- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
उपग्रह वाहिनी
सदस्य प्रवेश |
संथ चालती ह्या मालिकाकालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्याच बेटियॉ दिसत होत्या. एकूण प्रसंग सात फेरे वाला होता. सगळे क्रमाक्रमाने आनंदी, वात्सल्ययुक्त (काही 'युक्त' म्हंटले की श्रीखंडच आठवते. भूक लागली ) वगैरे नजरेने पाहात असतात. तेवढ्यात त्यातली एक खुनशी वगैरे हास्य करते यातील त्या कृतिका देसाईसारख्या दिसणार्या बेटीकडे बघून (सोयीसाठी आपण तिला क्रुतिका देसाईच म्हणू), चार पाच वेळा कॅमेरा फटाफट झूम इन झूम आउट होतो, पण इकडे फेरे चालूच असतात. वधूच्या डोक्यावरचा घूंघट पूर्ण चेहरा झाकत असतो, पण पुढून खालच्या कोनातून बघितले की आत एक हॉरर पिक्चर मधे दाखवतात तसे डोळे असलेला चेहरा दिसतो. त्याचबरोबर एक दुसरी बेटी कोठेतरी बहुधा कोंडलेली तेथून बाहेर पडते व रिक्षाने कोठेतरी जायला निघते. मग क्रु.दे. ला शंका येऊ लागते, तेवढ्यात तो घूंगट जरा हालतो आणि तिच्या लक्षात येते की ही भलतीच बेटी फेरे मारते आहे. आणि एकदम क्रु.दे. 'रोक दो ये शादी' ओरडते. पुढचे ५-१० मिनीटे प्रत्येकाचे reaction शॉट दाखवलेत नुसते वेगवेगळ्या कोनातून. प्रत्येक जण इमाने इतबारे दुसर्याची प्रतिक्रिया झाल्याशिवाय आपली देत नाही. इतके की शेवटी दिग्दर्शकच विसरतो की मूळ आरोळी क्रु.दे नेच मारली होती, कारण तिच्याच ओरडण्यावर तिचीच पुन्हा प्रतिक्रिया दाखवली आहे. या प्रतिक्रियांमधेच चार पाच फेरे होऊन गेले असतील मग तो गोंडस वगैरे दिसणारा वर त्या बेटीचा घूंघट (खस कन वगैरे नाही, अगदी 'घूंघट उठा रहा हू मै...' कभी कभी स्टाईल) उचलतो आणि अजूनपर्यंत तुमच्या लक्षात आले नसेल तर (मात्र तुम्ही या सिरीज पुन्हा पुन्हा पाहा) सांगतो की त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतीच मुलगी निघते. मग तो बहुधा सासरा किंवा मोठा दीर असावा असा माणूस (तो पहिल्या मुन्नाभाई मधला... ज्याला शेवटी मुन्नाभाइ बोलका करतो तो, नाव आठवत नाही) बरेच डॉयलॉग बोलतो. मग पुढची वाक्ये ऐकू आली नाहीत (कोणीतरी चुकून रिमोटवर mute दाबले आणि रिमोट शोधून म्यूट बटन शोधून लावण्यासाठी तेथे काही रिची बेनॉ बोलत नव्हता) पण झीकृपेने सबटायटल्स होती: you are a prostitiute , किंवा ...behaving like a lajawanti girl किंवा असेच काहीतरी. वर तिला ही धमकी देतो की जर तू पुन्हा असे केलेस तर काहीतरी करीन. म्हणजे एकदा हा प्रसंग घडल्यावर सुद्धा पुढच्या लग्नात जिचे लग्न आहे तीच मुलगी फेरे मारायला उभी राहील याचा भरवसा यांना नाही. १० मिनीटेच एवढी जबरदस्त असतील तर सिरीयल काय असेल? लावायला पाहिजे हे चॅनेल |
|
'कुलवधू'ची नायिका 'अपूर्वा गोखले' आहे ना? मला आवडायची ती. पूर्वी 'भाग्यविधाता' म्हणून मालिका लागायची ई टीव्हीवर त्यात होती ती. ('गोखले' मध्यंतरी बदललं असण्याची शक्यता आहे) काल बघितली, तेव्हा तरी पहिल्यासारखीच छान दिसत होती. सदाशिव अमरापूरकरही त्याच मालिकेच्या प्रोमोमध्ये सायकलरिक्षा चालवताना पाहिले!
लोकांचा काम करण्याचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे!
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
पूनम, 'पूर्वा गोखले'.... छानच दिसते ती. तिने मध्यंतरी 'बालाजी टेलिफिल्म्स' शी काँट्रॅक्ट केलं होतं, म्हणून बहुतेक मराठीतून दिसेनाशी झाली होती. तिची मुलगी ३ वर्षाची आहे.
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही....
अरे स्टारवर पहिल्या आठवड्यात आटपलेली एक 'कुलवधू' नावाची मालिका होती. ह्या नवीन मालिकेचे प्रोमोज त्यासारखेच दिसतायत. त्यातपण मिलिंद गुणाजी होताच की.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अवघाची संसार मधली "शारदा राजे" आहे ना तिचे लग्न आहे २० तारखेला, आमच्या सोसायटीतल्या मुलाशी. लग्न झाल्यावर ती जाणार अमेरिकेला. मग थोड्या दिवसांनी मालिकेत तीला रिप्लेस करतील.
--------------------------------------------------
अरेरे ती मालिका बघण्याचे एकमेव कारणही जाणार(येणार) अमेरिकेला..
>>प्रिया आदिनाथ सुलेखाच्या संपर्कात आहे हे ऐकून विचारात पडते.
का पण? तिला तर माहित होतं ना हे? आणि विक्रांतने ती डायरी सुलेखाला का दिली? प्रियाने ती वाचली नव्हती ना? निदान फोटोकॉपी तरी काढायची
>> आता वसा मध्येहि यासुया सारखाच घर सोडणे ड्रामा सुरु आहे
हे सगळे लोक घर सोडून जातात कुठे हा प्रश्न आहे
असंभव मध्ये काय चाललय कोणी सांगेल? १०/१२ दिवसांनी आत्ता बघीतली, काही लिंक लागत नाहीये (चक्क !)
सुरभी, आता एकदम वेग घेतलाय असंभवने. विक्रांत परत आलाय. तो प्रिया आणि आजोबांना भेटल्यामुळे तिघेही सध्या खुश. प्रियाचे विक्रांतवर प्रेम आहे याचा त्या दोघांनाही साक्षात्कार झालाय. आजोबांनाही!! सुलेखा, शुभ्रा आणि प्रथमेशला पुन्हा गतजन्मीचे भास होऊ लागलेत. अभिमान मेला असे घोषित झाले आहे. आणि चंदूच्या एका पुण्यातल्या मित्राला एका मुलीने भाड्याच्या घराबाबत काहीतरी फसवून पळून गेली म्हणून तो त्याला मदत करत असताना त्या मुलीचला मदत करणारा तिचा मित्र म्हणून जे स्केच काढले जाते ते चक्क आदिनाथचे निघते!! म्हणजे ती मुलगी सुलेखाच ही ट्यूब अजून तरी चंदूच्या आणि त्याच्या बायकोच्या डोक्यात कशी पेटली नाही हा एक मला पडलेला भा. प्र!!

काल स्वप्नील परत आला. आणि त्याला प्रिया खूप आनंदात असलेली दिसली. आता बहुतेक त्याला वाटेल की आपल्या परत येण्याने प्रियाला इतका आनंद झालाय.. हम्म्म्म.. म्हणजे कहानी मे पुरानाच ट्विस्ट!!
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
aashu_D, तुला पडलेला प्रश्न मलाही पडलाय
असो, सोपानने आजोबांना सांगितलं की प्रथमेश भुयाराजवळ बेशुध्द मिळाला त्याआधी त्यांनी त्याला कोणाशी तरी बोलताना पाहिलं, प्रथमेशला बोलता येत नाही त्यामुळे सोपान खोटं बोलतोय असं आजोबांनी त्याला सांगितलं, सुलेखाला इंदू आणि तिच्या मागे धावणारी गोदा स्वप्नात दिसते, आणि मग प्रथमेश आणि त्याने काढलेले त्या दोघींचं भुयाराकडे धावत येतानाचं चित्र दिसतं, त्यातून तिला प्रथमेश हा गोदाचा पुनर्जन्म आहे हे कळतं, अजून आजोबांच्या डोक्यात हा प्रकाश पडला नाहिये हे आणि एक गूढ.....
माठ शुभ्राला परत एक सावली दिसतेय आणि ती डॉक्टरकडे (बर्वे) धाव घेते, आजोबांना पण ती फोन करून सांगते, आणि ते तिला विचारतात की कोणाची आहे तर म्हणते मला माहित नाही....
शुभ्राला सतत दिसणार्या ३,६,९ ह्या आकड्यांची बेरीज ९, तसंच पार्वती, शुभ्रा आणि सुलेखाच्या जन्मतारखेची बेरीज पण ९ हे आजोबांना कळलंय पण त्याचं काय महत्त्व आहे काय माहीत.....
प्रथमेशने काढलेले चित्र सोपानने पळवलं आणि त्याला कळत नाहीये की हे द्रुष्य प्रथमेशने कुठे पाहिलंय?प्रथमेशला आपलं चित्र नाहीसं झाल्याचं कळलंय
मला तर असं दिसतंय की आजोबांनी कुसुमआत्याला वाड्यावर ये असं सांगितलंय, ती तिथे जाणार, सुलेखा तिच्या डोक्यात शिरून प्रथमेशला मारायचा प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नात आत्या मारली जाणार, म्हणून प्रथमेशच्या भविष्यात तो एका स्त्रीच्या मृत्युला कारणीभूत होणार असं आहे, पण मग आत्याचा मृत्यु आजोबांना दिसायला हवा....
अशी आशा करुयात की मालिका संपण्याआधी ह्या प्रश्नांची उकल होईलः
१. पार्वती घरातून का नाहीशी झाली? तिचं आणि महादेवचं कुठे बिनसलं? इंजिनिअर (बर्वेचा आधीचा जन्म) आणि महादेवचं त्या रात्री काय बोलणं झालं? इंजिनिअरचं पार्वतीवर प्रेम होतं का नुसताच आदर? तिचा मृत्यु कसा झाला?
२. शास्त्री कुटंबातल्या बाकीच्या व्यक्तींचा मृत्यु कसा झाला? म्हणजे भागीरथी, तिचा नवरा, तिचा आणखि एक भाऊ आणि त्याची बायको....
३. महादेवला वेड का लागलं? आणि तो सोपानला बघितल्यावर का बेभान होताना दाखवलाय? तो सोपानला पार्वती कुठे आहे असं का विचारतो?
४. गोदाचा मृत्यु कसा झाला?
५. इंदूची धिंड का काढली गेली? तिचा मृत्यु कसा झाला?
६. भागीरथीची तिच्या नवर्याने चोरलेली आणि इंदूला दिलेली मोहनमाळ विष्णूला वृंदावनाजवळ कशी पुरलेली मिळते?
७. निखिल आणि बाळकाका ह्यांना वाचवायला पार्वती का आली नाही? फक्त प्रियालाच तिने का वाचवलं?
८. निखिलच्या सख्ख्या आईला गाडीने उडवणारी सुलेखाच होती हे शास्त्री कुटंबाला कळायला हवं. हा अपघात होता का इंदूचा पहिला बळी?
९. ९ आक्ड्याचं काय महत्त्व आहे?
१०. निखिलच्या डायरीत काय लिहिलंय?
निखिल आणि बाळकाका ह्यांना वाचवायला पार्वती का आली नाही? फक्त प्रियालाच तिने का वाचवलं? >> सही पॉइंट .
काय जबरा आभ्यास केलाय मालिकेचा
यातल्या काही प्रश्नांची उकल थोडीफार झालेली आहे.
इंदूची धिंड का काढली गेली? >> महादेवमुळे तिचे आणि भालचंद्राचे संबंध गावात कळतात आणि बहुतेक भालचंद्र त्याचा सगळा आरोप तिच्यावर ढकलून पळून जातो. घरातले चोरलेले दागिनेही तिच्याकडे मिळतात. महादेव तिची धिंड काढतो. कारण जेव्हा माळ चोरल्याचे कळते तेव्हा यमी मावशी गोदाला म्हणते,"तुझ्याकडे जर मआळ मिळाली तर गावातून धिंड निघेल तुझी त्यापेक्षा आताच काय ते खरं सांग."
शास्त्री कुटंबातल्या बाकीच्या व्यक्तींचा मृत्यु कसा झाला? म्हणजे भागीरथी, तिचा नवरा, तिचा आणखि एक भाऊ आणि त्याची बायको.... >>
धिंड काढल्याने इंदू सूडाच्या भावनेने पेटून उठते. ती गावातल्या त्या चेटकीणीच्या मदतीने (जी आत्त्ताची तनिष्का आहे)त्या दुष्ट शक्तीची उपासना करते आणि सार्या शास्त्री कुळाचा नाश करायचा विडा उचलते. आणि एकेका शास्त्र्याचा बळी घेते.
पार्वती घरातून का नाहीशी झाली? तिचं आणि महादेवचं कुठे बिनसलं? इंजिनिअर (बर्वेचा आधीचा जन्म) आणि महादेवचं त्या रात्री काय बोलणं झालं? इंजिनिअरचं पार्वतीवर प्रेम होतं का नुसताच आदर? तिचा मृत्यु कसा झाला?
>> पार्वतीला घरातून महादेव तिच्यावर संशय घेऊन हाकलतो. कारण एका महाशिवरात्रीला तो आणि बर्वे भांग पीत असताना बर्वेच्या मनातला पार्वती बद्दलचा सॉफ्ट कॉर्नर महादेवला कळतो. पार्वतीही सारखी "भाऊजी भाऊजी " करत असते त्यामुळे त्याचा संशय बळावतो. याला पुष्टी देणार्या अजूनही काही घटना घडतील.
इंजिनिअर (बर्वेचा आधीचा जन्म) आणि महादेवचं त्या रात्री काय बोलणं झालं?महादेवला वेड का लागलं? >> आपला संशय खोटा आहे हे त्या बोलण्यातून कळते आणि विनाकारण आपण पार्वतीला हाकलून लावलं या अपराधीपणातून महा. ला वेड लागतं.
इंदू आणि पार्वतीचा मृत्यु कसा झाला? >> घरातून हाकलून दिल्यावर पार्वती गावाबाहेरच्या टेकडीवर जाते.. तिथे इंदू तिची त्या वाईट शक्तीची उपासना करत असते. दुष्ट शक्ती आणि पार्वतीची पवित्रतेची सुष्ट शक्ती यांचा सामना होतो आणि त्या ठिकाणी भूकंप होतो आणि दोघीही त्यात गायब होतात.
सगळंच असंभव आहे. विश्वास ठेवा अगर नका ठेवू!!
निखिलच्या डायरीत काय लिहिलंय? >> की सुलेखानेच त्याच्या आईला मारलंय.
हुश्श्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
ग्रेट........... आशु, ग्रेट विचारशक्ती..... वाचल्यावर मला वाटायला लागलं अगदी असेच असेल....
मी सुरवातीला जवळजवळ निखिलच्या मृत्युपर्यंत मालिका पाहीली नाही. त्यामुळे थोडे प्रश्न पडलेत..
निखिलच्या आईच्या मृत्युत आणि त्याच्या मृत्युत काही वर्षांचे अंतर असेल बहुतेक. कारण एवढा मोठा मुलगा असेल तर बाळ कदाचित लगेच लग्न करणार नाही. मग लग्नापासुन ते निखिलला मारेपर्यंत सुलेखा काय करत होती? की ती आदीला प्रेमात पाडायच्या प्रयत्नात होती?
डायरी कधीपासुन बाळकडे होती, ब-याच वेळा तो ती घेऊन बसलाय आणि मग पुनम त्याला त्याबद्दल बोललीय असेही दाखवलेले, मग ती त्याने कधीच वाचली का नाही? नुसती पुढ्यात घेऊन बसायचा आणि मग नाहिशी झाल्यावर त्याला ती वाचायची ओढ लागली. असे का?
विक्रांतकडे डायरी कशी आली? तनिष्का डायरी आणि सुलेखा दोघांनाही घेऊन गेली होती ना त्या रात्री??
त्याने ती डायरी निदान आदीला आणि मधुला वाचायला द्यायला पाहिजे होती. निदान आदिला तरी नक्कीच ...
जबर्या आशू! मी फार उशीरा पहायला लागले असंभव.. त्यामुळे यातले सगळेच माहीत नव्हते, आता समजले! धन्स गं!
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
आशुडे , सतीश च्या ऐवजी तू का नाही करत ही मालिका ??
इंदू आणि पार्वतीचा मृत्यु कसा झाला? >> घरातून हाकलून दिल्यावर पार्वती गावाबाहेरच्या टेकडीवर जाते.. तिथे इंदू तिची त्या वाईट शक्तीची उपासना करत असते. दुष्ट शक्ती आणि पार्वतीची पवित्रतेची सुष्ट शक्ती यांचा सामना होतो आणि त्या ठिकाणी भूकंप होतो आणि दोघीही त्यात गायब होतात.
>> इतक पुढच सगळ माहीतीय तुला
धन्स!!
म्हणून तर आता ती पाहणे सोडता येत नाहीये!

.

मी एकही एपिसोड न चुकता पाहिली आहे..
सतीश च्या ऐवजी तू का नाही करत ही मालिका ?? >> म्हणून तर त्याला परवा दार मोडल्याचे जाहीर कर म्हणाले ना!
आशु, ग्रेट विचारशक्ती..... वाचल्यावर मला वाटायला लागलं अगदी असेच असेल....
>>इतक पुढच सगळ माहीतीय तुला >>यातले सारे संदर्भ कधी आजोबांच्या तोंडून तर कधी सोपानच्या तोंडून आलेत. माझ्या मनाचे काही नाहीये. मी फक्त तुम्हाला अपडेट केलं..
विक्रांतकडे डायरी कशी आली? >> तनिष्काच्याअ घरी चोरी होते आणि फक्त डायरीच जाते!
निखिलच्या आईच्या मृत्युत आणि त्याच्या मृत्युत काही वर्षांचे अंतर असेल बहुतेक. >> आई जाते तेव्हा निखिल जेमतेम ८ वर्षांचा असतो. आता प्लीज सुलेखा, निखिल, पूनम आणि बाळ यांच्या वयाचे अंदाज लावू नका.. काही गोष्टी सोडून द्या...
मग लग्नापासुन ते निखिलला मारेपर्यंत सुलेखा काय करत होती? >> तिचे खरंच आदिवर प्रेम असते. आणि आदिचेही तिच्यावर. मधे ५ वर्ष आदि अमेरीकेत असतो तेव्हा घरी कळते आणि ते त्यांचे लग्न ठरवतात. पण परत आल्यावर आदिला साखरपुडा झाल्यावर कोकणात जावे लागते आणि तिथे त्याला शुभ्रा भेटते.. आणि मग जन्मजन्मांतरीचे नाते असल्याची जाणीव होऊन तो तिच्याशी लग्न करूनच परत येतो... आणि मग सुलेखातली इंदूमती जागी होऊ लागते..
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
आनि मग सुलेखातली इंदूमती जागी होऊ लागते.. >> म्हणजे मग निखीलची आई अपघातानेच मरते ....
तसंच काही नाही, मनिषापण गूढपणे मेलेली असतेच.. तेव्हा त्या दोघी ११ वर्षाच्याच असतात.. तिला इंदुमतीच्या शक्तिची जाणीव आदी-शुभ्रचे लग्न झाल्यावर होते.. त्याआधी इंदुमतीची जाणीव नसूनही तिच्यामध्ये संहारक शक्ति असणारच
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
बापरे ! इतकं सगळं वाचल्यावर आता असंभव नाही पाहिली तरी चालेल.
म्हणजे मग निखीलची आई अपघातानेच मरते .... >> हो.. पण तो अपघातही कसा होतो.. सुलेखा आणि अभिमान कॉलेजमधले मित्र असतात.. तेव्हाही अभिमानचे तिच्यावर प्रेम असते. तो तिला कार चालवायला शिकवत असतो आणि तेव्हा ताबा सुटून निखिलची आई रस्ताक्रॉस करताना उडवली जाते. मग तेव्हा सरंजामे सुलेखाला आणि अभिमानला पोलीसांच्या कचाट्यातून सहीसलामत सोडवतो अन अभि. ला परदेशी पाठवून देतो. मधे अभिमान अन सुलेखाचा काही काँटॅक्ट होत नाही. अन तो परत आल्यावरही ते अचानक पोलीस स्टेशन बाहेरच भेटतात.. सुलेखाला निखिलच्या अपघातासंबंधी चौकशीला बोलावले असताना.
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
बापरे ! इतकं सगळं वाचल्यावर आता असंभव नाही पाहिली तरी चालेल.
नाही, उलट पाहायलाच हवी... असेच आहे का ते बघायला...
खरंच हल्ली असंभव सोडवत नाही.. पहिल्यांदाही सोडवत नव्हती पण सतिश गेल्यावर रयाच गेली.... दुर्दैवाने मला घरी जायला उशिर होतो, त्यामु़ळे ८.३० ची चुकते आणि ११ वाजेपर्यंत जागे राहावत नाही
सुलेखात संहारक शक्ती आधीपासुनच आहे, आणि ज्यांना ह्याची जाणिव होते त्यांना तिने मारण्याचा प्रयत्न केलाय.. मनिषा मरते, तिची आई वाचते.
निखिलच्या आईच्या मृत्युबद्दल माहित नव्हते. मला वाटलेले कसाही करुन शास्त्री कुटूंबाशी संबंध यावा म्हणुन सुलेखाने असे केले.
पण सुलेखा (म्हणजे निगेटीव्ह) छान रंगवलीय निलम शिर्के ने तेव्ह्ढ्या ताकतीची पार्वती वाटत नाही. सोपान च काम तर ए-वन
मानसी साळवी ही इतकी प्रभावी नव्हती . बहुतेक सुलेखाचाच रोल भाव खाउन जातोय अस वाटुन तिने मालिका सोडून दिली असावी.
मला सुलेखा पेक्शा सोपान काकांचं काम जास्त छान वाटतं.
आणि कुसुम आत्या सुद्धा.... आगाऊ आणि भोचक बाई चं काम एकदम मस्त केलंय.
deepurza, हा पॉइंट माझा नाहीये, निखिल प्रियाच्या स्वप्नात येऊन तिला विचारतो
aashu_D, तसं ह्या सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीत तू केले आहेस तसे तर्क करता येतील पण मालिकेने त्याचा उलगडा करावा अशी अपेक्षा आहे
आईशपथ त्या निलम शिर्केला खरंच धरून बडवावं असं वाटतं, माझ्या आईला तर तिच्या सासूची जाम काळजी वाटते
सोपान आणि कुसुम आत्या काम मस्त करतात हे एकदम मान्य!
ओह, आणि प्रथमेश म्हणजेच गोदा हे अजून सुलेखा आणि तनिष्काला कळलं नाहीये पण प्रथमेश म्हणजेच मनिषा ह्याचा पुरावा मात्र काल आजोबांना मिळाला, खरं तर शुभ्राला गोदा, मनिषा, प्रथमेश एकत्र दिसले होते पण त्याचा अर्थ तिला कळला नाही का कळून तिने आजोबांना सांगितला नाही हे मला आठवत नाहीये.....
चंदू आदीला असं आडूनआडून का विचारतोय? आणि तो भागीरथीचा नवरा (अशोक शिंदे) ह्या जन्मात पण सुलेखाला दिसला होता त्याचं काय झालं?
तसंच आपल्या बहिणीने आपल्या मनात डोकावायचा प्रयत्न केला नाही पण ती एकदा सुलेखाला सोडवायला आली होती ह्याचा अर्थ तो प्रयत्न सुलेखाने केला असणार हे विक्रांतला कसं कळत नाही?
असो, काल यासुया संपली, मला वाटत होतं की शेवट्च्या क्षणी कस्तुरी आपल्या बाळाला घेऊन त्या आविष्कारबरोबर आलेली वगैरे दाखवतात की काय पण तसं काही झालं नाही, मला वाटतं त्यांना नोटीस दिली असणार म्हणून त्यांनी मालिका गुंडाळली....आज मासाहेब कुलवधू पाहातीलच्....आंखोदेखी पोस्ट करेन इथे
हम्म..... मी वरच्या सगळ्यांना असंभव बद्दल Ph.D. जाहीर करते...
त्या कुलवधु च्या प्रोमोज वरुन तरि सदाशिव अमरापुरकर आणि त्याची मुलगि म्हणजे मोहिते मास्तर आणि आसावरि वाटत आहेत परत.....
aashu_D, तसं ह्या सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीत तू केले आहेस तसे तर्क करता येतील पण मालिकेने त्याचा उलगडा करावा अशी अपेक्षा आहे >> याबाबत मी वर लिहीले आहे ना स्वप्ना,
>>यातले सारे संदर्भ कधी आजोबांच्या तोंडून तर कधी सोपानच्या तोंडून आलेत. माझ्या मनाचे काही नाहीये. मी फक्त तुम्हाला अपडेट केलं.. <<
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
विक्रांत भोसले परत इनस्पेक्टर म्हणून आलाय त्याचं नीट स्पष्टीकरण दिलं नाही, फक्त त्याने माझा प्रामाणिकपणा आणि ट्रॅक रेकॉर्ड ह्यामुळे मी परत आलो असं म्हटलं आहे.....त्याने अभिमानला पळून जायला मदत केली असा त्याच्यावर आरोप होता त्याचं काय?
प्रियाने आदिला चांगलं खडसावलं हे बरं झालं, आपण आधी सुलेखाला मदत करत होता शहाणा आणि वरती प्रिया कोणाशी बोलते त्यावर पाळत ठेवून आहे, हे म्हणजे "उलटा चोर कोतवालको डाटे".....पण सुलेखाची अटक अनपेक्षित होती, आता तनिष्का येईलच तिला सोडवायला.....
पण त्या मधुकर शास्त्री काय बोर केल काल
एक एक एपिसोड असाच वाया घालतात .
निखिल आणि बाळकाका ह्यांना वाचवायला पार्वती का आली नाही? फक्त प्रियालाच तिने का वाचवलं? >>>> एका भागात ह्याचाहि खुलासा होता ,की प्रिया हि वाडयावर असल्यामुळेच तिचे गन्डान्तर टळले होते असे काहितरी..... म्हणजे फक्त वाड्यात असेल तरच पार्वती त्या व्यक्तिला वाचवु शकते बहुतेक.....
>> म्हणजे फक्त वाड्यात असेल तरच पार्वती त्या व्यक्तिला वाचवु शकते बहुतेक
म्हणजे मग शास्त्री कुटुंबाने वाड्यातच जाऊन रहायला हवं.....काल मग शुभ्रा राधाला प्रथमेशला काहीही होणार नाही असा शब्द देते तो काय तो वाड्यावर आहे म्हणून? त्यापेक्षा तनिष्काची शक्ती बरी की - कुठेही बसून तिला सुलेखा काय करते ते दिसतं......
मधुकर शास्त्री खरंच वैताग आणतात, एरंडेल घेतल्यासारखा चेहेरा करून प्रियाशी बोलतात सदैव, त्यापेक्षा त्या कुसुमला थोडं दरडावून तिला वाड्यावर किंवा पुनमकडे हाकलतील तर त्या बायकोची डोकेदुखी कमी होईल थोडी....
काल परत प्रिया भोसलेशी बोलताना आत्या ऐकत होती.....मला वाटतं आता त्यां दोघांनी याहू चॅट करायला हवं
पण अजून तनिष्का सुलेखाला सोडवायला कशी आली नाही?
सगळया हिंदी मालिकांचं दळण सोमवारपासून परत सुरू होतंय
सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणे मालिका बंद झाल्याने वैतागले होते, त्यांना आपल्या वेळाचं काय करायचं हा प्रश्न पडला होता, दिल्लीत तर हॉटेलवाल्यांचा धंदा जोरात होता, ८ ते १० खूप गर्दी होतेय सध्या असं काल पेपरात होतं
मला "truman show" आठवला, त्यात हा शो बंद झाल्यावर लोक पुस्तकं, पेपर ह्यासारख्या इतर गोष्टींकडे वळतात!
काल वहिनीसाहेबमध्ये भैरवीला रडताना पाहिलं, मासाहेबांना विचारलं तर म्हणाल्या विश्वास मेला, ह्या सिरीयलमधल्या लोकांचा जास्तीत जास्त वेळा मरून परत जिवंत होण्याबद्द्ल गिनीजमध्ये समावेश केला पाहिजे
कुलवधूमध्ये सई रानडे उर्फ "वसा" मधली जानकीला खडूससारखा चेहेरा करुन बोलताना पाहिलं, एकूण सिरियलची कल्पना आली
तरी सदाशिव अमरापूरकर मास्तर वगैरे म्हणजे जरा "लईच" वाटतंय, मागे एकदा एका सिनेमात चंद्र्कांत गोखलेला व्हिलनच्या रोलमध्ये बघून असाच शॉक बसला होता 