पर्वा कुणास आहे???

Submitted by टोकूरिका on 20 November, 2011 - 23:29

हा खेळ आज सटवीने, मांडिला कशास आहे?
जाणून घ्यायचे ना, पर्वा कुणास आहे??

सरलीत सुखे मागे, जगणे भकास आहे,
येवोत लाख दु:खे, पर्वा कुणास आहे??

खंबीर या मनाला, शौर्याची कास आहे
ठाकले जग हे विरूद्ध, पर्वा कुणास आहे??

भवती काय घडले, चिंता जगास आहे,
संतप्त या मनाची , पर्वा कुणास आहे?

वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
डोळे जरी बोलकेसे, टोकू उदास आहे!! Sad

गुलमोहर: 

हिमतीने जगण्याची इच्छा कवितेत अनेक ठिकाणी प्रकट होतेय.
परंतु,
"टोकू उदास आहे!"
इथे अचानक मूड का बदललाय ते लक्षात येत नाही.

दक्स. Sad

उकाका, पूर्ण कवितेत लक्षात येइल की, कवयित्रीचे मन उदास आहे, त्याला हिमतीने जगायचे आहे, पण कुणालाही त्याच्या उदासीनतेची भनक लागलेली नाहीये, अन लागलेली असली तरी दुर्लक्षिले गेल्यामुळे खंबीर बनू पाहणारे मन पुन्हा उदासीनतेच्या गर्तेत ओढले जात आहे.

खंबीर या मनाला, शौर्याची कास आहे
ठाकले जग हे विरूद्ध, पर्वा कुणास आहे??>>>>>>>
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<कवयित्रीचे मन उदास आहे, त्याला हिमतीने जगायचे आहे, पण कुणालाही त्याच्या उदासीनतेची भनक लागलेली नाहीये, अन लागलेली असली तरी दुर्लक्षिले गेल्यामुळे खंबीर बनू पाहणारे मन पुन्हा उदासीनतेच्या गर्तेत ओढले जात आहे.
>>>>>>विरोधाभास वाटतो.
रचना सुंदर आहे,शेवट सकारात्मक असता तर कविता खुलली असती.
वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
डोळे जरी बोलकेसे, टोकू उदास आहे!!>>>>>>
वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
काळा टक्कर देण्या,टोकू तयार आहे!!

सरलीत लाख दु:खे जगणे भकास आहे
येवोत लाख दु:खे पर्वा कुणास आहे>> असेही एकदा वाचून पाहिले. अर्थात, आपण बदल वगैरे करू नयेत, सहज आपले मनातले मांडले Happy

@बेफी: तुम्ही सुचवलेला बदल पण उत्तम आहे. Happy धन्यवाद!
@बागेश्री: सटवी = सटवाई.

@संतु: कुणाला मनाच्या व्यथेची जाणीव नाही, म्हणून जगणे भकास आहे.
@किरणः धन्स!
धन्स मयुरी.

भिडेकाकांचा प्रश्न संयुक्तिक आहे पण आपले नंतरचे विवेचन पटले. अर्थात त्या विवेचनाची गरज नव्हती. काय वाटते हे वाचकाला वाटू द्यावे.

@पाषाणभेद: विवेचन देण्याचे कारण इतकेच की वाचकाचे शंकानिरसन व्हावे, व कवितेचा गाभा कळण्यास मदत व्हावी. हेमावैम.:)

वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
डोळे जरी बोलकेसे, टोकू उदास आहे!! >>> टोकु, सुंदर कविता ! Happy पण ही हतबलता कशासाठी ? अग, तुच म्हणतेयस ना,

खंबीर या मनाला, शौर्याची कास आहे
ठाकले जग हे विरूद्ध, पर्वा कुणास आहे?? >>> तरमग हतबल मनाला पुन्हा खंबीर बनव. निराशेची जळमटं झटकुन टाक आणि नव्या जोमाने, नव्या उमेदीने पुन्हा समर्थपणे उभी रहा ! Happy

@वनराई: जे घडतय त्याची पर्वा नसली, तरी हतबलता फक्त यासाठीच आहे की मनाचं दु:ख जाणणारे कुणी नाहीये.
प्रतिसादासाठी आभारी आहे लोक्स. Happy