हमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं. लेखनशैली खुप छान आहे. त्यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही अशीच खिळवून ठेवते. खुप डिप्रेसिंग आहे कथानक. पण वास्तव आहे ते..
गोनिदांचं 'कहाणीमागची कहाणी' वाचत आहे सध्या. मला आवडलं. ज्यांना गोनिदांचं लिखाण आवडतं त्या सर्वांना आवडेल. जे कुणी कथालेखन करतात त्यांनी सर्वांनी जरुर वाचा.
झुंपा लाहिरी च्या unaccoustomed earth मधल्या पहिल्या ३ गोष्टी वाचल्या...
नेमसेक ने वाढवलेल्या अपेक्षा पारच धुळीला मिळाल्या.... खूपच सामान्य वाटलं मला तरी...
सरी , मागच्याच महिण्यात वाचल मी "कुणा एकाची भ्रमणगाथा" .. बरचस डोक्यावरुन गेलं . आता परत वाचणार आहे . सध्या वंशवेल , आहार्-विहार, डायट हे वेड लागलय , वंशवेल खरच खुप माहीती देणारं आहे .
~Do u know who is the best couple in the universe? SMILE and TEARS.
Rarely they meet, but if they meet that will be the most gorgeous moment ever! ~
दीपु, डाएट वगैरे विषयांबद्दल बोलुन (म्हणजे नुसतच बोलुन) आ बैल मुझे मार करणं सोडलयं रे मी सध्या.. भ्रमणगाथा मात्र हळूहळू कळत आणि चढत जातं. परत एकदा वाच निवांत.
इथल्या पोस्टांनी प्रभावित होऊन मी पण गौरी देशपांडेंची आहे हे असं आहे.. आणि गोफ वाचली. आवडली. पारायणं करावीत अशीच!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ
बिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ
१) आहे हे असे आहे
२) एकेक पान गळावया
३) दुस्तर हा घाट
४) विंचुर्णीचे धडे
५) उत्खनन
६) थांग
७) मुक्काम
८) तेरुओ आणि काही दुरपर्यंत
९) चंद्रीके गं सारीके गं
१०) निरगाठी
११) And pine for what is not.. (हे पुस्तक 'आहे मनोहर तरी.. ' या सुनिताबाईंच्या पुस्तकाचा अनुवाद आहे.)
१२) The Lackadaisical Sweeper (ह्यातील बर्याचशा कथा 'आहे हे असे आहे' मधे आहेत.)
१३) Diary Of A Decade Of Agony (हे पुस्तक अविनाश धर्माधिकारी ह्यांच्या 'अस्वस्था दशकाची डायरी' या पुस्तकाचा अनुवाद आहे.
१४) Transalation of Richard Burton's "Arabian nights"
१५) Between the Births (हा त्यांचा काव्यासंग्रह आहे)
अन्य वाचलेले लेख (तुम्ही जर त्यांचे लेख इतर कुठे वाचले असतील तर लेखांची नावे लिहावीत):
१) हीशेब (बापलेकी मधे आहे)
२) भिजत भिजत कोळी
३) नव्या दंतकथा
४) दार
५) धरलं तर चावतं
६) निर्झर (शशी देशपांडे ह्यांच्या एका कथेचा अनुवाद)
दुस्तर हा घाट आणि थांग ह्या दोन्ही एकाच पुस्तकात आहेत.
.
गौरी मनातली हे गौरीच्या पंख्याना आवडेल असे आहे. गौरी गेल्यावर त्यांच्या गोतावळ्यातील कुणी-कुणी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. बहुतेक अशा पुस्तकासाठी म्हणुन ते लेख विषेश लिहुन घेतले आहेत.
.
कुठल्या तरी दिवाळी अंकात तिचे शेवटचे काही लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यात चोरी वर एक गोष्ट होती.
एकाच पुस्तकात दोन भाग आहेत. पहिल्या भागात त्यांच्याविषयी लेख आहेत. दुसर्या भागात त्यांच्या पुस्तकांचं समीक्षण. सगळंच कौतुक नाही. आणि शिवाय त्यांच्या दोन मुलाखती.
संपादन विद्या बाळ आणि वंदना भागवत यांनी केलं आहे.
हो. ही सगळी मिळुन सार्याजणींची टीम. गौरीताई गेल्यावर एक विशेषांक काढला होता मिळुन सार्याजणी मासिकाचा. त्या वरुनच ह्या समग्र गौरी ग्रंथाची कल्पना सुचली.
अनंत सामंतांचं 'एक ड्रीम्...मायला....' वाचलं. पुस्तक बरं आहे. एकदा वाचण्याजोगं. भाषा अगदी आजच्या तरूण पिढीला (सर्वच नाही, पण काही) आवडेल अशी आहे, बेदरकार शिव्या,सवंग शब्द आणि वाक्य. पण पुस्तक एकदा हातात घेतलं की पुढे काय होईल ही उत्सुकता, पुस्तक खाली ठेऊ देत नाही.
खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. !
शवटची साधारण १७५ पानं एका बैठकीत संपवली...
अफगाणिस्ताना बर्फ पडतो हे मला माहितच नव्हतं.. ! आणि जे काही टिव्ही/ पेपर मधे पहिले आहे त्यावरून तरी तिथे हिरवळ, डाळींबाची झाडं वगैरे अस्तिल असं वाटतं नाही..
नेमसेक मधे असे विशेष आहे तरी काय.. मला तर ते पुस्तक, खास करून त्याचा शेवटं एकदम रटाळ वाटला. >>> मी मुव्ही आणि पुस्तक एकामगोमाग एक वाचल्याने मला आवडलं.. एकूण त्यातले बारकावे आणि प्रसंग उभा करायची शैली आवडली मला...
Submitted by sandeep_chitre on 8 ऑगस्ट, 2008 - 14:10.
>> खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. !
अनुमोदन ! काईट रनर मलाही आवडलं खूप. कॅलिफोर्नियात खूप अफगाण आहेत हे तरी कुठे माहिती होतं ? !!!
काईट रनर मी २ वर्षापुर्वी वाचले होते. मला खुप आवडले होते. त्या नंतर त्याच्यावर काढलेला सिनेमा पण बघितला या वर्षी.
सिनेमा इतका नाही आवडला. पुस्तक मात्र नक्कीच वाचायला हवे.
मला वाटते आधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.
दाविंची कोड बाबत पण असेच झाले
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs
आधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.>>>
अनुमोदन रुनि. क्लासिक उदाहरण- हॅरी पॉटर!
पुस्तकाच्या दुनियेत आपण हरवून जातो इतकं डीटेलिंग असतं, सिनेमात नाही म्हणलं तरी विस्तारभयामुळे त्यांना सगळंच दाखवता येत नाही. परत प्रत्येकाला पुस्तक वाचताना त्याची त्याची स्वतःची दुनिया उभारता येते, सिनेमा नाही म्हणलं तरी दुसर्या कोणीतरी केलेला असतो!
आदमा, देर आये दुरुस्त आये
आशा बगेंची पारितोषक विजेती 'भूमी' वाचली. अस्वस्थ करून सोडते. काय रंगवली आहे नायिका आणि तिचं आयुष्य!
--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..
काईट रनर वर अधारित सिनेमाचं नाव काय आहे?
मी ही साधारण ६ महिन्यांपूर्वीच वाचलं पुस्तक, मला जाम डिस्टर्बिंग वाटलं.
.
नुकताच मी व्हिकी बामच्या फेमस कादंबरीचा अनुवाद वाचला.... 'मेन नेव्हर नो'
खरं सांगू तर काहीच अर्थबोध झाला नाही. कथा आहे त्यात मोजून २ ते ३ प्रसंग आहेत, ते वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून आपल्या समोर मांडले आहेत. कथा तर मला कळली. पण त्यातून लेखकला काय मेसेज द्यायचा आहे ते काही कळलं नाही.
तुमच्यापैकी कोणी वाचलं असेल तर मला जरूर सांगा...
पुन्हा एकदा.. एक उत्कृष्ट पुस्तक सुचविल्याबद्दल तुमचे आभार!
व्यासपर्व वाचलं.. इतके दिवस आपण जी गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहत होतो तीच गोष्ट जर एखाद्या प्रिझम मधून पाहिली तर मधेच त्यातले सप्तरंग दिसू लागतात!! तस्सं वाटलं हे पुस्तक वाचताना.. ज्यांना महाभारतातल्या व्यक्तिरेखांमधे रस आहे त्यांनी हे जरूर वाचा.. गुणांमधले दोष आणि दोषांमधले गुण सापडतील... त्यांच्या एकलव्य, कर्ण आणि दुर्योधनाला तोड नाही!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!
Submitted by sandeep_chitre on 12 ऑगस्ट, 2008 - 10:26.
अश्विनी -- 'व्यासपर्व' ची नोंद करून ठेवलीय .. पुढच्या भारतभेटीत घेईन म्हणतो !
------
इथे कुणी 'तमाच्या तळाशी' वाचलं आहे का ?
एक खूपच वेगळा विषय मांडला आहे प्रा. माधुरी शानभाग ह्यांनी. नैराश्य आणि पाठोपाठ होणार्या आत्महत्या ह्यास परिस्थिती फक्त निमित्त ठरते ! आत्महत्येच्या प्रवृत्तीच्या जीन्स शरीरात असू शकतात ज्या हे सारं कंट्रोल करतात. त्या जीन्स अनुवंशिकतेने शरीरात येऊ शकतात !!!
मला स्वतःला 'वेगळा विषय' म्हणून पुस्तक आवडलं पण 'कथानक' ठीक ( ओके टाईप्स !!) वाटलं.
--------------
व्यासपर्व वाचलं.. >> हे आवडले असेल नि पूजनीय व्यक्तीरेखांना मानवी कवच बसवून केलेली डागडुजी खटकणार नसेल तर भैरप्पांचे "पर्व" (मूळ पुस्तक कानडी आहे. मराठी अनुवाद मिळतो) वाचा.
हमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं. लेखनशैली खुप छान आहे. त्यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही अशीच खिळवून ठेवते. खुप डिप्रेसिंग आहे कथानक. पण वास्तव आहे ते.. >> एकदम बरोबर. का कोणास ठाउक हमो मी नेहमीच टाळत आलो होतो. नेमकी इथे मराठी ग्रंथालयासाठी पूर्वतयारी करताना ढिगभर हमो मिळाली नि नेमकी हीच दोन वाचली. निष्पर्ण प्रचंड डिप्रेसिंग आहे.
Submitted by tanyabedekar on 12 ऑगस्ट, 2008 - 12:12.
सारे प्रवासी घडीचे - ले. जयवंत दळवी.
कित्येक वर्षं झाली हे पुस्तक वाचुन पण मनातुन पुसले नाही गेले कधी. नरु, बिड्या आणायला पैसे देणारी आजी आणि त्यातुन कडक लाडू आणणारा नातू, दादू गुरवाचो वस्त्रहरण, बाबल्याच्या मुलीबरोबरची छोटीशी प्रेमकहाणी, शिरोड्याचं वर्णन, गावतलं देउळ, तिथला उत्सव, नवस.. i am neru म्हणणारा नरु.. अतिशय सरळ साध्या भाषेत लिहिलेलं, उगा कोट्या करत विनोदनिर्मिती न करता पात्रं, प्रसंग आणि कथानकातून विनोद निर्माण केलेले हे माझ्या मते मराठि मधील सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तकांपैकी एक आहे.
ह्या पुस्तकाच्या शेवटचे कंसातले वाक्य: 'ह्या पुस्तकातील सर्व वर्णने व पात्र काल्पनिक आहेत' हे वाचुन मला उगाचच तेव्हा दळवींचा राग आला होता इतकी ही पात्रं खरी उभी केलेली आहेत (अर्थात ह्यातले अनेक प्रसंग आणि पात्रं ही खर्या व्यक्तिरेखांवरुन व प्रसंगावरुनच उचललेली असणार)
शिरोड्याला मंदिरात गेल्यावर तिथल्या सपाता बघुन ह्या पुस्तकाची प्रचंड आठवण आली.. आजही तिथे तितक्याच उत्साहाने दशावताराचे प्रयोग होतात.. पुरुष नट स्त्रीपार्टीचे काम करतात.. लोकं मधेच उठुन बक्षिस देतात आणि प्रयोग थांबवून ज्याने बक्षिस दिले आहे त्याचे नाव मोठ्याने जाहिर केले जाते.
Submitted by tanyabedekar on 12 ऑगस्ट, 2008 - 12:15.
पर्वचा अनुवाद बहुतेक उमा कुलकर्णी ह्यांनी केला आहे (भैरप्पांच्या अनेक पुस्तकांचा अनुवाद त्यांनीच केला आहे).
हमो म्हणजे ह मो मराठे. हे एक ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत.
Submitted by tanyabedekar on 12 ऑगस्ट, 2008 - 12:22.
भैरप्पांचे अनेक वेगवेगळी कथानकं एकत्र गुंफलेले पुस्तक कुठले.. हे बर्यापैकी मोठे आहे.. मला आता सगळी कथानकं लक्षात नाहीत.. पण बहुतेक ह्यात एक अतिशय यशस्वी एक्झीक्युटीवचे एक कथानक आहे. तसेच एक घटस्फोटित यशस्वी महिलेचे व तिच्या तरुण मुलाचे जो इंजिनिअरिंगसाठी हॉस्टेल वर राहत असतो आणि तिथे एक लफडं करतो असेही एक कथानक आहे.
भैरप्पांचं आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आहे.. ते वाचलं की मग त्यांची इतर पुस्तकं 'समजत' जातात.. नुकतंच आलेलं 'मंद्र' मला आवडलं नाही (म्हणजे कथानक). पण भैरप्पांच्या आत्मचरित्रातल्या संदर्भांमुळे ते खोटं वाटत नाही.
ह. मो. मराठे - हनुमंत मो. मराठे
----> मराठे संमेलनामधे जेव्हा पुरस्कार घोषित केला "हनुमंत मराठे" या नावाने तेव्हा त्यांना सुद्धा कळले नाही जेव्हा व्यासपीठावर "ह. मो" चा पुकारा झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आले. हे संमेलन गोवा येथे ३ वर्षापुर्वी झाले होते.
असामी, बालकांड वाचल्यावर निष्पर्ण तील नायकाच्या मनोभुमिकेचा जरासा उलगडा होतो बघ. खरं तर निष्पर्ण ही त्याच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित असु शकते. असं बालपण वाट्याला आल्यावर एक प्रकारचं नैराश्य सगळ्या आयुष्याला व्यापु शकतं..
Submitted by marhatmoli on 16 ऑगस्ट, 2008 - 20:48.
मी वाचलय "पर्व" पण मला काहि ते तितकस आवडल नाहि. महाभारतातिल व्यक्तिंना मानवि पातळिवर दाखवलय म्हणुन नाहि पण एकंदर त्यांनि जे चित्रण केलय ते फारच अप्रगत समाजाच वाटत. ज्या राज्यसत्तेच्या अधिपत्याखालि एक महायुध्ध लढल गेल त्याच राजाला दुध आणि लाह्या वेळेवर खायला मिळायचि मारामार असेल हे कल्पना करुनहि पटत नाहि. पात्रांच मानविकरण करण्याच्या प्रय्त्नात कथेचा मुळ तोल गेलाय अस वाटत. आता व्यासपर्व आणि युगांतर एकाच वेळि वाचण्याचा संकल्प आहे.
पर्ववद्दल माझे मत असे आहे....
महाभारतातल्या व्यक्तीरेखांना त्यांना कुठलाही दैवी किंवा चमत्कारांचा साज न चढवता एव्हढे चपखलपणे मानवी स्वभाव, साचे नि व्यवहारांमधे बसवलेले (ते हि सगळ्या विसंगती नीट सोडवून) आणि तरिही व्यक्तीरेखांचे कुठेही चारित्र्यहनन झालेले नाहिये, त्या एकमेकांशी नि मुख्य म्हणजे कथानकाशी प्रामाणीक आहेत (म्रुत्युंजय आठवतेय ?), एव्हढे करूनही त्यांची भव्यता टिकून ठेवलेली आहे. अशा प्रकारचे amalgam मी तरी आधी वाचले नव्हते. युगांत मधे काहि भाग तसा आहे पण तेही विश्लेषण ह्या रुपामधे येते, कथानकाच्या स्वरुपामधे येत नाही. (पर्व चा problem म्हणशील तर एकच, मूळ महाभारत आधी वाचलेले हवे, पहिल्यांदाच महाभारत वाचू म्हणून पर्व वाचतील तर flashbacks चा overdose डोक्यावरून जाईल.)
दुध लाह्या बद्दल मला वाटते कि तर्कसंगत विश्ले षण आलेले आहे. एव्हढ्या मोठ्या स्तरावर युद्धाची तयारी केल्यावर नि त्यात युद्धामधे दारूण पराभव होतोय त्यात मागे राहिल्यांल्याना खाण्यापीण्याची ददात जाणवणे साहजिक आहे. वास्तवातल्या युद्धांनतंरही हेच तर होतेय (खास करून जीतांबाबत). पहा : पहिले, दुसरे महायुद्ध नि त्यानंतर झालेली Germany ची स्थिती.
आता व्यासपर्व आणि युगांतर एकाच वेळि वाचण्याचा संकल्प आहे. >> युगांतर कि युगांत ?
हमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं. लेखनशैली खुप छान आहे. त्यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही अशीच खिळवून ठेवते. खुप डिप्रेसिंग आहे कथानक. पण वास्तव आहे ते..
गोनिदांचं 'कहाणीमागची कहाणी' वाचत आहे सध्या. मला आवडलं. ज्यांना गोनिदांचं लिखाण आवडतं त्या सर्वांना आवडेल. जे कुणी कथालेखन करतात त्यांनी सर्वांनी जरुर वाचा.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
मला गोनिदांचं 'कुणा एकाची भ्रमणगाथा' खुप आवडतं आनि माचीवरला बुधा ही. कहाणीमागची कहाणी वाचलं नाहीये. आता वाचेन..
झुंपा लाहिरी च्या unaccoustomed earth मधल्या पहिल्या ३ गोष्टी वाचल्या...
नेमसेक ने वाढवलेल्या अपेक्षा पारच धुळीला मिळाल्या.... खूपच सामान्य वाटलं मला तरी...
सरी , मागच्याच महिण्यात वाचल मी "कुणा एकाची भ्रमणगाथा" .. बरचस डोक्यावरुन गेलं . आता परत वाचणार आहे . सध्या वंशवेल , आहार्-विहार, डायट हे वेड लागलय
, वंशवेल खरच खुप माहीती देणारं आहे .
~Do u know who is the best couple in the universe? SMILE and TEARS.
Rarely they meet, but if they meet that will be the most gorgeous moment ever! ~
नेमसेक मधे असे विशेष आहे तरी काय.. मला तर ते पुस्तक, खास करून त्याचा शेवटं एकदम रटाळ वाटला.
दीपु, डाएट वगैरे विषयांबद्दल बोलुन (म्हणजे नुसतच बोलुन) आ बैल मुझे मार करणं सोडलयं रे मी सध्या.. भ्रमणगाथा मात्र हळूहळू कळत आणि चढत जातं. परत एकदा वाच निवांत.
कुणी sedany sheldon नही का वाचत?
सध्या अनील अवचट यांच "कार्यरत" वाचतेय... खुप छान पुस्तक आहे
इथल्या पोस्टांनी प्रभावित होऊन मी पण गौरी देशपांडेंची आहे हे असं आहे.. आणि गोफ वाचली. आवडली. पारायणं करावीत अशीच!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ
बिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ
आता मुक्काम, उत्खनन ही वाच. तुला नक्की आवडतील.
मुक्काम<<<<<<<
च्या आधी 'थांग' वाचायला हवी. 'थांग' चा पुढचा भाग म्हणजे 'मुक्काम.'
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
गौरीच्या पुस्तकांची यादी देत आहे:
१) आहे हे असे आहे
२) एकेक पान गळावया
३) दुस्तर हा घाट
४) विंचुर्णीचे धडे
५) उत्खनन
६) थांग
७) मुक्काम
८) तेरुओ आणि काही दुरपर्यंत
९) चंद्रीके गं सारीके गं
१०) निरगाठी
११) And pine for what is not.. (हे पुस्तक 'आहे मनोहर तरी.. ' या सुनिताबाईंच्या पुस्तकाचा अनुवाद आहे.)
१२) The Lackadaisical Sweeper (ह्यातील बर्याचशा कथा 'आहे हे असे आहे' मधे आहेत.)
१३) Diary Of A Decade Of Agony (हे पुस्तक अविनाश धर्माधिकारी ह्यांच्या 'अस्वस्था दशकाची डायरी' या पुस्तकाचा अनुवाद आहे.
१४) Transalation of Richard Burton's "Arabian nights"
१५) Between the Births (हा त्यांचा काव्यासंग्रह आहे)
अन्य वाचलेले लेख (तुम्ही जर त्यांचे लेख इतर कुठे वाचले असतील तर लेखांची नावे लिहावीत):
१) हीशेब (बापलेकी मधे आहे)
२) भिजत भिजत कोळी
३) नव्या दंतकथा
४) दार
५) धरलं तर चावतं
६) निर्झर (शशी देशपांडे ह्यांच्या एका कथेचा अनुवाद)
अरे हो की. मी थांग कशी विसरले.. धन्स श्रध्दा.. बी तुलाही, लिस्ट साठी..
दुस्तर हा घाट आणि थांग ह्या दोन्ही एकाच पुस्तकात आहेत.
.
गौरी मनातली हे गौरीच्या पंख्याना आवडेल असे आहे. गौरी गेल्यावर त्यांच्या गोतावळ्यातील कुणी-कुणी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. बहुतेक अशा पुस्तकासाठी म्हणुन ते लेख विषेश लिहुन घेतले आहेत.
.
कुठल्या तरी दिवाळी अंकात तिचे शेवटचे काही लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यात चोरी वर एक गोष्ट होती.
'कथा गौरीची'सुद्धा खूप छान आहे.
हे काय आहे ? तिने लिहिलेले की तिच्याविषयी लिहिलेले ?
एकाच पुस्तकात दोन भाग आहेत. पहिल्या भागात त्यांच्याविषयी लेख आहेत. दुसर्या भागात त्यांच्या पुस्तकांचं समीक्षण. सगळंच कौतुक नाही. आणि शिवाय त्यांच्या दोन मुलाखती.
संपादन विद्या बाळ आणि वंदना भागवत यांनी केलं आहे.
आणि गिताली विं. म. ह्या देखील आहेत संपादन करण्यामधे.
हो. ही सगळी मिळुन सार्याजणींची टीम. गौरीताई गेल्यावर एक विशेषांक काढला होता मिळुन सार्याजणी मासिकाचा. त्या वरुनच ह्या समग्र गौरी ग्रंथाची कल्पना सुचली.
मलाही अजिबात अनक्स्टम्ड आवडले नाही. तुम्ही इंटरप्रिटर ऑफ मलाडीज वाचलं का? ते मला आवडलं होतं. झुम्पाचं पहिलं पुस्तक?
अनंत सामंतांचं 'एक ड्रीम्...मायला....' वाचलं. पुस्तक बरं आहे. एकदा वाचण्याजोगं. भाषा अगदी आजच्या तरूण पिढीला (सर्वच नाही, पण काही) आवडेल अशी आहे, बेदरकार शिव्या,सवंग शब्द आणि वाक्य. पण पुस्तक एकदा हातात घेतलं की पुढे काय होईल ही उत्सुकता, पुस्तक खाली ठेऊ देत नाही.
खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. !
शवटची साधारण १७५ पानं एका बैठकीत संपवली...
अफगाणिस्ताना बर्फ पडतो हे मला माहितच नव्हतं.. ! आणि जे काही टिव्ही/ पेपर मधे पहिले आहे त्यावरून तरी तिथे हिरवळ, डाळींबाची झाडं वगैरे अस्तिल असं वाटतं नाही..
नेमसेक मधे असे विशेष आहे तरी काय.. मला तर ते पुस्तक, खास करून त्याचा शेवटं एकदम रटाळ वाटला. >>> मी मुव्ही आणि पुस्तक एकामगोमाग एक वाचल्याने मला आवडलं.. एकूण त्यातले बारकावे आणि प्रसंग उभा करायची शैली आवडली मला...
>> खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. !
अनुमोदन ! काईट रनर मलाही आवडलं खूप. कॅलिफोर्नियात खूप अफगाण आहेत हे तरी कुठे माहिती होतं ? !!!
अरे बाप रे हे असे बाफ पण शिल्लक आहेत का अजुन आणि लोक त्यावर संदेश पण देताएत्
काईट रनर मी २ वर्षापुर्वी वाचले होते. मला खुप आवडले होते. त्या नंतर त्याच्यावर काढलेला सिनेमा पण बघितला या वर्षी.
सिनेमा इतका नाही आवडला. पुस्तक मात्र नक्कीच वाचायला हवे.
मला वाटते आधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.
दाविंची कोड बाबत पण असेच झाले
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs
आधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.>>>

अनुमोदन रुनि. क्लासिक उदाहरण- हॅरी पॉटर!
पुस्तकाच्या दुनियेत आपण हरवून जातो इतकं डीटेलिंग असतं, सिनेमात नाही म्हणलं तरी विस्तारभयामुळे त्यांना सगळंच दाखवता येत नाही. परत प्रत्येकाला पुस्तक वाचताना त्याची त्याची स्वतःची दुनिया उभारता येते, सिनेमा नाही म्हणलं तरी दुसर्या कोणीतरी केलेला असतो!
आदमा, देर आये दुरुस्त आये
आशा बगेंची पारितोषक विजेती 'भूमी' वाचली. अस्वस्थ करून सोडते. काय रंगवली आहे नायिका आणि तिचं आयुष्य!
--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..
काईट रनर वर अधारित सिनेमाचं नाव काय आहे?


मी ही साधारण ६ महिन्यांपूर्वीच वाचलं पुस्तक, मला जाम डिस्टर्बिंग वाटलं.
.
नुकताच मी व्हिकी बामच्या फेमस कादंबरीचा अनुवाद वाचला.... 'मेन नेव्हर नो'
खरं सांगू तर काहीच अर्थबोध झाला नाही. कथा आहे त्यात मोजून २ ते ३ प्रसंग आहेत, ते वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून आपल्या समोर मांडले आहेत. कथा तर मला कळली. पण त्यातून लेखकला काय मेसेज द्यायचा आहे ते काही कळलं नाही.
तुमच्यापैकी कोणी वाचलं असेल तर मला जरूर सांगा...
पुन्हा एकदा.. एक उत्कृष्ट पुस्तक सुचविल्याबद्दल तुमचे आभार!
व्यासपर्व वाचलं.. इतके दिवस आपण जी गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहत होतो तीच गोष्ट जर एखाद्या प्रिझम मधून पाहिली तर मधेच त्यातले सप्तरंग दिसू लागतात!! तस्सं वाटलं हे पुस्तक वाचताना.. ज्यांना महाभारतातल्या व्यक्तिरेखांमधे रस आहे त्यांनी हे जरूर वाचा.. गुणांमधले दोष आणि दोषांमधले गुण सापडतील... त्यांच्या एकलव्य, कर्ण आणि दुर्योधनाला तोड नाही!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!
अश्विनी -- 'व्यासपर्व' ची नोंद करून ठेवलीय .. पुढच्या भारतभेटीत घेईन म्हणतो !
------
इथे कुणी 'तमाच्या तळाशी' वाचलं आहे का ?
एक खूपच वेगळा विषय मांडला आहे प्रा. माधुरी शानभाग ह्यांनी. नैराश्य आणि पाठोपाठ होणार्या आत्महत्या ह्यास परिस्थिती फक्त निमित्त ठरते ! आत्महत्येच्या प्रवृत्तीच्या जीन्स शरीरात असू शकतात ज्या हे सारं कंट्रोल करतात. त्या जीन्स अनुवंशिकतेने शरीरात येऊ शकतात !!!
मला स्वतःला 'वेगळा विषय' म्हणून पुस्तक आवडलं पण 'कथानक' ठीक ( ओके टाईप्स !!) वाटलं.
--------------
व्यासपर्व वाचलं.. >> हे आवडले असेल नि पूजनीय व्यक्तीरेखांना मानवी कवच बसवून केलेली डागडुजी खटकणार नसेल तर भैरप्पांचे "पर्व" (मूळ पुस्तक कानडी आहे. मराठी अनुवाद मिळतो) वाचा.
हमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं. लेखनशैली खुप छान आहे. त्यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही अशीच खिळवून ठेवते. खुप डिप्रेसिंग आहे कथानक. पण वास्तव आहे ते.. >> एकदम बरोबर. का कोणास ठाउक हमो मी नेहमीच टाळत आलो होतो. नेमकी इथे मराठी ग्रंथालयासाठी पूर्वतयारी करताना ढिगभर हमो मिळाली नि नेमकी हीच दोन वाचली. निष्पर्ण प्रचंड डिप्रेसिंग आहे.
१) पर्व चा अनुवाद कुणी केला आणि पुस्तकाचे नाव 'पर्व' च असेल असे वाटते..
२) हमोंचा काही long form आहे का? मी ते ह. मो. असे घेत आहे..
सारे प्रवासी घडीचे - ले. जयवंत दळवी.
कित्येक वर्षं झाली हे पुस्तक वाचुन पण मनातुन पुसले नाही गेले कधी. नरु, बिड्या आणायला पैसे देणारी आजी आणि त्यातुन कडक लाडू आणणारा नातू, दादू गुरवाचो वस्त्रहरण, बाबल्याच्या मुलीबरोबरची छोटीशी प्रेमकहाणी, शिरोड्याचं वर्णन, गावतलं देउळ, तिथला उत्सव, नवस.. i am neru म्हणणारा नरु.. अतिशय सरळ साध्या भाषेत लिहिलेलं, उगा कोट्या करत विनोदनिर्मिती न करता पात्रं, प्रसंग आणि कथानकातून विनोद निर्माण केलेले हे माझ्या मते मराठि मधील सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तकांपैकी एक आहे.
ह्या पुस्तकाच्या शेवटचे कंसातले वाक्य: 'ह्या पुस्तकातील सर्व वर्णने व पात्र काल्पनिक आहेत' हे वाचुन मला उगाचच तेव्हा दळवींचा राग आला होता इतकी ही पात्रं खरी उभी केलेली आहेत (अर्थात ह्यातले अनेक प्रसंग आणि पात्रं ही खर्या व्यक्तिरेखांवरुन व प्रसंगावरुनच उचललेली असणार)
शिरोड्याला मंदिरात गेल्यावर तिथल्या सपाता बघुन ह्या पुस्तकाची प्रचंड आठवण आली.. आजही तिथे तितक्याच उत्साहाने दशावताराचे प्रयोग होतात.. पुरुष नट स्त्रीपार्टीचे काम करतात.. लोकं मधेच उठुन बक्षिस देतात आणि प्रयोग थांबवून ज्याने बक्षिस दिले आहे त्याचे नाव मोठ्याने जाहिर केले जाते.
पर्वचा अनुवाद बहुतेक उमा कुलकर्णी ह्यांनी केला आहे (भैरप्पांच्या अनेक पुस्तकांचा अनुवाद त्यांनीच केला आहे).
हमो म्हणजे ह मो मराठे. हे एक ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत.
अरे हे हमो का.. हे आहेत माहिती. पण मी त्यांच काहीच वाचलेलं नाही किंवा मला संधी मिळाली वाचायला. धन्यवाद टण्या.
हमो अजून आहेत??
भैरप्पांचे अनेक वेगवेगळी कथानकं एकत्र गुंफलेले पुस्तक कुठले.. हे बर्यापैकी मोठे आहे.. मला आता सगळी कथानकं लक्षात नाहीत.. पण बहुतेक ह्यात एक अतिशय यशस्वी एक्झीक्युटीवचे एक कथानक आहे. तसेच एक घटस्फोटित यशस्वी महिलेचे व तिच्या तरुण मुलाचे जो इंजिनिअरिंगसाठी हॉस्टेल वर राहत असतो आणि तिथे एक लफडं करतो असेही एक कथानक आहे.
भैरप्पांचं आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आहे.. ते वाचलं की मग त्यांची इतर पुस्तकं 'समजत' जातात.. नुकतंच आलेलं 'मंद्र' मला आवडलं नाही (म्हणजे कथानक). पण भैरप्पांच्या आत्मचरित्रातल्या संदर्भांमुळे ते खोटं वाटत नाही.
भैरप्पांचं आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आह >> नाव सांग पुस्तकाचे (अनुवादाचे पण
)
'आत्मचरित्र' असंच आहे. उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केला आहे.
ह. मो. मराठे - हनुमंत मो. मराठे
----> मराठे संमेलनामधे जेव्हा पुरस्कार घोषित केला "हनुमंत मराठे" या नावाने तेव्हा त्यांना सुद्धा कळले नाही जेव्हा व्यासपीठावर "ह. मो" चा पुकारा झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आले. हे संमेलन गोवा येथे ३ वर्षापुर्वी झाले होते.
अखि, हमोंना कुठला पुरस्कार देण्यात आला आणि त्यांच्या कुठल्या पुस्तकासाठी कृपया सांगतेस का?
असामी, बालकांड वाचल्यावर निष्पर्ण तील नायकाच्या मनोभुमिकेचा जरासा उलगडा होतो बघ. खरं तर निष्पर्ण ही त्याच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित असु शकते. असं बालपण वाट्याला आल्यावर एक प्रकारचं नैराश्य सगळ्या आयुष्याला व्यापु शकतं..
मराठे कुल संमेलन जे होत ना त्यात मिळाला होता. म्हणजे मराठे लोकांच get to gether. त्या संमेलनामधे माझे सासु सासरे गेले होते
मी वाचलय "पर्व" पण मला काहि ते तितकस आवडल नाहि. महाभारतातिल व्यक्तिंना मानवि पातळिवर दाखवलय म्हणुन नाहि पण एकंदर त्यांनि जे चित्रण केलय ते फारच अप्रगत समाजाच वाटत. ज्या राज्यसत्तेच्या अधिपत्याखालि एक महायुध्ध लढल गेल त्याच राजाला दुध आणि लाह्या वेळेवर खायला मिळायचि मारामार असेल हे कल्पना करुनहि पटत नाहि. पात्रांच मानविकरण करण्याच्या प्रय्त्नात कथेचा मुळ तोल गेलाय अस वाटत. आता व्यासपर्व आणि युगांतर एकाच वेळि वाचण्याचा संकल्प आहे.
व्यासपर्व खूप अवघड आहे कळायला. पण युगांतर एकदम सुरेख सोपं.
पर्ववद्दल माझे मत असे आहे....
महाभारतातल्या व्यक्तीरेखांना त्यांना कुठलाही दैवी किंवा चमत्कारांचा साज न चढवता एव्हढे चपखलपणे मानवी स्वभाव, साचे नि व्यवहारांमधे बसवलेले (ते हि सगळ्या विसंगती नीट सोडवून) आणि तरिही व्यक्तीरेखांचे कुठेही चारित्र्यहनन झालेले नाहिये, त्या एकमेकांशी नि मुख्य म्हणजे कथानकाशी प्रामाणीक आहेत (म्रुत्युंजय आठवतेय ?), एव्हढे करूनही त्यांची भव्यता टिकून ठेवलेली आहे. अशा प्रकारचे amalgam मी तरी आधी वाचले नव्हते. युगांत मधे काहि भाग तसा आहे पण तेही विश्लेषण ह्या रुपामधे येते, कथानकाच्या स्वरुपामधे येत नाही. (पर्व चा problem म्हणशील तर एकच, मूळ महाभारत आधी वाचलेले हवे, पहिल्यांदाच महाभारत वाचू म्हणून पर्व वाचतील तर flashbacks चा overdose डोक्यावरून जाईल.)
दुध लाह्या बद्दल मला वाटते कि तर्कसंगत विश्ले षण आलेले आहे. एव्हढ्या मोठ्या स्तरावर युद्धाची तयारी केल्यावर नि त्यात युद्धामधे दारूण पराभव होतोय त्यात मागे राहिल्यांल्याना खाण्यापीण्याची ददात जाणवणे साहजिक आहे. वास्तवातल्या युद्धांनतंरही हेच तर होतेय (खास करून जीतांबाबत). पहा : पहिले, दुसरे महायुद्ध नि त्यानंतर झालेली Germany ची स्थिती.
आता व्यासपर्व आणि युगांतर एकाच वेळि वाचण्याचा संकल्प आहे. >> युगांतर कि युगांत ?
'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक मी काल वाचून संपवले.
'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक मी काल वाचून संपवले.
=== म्हणजे अनिरुद्ध बापुंचे आहे ते हेच का?
मग पुस्तक परीक्षण कधी लिहीणार?