ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling..!

Submitted by विनायक उजळंबे on 3 July, 2010 - 06:23

आताशा गाव सोडताना ..
वेगळे वाटायचे बंद झाले आहे..
पाउस तसाच भिजवतो सगळीकडे ..
उन्हं तापतात तशीच सगळीकडे..
आता एका गावातून दुसर्‍या गावी पोहचताना ..
घरी परतल्यासारखे वाटते ..
मला कळत नाही ..
हे ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling कुठून आलंय ?

कर्म करताना फळाची अपेक्षा करू नको..
कृष्ण गेला सांगून ...माउली गेले लिहून ..
त्याच सांगायला ..यांच रुपांतर करायला..काय जातं..
असं जगायच म्हणलं तर मरणं सोपं होतं...
आयला कळत नाही हे anti ज्ञानेश्वरी feeling कुठून आलंय?

जाणीवा सार्या जपताना .. नेणीवेचे प्रश्न उगाच..
माणसासारखे जगताना देवासारख का वाटतय?
सगळं feel feel मध्ये उतरवलं मनातले..
आता feelingness feel होतंय..
आता माणसापेक्षा वेगळा वाटतंय..
इथे वर हलके वाटतय..
"अरे , माउली तुम्ही..?"
"बघ म्हणलं होतं न?
कृती कर .. प्रचीती येयील.."..
.
.

विनायक

गुलमोहर: 

@प्रसाद & मयूरेश
______/\______

धन्यवाद !!

___/\___