कधीच ही आयुष्य कहाणी खरी वाटली नाही

अस्तित्वाची जबाबदारी कधी घेतली नाही
कधीच ही आयुष्य कहाणी खरी वाटली नाही

नुसते बसण्याहून म्हणालो जीव गुंतवावा हा
पृथ्वीसंगे मीही फिरलो सूर्यासभोवताली
प्रदक्षिणा चाळीस जाहल्या, धाप लागली नाही

नवे पुराणे अब्ज प्रवासी होते गाडीमध्ये
संपत होते, जन्मत होते, जिंकत, हारत होते
उभाच होतो, बसायला जागाच लाभली नाही

कधीच ही आयुष्य कहाणी..

Submit to kanokani.com

नुसते बसण्याहून म्हणालो जीव गुंतवावा हा
पृथ्वीसंगे मीही फिरलो सूर्यासभोवताली
प्रदक्षिणा चाळीस जाहल्या, धाप लागली नाही....... वा वा... सुंदर..

नवे पुराणे अब्ज प्रवासी होते गाडीमध्ये
संपत होते, जन्मत होते, जिंकत, हारत होते
उभाच होतो, बसायला जागाच लाभली नाही

अब्जाहूनही जास्त आहेत भूषणराव... स्मित

छान कविता..