भारता तील पान वीडा खाण्याची संस्क्रुती

Submitted by विवेक नाईक on 8 October, 2011 - 13:11

आपल्या सर्व संस्क्रुती मध्ये पानाला, वीड्याला विषेश महत्व दिलेल आहे. का ?

भारतात सर्व सार्वजनीक स्थानावर, ठीकाणी पानांची रंग रंगोटी बघुन तुम्हाला काय वाट्ते ?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पान वीडा खावून थुंकणारे बघीतले की त्यांच्या तोंडाप्रमाणेच गाल देखिल लाल करावेसे वाटतात. आजकाल तर हिस्ट्री, NGC चैनल्सवर भारतीय संस्क्रुती दाखवायची असल्यास सर्रास पान खाताना दाखवतात :राग . माझ्या ऐकीवात असल्याप्रमाणे मिठापान हा न थुंकता घाशाच्या आत ढकलता येतो. अस असेल तर थुंकण्याच्या पानावर बंदी का घालत नाहीत?
ज्याप्रमाणे मोटारसायकल चालवायची असेल तर हेल्मेट सक्ती केलेली आहे त्याप्रमाणे थुंकायचे पान/गुटका खाताना पिंकदाणी जवळ बाळगणे सक्तीचे केले पाहीजे

थुंकणे आणि पान खाणे यांचा तसा थेट संबंध नाही. पारंपारिक त्रयोदशगुणी विड्यातले
सर्व पदार्थ खाण्याजोगे असतात. त्यात थुंकण्यासारखे काही नसते. त्यातले काही पदार्थ
औषधी असतात. कंकोळ, काथ वगैरे पदार्थ गळ्यासाठी आवाजासाठी चांगले असतात.
पान, काथ व चुना हे तिन्ही घटक अल्कधर्मी असल्याने, भारतीय पारंपारिक जेवण
(जे आम्ल्धर्मी असते) पचण्यास मदतच होते. वेलची, बडीशेप सारख्या पदार्थाने वात
कमी होतो व मुखदुर्गंधी जाते.
पान खाण्याचा श्रुंगाराशी पण संबंध जोडलेला आहे. पानामूळे ओठ लाल होतात, व तो
सोळा श्रुंगाराचा भाग झाला. त्याने लैंगिक उत्तेजना येते, असाही समज होता.
पूजाविधीमधे पानसुपारी हे सृजनाचे प्रतीक असते.
पान बदनाम झाले ते त्यातल्या तंबाखुमूळे. तंबाखु भारतात दक्षिण अमेरिकेतून
पोर्तुगीजांनी आणला. तंबाखु गिळता येत नाही, तो थुंकून फेकावाच लागतो.
त्यामूळे दोष द्यायचा तो भारतीय संस्कृतीला नाही तर तंबाखूला.

दिनेशदांच्या पोष्ट शी सहमत.

थुंकणे आणि पान खाणे यांचा तसा थेट संबंध नाही. पारंपारिक त्रयोदशगुणी विड्यातले
सर्व पदार्थ खाण्याजोगे असतात. >> सहमत.

पान, विडा खाणारे रसीक मनाचे असतात. स्त्रि,पुरुष, विशिष्ट वयातील बालके कुणीही निर्दोष पानाचा स्वाद घेउ शकतात.

जेवणा नंतर एक मसाला पान जरुर घ्यावा.
चुना,कत्था,बडीशेप,धणा डाळ, सुक्या खोबर्‍याचा किस,गुलकंद, इलायची, लवंग्, चेरी, हवं असल्यास किमाम.

दिनेशदा, प्रसीक, चातक

सर्वानां Thanks !!

पान हे भारतीय संस्क्रूतीच अविभाज्य अंगच !! संपूर्ण भारतात पान खाण्यात् वापरले जाते.

मला नेहेमी असा प्रश्न पडतो की, ईतकी वेगवेगळी पाने उपलब्ध असता ना फक्त एका नागवेलीचेच पान का बरे आपल्या पुर्वजांनी निवडले ??

आताच्या संशोधना नुसार तोंडातील Bacteria चा व ह्रदय विकारांचा जव़ळचा संबंध आहे. ह्या Bacteria ची
लिस्ट सुद्धा मोठी आहे. जर ह्या Bacteria पासून व पर्यायाने ह्रदय विकारां पासून स्वता:ला वाचवायचे असेल
तर, दोन्ही जेवणानंतर व्यवस्थीत तोंड धुणे व Bacteriaचा आवर घालणे हे अगत्याचे आहे,
त्यासाठी काही लोक Mouth Wash चा उपाय सांगतात पण हा उपाय ईतका प्रभावी आहे का? जाणकारांच्या मते,
आता हे Mouth Wash प्रभावी असतील, पण येत्या काळात असू शकतीलच असे नाही.

आपल्या लोकानी ह्या तोंडातील Bacteria चा उ पाय हजारों वर्षां पुर्वीच देऊन ठेवला आहे. पान !!!

ह्या नागवेली च्या पानात असे काही गुण आहेत कि तोंडात Bacteria राहूच शकत नाहीत. अर्थातच हे सिद्ध
झाले आहे. पाना शिवाय असे काही पदार्थ आपण वापरू शकतो ज्याच्या संयुक्त वापरांनी तोंडातील
Bacteria वर कंट्रोल राहू शकेल. उ द पान् + लवंग + वेलची,

ता क : तोंडात Bacteria वर Mouth Wash वापरण्याचा सल्ला सर्व मानतील. पण भारतातील नाग वेलीचे
पान पण हेच काम करते हा मात्र जावई शोध !!

रच्याक, Mouth Wash मात्र ह्रदय विकारांशी संबंधीत असलेल्या Bacteria target साठी बनवलेलाच नव्हता.

स्त्रोतः माहीती जाल, वाचन आणी

http://www.ias.ac.in/currsci/jan102007/26.pdf

तोंडातील Bacteria चा व ह्रदय विकारांचा जव़ळचा संबंध आहे

हा कुठला बॅक्टेरिया? कुठला ।रुदय विकार? हार्ट अटॅक तर नक्कीच नाही.. बॅक्ट्रेरियल एन्डोकार्डायटिस नावाचा हार्टचा एक रोग तोंडातल्या बॅक्ट्रेरियामुळे होऊ शकतो, पण तेही काही विशिष्ट परिस्थितीत.. आणि तो इतका गंभीर असतो की नुसते पान खाऊन नक्कीच नाही भागणार.

पानामुळे जंतू मरतात तर मग पान खाणार्‍यांच्यामध्ये दात किडण्याचे प्रमाण कमी असायला हवे होते ना?

पान बदनाम झाले ते त्यातल्या तंबाखुमूळे. तंबाखु भारतात दक्षिण अमेरिकेतून
पोर्तुगीजांनी आणला. तंबाखु गिळता येत नाही, तो थुंकून फेकावाच लागतो.
त्यामूळे दोष द्यायचा तो भारतीय संस्कृतीला नाही तर तंबाखूला

दिनेशदा,
१००० वेळा अनुमोदन !
तुम्ही अगदी मनातलं बोललात !
आपने १००% की बात कही है !
Happy