Submitted by harish_dangat on 6 December, 2009 - 21:34
कालच्या पुरात पाणी
पुलावरुन वाहीले
बरेच काही वाहून गेले
पण काही मात्र राहीले
वाहून गेली पिकलेली
सारी हिरवीगार शेते
मागे राहीली ती
भुकेली खिन्न प्रेते
वाहून गेले कुणाच्या
घराचे लाकडी वासे
मात्र मागे राहीले
नशीबाचे उलटे फासे
वाहून गेली कुणाच्या
सरणावरची लाकडे
मागे राहीले सांगाडे
जळके आणि वेडेवाकडे
वाहून गेले कुणाचे
शाकारलेले झोपडे
मोकळ्या आभाळाखाली
उघडे त्याचे खोपडे
वाहून गेली कुणाच्या
दावणीची सारी गुरे
मागे राहीली चिंता
तो मनातच झुरे
वाहून गेला कुणाचा
तोंडी आलेला घास
मागे राहीला तो
छळनारा उपवास
कालचा तो पूर
नदी भरुन वाहीला
बाहेर ओसरला तरी
डोळ्यात भरुन राहीला
-हरीश दांगट
गुलमोहर:
शेअर करा
कालचा तो पूर नदी भरुन
कालचा तो पूर
नदी भरुन वाहीला
बाहेर ओसरला तरी
डोळ्यात भरुन राहीला........... भन्नाट्..आवडली !!!
सुन्न केलं कवितेनं! विलक्षण
सुन्न केलं कवितेनं! विलक्षण ताकदीनं वर्णन केलंय पुराचं. सलाम!!!!!!
कालचा तो पूर नदी भरुन
कालचा तो पूर
नदी भरुन वाहीला
बाहेर ओसरला तरी
डोळ्यात भरुन राहीला
खरच सुन्न केल
खरच सुन्न केल
जबरदस्त
जबरदस्त
रचना व आशय आवडला.
रचना व आशय आवडला.
निशब्द
निशब्द
शहारा आला अंगावर.. वास्तव
शहारा आला अंगावर..
वास्तव मांडलय पण उगाच अतिरंजीत न करताही खुपच परिणामकारक लिहीलय..
लगे रहो!
हरीशभौ, हल्ली एकदम वास्तववादी
हरीशभौ, हल्ली एकदम वास्तववादी लिखाणावर उतरलात. कवितेने सगळं चित्र डोळ्यासमोर उभं केलं.
च्रित्रमय कवीता. खरोखर अशीच
च्रित्रमय कवीता. खरोखर अशीच परिस्थिती असते.
शेवटचं कडवं चांगलं आहे. बाकी
शेवटचं कडवं चांगलं आहे. बाकी मधली ठीकठीक.
शुद्धलेखनाकडे लक्ष द्यायला हवंय.