संथ चालती ह्या मालिका

कालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्‍याच बेटियॉ दिसत होत्या. एकूण प्रसंग सात फेरे वाला होता. सगळे क्रमाक्रमाने आनंदी, वात्सल्ययुक्त (काही 'युक्त' म्हंटले की श्रीखंडच आठवते. भूक लागली ) वगैरे नजरेने पाहात असतात. तेवढ्यात त्यातली एक खुनशी वगैरे हास्य करते यातील त्या कृतिका देसाईसारख्या दिसणार्‍या बेटीकडे बघून (सोयीसाठी आपण तिला क्रुतिका देसाईच म्हणू), चार पाच वेळा कॅमेरा फटाफट झूम इन झूम आउट होतो, पण इकडे फेरे चालूच असतात. वधूच्या डोक्यावरचा घूंघट पूर्ण चेहरा झाकत असतो, पण पुढून खालच्या कोनातून बघितले की आत एक हॉरर पिक्चर मधे दाखवतात तसे डोळे असलेला चेहरा दिसतो. त्याचबरोबर एक दुसरी बेटी कोठेतरी बहुधा कोंडलेली तेथून बाहेर पडते व रिक्षाने कोठेतरी जायला निघते.

मग क्रु.दे. ला शंका येऊ लागते, तेवढ्यात तो घूंगट जरा हालतो आणि तिच्या लक्षात येते की ही भलतीच बेटी फेरे मारते आहे. आणि एकदम क्रु.दे. 'रोक दो ये शादी' ओरडते. पुढचे ५-१० मिनीटे प्रत्येकाचे reaction शॉट दाखवलेत नुसते वेगवेगळ्या कोनातून. प्रत्येक जण इमाने इतबारे दुसर्‍याची प्रतिक्रिया झाल्याशिवाय आपली देत नाही. इतके की शेवटी दिग्दर्शकच विसरतो की मूळ आरोळी क्रु.दे नेच मारली होती, कारण तिच्याच ओरडण्यावर तिचीच पुन्हा प्रतिक्रिया दाखवली आहे. या प्रतिक्रियांमधेच चार पाच फेरे होऊन गेले असतील मग तो गोंडस वगैरे दिसणारा वर त्या बेटीचा घूंघट (खस कन वगैरे नाही, अगदी 'घूंघट उठा रहा हू मै...' कभी कभी स्टाईल) उचलतो आणि अजूनपर्यंत तुमच्या लक्षात आले नसेल तर (मात्र तुम्ही या सिरीज पुन्हा पुन्हा पाहा) सांगतो की त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतीच मुलगी निघते.

मग तो बहुधा सासरा किंवा मोठा दीर असावा असा माणूस (तो पहिल्या मुन्नाभाई मधला... ज्याला शेवटी मुन्नाभाइ बोलका करतो तो, नाव आठवत नाही) बरेच डॉयलॉग बोलतो. मग पुढची वाक्ये ऐकू आली नाहीत (कोणीतरी चुकून रिमोटवर mute दाबले आणि रिमोट शोधून म्यूट बटन शोधून लावण्यासाठी तेथे काही रिची बेनॉ बोलत नव्हता) पण झीकृपेने सबटायटल्स होती: you are a prostitiute , किंवा ...behaving like a lajawanti girl किंवा असेच काहीतरी. वर तिला ही धमकी देतो की जर तू पुन्हा असे केलेस तर काहीतरी करीन. म्हणजे एकदा हा प्रसंग घडल्यावर सुद्धा पुढच्या लग्नात जिचे लग्न आहे तीच मुलगी फेरे मारायला उभी राहील याचा भरवसा यांना नाही.

१० मिनीटेच एवढी जबरदस्त असतील तर सिरीयल काय असेल? लावायला पाहिजे हे चॅनेल

Submit to kanokani.com

मारुतीची शेपटी 'वाढता वाढता' वाढ्ताना पाहून रावणाला जसं वाटलं असेल तस्सं 'आभास हा' बघताना मला वाटतं - दरवेळी. फक्त मला रावणासारखी दहा तोंडं आणि २० डोळे नाहीत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

अर्जुनला गाडीने उडवल्यावर हॉस्पिटलात नेलं होतं तिथे रोहितच्या मित्राने त्याला मारायचा प्रयत्न केला. अर्जुन कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमध्ये गेला त्यावेळी त्या डॉक्टरने त्याला एव्हढ्या वेळा शॉक दिला की तो त्या शॉक्समुळे तरी वरची वाट धरेल अशी आशा मला वाटली. पण वाचला. माया रोहित दिसतो तो नाहिये असं सांगायला रोहित आणि आर्याच्या साखरपुड्याच्या वेळी आली तेव्हा विश्वाने तिच्या कानाखाली लगावली. मग ती भडकली आणि विश्वा, रोहित आणि आर्या सगळ्यांना धडा शिकवायचा तिने निश्चय केला. मग तिचा तो भाऊ आणि त्याची बायको घर सोडून गेले होते ते गरिबीला कंटाळून परत आले आणि पुन्हा आपल्या कारवायांना त्यांनी सुरुवात केली. आर्या २-३वेळा त्याच हॉस्पिटलात रोहितच्या औषधासाठी आली पण ती आणि अर्जुन दरवेळी भेटले नाहीत.

हॉस्पिटलातल्या नर्सेसना अर्जुनविषयी इतका पुळका की त्याच्या तोंडून आर्याच्या नावाचा जप ऐकून त्यांनी ह्या आर्याला फोन केला. तो नेमका रोहितने उचलला. तो अर्जुनला मारायला आला. पण रोहितचा पाठलाग करत आलेल्या मायाने खोलीची काच फोडून गर्दी जमवली. मग तिने नर्सला मी अर्जुनची आई आहे असं सांगितलं आणि तो मेल्याचं नाटक रोहितसमोर करवून त्याला घरी घेऊन गेली आहे.

इथे मायाच्या भावाने फोन केल्याने विश्वाला रोहितचा संशय आला. म्हणून तो चौकशी करायला अलिबागला गेला. आता परत आल्यावर रोहित आणि आर्याचं लग्न एव्हढ्यात नको म्हणतोय. मायाच्या भावाला बघून तो त्याचा पाठलाग करत मायाच्या घरात गेला. पण तिथे असलेला अर्जुन त्याला दिसला नाही. अरे हे घर आहे का पांडवांची मयसभा?

आता आर्या आणि अर्जुन भेटतील आणि मालिका संपेल असं म्हणता म्हणता मायाने अर्जुनला हाताशी धरून रोहित, आर्या आणी विश्वा ह्यांना देशोधडीला लावायचा निश्चय केलाय.

बालिका बधू मध्ये जग्या आणि आनंदीने डिव्होर्स पेपर्स साईन केले. दादीने आनंदीच्या आयुष्यात दुसरा कोणी येईल असं म्हटलं, आनंदीला घोड्यावरून येताना कोणीतरी स्वप्नात दिसलं. ती राजस्थानात असल्याने उंटावरचा कोणी शहाणा दिसायला हवा होता असं माझं मत आहे. अर्थात ह्या मताला काडीचीही किंमत नाही. मग आनंदीला सरपंच म्हणून गावाचा विकास केल्याबद्दल सरकारकडून बक्षीस मिळालं म्हणून समारंभ होता. त्याला नवा कलेक्टर येणार होता. आनंदी नटूनसजून तयार झाली. पण ऐनवेळी लावलेल्या फटाक्याने घोडे बुजले आणि घोडागाडी घेऊन पळत सुटले. आनंदीने शांतपणे बसावं किंवा बाहेर उडी टाकावी पण ती आत हिंदी चित्रपटातल्या हिरविणीप्रमाणे 'बचाओ बचाओ' असं ओरडत सुटली. एकाच रानात तिला आणि आपल्याला गरागरा फिरवल्यावर एक एसयुव्ही आली. त्यातल्या माणसाने जीवावर उदार होत तिला वाचवलं आणि गाडी निकामी झाल्यामुळे घोड्यावर बसवून तिला सुखरूप परत आणलं. हेच ते कलेक्टर बाबू. कलेक्टरच्या मानाने बरेच तरुण दिसतात. परत त्यांना muscles build करायलाही वेळ मिळालेला दिसतोय. आता अश्या माणसाला गर्लफ्रेन्ड (किंवा बॉयफ्रेन्ड) असणार ना? पण दादी त्याचं आणि आनंदीचं जमवायच्या प्रयत्नात आहे.

हे असं काही दाखवलं की आमच्या मातोश्री आमच्याकडे एक विशिष्ट कटाक्ष टाकतात. त्यांना काय माहित की आमची टॅक्सी सिग्नलला थांबली की शेजारच्या टॅक्सीत सिनियर सिटिझन्स किंवा पानाची पिचकारी टाकणारे भैय्ये, वाढत्या अंगाच्या पृथुला ह्यांपैकीच कोणीतरी असतात. बस असेल तर किरकिरणारं पोर असलेली लेकुरवाळी माझ्याचजवळ येऊन बसते. नशीब नशीब म्हणतात ते दुसरं काय असतं हो? तूर्तास हे असले कलेक्टर्स पाहून जयपूरमध्ये एखादी आयटी कंपनी आहे का हे मी सध्या शोधत आहे. पधारो म्हारे देस! फिदीफिदी

आभास हा म्हणजे आजीसाठीचा प्रसाद ((देवळात मिळालेला) बस कंडक्टरला देणे..तीच का? आजी दिसली का?

काल दूरदर्शनवर इन्सानियत नावाच्या चित्रपटात दिलीपकुमार आणि देव आनंद एकत्र दिसले. या दोघांनी एकत्र काम केले आहे हे मला माहीत नव्हते. राज-दिलीप मेहबूब खानच्या अंदाजमध्ये एकत्र होते . राज- देव कधी एकत्र आलेत का?

आज कुठल्यातरी चॅनेलवर संघर्ष हा चित्रपट आहे यात दिलीपकुमार, बलराज सहानी आणि संजीवकुमार हे तीन 'अभिनेते' एकत्र आलेत.

काल आणि गेल्या रविवारच्या सह्याद्रीवर संध्याकाळी भीमराव पांचाळेंच्या गझल गायनाचा कार्यक्रम होता.

नशीब नशीब म्हणतात ते दुसरं काय असतं हो? तूर्तास हे असले कलेक्टर्स पाहून जयपूरमध्ये एखादी आयटी कंपनी आहे का हे मी सध्या शोधत आहे. पधारो म्हारे देस!>>>>>>>>>>>>>>
स्वप्ना,

तुला दंडवत

काल दूरदर्शनवर इन्सानियत नावाच्या चित्रपटात दिलीपकुमार आणि देव आनंद एकत्र दिसले

हा एकमेव. आणि देवने केलेला हा एकमेव पोशाखी चित्रपट.

<<कलेक्टरच्या मानाने बरेच तरुण दिसतात>>

कलेक्टर म्हातारेच असतात कशावरुन? स्मित

UPSC तर्फे घेण्यात येणार्‍या Civil Services Exam वयाच्या अव्घ्या २२ व्या वर्षी उत्तीर्ण करणारे लोक आहेत्..त्या मानाने दाखवलेला कलेक्टर मोठाच दिसतो...स्मित

मास्टरशेफ ज्युनियर कधी असतं? मागे जाहिराती बघितल्या होत्या, तेंव्हा नक्की बघायचं असं ठरवलं होतं.
रिपीट टेलिकास्ट कधी असेल पहिल्या एपिसोडचामाहितेय का?

स्वप्ना, नेहेमीप्रमाणेच अशक्य हसलेय तुझ्या बालिकावधू पोस्टवर. परवा साबा बहुदा हाच एपिसोड बघत होत्या पण मी जेमतेम दोन मिनिटं बघितला आणि हलले तिथून. अरेरे!

मला एकदम उडान मधला कलेक्टर शेखर कपूर आठवला. आणि त्याची ती कविता चौधरीला मदत करायला केलेली एन्ट्री अजून आठवतेय. तमाम पोरी मरायचो त्याच्यावर.. फिदीफिदी
नंतरच्या आयुष्यात प्रत्यक्षात भेटलेले/ पाहिलेले कलेक्टर किती बेंगरूळ, डल आणि वाईट्ट दिसणारे निघाले.. असोच.

अल्पना., दुपारी एक वाजता लागलय बघ. नुकतंच चालू झालय.

बिग बँग थेअरी आजपासून बारा वाजता लागतय.

सध्या पोरगा मडगास्कर बघतोय टिव्हीवर. आता लक्ष ठेवेन आणि परत दिसतं का बघेन.

भरत,
देव आणि राज ने एकत्र काम बहुतेक नाहीच केले, पण त्याच्या काला बाजार मधे, काही चित्रपटांचे प्रिमियर
दाखवले आहेत. त्यात राज कपूरला बघितल्यासारखा वाटतोय.

स्वप्ना हाहा

ज्युमाशेऑ ८-१० वर्षाच्या मुलांनी मासे नीट करण्यापासून सग्गळ केलं? सुरुवातीच्या फेर्‍यांमध्येच थक्क करून सोडलं त्या पोरांनी. मुख्य फेर्‍यांबद्दल उत्सुकता वाढलीय.

स्वप्ना, नेहमी प्रमाणेच हाहा

मंडळी स्मित

आजकाल 'कैरी - कुछ खट्टी कुछ मीठी' आणि 'ससुराल सिमरका' एकत्र दाखवताहेत त्यामुळे माताजी, सुजाताबहू, करुणाबहू, उमा, परी, सिमर, रोली, सिध्दार्थ आणि प्रेमजी ह्या सर्वांच्या तडाख्यातून सुटका झाली आहे. भगवानकी लीला अगाध है!

माहीम कॉजवेवर २१ ते २८ मे - सकाळी १० ते रात्री १० आंबा महोत्सव सुरु आहे. इच्छुकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. स्मित

स्वप्ना, तू तिथे मी बघ की ग. आम्हाला त्याचं स्वप्ना-परिक्षण वाचायला फारफार आवडेल. स्मित