गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडत. लहानपणी ऐकलेल्या भूताखेतांच्या किंवा सिंदबाद, अरेबियन नाइटस् मधील सुरस चमत्कारिक कथा अगदी खर्या खर्या वाटायच्या.एवढच कशाला, अज्जी तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची. तिच्या अजोळच्या वाड्यातल्या तळघरातून येणारे आवाज, लग्नात तिची बहीण सोन्याने कशी वाकली होती, एका पैशाला ढीगभर सगळकाही मिळायच, शेतातला एक गडी मोठा मणाचा हंडा कसा उचलायचा आणी तिचे कोणी तरी मामा निरस शेर-शेरभर दूध कसे गटागटा प्यायचे. या गोष्टीही अगदी रंगवून की त्यात पूर्ण गुंतायला व्हायच आणी शेवटी खर किती आणी काल्पनिक काय कशाचाच पत्ता उरायचा नाही पण ते आवडायच इतक की परत परत ऐकून सुद्धा नेहमी नविनच वाटायच.
गोष्टी सांगायची आणी ऐकायची आवड माणसाला अगदी लेखनकला विकसित होण्याआधी पासून आहे.पुरणकाळापासून अनेक कथा मौखीक पद्धतिने चालत आपल्य पर्यंत पोचल्या, अनेक कथाकारांनी आपापले किस्से त्यात मिसळले, पण तरीसुद्धा या सरमीसळीतून जी गोष्ट तयार होते ती खूप मस्त असते.गोष्ट सांगणे ही कला आहे, कोणतीही साधीशी गोष्ट रंजक होणे हे सांगणार्याच्या शैलीवर अवलंबून असत. धर्मवीर भारतींच्या "सूरज का सातवाँ घोडा" या लघूकादंबरीवर बेतलेला श्याम बेनेगलांचा अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडलेला हा चित्रपट "metafiction" आणी "non linear narrative" या माध्यमांचा उपयोग करतो.चित्रपट पाहताना हे दोन्ही कॉनसेप्ट डोक्यात पक्के बसलेले हवेत नाहीतर शेवटी गोंधळ उडू शकतो.
"metafiction" या प्रकारत नेहमी वाचकाला/प्रेक्षकाला हे जाणवून दील जात की जे चालू आहे ते सगळ रचलेल किंवा काल्पनीक आहे.कथाकर कथे मधे दुसरी एक कथा लिहितोय, वाचतोय किंवा दुसर कोणीतरी सांगत असलेल्या कथेतल तो एक पात्र आहे, चालू असलेली कथा एकदम वाचकाशीच बोलू लागते (नाटकात याला breaking fourth wall म्हणतात), कथेतल्या पात्रानां माहीती असत की ते कथेत आहेत, कथाकार मुद्दाम तुम्हाला सांगतोय की तुम्ही जे ऐकताय/पाहताय ते सगळ मी रचलेली एक गोष्ट आहे ही सगळी "metafiction" ची उदाहरण.कथेतून तुम्हाला आभासी जगात घेउन जाण्याऐवजी तुम्हाला ओढून वास्तवात आणतात पण त्यासाठी उपयोग मात्र fictionचा करतात.
non linear narrative म्हणजे गोष्ट सांगायची अशी पद्धत ज्यात घटना एकामागून एक अशा chronologically न सांगता तुकड्यातून कथाकाराला हव्या तशा पूढे येतात. हे जिगसॉ पझल सारख आहे, सांगणार्याला सगळी गोष्ट माहिती असते, त्याचे तो छोटे छोटे तुकडे करतो मग तुमच्याकडे अधले मधले तुकडे फेकत राहतो.ते एक एक घेउन आपण जोडत बसतो, शेवटचा तुकडा मिळू पर्यंत पूर्ण गोष्ट तयार होत नाही. गोष्ट सांगणार्याच्या हातात इथ बरच काही असत, तो हुकमी एक्के स्वतःकडेच ठेउन तुमची दिशाभूल करु शकतो, कोणते तुकडे कधी सोडायचे हे सुद्धा तोच ठरवतो.वाचण्यापेक्षा पाहताना हे जास्त परीणामकारक वाटत त्यामूळे चित्रपटात हे माध्यम बरच प्रभावी आणी लोकप्रिय झाल.
चित्रांच प्रदर्शन पाहत फिरणार्या मध्यमवयीन श्यामला (रघूवीर यादव ) एक गजबजलेल्या मोहल्ल्याच चित्र दिसत, ते पाहून त्याला आपल्या कॉलेजच्या दिवसातील ती गल्ली आठवते जिथे श्याम आणी त्याचे मित्र माणीक मुल्ला (रजित कपूर) च्या घरी चकाट्या पिटायला जमायचे.माणीककडे कथा कवितांचे अनेक किस्से असायचे, एका दूपारी कलिंगड खाता खाता सगळ्यांची चर्चा प्रेमाकडे वळते.श्यामच्या हातातल "देवदास" ओढून घेउन मुल्ला म्हणतो माझ्या घरात दुसर्या लेखकाच काही वाचायच नाही आणी प्रेमकथा ही समाजकल्याणकारी असावी अशी रडकी काहीच बोध देणारी वगेरे नसावी.सगळे त्याची खील्ली उडवत म्हणतात वर्गसंघर्ष आणी प्रेमाचा काय संबंध? कलिंगडाच्या फोडी खाली गायीच्या अंगावर टाकत मुल्ला गोष्ट सुरु करतो, नाव आहे "नमक की अदाइगी".शाळकरी मुल्लाच्या घराजवळ जमूना (राजेश्वरी सचदेव ) राहते, तिच्या गोठ्यातल्या गाइला चारा देण्यास मुल्लाची चक्कर नेहमी होते ("आहाते मे गाय बंधी थी, घर मे लडकी" ).जमूनाच शेजारच्या तन्ना (रिजू बजाज ) वर प्रेम आहे.त्याच्या घरातून वडलांचे ओरडलेले आवाज ऐकू येतात.गच्चीवर दोघे नेहमी भेटतात, त्याच्यासाठी मालपूवे आणायला ती घरात येते आणी आई वडलांशी भांडून तन्नाशीच लग्न करणार म्हणते.मुल्लाच्या घरात त्याचा भाउ ( के के रैना) आणी वहीनी तन्नाचा बाप महेसर दलाल ( अमरिष पूरी) कसल बिनहुंड्याच त्याच लग्न लावतोय म्हणून चर्चा करतायत.रात्री गाईला चारा द्यायला गेलेल्या माणीकला गच्चीवरून येणारी जमूना दिसते.ती त्याला तिथेच बसवून घेउन तन्ना कसा बापाला घाबरतो हे सांगत राहते.माणीक तिच्यासाठी पुस्तक आणतो, " देवदास ".जमूना रोज माणीकला जबरदस्तिने मालपुवे खायला घलते आणी तू माझ मीठ खाल्लयस आणी माझ्या सोबतिला रात्री बसायलाच पाहीजे म्हणते.हळूहळू जमूना आणी मुल्ला जवळ येउ लागतात आणी प्रेमात पडतात आणी शेवटी जमूना लग्न होउन निघून जाते.मुल्ला म्हणतो मला हे करायच न्हवत पण काय करणार तिच मीठ खाल्ल होत ना.आता यात आर्थीक विषमता कोठून आली म्हंटल्यावर मुल्ला म्हणतो जर भारतातल्या प्रत्येक घरात गाय असती तर मला तिच्या गाईला चारा द्यायलाच जाव लगल नसत आणी मिठाची किंमत पण चुकवावी लागली नसती. सगळे खिदळत राहतात.बिचार्या जमूनाच काय झाल म्हणून विचारणार्या श्यामला तो खूंटीला अडकवलेल्या नाली कडे पाहत पुढची गोष्ट सांगू लागतो "घोडे की नाल" .जमुनाच लग्न एका म्हातार्याशी होत, काही दिवसांनी ती माहेरी येते आणी आपण अगदी मजेत असल्याच आईला सांगते, तन्नाच लग्न ठरल्याच आई सांगते.बरच देव देव करून पण तिला मूल होत नाही शेवटी महिनाभर भल्यापहाटे देवळाला जाते, सोबतिला असतो टांगेवाला रामधन (रवी झंकल ).टांगेवाला म्हणतो घोड्याच्या नालीची अंगठी घातली तर सगळ्या इछा पूर्ण होतात.दोघांचे संबंध येतात, तीला मूलगा होतो.काही दिवसांनी तिचा नवरा मरतो.एकेदिवशी आता नोकरी करणार्या मुल्लाला रामधन स्टेशन वर भेटतो, तो अगदी थाटात आहे आणी ही सगळी घोड्याच्या नालीची कमाल म्हणतो.एक नाल तो माणीकला देतो आणी तन्ना मेल्याच ऐकून खूप वाइट वाटल्याच सांगतो.मुल्ला म्हणतो मी आता त्याच्याच जागी नोकरी करतोय.आता यातून निष्कर्श काय तर कुठलही काम अगदी टांगा हाकण्याच सुद्धा कमी लेखू नये, दुसरा एक जण म्हणतो याचा समाजवादी अर्थ आहे जमूना मानवतेच प्रतीक आहे, तिचा उद्धार करायला नवरा (सामंतवर्ग) असमर्थ ठरला आणी शेवटी रामधननी ते केल (कामगार वर्ग).
मुल्ला तन्नाची गोष्ट सुरु करतो, शिर्षक नाही. तन्नाला आई नाही दोन बहीणी आहेत, वडीलांनी घरात एक मावशी आणून ठेवलिये.पहिल्या गोष्टीत ऐकू आलेले रागीट आवाज पून्हा येतात आणी महेसर दिसतो.आई वडीलांशी भांडणारी जमुना पून्हा दिसते, शेवटी तिचे वडील लग्नाला तयार होतात आणी तन्नाला घर जावाई हो म्हणतात.तन्ना महेसरला घाबरून नाही म्हणतो.जमूना अजूनही त्याला रात्री गच्चीवर भेटण्याचा प्रयत्न करते पण तन्ना वडीलांना घाबरून तिला टाळतो, इथे पहिल्या गोष्टीतली रात्री मुल्लाला गच्चीवरुन येणारी जमूना दिसते. महेसर तन्नाला रेल्वेत नोकरी लावतो. एक दुकानदार (विरेंद्र सक्सेना) तन्ना साठी स्थळ सुचवतो, इतक्यात दुकानात सोप विकणारी सत्ती (निना गूप्ता) येते, छेडछाड करणार्या दुकानदाराला चाकू दाखवून जाते.आपल्याला कळत की ती चमन ठाकूरची (ललीत तिवारी) भाची आहे.महेसरचा तिच्यावर डोळा आहे, तो चमन बरोबर सत्तीच्या आशेने सोपचा धंदा सूरू करतो.तन्नाच लग्न महेसर ललिताशी (पल्लवी जोशी) ठरवतो, तिच्या आईबरोबर (इला अरुण) पण याचा रंगीनपणा सुरु आहे.माहेरी आलेल्या जमूनाला तन्नाच लग्न ठरल्याच कळत.महेसर मावशीला घराबाहेर काढतो.तन्नाच लग्न होत.ललीता शिकलेली आणी गर्विष्ठ आहे फारशी कोणात मिसळत नाही.बाळंतपणासाठी माहेरी जाउन ती परतत नाही.इकडे चमनच्या घरासमोर उभाराहून दुकानदार म्हणतो, काल चमन सामान घेऊन गाव सोडून गेला त्याच्या गाडीत सत्तीच प्रेत होत्.महेसर आणी चमननी मिळून तिला मारल बहूधा.महेसर ललिताच्या घरात येउन लपतो पण ती त्याला बाहेर काढते आणी तो गायब होतो. तन्नाला स्टेशन वर जमूना भेटते, तिच्यासमोरच अपघात होउन तो मरतो.गोष्ट ऐकून सुन्न झालेले सगळे घरी जातात.
दुसर्यादिवशी पून्हा चर्चा प्रेमाकडे वळते, रात्री भयानक स्वप्न पडलेला श्याम चांगलाच अस्वस्थ आहे.मुल्ला म्हणतो प्रेम काही फक्त सामाजीक विषमतेशी संबंधीत नसत, कधी कधी ते सुंदर संगीतमय ही असत, चला मी तुम्हाला एक छोटी गोष्ट संगतो, नाव आहे 'मालवा की रजकन्या देवसेना".ललीता आणी माणीक मुल्ला एकमेकांच्या प्रेमात आहेत, तिच लग्न ठरल्यामूळे ति दु:खी आहे.स्कंदगुप्त मधल्या देवसेनेसारखी तू शूर आहेस अस माणीक तिला समजावतो.आपली मैत्रीण "देवदासची "कशी खिल्ली उडवत होती हे ति माणीकला सांगते, इथे एक गाण ही येत ( "ये शामे").ललिताच लग्न होत, माणीक एकटा राहतो हे ऐकून तुझ्या आयुष्यावर फारच मोठा परीणाम झाला असेल म्हणणार्यानां तो अरे, देवदास ला नाही का पारो नंतर चंद्रमुखी मिळाली होती.सगळे म्हणतात हे सगळ फारच सरळसोट होतय, टेक्नीक कुठे आहे यात. मुल्ला म्हणतो मी चेकॉव्ह सारख कशावरही गोष्ट सांगू शकतो, एकजण म्हणतो या चाकूवर सांगा, सत्तीची गोष्ट सुरु होते.चमन ठाकूर ने सत्तीला वाढवलय.तो सोपचा धंदा करतो, म्हणजे सगळी काम सत्तीच करते.हिशोब करुनदेण्यासाठी माणीक नेहमी तिथे जातो.आधीच्या गोष्टीतल्या दुकानदाराला चाकूने धमकावून सत्ती बाहेर पडते इथे तिला माणीक भेटतो, दोघे घरी येतात.सत्ती त्याला एक छान लोकगीत म्हणून दाखवते ("निमिया क पेड").दोघ प्रेमात पडतात.महेसर सत्तीच्या मागावर आहे, चमन ला पैसे देउन तो सत्तीवर बळजबरी करतो.ती रात्री माणीक कडे येते आणी पळून जाउ चल म्हणते. घाबरलेला माणीक भावाला बोलावतो,माणीकचा भाउ चमन आणी महेसर ला बोलावून आणतो, दोघे तिला तिथून जबरदस्तिने न्हेतात, तिच्या हातातला चाकू माणीकच्या घरातच राहतो.दुसर्यादिवशी दुकानदार चमन ठाकूर घर सोडून गेल्याच आणी सत्तीला मारल्याच सांगतो.
चिडलेले सगळे तू घाबरट आहेस आणी जमूना, ललीता आणी सत्ती तिघीनां पण धोका दिलास म्हणतात.उदास झालेले सगळे चहा प्यायला जातात, वाटेत श्याम मुल्लाला जमुना, तन्ना लहान मूल, तुटलेले पाय हे सगळ कस डोक्यात येत होत ते सांगत राहतो.माणीक म्हणतो तू लेखक व्हायला पाहिजेस.बाकिचे बोलतात आता काय स्वप्नावरती गोष्टी लिहायच्या काय.मुल्ला म्हणतो का नाही गोष्टीमधे स्वप्नासारख सत्य अस्त्याच मिश्रणच असत, आपल्या अपूर्या राहिलेल्या इछा आपण गोष्टीतूनच पूर्ण करू शकतो.सगळे म्हणतात ह्या कथात काही प्रेम न्हवत.मुल्ला म्हणतो कदाचीत आयुष्य असच प्रेमाच्या शोधात निघून जात.पण जगात अस काहीतरी आहे जे तूम्हाला पूढ जायला प्रेरणा देत.म्हणजे सुर्याच्या रथाला सात घोडे असतात, सहा घोडे म्हणजे या गोष्टीतली पात्र जी हरलेली, धैर्यहीन काही मूल्य नसलेली आहेत.त्यामूळे हे घोडे अडखळतायत, ठेचकाळतायत पण शेवटचा घोडा मात्र लहान असला तरी सगळा गाडा ओढून पूढे न्हेतो आणी जगाला एक नवीन दिवस दाखवतो हा घोडा म्हणजे आशेचा बारीक कीरण, जीवन हे या सातव्या घोड्यासारखच असत.इतक्यात त्याच्या पाठीवर एक भीकारीण हात ठेवते, पैसे मागायला. तो वळून बघतो ती सत्ती असते, तिच्याकडे एक लहान मूल आणी गाड्यावर बसलेला चमन ठाकूर आहे.धक्का बसलेला माणीक तिच्यामागे धुक्यात जातो.श्याम म्हणतो यानंतर माणीक गायब झाला, पूढे चालून मी लेखक झालो.चित्रपट संपतो.
आता थोडस माणीक मुल्ला मधून बाहेर येऊन श्याम काय म्हणतोय या कडे लक्ष द्या.तो म्हणतोय की तो लेखक झालाय मग ही सगळी, ते चित्र बघून श्याम नी रचून सांगीतलेली गोष्ट तर न्हवती ????
चित्रपट जर इतके प्रश्न निर्माण करून वरच्या पातळीला पोचत असेल तर त्याला म्हणायच कसदार कलाकृती. हा चित्रपट खर्या अर्थाने "art film" आहे.अशा तर्हेचे प्रयत्न भारताबाहेर बरेच होतात.यातले काही गाजलेले चित्रपट म्हणजे Rashomon, Annie Hall, Pulp Fiction, Amores Perros, Magnolia, Elephant, Hiroshima mon amour, Memento, The Prestige, Run Lola Run, 21 Grams. या सर्व चित्रपटा पेक्षा "सूरज का सातवाँ घोडा" काढणे अधीक अवघड होत कारण काही मोजके अपवाद वगळता सगळ्या गाजलेल्या चित्रपटात एक समान दुवा आहे, तो म्हणजे कथेला मिळालेली बलात्कार, अपघात, गुन्हेगारी अशी पार्श्वभूमी. हे विशय ड्रॅमॅटीक असतात, skilled editing ने तूम्ही ते अधीक परीणामकारक करु शकता.या मधे एक सोपी कथा आहे पण ती ज्या प्रकारे मांडलिये त्यातूनच सगळा ड्रामा तयार होतो.इथे पात्र एका गोष्टीत victim वाटतात तर दुसर्या गोष्टीत आक्रमक आणी स्वार्थी.शेवटी आपल्या लक्षात येत की ही सगळी एकच गोष्ट आहे फक्त ती वेगवेगळ्या अँगल नी दाखवलिये.
चित्रपटातील बरेचसे कलाकार NSD मधील आहेत.सर्वांचा अभीनय अगदी एकापेक्षा एक.रजीत कपूर अगदी लाजवाब.यातल शूद्ध हिन्दी तुम्हाला दूरर्शनच्या पहिल्या काही वर्षात घेउन जात.Memento किंवा Amores Perros असे विदेशी चित्रपट डोळे विस्फारून पाहताना आपल्याकडे त्याच्याही आधी (१९९३) असा उत्तम चित्रपट आला होता हे आपण विसरतो.
नेहमीप्रमाणेच मस्त ओळख. हा
नेहमीप्रमाणेच मस्त ओळख.

हा माझा राहून गेला आहे बघायचा. बरं झालं आठवण झाली. आता नक्की बघणार.
मस्त जमलाय हा चित्रपट परिचय
मस्त जमलाय हा चित्रपट परिचय ..आवडला...
पूर्वी खूपदा लागायचा टिव्हीवर
पूर्वी खूपदा लागायचा टिव्हीवर पण माझा कधीच पूर्ण बघून झालेला नाही. तुम्ही ओळख चांगलीच करुन दिलीत पण लिहिण्याने माझ्या डोक्यात गोंधळ उडाला.
नेतिरी, परत एकदा माझा आवडता
नेतिरी, परत एकदा माझा आवडता चित्रपट...
मी ही कादंबरीही वाचली आहे. फार सुरेख आहे. पण मला सगळ्यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे कादंबरीच्या कथानकाची चित्रपटातली हाताळणी ही पूर्णपणे 'चित्रपटीय(?) ' आहे, कादंबरीच्या साहित्यिक हाताळणीची त्याच्यावर कुठेही छाप नाही. एकाच कथानकावरच्या दोन स्वतंत्र कलाकृती वाटतात मला त्या,, आणि दोन्हीही अप्रतिम!!
भारी.. याच चित्रपटावर काही
भारी.. याच चित्रपटावर काही वर्षांपुर्वी मी सकाळ मध्ये वाचलं होतं... तेव्हापासुन पहायची खूप इच्छा आहे पण अजुन नाही जमलं..
मस्तच लिहिलय नेहमीप्रमाणे...
आपला लेख वाचुन पुन्हा आठवलं ते.. आता नक्की बघणार..
मेरेको नै आवडताय ये पिक्चर.
मेरेको नै आवडताय ये पिक्चर. तंत्राच्या नादात जरा टेक्स्टबुकिश झालाय. बेनेगलांकडुन जास्त अपेक्षा होत्या.
तुम्ही छानच लिहीताय.
सुंदर लिहीले आहे.
सुंदर लिहीले आहे. परिच्छेदांची संख्या वाढवली तर वाचायला आणखी सोपे जाईल.
चित्रपट मस्तच आहे, खरच बेनेगल
चित्रपट मस्तच आहे, खरच बेनेगल यांना मानलं आणि यातील कलाकारांनाही.
चित्रपटांच्या रसग्रहणाचं भान
चित्रपटांच्या रसग्रहणाचं भान तुमच्या प्रत्येक अप्रतिम विश्लेषणाने वाढतं आहे. धन्यवाद.
आपण उल्लेख केलेल्यांपैकी " Run Lola Run " पाहून मी खूपच प्रभावित झालो होतो; आपण तांत्रिक बाजू समजावल्यावर मी कां प्रभावित झालो होतो तेंही कळलं ! इतर कोणतंही तंत्र वापरून तो सिनेमा कंटाळवाणाच झाला असता हेंही जाणवलं.
माझा राहिलाय हा सिनेमा
माझा राहिलाय हा सिनेमा बघायचा.
तुम्ही छान लिहिले आहेत.
कुठे बघायला मिळेल हा चित्रपट?
कुठे बघायला मिळेल हा चित्रपट?
तुनळीवर !
तुनळीवर !