- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
चालू घडामोडी
सदस्य प्रवेश |
२०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का?मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे. मग ते काय असेल ? तुम्हि हि कोणि काहि माहित असेल तर नक्कि सान्गा. खालि काहि लिन्क्स आहेत.
31 जुलै, 2008 - 21:49 Bhumika
|
|
कृपया खालीलप्रमाणे बदल करता येईल का?
२०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का?
|| हरि ओम ||
नक्किच . धन्यवाद
|| हरि ओम ||
पहिलि शक्यता भारतिय पन्डितानि सान्गितलाय कि २०१२ पासुन विध्वन्स सुरु होइल.( कशामुळे माहित नाहि)
नोस्ट्राडेमास ने सान्गितलाय कि २०१२ पासुन ३ रे महायुद्ध जोरात सुरु होइल, काळ अश्या काहि गोष्टि बघेल ज्या ह्या आधि कधिच्च पाहिल्या गेल्या नसतिल
माया संस्कृतींमध्ये म्हटलेय कि २०१२ ला प्रुथ्वि चा अक्श ( ऐक्सिस) बदलणार आहे ज्यामुले पुर, ज्वालामु़खि , वादळे निर्माण होवुन यत्र तत्र हा:हा:कार माजेल. मानव जातिचा नाश अटल आहे ( वेळ , काळ थाम्बेल कारन मकेन च्या म्हनण्यानुसार वेळ तरन्ग ( टाइम वेव ) शुन्यावर येवुन थाम्बतेय.
नक्कि काय असेल ते कळेलच.
अरेरे.. मला हे माहिती असतं तर उगाच गुंतवणुक वगैरे करायच्या फंदात पडलो नसतो.. चार्वाक स्टाईल यावत् जीवेत जगायला पाहिजे होते
काळाच्या तरंगलहरीने तिथे थोडी हलचल तरी माजेल...
प्रकाश हा लहरी आणि कण रुपात असतो (wave and particle) हे अभ्यासले होते.. आणि अवकाश हे (space) आपल्याला दिसणार्या तीन मिती आणि वेळ ह्यांच्या नुसार बदलते (आठवा आइन्स्टाईन).. पण वेळ ही तरंगाच्या माध्यमातून सिद्ध करता येते हे माहिती नव्हते.. ते स्ट्रिंग थेअरीवाले स्वतःच्या थेअर्या सिद्ध करायला ९, १०, ११ ते २६,२७ मितींपर्यंतची गणिते मांडत असतात.. कोण म्हणतं त्या एकमेकांभोवती गुंडाळल्या आहेत. कोणी म्हणतात की प्रत्येक मिती ही स्वतःभोवती वर्तुळाकार गुंडाळली आहे..
ही काळाची तरंगलहरी संकल्पना जरा ह्या आजकालच्या थेरॉटिकल फिजिसिस्ट ना सांगाल काय? नाहीतरी सध्या त्या क्षेत्रात जबरदस्त मंदी आलेली आहे आणि वेगवेगळे ग्रुप एकमेकांना 'कुणी टॅकिऑन घ्या, कुणी ब्रेन्स घ्या' असे टोमणे मारत आहेत
|| हरि ओम ||
इथे ते विज्ञान खुप छान पधतिने टोरेन्स मकेन ने विशद केले आहे.
स्वतःपुरते बोलायचे म्हंटले तर २०१२ साली मी ६९ वर्षाचा होईन. मला आत्ताच जगण्याची काही आवश्यकता वाटत नाहीये. तेंव्हा २०१२ मधे जग बुडले तरी मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही!
पण गेल्या ६५ वर्षात असे अनेकदा ऐकले होते की जग बुडणार! तसे काही झाले नाही. मला नोकरी करावीच लागली. कष्ट करावेच लागले. जग चालूच राहिले, महागाई वाढतच गेली. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटर नष्ट झाले. इराक, अफगाणिस्तान बेचिराख झाले. भारतात बाँब स्फोट होतच आहेत. मी अजून हिशेब करतोच आहे की इतके पैसे आहेत नि इतकी देणि आहेत, तर कसे करावे?
हे रोजचे प्रश्न मला जास्त महत्वाचे वाटतात. जग बुडायचे तेंव्हा बुडेल. त्याची काळजी मी करून काय होणार?
|| हरि ओम ||
पण गेल्या ६५ वर्षात असे अनेकदा ऐकले होते की जग बुडणार! तसे काही झाले नाही
भुमिका
झक्कि जगबुडि होइल हे नौस्ट्रदेमास ने सान्गितले कारण त्याने " सुनामि " पाहिले होते. आणि ते झाले.
त्याने सगळे जग नष्ट होइल असे नाहि म्हटलेय . जगातिल विध्वन्सा मधे ३/४ माणसे मरतिल. ( १ टक्क्का फक्त राहतिल )
इतकेच त्याने म्हटलेय
३/४ माणसे मरतिल. ( १ टक्क्का फक्त राहतिल)
; मग राहिलेले २४% कुठे जातील?
--- ३/४ म्हणजे ७५% मरतील
**३/४ म्हणजे ७५% मरतील ; मग राहिलेले २४% कुठे जातील?
****
हाच प्रश्न मलाही पडलाय्.बाकी अस काही होईल यावर माझा अजिबात विश्वास नाही
तसे काही झाले नाही. मला नोकरी करावीच लागली. कष्ट करावेच लागले. जग चालूच राहिले, >>>>>>>>>>>>>>
मला वाटते इथे ' स्वयंपाक घरात काम करावेच लागले ' हे वाक्य राहून गेलेय.
(संदर्भः_ झक्कींच्या आत्मचरित्रातून.....)
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
|| हरि ओम ||
**३/४ म्हणजे ७५% मरतील ; मग राहिलेले २४% कुठे जातील?
ते मलाहि माहित नाहि. पण हे २४ % नक्किच नशिब्वान असतिल . नवे जग नवे आयुश्य नवी इनिन्ग आणि जग शान्ति प्रेम आनन्द या वटेने चालु लागेल.
इथे मी फक्त ज्यानि ज्यानि हि ग्रुहितके मन्डलि आहेत त्यन्चे विचार लिहतेय. त्यात माझ्या मनाचे काहि नाहि बरे का. पण मला कुतुहल मात्र नक्कि आहे
भूमिकाताई, मी उत्तरपूर्व मेक्सिकोमधल्या आता नष्ट झालेल्या इंका संस्कृतीच्या पुस्तकातही जगबुडीबद्दल वाचले आहे. त्यात मात्र हे साल नाही. त्यात मोघम २, ३, ८, १ असे आकडे काढले आहेत आणि पुढे मोठे प्रश्नचिन्ह काढले आहे.

तसेच एक चित्रमालिकापण आहे. त्यात एक माणूस हरणाला मारताना दाखवून पुढे तो बुडताना दाखवला आहे. याचा अर्थ नॉन्व्हेज खाणारे सगळे बुडतील असा होतो, असे काही संशोधकांचे मत आहे. सध्या जगात व्हीगन चळवळ जोरात सुरु आहे याचे कारण हेच.
तसेच जे लोक सव्यसाची असतील म्हणजे डाव्या व उजव्या हाताचा वापर सारख्याच क्षमतेने करू शकणारे ते लोक प्रलय आल्यावर दोन्ही हाताने वल्हवतील आणि जिवंत राहतील असे पण त्या पुस्तकात आहे.
तसेच गाय हा प्राणी पवित्र असल्याने आणि शाकाहारी असल्याने टिकून राहील असेही इंकन लोक म्हणतात.
तसेच तेथे संस्कृत शब्दांमध्ये काही गूढ वाक्यं आहेत.
अग्नि:... ज्ञात... युद्धस्य कथा रम्या असे काही शब्द नीट ओळखू येतात पण बाकीचे अजून स्पष्ट व्हायचेत.
पण हे पुस्तक दुर्दैवाने आउट ऑफ प्रिंट आहे. आमच्या इथल्या लायब्ररीमध्ये याची एकच जुनी कॉपी आहे (ती इतकी जुनी आहे की ती मूळची इंका लोकांची कॉपी असावी, असे लोक विनोदाने म्हणतात.) त्यात मी हे वाचले. त्यात अजूनही थक्क करून सोडणार्या मजेमजेच्या गोष्टी आहेत. मी त्या इथे नक्कीच लिहिन. पण साल २०१२ नाही हे नक्की.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
माया बद्दल मीही वाचले. त्यांनी ब-याच शतकांबद्दल लिहुन ठेवलेय असे वाचले. बरीच शतके असल्यामुळे कुठेतरी लिहायची मर्यादा संपणारच ना? अगदी अगणित वर्षांचे कसे लिहु शकणार ते? म्हणजे जागा आणि मनुष्यबळ किती लागेल एवढे सगळे लिहायला? त्यामुळेच बहुतेक त्यांनी २०१२ नंतर आवरते घेतले असणार...
असो, काय होईल ते बघायला मला निश्चितच आवडेल. काय झालेच आणि सगळेच गेलो एकदम तर मग काय... हाय काय नी नाय काय्...
साधना.
(श्रद्धा - पुस्तकाचे नाव कळेल का?)
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
श्रद्धा, 'पृथ्वीवर माणुस उपरा' का? शरतशंद्र नाडकर्णी बहुतेक लेखक..
साधना, पुस्तकाची पहिली काही पाने गायब आहेत. त्यानंतर हे पुस्तक लायब्ररीबाहेर देणे बंद झाले.
टण्या, नाही. हे खूप जुने पुस्तक आहे. इंकांच्या संस्कृतीवर आहे. 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे अजूनही विकत मिळतं दुकानात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
नॉन्व्हेज खाणारे सगळे बुडतील असा होतो, असे काही संशोधकांचे मत आहे. सध्या जगात व्हीगन चळवळ जोरात सुरु आहे याचे कारण हेच.
खरच काय्????व्हेगन चळवळ याच्यामुळे जोरात आहे????
'पृथ्वीवर माणूस उपराच' हे अजूनही विकत मिळतं दुकानात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~ >>>>>>>>>>>>>>>
हे पुस्तक मला फारच भम्पक वाटले बुवा.....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
आमच्या इथल्या लायब्ररीमध्ये याची एकच जुनी कॉपी आहे (ती इतकी जुनी आहे की ती मूळची इंका लोकांची कॉपी असावी, असे लोक विनोदाने म्हणतात.) त्यात मी हे वाचले. >>>>>
आता त्याची झेरॉक्स काढने अथवा स्कॅनिंग करणे अगदी अशक्य आहे का? पण नाही लोक थोडे सुद्धा डोके चालवत नाहीत....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
मी पण एका ईन्का संस्कृती विषयीच्या पुस्तकात वाचले होते कि मुळात इन्का लोकांची ही वस्ती परग्रहावरून आलेल्या लोकांनी स्थापन केलेली होती. त्यातही २०१२ साल होते का नाही ते आठवत नाही पण ते असे असेल कि २०१२ हा शेवट असण्याचे कारण असे की परग्रहावरील ईतर रहिवाशांकडून किती तरी हजार वर्षे हा ग्रह म्हणजे पृथ्वी त्यांनी भाडेतत्वावर घेतली व ही लिज २०१२ साली संपणार. व त्या नंतर जगबुडी होऊन एक नवी वसाहत स्थापन होणार.
End of the world in 2012' असा गुगल शोध केला तर खंडीभर साईट्स मिळतात.
.
२०१२ पर्यंत जगले वाचले तर मी बाई भरपूर खाऊन पिऊन घेणार. (आठवा स्कायलॅब भारतावर कोसळणार अशी बातमी होती तेव्हा कश्या लोकांनी पुरणापोळ्या आणि वडे करून खाल्ले!)
|| हरि ओम ||
हे हे हे ! सहि आहे.
मज्जाच मजा. ममी पण माझे आवडते श्रिखन्ड खाणार
मी पण वाचतेय एक पुस्तक त्या प्रमाणे २०१२ पासुन ३ रे महायुद्ध जोरात सुरु होवुन महासन्ग्राम होइल असे म्हटलेय. त्यामुळे मला वाटतेय सर्वकष निकश हा असु शकतो कि प्रचन्ड मानवी सन्हार होइल आणि जे सात्विक / सदाचारि ( पापि नसलेले ) सद्गुनि सत शील लोके जगतिल ( बाकी आमच्यासारख्या पाप्यन्चे काहि खरे नाहि : ))
श्रद्धा व हवाहवाई,
आपल्या प्रतिक्रीया वाचल्या. त्यातल्या बर्याच मला चुकीच्या वाटल्या.
१. <<पण ते असे असेल कि २०१२ हा शेवट असण्याचे कारण असे की परग्रहावरील ईतर रहिवाशांकडून किती तरी हजार वर्षे हा ग्रह म्हणजे पृथ्वी त्यांनी भाडेतत्वावर घेतली व ही लिज २०१२ साली संपणार>>
माझ्या माहितीनुसार इंकांव्यतिरीक्त इतर कुठली जमात भाडेकरू नव्हती. कदाचित पोटभाडेकरू असतील. मग इतर लोकांचे काय?मूठभर भाडेकरूंसाठी त्यांनीही नष्ट व्हायचे का? तसंच या लीजचं नुतनीकरणही करता येऊ शकतंच. शिवाय पुनर्वसनाचं काय?म्हणजे उरलेले १/४ किंवा १% यांपैकी जे कुणी उरतील त्यांना परत या वसाहतीत राहता येईल का?
२. <<त्यात एक माणूस हरणाला मारताना दाखवून पुढे तो बुडताना दाखवला आहे. याचा अर्थ नॉन्व्हेज खाणारे सगळे बुडतील असा होतो, असे काही संशोधकांचे मत आह<<>
अमेझॉनच्या जंगलात राहून डॉ. लिझा मार्शमेलो यांनी सुमारे २० वर्षं संशोधन केलं आहे. त्यांच्या मते या जंगलात राहणार्या लोकांसाठी हरण, तरस हे प्राणी खाणारी लोकं शाकाहारी असतात. आपल्याकडे नाही का बंगाली लोक समुद्रभाजी म्हणून मासे खात, त्यातलाच हा प्रकार. थोडक्यात इंका जमात व अमेझॉनच्या लोकांच्या विचारसरणीत खूप फरक आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे?
आपण मांसाहारी लोकांबद्दल थेट विधान केले, पण हरीण वगैरे प्राणी खाल्ले की मांसाहाराचे पाप बोडखी बसते याची कल्पना नसलेल्या त्या अजाण अमेझॉनवासीयांना पण बुडावे लागेल का?
३. <<अग्नि:... ज्ञात... युद्धस्य कथा रम्या असे काही शब्द नीट ओळखू येतात पण बाकीचे अजून स्पष्ट व्हायचेत.>>
इंका जमात ही बरीचशी शांतताप्रिय होती. गुलाबपुष्पाला तर त्यांच्या संस्कृतीत प्रचंड महत्त्व होतं. ही लोकं युद्धकथा आवडून घेतील असं वाटत नाही.
४. <<गाय हा प्राणी पवित्र असल्याने आणि शाकाहारी असल्याने टिकून राहील असेही इंकन लोक म्हणतात.>>
हे चूक. गाय हा प्राणी आपल्यासाठी पवित्र आहे. त्यांच्यासाठी हरीण हा प्राणी पवित्र होता. त्यांच्या एका सणाला हरणाची पूजा व्हायची. शिवाय ' e um engana' या पुस्तकाच्या अनुवादात मी वाचलं आहे की हरणीचं दूध हे या लोकांत अतिशय पवित्र व पौष्टीक असल्याचा समज आहे.
आपण २, ३, ८,१ या आकड्यांबद्दल बोललात ते बरोबर आहे, हे आकडे जुळवून १८३१, १३८१, २३८१, २८३१ अशी विविध सालं तयार करता येतात.
नॅनोटेक्नॉलॉजी वापरून 'भविष्यात नेणारी यंत्रं' तयार करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. तेव्हा २३८१, २८३१ या सालांबद्दल आपल्याला माहिती मिळू शकेल.
चिन्मय ते पुस्तक e um engana नसून e om engana आहे. आपल्या ओम चा मूळ उगम सुर्यपूजक इन्का लोकांपासून झाला हे त्या वरचे भाष्य तू प्रस्तावनेत वाचले नाहिस का?
HH, मला नाही वाटत लीजचे काही प्रकरण असेल. कारण जर जगबुडी होणार म्हणतात तर त्यांच्यासाठी मनुष्यप्राणी इतका हीन आहे का की मनुष्यजात नष्ट केल्यावर ते पृथ्वी पाण्याने धुवून घेतील?
.
गुलाबपुष्पाला तर त्यांच्या संस्कृतीत प्रचंड महत्त्व होतं.>>>>>>>
चिनूक्स, शांततेचा संदेश हे पांढर्या लिलीचे फूल देते. गुलाबपुष्प हे प्रेमाचे प्रतीक आहे. मुळात गुलाबपुष्प प्रेमाचे प्रतीक ही गोष्ट जुन्या ऍझटेक संस्कृतीतली. आणि तेव्हा या संस्कृती बर्याचशा एकमेकांशी संपर्क राखून होत्या. त्यामुळे प्रत्येक संस्कृतीत थोड्याफार फरकाने तेच तेच संकेत सापडतात.
'Everything is fair in love and war' असे जिथे प्रेमाबद्दल म्हटले जाते आणि त्याची तुलना युद्धाशी केली जाते, याचा अर्थ स्पष्ट आहे. इंकन लोक हे सगळ्याच बाबतीत लढाई करायला सदैव तयार होते; असे दिसून येते.
.
२,३,८,१... चा अर्थ थोडा गूढ आहे. काही संशोधकांच्या मते हा एक क्लू असावा. २ मार्च १९८१ ला जगात काहीतरी महत्त्वाचे घडले आहे ज्यातून भविष्याचे संकेत मिळतील. पण ते काय आहे हे दुर्दैवाने अज्ञात आहे. अजूनतरी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
>>>> २,३,८,१... चा अर्थ थोडा गूढ आहे. काही संशोधकांच्या मते हा एक क्लू असावा. २ मार्च १९८१ ला जगात काहीतरी महत्त्वाचे घडले आहे ज्यातून भविष्याचे संकेत मिळतील. पण ते काय आहे हे दुर्दैवाने अज्ञात आहे. अजूनतरी!
>>>>>
काही अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते ते २ मार्च नसुन ३ फेब्रुवारी आहे
टण्या, त्याकाळात तारखांची एकच पद्धत अस्तित्त्वात होती असे 'e um engana' या चिन्मयने नमूद केलेल्या पुस्तकात लिहिलेले आहे. त्यामुळे तो दिवस २ मार्चच.
या पुस्तकातले 'Bonding with other civilizations' नावाचे प्रकरण वाच. त्यात त्या वेळची कालगणना, इंकांचे कॅलेंडर आणि तारखा लिहिण्याची पद्धत सगळे तपशीलवार लिहिले आहे.
.
चिन्मय, हरणाचा मुद्दा बरोबर आहे. पण गायीलाही पवित्र मानले आहे. हरणांना मारूनही खात असत.
हरीण हा मुळात नाजूक प्राणी आहे. तो प्रलयात टिकून राहील, असे इंकांना मुळीच वाटत नव्हते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
२०१२ असे तर्कवितर्क करेपर्यन्त येईलसुद्धा.
ही सगळी पुस्तके कुठे मिळतात ते प्लीज सांगा. उत्सुकता खुप वाढली...
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
मुळात इन्का लोकांची ही वस्ती परग्रहावरून आलेल्या लोकांनी स्थापन केलेली होती. >> हो हो हे एकदम बरोबर आहे. पुराव्यादाखल उत्साही वाचकांनी Alien Vs Predator हा सिनेमा पाहावा. तो सत्य घटनांवर आधारीत आहे असे सुरूवातीलाच सांगितले आहे.
......
हरणाचा मुद्दा बरोबर आहे. पण गायीलाही पवित्र मानले आहे. हरणांना मारूनही खात असत.>> तुम्हा दोघांचा काहितरी गैरसमज होतोय. "तो" उल्लेख गाय किंवा हरणाचा नसून नीलगायीचा आहे. ना पूर्ण हरण ना पूर्ण गाय, ती नीलगाय.
......
ashbaby, e om engana हे पुस्तक असे सहजासहजी कोणालाही कधीच मिळत नाही. ज्यांचा २,३,८,१ ह्या आकड्यांशी संबंध आहे त्यांनाच ते मिळू शकते. (कसला संबंध ते मला विचारू नका. मला अजूनही पुस्तक मिळालेले नाही. मायबोलीकर चाफ्याला मिळालेले होते असे मी ऐकलेय आणि ते वाचल्यानंतर त्याने माझे "आठवी कथा" - परत आठ आकडा - हि त्यावर आधारीत कथा लिहिली होती)
e om engana हा अपभ्रंश असुन, त्या पुस्तकाचे मूळ नाव हरि ओम गणगणा असे आहे (गणगणा हे गणगण गणात बोते ह्यावरुन).. पुढे इंका लोकांनी त्याचा e om engana असा अपभ्रंश केला.. भारतीय संस्कृती त्याकाळी एव्हडी विस्तृत पसरली होती की दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया, झालेच तर दक्षिण तसेच उत्तर ध्रुवावर देखील भारतीय संस्कृतीची निशाणे दिसतात.. हवाई ह्या पॉलिनेशियन बेटांपैकी सर्वात पूर्वेच्या बेटाचे नाव हवाहवाई नावाच्या भारतीय शब्दावरूनच पडलेले आहे..

हे पुस्तक मला मिळणार होते कारण माझा जन्म १९८२ (म्हणजे १, ३ चा वर्ग ९, २ आणि ८) अश्या तर्हेने १,२,३,८ ह्या चारही आकड्यांशी निगडित होता.. परंतु मायबोलीवरील काही तर्ककठोर माणसांनी त्यात खोडा घातला कारण त्यांच्या मते ३ चा वर्ग करताना २ हा आकडा आधीच वापरला गेला होता...
असाम्या, ती नीलगाय नाही काय.. तो ल्लामा.. हा पेरु (बघा भारतीय संस्कृतीचा प्रभाव.. ह्या देशाचे नाव देखील भारतीय पेरु ह्या शब्दापासून) नावाच्या देशात सापडतो.. तिकडचा उंटच म्हणा की.. इंका लोक दळवळणाचे साधन म्हणुन ह्याचा उपयोग करत असत.. ते लोक ह्याच प्राण्याचे दूध पीत असत.. वरती उल्लेखलेल्या चित्रात हरणारा मारणारा माणुस नसुन तो ल्लामाला मारणारा माणुस आहे...
>>>>>>>>>>>>
मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
परंतु दक्षिण-मध्य-पश्चिम आफ्रिकेतील जंगलांमध्ये राहणार्या इंबुट्टु (Mbumbuttueue) नावाच्या एका अतिअर्वाचीन जमातीनुसार २०१२ हे साल दशांशा नंतरचा आठवा आकडा ध्यानात न घेतल्याने आलेला आहे.. अचूक आकडेमोडीनुसार ते साल २०१३ असे आहे.. २०१३ साली होणार्या व केवळ दक्षिण धृवावरुन दिसणार्या खग्रास सुर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीचा नाश होईल.. ह्याच संकल्पनेवरून धर्मेंद्रचा जलजीरा (की असाच काहीतरी नाव असलेला) चित्रपट बनवला गेला होता ज्यामध्ये खग्रास सुर्यग्रहणाच्या दिवशी हिमालय दुभंगून त्याच्या पोटातील सोन्याची शंकराची पिंड झळाळू लागते.. पण कोत्या मनाच्या भारतातल्या लोकांनी, हा चित्रपट म्हणजे ग्रेगरी पेक ह्या अभिनेत्याचा 'मकाण्णाचे सोने' ह्या इंग्रजी चित्रपटाची भ्रष्ट नक्कल आहे असा आरडाओरडा केला..
थोडक्यात इंका जमात व अमेझॉनच्या लोकांच्या विचारसरणीत खूप फरक आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे?
यावर माझे मत असे आहे:
'डोंबल तुमचे!! लग्नाला एव्हढी वर्षे झाली, माझ्या नि सौ. च्या विचारसरणीत काय फरक आहेत तेहि कळत नाही. कुठले इंका नि अमॅझोन??'
असो. पण 'सर्व' संस्कृतींमधे भारतीय संस्कृति पण आहे. तर त्यातल्या कुठल्या ग्रंथात याबद्दल काही लिहीले आहे का? कुणि आहेत का आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणारे? अर्थात् त्यात लिहिलेल्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार? कुणा गोर्या माणसाने दारूच्या धुंदीत काहीतरी लिहीले की त्यावर उलट सुलट चर्चा होणार! हं! कदाचित् कॅनडा किंवा जर्मनीत सापडतील. चौकश्या केल्या पाहिजेत.
Eric von Daniken या माणसाने एक पुस्तक लिहीले होते. त्यात त्याने असे म्हंटले होते की दक्षिण अमेरिकेत परग्रहावरून लोक येऊन राहिले होते. नंतर त्याच्या मुद्द्यांचे खंडन करणारीहि पुस्तके प्रसिद्ध झाले होते.
हे २०१२ सोडा, पण तुम्ही जयंत नारळीकरांचे 'यक्षांची देणगी' हे १९९३ मधे प्रकाशित झालेले पुस्तक वाचा. एकाहून एक सरस कथा! नि काय काय कल्पना? दोरीला गाठ मारून दोरीची लांबी जशी कमी करतात, तसे कुणा परग्रहावरील लोकांनी रस्त्यालाच 'गाठ' मारून दोन ठिकाणातले अंतर कमी केले!
यावर माझे मत असे आहे:

'डोंबल तुमचे!! लग्नाला एव्हढी वर्षे झाली, माझ्या नि सौ. च्या विचारसरणीत काय फरक आहेत तेहि कळत नाही. कुठले इंका नि अमॅझोन??'
>>>>>>>>
'डोंबल तुमचे!! लग्नाला एव्हढी वर्षे झाली, माझ्या नि सौ. च्या विचारसरणीत काय फरक आहेत तेहि कळत नाही. कुठले इंका नि अमॅझोन??' >>> ROFL... Classic Zakki!!!
टण्या व असामी,
तुम्ही लोक जगबुडीला थट्टा समजत आहात, असे माझे मत बनत चालले आहे. नीलगाय काय नि ल्लामा काय? ती चित्रमालिका स्पष्ट आहे. ते हरीण आहे. हरणाला ते पवित्र मानत, आणि त्याचे मांस प्रसाद म्हणून खाल्ल्यास देव त्यांच्यावर कृपा करेल अशी त्यांची श्रद्धा होती. इंका लोकांनी बटाट्याच्या दोनशे जाती शोधून काढल्या होत्या. प्रत्येक वर्षी एका जातीचा बटाटा असे पीक ते घेत असत व पहिला बटाटा तयार झाला की हरीण व बटाट्याचा स्ट्यूसदृश पदार्थ ते त्यांच्या 'माचू पिचू' पठारावरील देवाला नैवेद्य दाखवून ग्रहण करत.
आणि ते पुस्तक लायब्ररीत उपलब्ध असेल तर कुणालाही मिळते. त्याचा त्या आकड्यांशी काहीएक संबंध नाही. ते आकडे म्हणजे २ मार्च १९८१ हा दिवस. त्यावेळेस मी काही महिने वयाची असल्याने मला त्यादिवशी नक्की काय झाले ते ठाऊक नाही. पण काहीतरी नक्कीच महत्त्वाचे झाले आहे. भविष्यातले स्पष्ट संकेत त्या गोष्टीमुळे मिळत आहेत व पुढेही मिळणार आहेत.
महिन्यातल्या पाचव्या शनिवारी जांभळे कपडे घालून हरीणाची पूजा करून लायब्ररीत गेल्यास हे पुस्तक मिळण्याची शक्यता वाढते.
हरीण नसेल तर हरीणाचे चित्र चालेल. मात्र त्या दिवशी बटाटा चिरू नये.
टीप : जांभळे कपडे हरीणाला नव्हे, आपण घालायचे आहेत.
.
लक्षात घ्या :
३ = पृथ्वीचा सूर्यमालेतील पत्ता
८ - १ = ७ = जांभळ्या रंगाचा इंद्रधनुष्यातील पत्ता
२ = शनिवारचा सप्ताहातील पत्ता (इंका मोजणीनुसार)
टीप : जांभळे कपडे हरीणाला नव्हे, आपण घालायचे आहेत.>> हे स्पष्ट केल्यामूळे बरे झाले. हरणाचे माप कसे घ्यायचे ह्याचा विचार करत होतो मी.
श्र तूला पुस्तक वाचायला मिळाल्यामूळेच तुला "ते कोणालाही मिळते" असे वाटतेय. किंबहुना पुस्तक वाचल्यामूळेच तूला "माता" हि पदवी प्राप्त झाली आहे ह्याचा तूला विसर पडला आहे. ह्या घोर पातकाबद्दल तूला mummy 3 Theatre मधे जाऊन बघावा लागेल असे मला वाटते. ह्यावर उ:शाप म्हणून तू दोन दिवस हरणाच्या कापड्याचे कपडे घालून २,१,८ ह्या आकड्याएव्हढे जांभळे बटाटे खा नि लामाचे दूध पी.
जिवतीच्या चित्राप्रमाणे, हरणाचे चित्र कुठे मिळु शकेल काय?
नेमस्तक, हितगुज खरेदी पृष्ठावर 'इंकाच्या हरणाचे पूजेचे चित्र' खरेदी करण्याची सोय उपलब्ध करुन देता येईल का? हरणाच्या चित्रासोबत जांभळा वेष मोफत अशी योजना देखील सुरु करता येईल..
>>
स्वाती, तो रंग जांभळा नसून किरमिजी असाअवा असे माझे मत आहे.. कारण किरमिजी रंग हा, 'हातीमताई' नावाच्या अश्याच अतिशय गूढ व मूलभूत पुस्तकात अनेक वेळा येतो (उदा: हातीमताईने विहिरीत उडी मारली. मग त्याला प्रथम पिवळ्या रंगाचे उद्यान लागले. मग लाल रंगाचे. मग हिरव्या आणि शेवटी तो एका किरमिजी रंगाच्या उद्यानात पोचला. तिथे एक सुंदर राजकन्या हरणाची पूजा करत होती).. हातीमताईची कथा मी वर उल्लेख केलेल्या इंब्बुट्टु समाजात अतिशय लोकप्रिय होती..
तिथे एक सुंदर राजकन्या हरणाची पूजा करत होती >> नक्की हरीण होते कि ल्लामा रे ? आणि किरमिजी रंगाचे होती का ? राजकन्येने कुठल्या रंगाचे कपडे घातले होते ? जांभळ्या ?
सगळे details लिही रे. Devil is in the details.
असामी, डिटेल नीट वाच.. ल्लामा हा इंकांचा पूज्य प्राणी.. हरीण हे इम्ब्बुट्टू लोकांचे दैवत.. हतीमताई हा इम्ब्बुट्टुंचे आवडते पुस्तक.. आणि किरमिजी रंग हा हातीमताईचा आवडता रंग..
राजकन्येने कपडे घातले होते की नव्हते ह्याबद्दल महान महान पंडितांनी संशोधन केले परंतु त्यांना ह्यात यश आले नाही (त्यातले काही पंडित मग गाढवांना हरिण समजून त्यांचा अभ्यास करु लागले तर गाढवांनी त्यांना लाथा घातल्या)... आता जिथे कपड्यांबद्दलच संधिग्दता आहे तिथे रंग कुठुन कळणार!
हे सगळे वाचल्यावर मला वाटतेय कि जांभळ्या रंगाच्या नीलगायीला हरीण म्हणतात नि किरमिजी रांगाच्या नीलगायीला ल्लामा.
नाही, मला तर असं वाटतंय की कपडे घातलेल्या राजकन्येला हातीमताई म्हणत असावेत. (नाहीतरी पुरुषाला कशाला ताई म्हणतील?)
नाहीतरी पुरुषाला कशाला ताई म्हणतील? >>
आता पुरुषाला लामा (दलाई लामा) म्हणतात तर ताई का नाही चालणार ? 
विषय फार भरकटत चालला आहे.
मी आज कालनिर्णय ऑफिस मधे चौकशी केली तर त्यांनी पण सांगितले की फक्त २०१२ साल पर्यंतच्याच कालनिर्णयची त्यांनी तयारी केली आहे.
ही इंका संस्कृती इतकी प्रगत होती की त्या काळी त्यांनी संगणकीकृत बँका स्थापन केल्या होत्या.. आणी त्या बँकांचा setup आपले मायबोलीकर विनयदेसाई यांच्या पुर्वजांनी केल्याचे वाचल्याचे स्मरते.. पुस्तक सर्वत्र उपलब्ध!
स्वातीताई, तुम्हीसुद्धा गमतीत असे मूळ विषयापासून भरकटावे ना?
मुळातला मुद्दा जगबुडी आहे. त्यात इंकांच्या पुस्तकाचा संदर्भ मी दिला. तर टण्या, असामी व तुम्ही हातिमताई नाव असलेल्या राजकन्येच्या कपड्यांविषयी बोलायला लागलात. हे योग्य नाही. चर्चा मुद्द्याला धरून व्हायला हवी. तुम्ही २,३,८,१ विषयी दिलेली माहिती मात्र रंजक आहे.
.
नात्या, तुम्हाला नक्की माहीत आहे का? कारण 'e um engana' या पुस्तकात तसा काहीच उल्लेख नाही. हे पुस्तकही इंका संस्कृतीबद्दल उपलब्ध असलेल्या पुस्तकांपैकी एक मुख्य पुस्तक समजले जाते. (दुसरे आमच्या इथल्या लायब्ररीमधले!)
.
असामी, माझे पोस्ट कृपया पुन्हा वाचा. नीलगाय कुठेही नाही. त्याकाळात नीलगायीची प्रजात निर्माण व्हायचीच होती. इंका संस्कृतीमध्ये केवळ चार प्राणी वर्णिलेले आहेत ते म्हणजे वाघ, चित्ता, हरीण आणि सांबर. दोन मांसाहारी तर दोन शाकाहारी. इंकांच्या संस्कृतीत हा बॅलन्स आधी होता तेव्हा ते जगज्जेते होते. नंतर चित्त्यांनी अमाप हरणे खाल्ली तेव्हा माचू पिचू डोंगरावरच्या देवाचा कोप होऊन इंका नष्ट झाले.
माचू पिचू विषयी अधिक माहिती विकिपीडियावर मिळेल.
.
एच्चेच, तुझं बरोबर आहे पण कालनिर्णय वाले माया संस्कृतीवर जास्त हवाला ठेवतात. याउलट संशोधकांच्या म्हणण्यानुसार इंकांचे गणित जास्त बरोबर होते. त्यामुळे ते साल २०१५ येते. जून महिना.
>>'मकाण्णाचे सोने'
आणि इतर प्रतिक्रिया!!