.
बाकी - शाम, नामही काफी है.......
डोळ्यामधे कुणाच्या आणू नकोस पाणी
सांगू नको जगाला माझी-तुझी कहाणी..
यातील आर्तता जाणवली.
गझल अप्रतिम आहे.
सुंदर गझल.
मनिमाऊ+१
सुंदर गझल.
मनिमाऊ+१ +१
फार फार फार सुंदर
बेस्ट्....आवडली गझल.
सुंदर गझल.
विराणी खासच.
अजयजी , आर, मनी, योगुली, बागुली, अमित, शशांक, जो, शोभा, विभा, प्रद्युम्न, विरु आणि नन्ना.....
आभारी आहे दोस्तांनो...!!!
.................................................शाम
अप्रतिम