महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुले-मुली या समान आहेत हे बिंबवणारे पालक<<< इथेच तर आपलं घोडं पेंड खातंय...

परवा याच विषयावर इथे दिल्लीत वाढलेल्या एक बाई बोलत होत्या. 'मी माझ्य मुलीला भारतात कधीच पाठवणार नाही...' वगैरे.

पण या बाईंच्या घरात, 'नवरा म्हणेल ती पूर्वदिशा', 'तो खर्चाला देईल तेवढेच पैसे खर्चणे', 'तो दुकानात नेईल तेव्हाच खरेदी' असे अनेक नियम आहेत. त्रांगडं असं आहे की मुलगा बापाकडून हेच शिकणार की बाईपेक्षा पुरूष श्रेष्ठ आहे.
आणि हेच बहुतेक सगळीकडे घडतं. पालकांना आपण मुलांना हे शिकवतोय याची जाणीवच होत नाहीय. यासाठी प्रत्येकाने आपलं घरातलं वागणं/बोलणं तपासून बघायला हवं...

>>>असहमत. अधिकार गाजवतोय हा मुद्दा पटवण्यासाठी बलात्कारच कशाला करायला हवा ? ते इतर अनेक मार्गांनी दाखवता येते.<<<<
असहमत. याहून यातना देणारा अधिकार गाजवण्याचा मुद्दा आहे असे मला वाटत नाही. अधिकार गाजवायला ओळखीची गरज लागत नाही.

<<<पण या बाईंच्या घरात, 'नवरा म्हणेल ती पूर्वदिशा', 'तो खर्चाला देईल तेवढेच पैसे खर्चणे', 'तो दुकानात नेईल तेव्हाच खरेदी' असे अनेक नियम आहेत. त्रांगडं असं आहे की मुलगा बापाकडून हेच शिकणार की बाईपेक्षा पुरूष श्रेष्ठ आहे.
आणि हेच बहुतेक सगळीकडे घडतं. पालकांना आपण हे शिकवतोय याची जाणीवच होत नाहीय. यासाठी प्रत्येकाने आपलं घरातलं वागणं/बोलणं तपासून बघायला हवं.<<<<<< +१

खरंय! आता काहीना मी म्हणतोय हे आक्षेपार्ह वाटेल पण " ती आई, ते बाबा!" यातच सगळी गोम आहे असं मला वाटतंय.

उपायांची लिस्ट बनवायचं काम छान चालू होतं. तेच चालू रहावं या बाफवर..
माझा एक पैसा..
अ‍ॅडमिनने अवांतर पोस्टस डिलीट केल्या तर या बाफची लिंक फेसबुक / ट्विटरवर शेअर करता येईल.

विस्मया, उपाय करण्याआधी 'निदान' होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे.

जखमेवर 'band-aid' हवेय की जखम टाळायचीये?

१. शक्यतोवर रिस्क असेल अशा ठिकाणी अशा वेळी एकटंदुकटं जायचं टाळणं, फोनचा वापर करून ठावाठिकाणा कळवत रहाणं, इ.
२. प्रतिकार करायचा, आवाज उठवायचा प्रयत्न करणं
३. जेव्हा आपली बाजू दुर्बल असेल तेव्हा तिथून सहीसलामत सटकायचं बघणं
४. स्वतःकडे तिखटाची पूड, सेफ्टीपिन असं काहीतरी बाळ्गून वेळ पडल्यास उपयोगात आणणं
५. स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घेणं

असे विविध उपाय सुचवले जातायत. पण यातले पहिले चार उपाय बहुतांशी बायका कायमच करत असतात. त्यात आवर्जून सांगण्यासारखं काही नाहीये. बाई म्हणून मोठं होताना हे सगळं शिकत - घरातल्या मोठ्या बायकांनी दिलेली शिकवणूक आणि टीनएजपासूनच बाहेर आणि कधीकधी घरीही वावरताना येणार्‍या नकोशा अनुभवांतून - जातोच की आम्ही. कुठल्याही माणसाची, प्राण्याची स्वसंरक्षण ही आदिम भावना, इन्स्टींक्ट असतेच. बायका अपवाद नाहीत. गरज आहे ती रोगाचं मूळ उघडं करून ते नष्ट करायचा प्रामाणिक प्रयत्न करायची.

ती मुलगी दिल्लीत वावरायच्या 'डोन्ट्स'पैकी एक महत्वाचा नियम विसरली. की उशीर झालेला असताना (म्हण्जे संध्याकाळी ५-६ नंतर) प्रायव्हेट बसमधे चढायचं नाही. सरकारी बसमधे चढायचं असलं तरी आधी आत किती लोक आहेत, २-३ पेक्षा जास्त संख्येत बायका आहेत का किंवा तुमच्या बरोबर ४-५ पुरुष आहेत का इ. खात्री करून मगच चढायचा निर्णय घ्यायचा (हो, बस स्टॉपवर जितका वेळ थांबते तेवढ्यात हे सगळे आडाखे बांधून निर्णय घ्यायचा..). या एका चुकीची सजा तिला अशी काही मिळाली की कुठलीही बाई दिल्लीत बसमधे चढायच्या आधी चार वेळा विचार करेल. हे सग्ळे सुरक्षित रहायचे उपाय करतच दिल्ली-उत्तर भारत आणि भारतातल्या इतर भागतल्याही बायका अजून सर्व्हाईव करून आहेत.

प्रश्न आहे की ही अशी परिस्थिती किती काळ सहन करत जगायचं बायकांनी? संरक्षणासाठी प्रिव्हेन्टीव मेझर्स सगळे घेतातच पण मुळात ज्या मानसिकतेतून अशी सामाजिक असुरक्षितता निर्माण होते ती चूक आहे, रोगट आहे हे मान्य करून कधीतरी कुठेतरी बदलायची सुरुवात करायची की नाही? मानसिकता बदलायला काही पिढ्या नक्कीच जातील पण तोपर्यंत कायद्याची जरब बसवून, सकारात्मक आणि संवेदनाशील पोलिसिंग वापरून या गुन्ह्यांना आळा बसेल याची तरतूद समाज आणि सरकार करणार की नाही? मी खूप वर्षं लांब पल्ल्याचे रेल्वे प्रवास केलेत. तिथे एकेकट्या मुली-बायकांना कसा त्रास होतो आणि आसपासची सभ्य सुशिक्षित कुटुम्बं कशी लगेच नजर चुकवून अलिप्त भूमिका घेतात हे इतक्या असंख्य वेळेला पाहिलंय की बास. दोन तीन लोकांनी जरी आवाज चढवला तरी बहुतेक वेळा या छेडछाडी थांबण्यासारख्या असतात. त्यालाही लोकं तयार नसतात. यात प्रांत-भाषा-धर्म असा कसलाही भेद नाही. कसल्या सामाजिक जबाबदार्‍यांच्या गप्पा मारायच्या आपण?

महिलांनी 'स्वतःला' सुरक्षित कसं ठेवायचं या बाफच्या नावातच वांधे आहेत - जबाबदारी बाईची स्वतःचीच! - ते कुणालाही जाणवलं नाही का? एका स्त्री आयडीने बाफ काढताना असं नाव दिलं तेव्हा तिची भूमिका नक्की काय आहे? ही बाईचीच जबाबदारी आहे असं तिला प्रामाणीकपणे वाटतंय का उपरोधाने नाव दिलंय?

राहिता राहिलं स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण. ते पण घ्यावंच. पण झुंडशाहीपुढे तेही अपुरं पडू शकतंच. दिल्लीतल्या घटनेत त्या मुलीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला म्हणून रॉडने अत्याचार केले अशी कबुली आरोपीने दिली आहे. आता काय बोलणार?

ह्यात मानसिकता हाच मोठा भाग आहे.

पुरुषी अहंकार्(जेव्हा पुरुष स्त्रीवर अत्याचार करतो तेव्हा) व स्त्रीची इज्जत गेली की ती पांगळी ह्या व अश्या सामाजिक मानसिकतेचा हा परीणाम आहे.

स्त्री हि दुबळी आहे/असते व तिची इज्जत हा सामाजिक पैलू बनवून ठेवलाय कित्येक काळापासून्(पुराणातच पहा ना, द्रौपदीचे वस्तहरण.. आता ते इतके रेटेड करून दाखवतात सिरियल्स मधून पण ते चुकीच आहे म्हणून कोणी सिरियल्स मध्ये दाखवत नाहीत).
काही घराघरातून 'मुलीची जात', 'मुलीची इज्जत' 'लडकी की इज्जत पे डाका', 'लडकी को काबू मे रखना, घर की इज्जत उसी मे है', 'एक बार लडकी की इज्जत गयी तो घर की इज्जत गयी' हे असले समज असल्याने त्या वातावरणात वाढलेल्या मुलांना वाटते की आपली पॉवर दाखवायला तिची इज्जत लुटली की झाली ती बदनाम... व मुली पण ह्याच विचारांच्या शिकार असतात की त्यांचे अबलेसारखे जगणेच बरोबर.

त्यामुळे हा सामाजिक मानसिकतेचा परीणाम आहे व जो काही काही घराघरांतून पाळला जातो वर्षानूवर्षे.

कुठले एकच शहर अश्या विचारांचे असे नसले तरी भारतात मला उत्तरेत खूप अधिक ठळक रित्या असला मानसिक बुरसटलेला समज दिसलाय.
इथे अमेरीकेत इतकी वर्षे राहून, जग फिरून सुद्धा शेवटी लहानपणी कसे वाढले ह्याचे रूपच ते दाखवत फिरत असतात. अश्या विचारांचा पगडा स्त्रीवर व पुरुषांवर असेल त्यांना सुधारणे गरजेचे आहे.

सर्व साधारणपणे, मुलगा बाप कसा वागतो/वागला आईशी , त्यानुसार मोठेपणी बायकोशी वागतो.
व आपली आई कशी बापाशी वागली(किंवा बापाला घाबरून जगली) , तशी बायकोकडून अपेक्षा करतो.

कधी कधी घरात ज्यास्त वरचढ कोण(आई का बाप) ह्यानुसार पण मुलाचं/मुलीचं वागणं असतं मोठे झाल्यावर.

तेव्हा, आई व वडील दोघांनीही आपले वागणे तपासून पहावे की कसला संदेश आपण मुलांना/मुलींना देतोय आपल्या परस्पर वागण्यातून. भारतातून हे शिक्षण देणे तळागाळातून देणे जरा कठिण आहे पण साक्षरता वर्गासारखे कुठेतरी सुरुवात तर करु शकतो.

(कुठलाही प्रांतिक वाद नकोय. मी इथे एक निरिक्षण सांगितलेय माझे).

>>पण मुळात ज्या मानसिकतेतून अशी सामाजिक असुरक्षितता निर्माण होते ती चूक आहे, रोगट आहे हे मान्य करून कधीतरी कुठेतरी बदलायची सुरुवात करायची की नाही? मानसिकता बदलायला काही पिढ्या नक्कीच जातील पण तोपर्यंत कायद्याची जरब बसवून, सकारात्मक आणि संवेदनाशील पोलिसिंग वापरून या गुन्ह्यांना आळा बसेल याची तरतूद समाज आणि सरकार करणार की नाह>><<
१००००+

>>राहिता राहिलं स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण. ते पण घ्यावंच. पण झुंडशाहीपुढे तेही अपुरं पडू शकतंच. दिल्लीतल्या घटनेत त्या मुलीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला म्हणून रॉडने अत्याचार केले अशी कबुली आरोपीने दिली आहे. आता काय बोलणार>><<

कराटे वगैरे शिक्षन विशेष कामाचे नाही जेव्हा ४-५ लोकं चाल करतील. एका दोन पुरुष आहेत म्हणून्ही रात्री प्रवास करणे चुकीचेच आहे. इथे जरब बसेल असा कायदाच हवा.

----
आणखी एक सुचना: ऑफीसमधील बरोबर काम करणारे कलिग आहे , ओळख आहे आहे म्हणून रात्री पर्यंत उशीरा थांबून काम करणे व सोबत प्रवास करणे चुकीचेच आहे. कोणा पुरुषाचे विचार कुठल्या क्षणी कसे बाहेर येतील ह्याची परीक्षा घेणे चुकीचेच. सहसा कोणावर विश्वास टाकणं चुकीचेच आहे. सर्व पुरुष कलिग असेच असतील असे म्हणणे नाही हे कळलेच असेल सुज्ञांना.

वरदाच १३:४३ च पोस्ट आवडल!

९११ कॉल सारखी प्रणाली भारतात विकसित करता येणार नाही का? अगदी तशीच नाही पण कॉल केल्यास लवकरात लवकर काही मदत मिळेल अशी..

सर्व लहान/मोठ्या स्त्रियांनो, भगिनींनो आणी मातांनो,

स्त्री स्वातंत्र्य आणी पुरुषांची मक्तेदारी इत्यादी सर्व थोडेसे बाजूला सारून, सध्या आहे त्या परिस्थितीत, तुम्ही इतर मुलींना काय सल्ला द्याल?

(दिल्ली च्या त्या प्रसंगाविषयी जेवढे जास्ती कानावर येते आहे तेवढे हृदय फाटून जाते आहे. The doctor said - I cannot tell what this girl has suffered.)

अमेरिकेत सुदधा, जेथे स्त्रिया सर्वत जास्त स्वतन्त्र आहेत, दर वर्षइ सुमारे २ लाख स्त्रियांवर अत्याचार होतात.(http://www.rainn.org/statistics).

तुम्ही सर्व गावावर छप्पर घालू शकत नहीं. तुमच्या हातात छत्री घेऊ शकता.

तुम्ही मुलींना तुमच्या अनुभवाचा काय फायदा द्याल ? काय सल्ला द्याल?

हेही तितकेच महत्त्वाचे आहे की एखाद्या मुला-मुलीवर बळजबरी होत असेल तर समाजाने गप्प बसता कामा नये. नराधमाना वेळीच मुसकायला हवे. आणि त्यासाठी प्रत्येक घरात अत्याचाराविरुद्ध खंबीरपणे उभे रहाण्याची हिंमत देण्याचे संस्कार हवेत.

महिलांनी 'स्वतःला' सुरक्षित कसं ठेवायचं या बाफच्या नावातच वांधे आहेत - जबाबदारी बाईची स्वतःचीच! - ते कुणालाही जाणवलं नाही का? >> वरच्या पोस्टस मधला मुद्दा कितीही बरोबर असला तरी व्यवहारात केवळ व्यावहारिक शहाणपणच उपयोगी पडतं. वरती किरणनं दिलेल्या उदा प्रमाणे आपण मारे नियम वापरून गाडी चालवत असू, पण समोरच्याच्या चुकीमुळे जरी अपघात झाला तरी जीव बरोबर चालवणार्‍याचाही जाऊ शकतोच and once it happens there is no roll back. And when thr is no roll back its better to be careful, even when you are right.

हे सगळे उपाय बर्‍याचदा बायका करतातच वगैरे मला मान्य आहे. I am a feminist too, पण आहे ही परिस्थिती अशी आहे. परिस्थिती अशी आहे म्हटल्यावर त्यावर उपाय काय?
१. परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याकडून यथाशक्ती रेटा लावणं
२. ती बदलेपर्यंत आहे त्या प्राप्त परिस्थितीत आपण कसे तगू शकतो, कसे झगडू शकतो ते बघणं.

त्रागा करू शकतोच (आणि त्रागा केला नाही तरी त्रास/वैताग येतोच) - पण त्यानं काही बदलणार नाही हे ही तितकच सत्य.
वरती अनेकांनी दिलेले उपाय मलातरी व्यवहार्य वाटले.
उदा. दिनेशदा: प्रतिकार करा. - i read it as शक्य तिथे प्रतिकार करा. रात्रीच्या वेळेस, सामसुम रस्त्यावर काही घडलय - इथे पळून जाणं हा प्रतिकार आहे. पण पुण्यासारख्या ठिकाणी गर्दीत घडल्यावर, इतरांची मदत घेणे, पिना टोचणे, मोठ्यांदा - हात सांभाळा सांगणे हे प्रतिकाराचे उपाय आहेत. ह्यापुढे जाऊन मी माझ्या गावात असेन तर समोरच्याची फिजिकल ताकद जास्त असतानाही मी जास्त टोकाची भूमिका घेऊ शकेन (कारण मला ओळखणारी आणि सपोर्ट करणारी माणसही जास्ती असतील. जे घडलं/घडू शकेल ते पचवायची माझी कपॅसिटी जास्त असेल.)
पण माझ्या एकटीच्या प्रतिकारानं काय होणार, कितीदा प्रतिकार करणार हा विचार प्रत्येकजण करतो - तेव्हा काहीच फरक - कधीच पडू शकत नाही.

४-५ लोक असतील आणि आपण एकटे असू, एकट जागी असू तर काहीच करता येणार नाही हे मान्यच. पण गर्दीत असताना तरी आजूबाजूच्या लोकांच्या असण्याचा फायदा घेऊन जरब बसवायचा प्रयत्न केला पाहिजे.
१०० तली १ मुलगी एका वेळेस विरोध करते आणि ९९ जणी गुपचूप सोडून देतात हे चित्र असेल तर करणार्‍याची i can get away with it - ही मेंटॅलिटी होणं स्वाभाविक (बरोबर नव्हे) आहे.
हेच चित्र (जिथे मॉब मदत करतो, करू शकतो ही परिस्थिती असेल तिथे तरी) उलट होईल तिथे करणार्‍यांना जरब बसेलच.

कुणीतरी स्वसंरक्षणाच्या क्लासेसची माहिती दिली आहे - ते ही शिकून घेणं - आपल्याच हिताचं आहे असं मला वाटतं. काही प्रमाणात तर उपयोग होईल!

---
लाँगटर्म करता (समाज बदलावा असं वाटत असल्यास)
महेश आणि आणखीन कुणीतरी म्हटल्याप्रमाणे बर्‍यापैकी जाळं विणून जनजागृती करायला पाहिजे.
हे कसं शक्य आहे?
१. स्वतःला शक्य असल्यास पथनाट्य, भाषणं, शिबीरं आयोजित करणं (जत्रा, गॅदरिंग्ज, शाळा कॉलेजं, ऑफिसेस इत्यादी ठिकाणी)
२. ती आयोजित करणार्‍यांना मदत करणं (कन्टेन्ट्स तयार करणे, स्लॉट्स मिळवून देणे, पब्लिसिटी वगैरे)
३. जे ऑल्रेडी हे काम करताहेत त्यांना आर्थिक मदत करणे
४. शालेय अभ्यासक्रमात मानसोपचार तज्ञांच्या मदतीनं लैंगिक शिक्षण, जबाबदार लैंगिक वागणूक, इतर माणसांशी, समाजात वागतानाची कर्तव्य, सेन्सिबिलिटी, सेंसिटिविटी वगैरे गोष्टींवर प्रशिक्षण देणं (पुस्तकं नव्हेत वर्कशॉप्स) - हे व्हावं म्हणून सरकारवर दबाव आणणं. प्रत्येक शाळेचा स्वतःचा कॉन्सेलर असावा म्हणून आपापल्या शाळांकडे आग्रह धरणं
५. वैयक्तिक पातळीवर स्वतःच्या मुलांशी सेक्स ह्या विषयावर ओपनली डिस्कस करणं. शास्त्रीय माहितीबरोबरच त्यांचे मानसशास्त्रीय अँगल समर्थपणे हाताळण्याचा प्रयत्न करणं.
६. लैंगिक अनुभवाला विरोध करण्यापेक्षा, ती काहीतरी चुकीची गोष्ट आहे हे बिंबवण्यापेक्षा कायद्यानं सज्ञान मुलांना (स्वतःच्या) अनुभव घ्यायचा असल्यास घेऊ देण्याची मुभा, सपोर्ट सिस्टीम उभी करणं, त्याचबरोबर त्यातले धोके, घेण्याच्या काळज्या, जबाबदार्‍या समजाऊन देणं.
माझ्या मते:
अ. लैंगिकते बद्दलची जी वखवख समाजात दिसते - ती ह्या मुळे कमी होईल.
ब. शरीर आणि मन ह्या दोघांमधे हार्मनी असायला पाहिजे हे मुलांना कळण्याची शक्यता वाढेल. This will stay with them forever. (शरीरसंबंध ही कॅज्युअल गोष्ट नाही, परस्पर संमती हवी हे वळण्याची शक्यता वाढेल)
७. मुलांना वाटेवरच्या काट्यांची आणि प्रोबॅबल उपायांची शक्यता समजाऊन देणं

आपल्याकडे ह्या बाबतीत जितका चोरटेपणा आहेत त्यातूनच हे चुकीचे दृष्टीकोन वाढीला लागतात असं मला वाटतं. सामाजिक लेवलवर बदलणं अवघड,पण वैयक्तिक पातळीवर सुरुवात तरी करू शकतो.
८. कायदा पाळला जावा, केस पटापट सोल्व व्हाव्यात, योग्य ती शिक्षा मिळावी ह्याकरता आग्रह धरणं.
९. घटना घडून गेल्यावर १५ दिवसात सगळं विसरून जाणं - ही आपली सवय (अ‍ॅज अ समाज) सोडून देणं

महिलांनी 'स्वतःला' सुरक्षित कसं ठेवायचं या बाफच्या नावातच वांधे आहेत - जबाबदारी बाईची स्वतःचीच! - ते कुणालाही जाणवलं नाही का? एका स्त्री आयडीने बाफ काढताना असं नाव दिलं तेव्हा तिची भूमिका नक्की काय आहे? ही बाईचीच जबाबदारी आहे असं तिला प्रामाणीकपणे वाटतंय का उपरोधाने नाव दिलंय? >>>
मी इथे कहिहि नाव दिले असते तरि ते कोणाला न कोणाला वांधे वाटणार आहेत. मी प्रत्येकाला ठिक वाटेल असेल नाव नाहि देवु शकत.
मी प्रामाणिकपणे या बाफ ला ते नाव दिले होते आणि अपेक्शित काय ते सुद्धा लिहिले आहे वर. बाफ वर काय चर्चा चालली आहे यावर माझा काहिहि कंट्रोल नाहि आणि मी काहि प्रयत्न सुद्धा नाहि केला आणि खरे तर मला गेल्या २-३ दिवसात वेळ हि नाहि मिळाला माझि लिस्ट बनवायला.
वर लिहिलेले सगळे उपाय बर्‍याचदा बायका करतातच पण अजुन काहि उपाय आहेत का जे कोणि करते ते काहिंना महिति नसतिल तर ते महित पडुन कदचित थोडा तरि फायदा होईल असे अपेक्शित होते. पण अर्थातच ५-६ लोकांपुढे कदाचित हे उपाय नाहि कामी येणार पण थोडि तरि माहिति होईल लो़कांना हा विचार आहे.
इथे बर्‍याच लो़कांनि मानसिकता बदलण्याबद्दल लिहिले आहे. अगदी खरे! मानसिकता बदलली तर सगळेच किति चांगले होईल नाहि.पण I think changing peoples mindset is अ difficult task than providing the security measures.History made when mindset changed. नुसती मानसिकता बदलुन गुन्हा थांबणार नाहि त्याबरोबरच कडक कायद्याची गरज आहे जो दहशत बसवुन गुन्हा कमी करेल.पण तरिहि गुन्हा होणारच तो एकदम बंद नाहि होणार, म्हणुन आपण सुद्धा काहि सुरक्शिततेचे उपाय वापरले तर आपल्यालाच थोडा तरि फायदा होईल च ना. इथे वर बर्‍याच मायबोलिकरांनि काहि उपाय लिहिले आहेत. पण आपण काहि वस्तु वापरत असाल तर त्याची थोडि माहीति लिहिलि तरि बरे होईल ना!
असे बरेच उपाय आहेत जसे पेपर स्प्रे त्याबद्दल थोडि माहिति - कि पेपर स्प्रे चांगला असतो पण सगळ्याच लोकांवर त्याचा परिणाम होत नाहि. ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा . अशि बरिच मोठि लिस्ट होउ शकेल ज्यात हाताशी असलेल्या वस्तु कशा वापरता येतिल हे लिहिता येतिल आणि थोडि सावधगिरि कशि घेता येइल हे लिहिता येइल.
अजुन लिहिल वेळ मिळेल तेंव्हा आणि जी माहिति माझ्याकडे आहे ति टाकेन इथे.

नानबा अनुमोदन! छान पोस्ट.

ती पिडीत मुलगी अजुनही क्रिटकल आहे, खालची लिंक वाचून शहारा आला... निर्दय पणे मेटल रॉडने अवस्था केली आतड्याची.... अंगावर असंख्य चावलेले...
नुसती फाशी देवून सुद्धा नराधमांना पुरेशी नाहीये.. त्यांचे आतडे बाहेर काढून चोपले पाहिजेच.

:रागः
http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Rape-victim-still-crit...

@विवेक नाईक | 21 December, 2012 - 12:08
हे घ्या दिल्लीतील मेट्रो मध्ये रात्री च्या वेळी महीलां साठी आरक्षीत असलेल्या डब्या मधुन पुरुष प्रवास करतात त्यांना कोणीही हटकत नाही असे अनेक आरोप महीला प्रदर्शनकार्यानी आताच टीव्हीवर केलेत ,
<<
ते १००% खरे असणार.
नियमांच्या अंमलबजावणीत आपल्याकडॅ नेहमीच बोंब असते. बसेसमध्ये अपंग, ज्येष्ठ, स्त्रीयांच्या राखीव जागांवर अनेकदा कोण बसतात ते पाहावे.ज्यांच्यासाठी त्या जागा असतात त्यांनी जागरूक राहून हक्कासाठी आग्रह धरला तरच त्या मिळतात [अर्थात संस्कारी लोक कित्येकदा राखीव नसल्या तरी आपणहून जागा करून देतात हेही नमूद करतो].
शिवाय अंमलबजावणीतून कोणाला भयानक गुन्ह्यांबद्दल कधि फाशीची शिक्षा झालीच तर दयेचा अर्ज करून जीवन दान नक्कीच मिळते.
आज मारे त्यांना फाशीची शिक्षा द्याचा घोष चाललाय पण झाली न्यायालयात फाशीची शिक्षा तरी उपयोग काय त्याचा ? दयाळू राष्ट्रप्ती आहेतच त्यांना जीवन प्रदान करायला? पालथ्या घड्यावर पाणी!

नानबा च्या पोस्टला अनुमोदन.

@ सुलु - तुम्हाला उत्तर द्यायचं नव्हतं खरंतर. पण नानबाच्या पोस्टनंतर तुम्हाला उत्तर मिळालं असेल अशी आशा आहे. या अशा चर्चा अनेकदा झालेल्या आहेत. त्यात निदान झालं असं वाटतं का ? नसेल झालं तर का ? इथेही चारशे पोस्टपर्यंत जी चर्चा झालीय तिथे तुमच्यासहीत कुणाकडून नेमकं निदान झालंय असं दाखवून द्या. तुमच्यासारखं विचारावंसं वाटतं.. निदान होत नाही म्हणून जखमेवर उपचार करायचेच नाहीत का ? किमान वर जे साधे साधे आणि दूरगामी उपाय सुचवले जाताहेत त्यांचीही कल्पना नसते कित्येकांना.. मायबोली हे संकेतस्थळ अनेकांपर्यंत पोहोचतं. अशा उपायांची यादी बनवणं चालू आहे हे समजलं तर त्या दॄष्टीने बरंच काही घडू शकतं. असो. हेमाशेपो.

या बाफवर जे वोटिंग चालू आहे ते मजेशीर आहे. जिथे चांगल्या आणि उपयुक्त पोस्टस आहेत तिथे शून्य वोटस आणि जिथे एकमेकांना पाण्यात पाहणा-या पोस्टस आहेत तिथे जोरदार वोटिंग... यावरून कुणाला कशात इंटरेस्ट आहे हे लक्षात येतं.

@आहना | 21 December, 2012 - 20:20Where is Pratibha Patil? The reason that criminals are 'fearless' because of India is having curse of President like Pratibha Patil, who cancelled death punishment of rapist and murderer. Where is she now?
>>

त्यांना शोधण्यात वेळ घालवू नका. राष्ट्रपतींना दिलेल्या अधिकाराचा जो दुरुपयोग चालू आहे त्यावर तो त्यांचा अधिकारच नष्ट/न्यायालयाकडून मर्यादित करण्यासाठी आवाज उठवा.मी हीच बाब सातत्याने माबोवर आल्यापासून लिहित आहे. भले त्याला साथ मिळो वा न मिळो! त्यांच्याबद्द्ल वैयक्तिक कृपया लिहू नका. तुमची भावना लक्षात न घेता आणि प्रतिसाद नीट न वाचताच कांही विद्वान तुमच्यावर वैयक्तिक द्वेष असल्याचा आरोप करतील.

@झंपी | 22 December, 2012 - 05:11
...... नुसती फाशी देवून सुद्धा नराधमांना पुरेशी नाहीये.. त्यांचे आतडे बाहेर काढून चोपले पाहिजेच. >>

विसरा ते सर्व.
त्यांना न्यायालयात फाशी झाली तरी आपल्याकडे दयेचा अर्ज करून जिवंत राहाण्याची सोय आहे हे विसरताय!
तेव्हा रागाला वाट करून देण्यापलिकडॅ याचा उपयोग शून्य!

प्रमोद देव | 21 December, 2012 - 18:36
एखादी व्यक्ती स्वत: कितीही पुढारलेल्या आचार-विचारांची असली तरी त्या व्यक्तीला ...त्यांच्या दृष्टीने बुरसटलेल्या समाजात नाईलाजाने का होईना जेव्हा वावरायचं असतं...तेव्हा
>>
पुढारलेल्या आचार-विचारांच्या, स्त्री-मुक्ती चळवळीच्या महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्या, विचारवंत नात्याने प्रसिद्ध लेखीच्या दिल्लिच्या घटनेनंतर म्हणाल्या :
"मी पूर्वी फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द व्हावी या मताची होते. पण बलात्कार करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे."

कसल्या या पुरोगामी आणि कसल्या या विचारवंत? आजच्या पॉप्युलिस्ट विचारांबरोबर आपणही आहोत हे दाखवायचे आहे का त्यांना?
याआधी भयानक क्रौर्याच्या घटना जणू झाल्या नव्हत्या आणि आताच ही पहिली घटना त्यांच्या पाहाण्यात आल्याप्रमाणे मते बदलणे हा पोरकटपणा नाही का? कसले हे विचारवंत?

त्यांच्या पेक्षा फाशीची शिक्षा असायला पाहिजे आणी ती शिक्षा न्यायालयांमधून सर्व विचारा अन्ती दिली गेल्यावर अंमलातही आणली पाहिजे असा आग्रह कायम धरणारे आमच्यासारखे तथाकथित
प्रतिगामी बरे.

झंपी,

भयंकर लिंक दिलीत हो! आयुष्यभर विसरू शकत नाही. कोणताच देश/कायदा त्यांना पुरेशी शिक्षा देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी पृथ्वीवर शिक्षा नाही.

कलियुग संपेपर्यंत ते सगळ्या नरकात सडोत.

मला वाट्ते की आपण युवा नी काही तरी केल पाहीजे जो परेन्त या नराध्माना फाशि दिलि जात नाही तो परेन्त आपण स्वस्थ बसता कामा नये.कारण कायद्यात याना मुभा मीळते.फाशि ची अम्लबजावणी 20 वर्शा नन्तर होते.I am very sorry i cant write dis in marathi .Mage eka shaletil muliwar balatkar karun khun karnyat ala tyala tabbal 20 varsha nanatar fashi denyat aali .Tumhi news paper bagha ulat delhi madhlya krutya nanatar roz 2/3 batmya rape chya yet aahet .3 varshanchi lahan baal sudha ya salyana kalat nahi.Guys aapanch kahi tari kel pahije jewha ekala tari bhar chowkat nagada karun dagdane thechun marat nahi na to parent bakichyan che dole ughdnar nahi .
Mage bhrashtara sathi jasha raleey kadhli hoti sagala bharat ek zaalaq hota .ataa sudha garaj ahe aplya saglyani thos paul uchlnyach.lakshat asu dya jo parent aapan tya paristhitun jaat nahi to parent aaplyala tyachi bhayanakta janwat nahi. aapan hitguj madhun bharpur lihu facebook war comments taku twieetrwarti tweet karu pan end of the day R U SURE KI TUMCHI BAHIN ,MULGI ,AAI, BAYKO ,MAITRIN SURAKSHIT AHE ?

1 stri 5 naradhaman pasun kas kay swatala wachu shakte? Jari ti black belt asli kiwa ankhin kahi ! Surkshite peksha garaj ahe samajik janiv karun denyachi.kayada astoch muli palwata kadhyala.aani tyana fashi hoeparent aankhin 200 striya ya anyyala bali padnar.Garaj aahe yana wachak dakhwnyachi .Bharat ha yuvancha desh aahe jithe strila devtechi upadhi dili aahe.Mala mahit aahe ki aaj stri mhanun mala jitka raag aahe tya peksha kiti tari patine amchya purush mitrana pan raag ahe,kalji aahe aani tee tyanchya shbdat janvate.Ek comment hoti tya mulach kay zaal ? Yaar 5 mulan samor to bichara tari kay karnar ? to kay salman khan aahe ki sunny deol ? Forget about dat but nw we realy need to do somthing !
Aapn bhartiy pehle baat ,fir mulakt aur jarurat pade to pichwade pe laat ! Aata garaj aahe lat marnyachi ! What u say ?

@विस्मया, नानबा, झंपी नी आणि तुम्ही लिहिलेले वाचले. सगळे मुद्दे नाही पटले. हेतू मात्र पटले.
कुठेतरी Citizen Cops ची आयडिया ऐकली. चांगली वाटली. पोलिसांच्या मदतीला प्रत्येक गल्ली-मोहोल्ल्यामधे नागरिकच गस्त घालणार्/लक्ष ठेवणार...!

http://www.thehindu.com/opinion/op-ed/rape-and-the-crisis-of-indian-masc...

Rape and the crisis of Indian masculinity
Ratna Kapur

As women assert their identity and enter his bastions of power, the traditional Indian male is reacting with violence

Even as the world remains shocked and horrified by the gunning down of 20 little children in Newtown, Connecticut, we need to turn some of that shock and horror toward our own selves. The gang rape in the capital of a paramedical student, who lies in critical condition in hospital, should more than just outrage us. Rape is not simply about law and order, or about deranged individuals. Nor is the problem going to be solved by more laws, more police on our streets, more CCTV cameras on our buses or stiffer sentences for rapists. The gang rapes that are occurring with alarming regularity must compel us to reflect upon who we are as a society.

Just like the killing of young innocents is forcing Americans to address the societal reasons for such violence and not just blame one individual, Indians need to understand that gang rape is not just an aberration committed by inhuman men. We need to address how we as a society are implicated in producing such appalling levels of violence against women, which is increasingly being tolerated and even normalised. As women enter the work place and the public arena, their boldness and confidence seem to trigger a sense of insecurity in a society where men are used to being in charge. While it is impossible to reduce the issue of violence to one sole cause, that is men, the fact remains that young men are the ones committing these crimes. These include the 2003 gang rape of a 17-year-old Delhi University student in Buddha Jayanti Park; the Dhaula Kuan gang rape in 2005 in a moving car of a student from Mizoram; and the 2010 gang rape of a young BPO employee from the north-east.
Sense of displacement

We need to inquire why young Indian men are routinely committing gang rapes in metropolitan cities against women who are just going about their daily lives. What is the anger that motivates this level of violence? Is the sight of a young smartly-dressed educated female professional generating a sense of displacement in men? Over the past several decades, women’s rights have proliferated and they are claiming their subjectivity, asserting their identity as women as opposed to being someone’s wife, daughter or sister. And with the opening up of the market, women are more visible in the workplace. That they are entering male bastions of power has challenged the sense of superiority and entitlement of the traditional Indian male.

This idea of a woman as a fully formed human subject remains a difficult concept to embrace.

Even those who are ostensibly in favour of women’s rights such as the National Commission of Women and the Department of Women and Child Development, continue to refer to women as vulnerable objects and discuss the issue of violence against women in highly protectionist language.
Built for bias

What is required at this stage is not more protection and security, but education. The grooming of young men to have a feeling of entitlement by Indian parents breeds a sense of masculinity and male privilege. Son preference simultaneously erodes the possibility of respect for women, as girls are seen as unwanted or burdensome. Such inequalities produce the very hatred against women in the public arena that we are witnessing throughout the country. When women do not cower or display their vulnerability — thereby inviting the protection of the virile Indian male — what follows is a sense of emasculation and aggrievement on the part of these men.

More law — or calls for the death sentence — are not the answer to what is a deeply ingrained societal problem.

More law will only serve to give a sense of something being done, when in fact very little is being done. To confront the hatred that is now manifesting itself in the most egregious ways is to move forward as a society. We need to think about how we can handle women’s equality in ways that are not perceived as threatening. That demands greater responsibility on the part of parents as well as society not to raise sons in a way in which they are indoctrinated with a sense of superiority and privilege. There is also a need on the part of young men to be actively involved in their schools and communities in advocating women’s equality rights.

While these seem like long-term solutions that will do little to help the young woman who lies in a coma in Safdarjung hospital, law reform or hanging the perpetrators will not solve the problem. Law reforms in the area of rape have been taking place over three decades but they do not appear to have arrested the appalling levels of violence to which Indian women are subjected. It is time for us to recognise how we as a society are implicated in producing the very individuals who are perpetrating such heinous crimes against women, and to start taking responsibility for bringing it to an end.

(Ratna Kapur is Global Professor of Law, Jindal Global Law School, NCR)

जनतेने रोजच्या आयुष्यात साध्या सोप्या गोष्टी अवलंबल्या तर फार मोठा बदल होऊ शकेल. उदा. आपल्या आजुबाजुला जर काही दुर्घटना घडत असेल तर ती रोखण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करणे, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला उत्तेजन न देणे, इ.

पुर्वी पोलिसांचे खबरी लोकांशी चांगले संधान असायचे आणि मोठे जाळे असायचे, ते खुप मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाले आहे गेल्या अनेक वर्षांत (एका पोलिस अधिकार्‍याने मुलाखतीत हे सांगितले होते).
एकतर असे जाळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर कार्यरत केले गेले पाहिजे. तसेच पोलिस यंत्रणेला एक समांतर यंत्रणा उभी केली गेली पाहिजे, उदा. युवक युवतींचे गट करून त्यांना विशिष्ट आयडेंटिफिकेशन देऊन गस्त घालणे, आपापल्या विभागावर करडी नजर ठेवणे, आणि जर काही घडले तर गुन्हेगार व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देणे, अपघातग्रस्त व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करणे, इ. कामांचे अधिकार दिले जावेत. आणि या बदल्यात त्यांना काही मोबदला मिळावा. काही विशेष सवलती मिळाव्यात (उदा. प्रवासात सवलती, कमी दरात सिनेमाची तिकिटे, इ.) आणि हे काम काही ठराविक मर्यादित काळापुरते असावे. नंतर पुढची तरूण पिढी त्यामधे येऊ शकेल, असा फ्लो असावा. हे जर झाले तर अनेक गोष्टींना जरब बसु शकेल. आणि तरूण पिढी भलत्या सलत्या मार्गाला जाणार नाही.

I agree mahesh ! Tumhi mhantay te 100% barobar aahe.Vichar kara jewha ha prakar chalala hota tewha tya bus cha chalak kay zopala hota ka ? tyane jar bus direct police stational la neli asti athwa bus madhun pal kadhun aardaorda kela asta tar tya bicharichya madatila koni na koni aal ast na.pan je hoat ahe te nimut pane sahan karnyachi aaplyala saway zali aahe.Agadi SHANDH zale aahot aapn sagale.
Me mhant nahi ki kayada hataat ghya .pan kayadywarti dadpan aanu ya ki tyana aatach fashich zali pahije tya sathi aamhi 20 varsh waat baghnar nahi.mhanje hitun pudhe asa ghanerda vichar karnya purvi ase naradham 100 wela vichar kartil.Aapn jithe tithe pahara nahi theu shakat pan ek jrab wachak tar basu shakto na.Ashi mansikata lagech change karan shakya nahi pan tya dishene paul uchalan shkay aahe aapna sathi.Kayada aaplya rakshna sathi aahe!
Aapan kaydya sathi nahi.Mag aapla hak aaplyala mila pahije.T\arch kuthe samaj jagrut hoel.Tyana aple adhikar kaltil.Aapn durlaks kel tar tya muli sarkhi wel udya aaplyawr sudha yeu shakte hey wisrun chalnat\r nahi.!

@निदान - माझ्यापुरतं तरी झालं आहे.
१. बलात्कार ही मानसिकता अधिक आणि दुसर्यावर शारिरीक अत्याचार करण्याची वि़कृती आहे.
२. करणारा शक्ती ने बलवान असेल तर सोपे नाहीतर ३-४ मिळून बलात्कार करतात.
३. भारत देशात अजून कित्येक दशके स्त्री-पुरुष समानता काही समाजांमध्ये येणार नाही.
४. पुरुषांना जोपर्यंत मुलं होत नाहीत तोपर्यंत इच्छेविरुद्द संभोग आणि येऊ घातलेली गर्भधारणा किती शारिरिक आणि मानसिक त्रास देते ते त्याना समजणार नाही. त्यामुळे त्याना बलात्कार झाल्यावर आयुष्याची कशी वासलात लागते तेही कळणार नाही. (वादग्रस्त मुद्दा. पण माझे स्पष्ट मत!)
५. भारतात कायद्यामधे बदल केवळ नवीन पिढीच घडवून आणेल. जुनी पिढी सत्तेवर असेपर्यंत काहिही होणार नाही.
६. सरत्-शेवटी समाज म्हटले तर सर्व प्रकारची लोकं आली. समाज चांगला घडवणं प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. Character-building हा प्रकार इतिहासजमा झाला आहे. तो घरा-घरातून व्हायला हवा.

बाफ काळजीपूर्वक वाचला तर ब-याच मुद्यांचं रिपीटेशन टाळता येईल. अनावश्यक पोस्टस मुळे चांगल्या पोस्टी नंतर सापडत नाहीत.

>>भारतात कायद्यामधे बदल केवळ नवीन पिढीच घडवून आणेल. जुनी पिढी सत्तेवर असेपर्यंत काहिही होणार
नाही.

हा फार मोठा गोड गैरसमज आहे. कारण नविन पिढी जी ऑलरेडी राजकारणात आलेली आहे, ती आधीच्या पेक्षा जास्त भयानक आणि खतरनाक आहे, कारण पुर्वीचे राजकारणी हे कमी शिकलेले आणि गुंड कॅटेगरीचे असायचे, पण त्यांची पुढची पिढी ही वेगवेगळ्या भारी ठिकाणी (अगदी परदेशात सुद्धा) शिक्षण घेऊन आलेली आहेत. हे फक्त राज्य, देश पातळीवरचे नेते नाहीयेत तर अगदी नगरसेवक लेव्हलच्या लोकांची मुलेसुद्धा यामधे आहेत.
त्यामुळे जर कोणी असा विचार करत असेल की आपण शिक्षणाचा जोर दाखवून (आयआयटी, इ.) लोकांना सांगू की यांच्यापेक्षा आम्ही लायक आहोत राज्य करायला तर आता ते पण शक्य नाहीये, कारण या नविन फळीकडे वारसा तर आहेच, पैसा आहे, गुंडगिरी आहे आणि आता शिक्षण पण आहे (ते सुद्धा विकत घेतलेल्या डिग्र्या नाही, अगदी खर्‍या).

तात्पर्य : समाजातल्या सत्प्रवृत्तीला एकत्र येऊन दुष्प्रवृत्तीवर वचक ठेवणे हे अजुनच अवघड होत चालले आहे. Sad

आता सकाळी इंडीया गेटवरची तुफान गर्दी टिवीवर पाहात होते तेव्हा मनात आले की आज इथे गर्दी करणा-या तरुणांनी यापुढे प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या बरोबरीचे, तेवढाच मान देण्याचे, तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी कुठलेही वर्तन करायचे नाही हे ठरवले तरी खुप होईल.

हेल्दी छेडछाड जी मित्रमैत्रिणींमध्ये होते, जी दोघांनाही आवडते त्याबद्दल काहीच म्हणणे नाही पण उगीच एखादी बाई दिसली की तिच्या अंगप्रत्यंगाबाबत चर्चा अगदी तिच्या कानांपर्यंत पोचेल आणि तिला शरमिंदे वाटेल इतक्या जोरात, ती एक वस्तु आहे असे समजुन हवे तसे स्पर्श, इ. सगळ्या गोष्टी या तरुणांनी यापुढे टाळल्या, दिल्लीत जे घडले त्याने डोळे उघडले म्हणुन देशातल्या तरुणांनी स्वत:चा शोध घेतला आणि स्वतःपुरते माणसासारखे वागायचे ठरवले तरी खुप होईल.

अजून एक निराळा विचार भेडसावतोय...त्या हैवान मुलांच्या आईवडिलांसाठी पण हा एक अत्यंत जीवघेणा व भयानक प्रकार, समाज वाळीत टाकणार, व इथून पुढचे संपूर्ण आयुष्य त्यांना त्यांच्या मुलांच्या पापाची सजा भोगावी लागणार. .तेही बळीच आहेत ह्या घटनेचे. (त्यांच्या मुलांच्या कृतीसाठी त्यांना जबाबदार कसे धरणार? असल्या अमानविय विकृती शिकवता कश्या येतील?

सुमेधा शिकवता नाही येणार पण मुलांच्या वागण्याला आईवडील अजिबात जबाबदार नाहीत ? कुठेतरी त्यांच्या कर्तव्याला ते कमी पडले नाहीत ? कोणी वाळीत टाकले नाही तरी आपल्या मुलाकडून असले काही घडले हे आयुष्यभर बोचणारच सालस माणसाला.

जक्कल सुतार चांडक ही पण चांगल्या घरातील चांगल्या पालकांची मुले होती तसेच त्या चौकडीमधे मास्टर माईंड जक्कल होता व बाकीच्यांची विकृती पिअर प्रेशर मधून निर्माण झाली.
अर्थात मुलीवर ओढवलेला प्रसंग व तिच्या घरच्यांच्या भावनांची कल्पना केली तर त्यांच्या दु:ख्खाची कल्पनाच करवत नाही. हे सगळे घडणारे प्रसंग पाहीले की असे वाटते की आज "आपला" नंबर लागला नाहीये इतकेच्...आणि हे सुधारायचे असेल तर आपल्यालाच काहीतरी करावे लागणार. दुसरे कोणीही येवून ते सुधारून देणार नाहीये हे नक्की.

लहानपणापासून कळत नकळतपणे स्त्रीला माणूस म्हणून आदर देण्याचे जर शिकवले गेले नसेल तर अशी विकृती जन्म घेण्याची शक्यता जास्त म्हणता येईल.

जसं स्वतःच्या मुलांना स्त्री-पुरुष समानतेविषयी शिकवायला पाहिजे तसंच सामाजिक जबाबदारीची शिकवण पण दिली पाहिजे. आपल्या आसपास जर काही गुन्हा होत असेल तर त्याच्या कडे दुर्लक्ष करणं हाही एक गंभीर गुन्हा आहे हे मानसिकतेत रुजवलं पाहिजे.

दिल्ली किंवा उत्तर भारतात अगदी गर्दीच्या ठिकाणीही आरडाओरड केली, मदत मागितली तरी ती काडीमात्र मिळणार नाही याची ९९.९९% खात्री असते. तुम्ही आरडाओरड केली म्हणून गुन्ह्याची तीव्रताही वाढू शकते. अशा ठिकाणी सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय आणि कायद्यांची कडक अंमलबजावणी केल्याशिवाय या प्रकारांना चटकन आळा बसणं शक्य नाही

वरदा, हे असं का आहे दिल्लीत ? मी हल्ली गेलो नाही दिल्लीत पण असा प्रकार मी १०/१२ वर्षांपुर्वी पण ऐकला होता. आणि हे ठराविक भागातच आहे का सर्व शहरभर ? इतर कुठल्याही शहरात इतकी असंवेदनशीलता दिसणार नाही.
कदाचित दिल्लीत परप्रांतीय जास्त आहेत आणि त्यांच्याबद्दल मूळातच राग आहे म्हणून का ?

अशी बुरसटलेली मानसिकता दिल्ली, गुरगाव, हरयाणा, लखनौ, बिहार, म.प मध्ये जरा ज्यास्तच आहे वावगे ठरणार नाही.
इतर राज्यात सुद्धा आहे पण इथे बहुधा आपला संबध कामाच्या निमित्ताने, नातेवाईक रहात असल्याने, येत जात असल्याने बहुधा माहिती होते.

पण सॉउथ मध्ये पण एकीवात आहे. स्वतःचा अनुभव कमीच आहे.

मुद्दाम मी राज्याचे नाव घेत नाही. पण संस्कार कसे असतात याची तीन उदाहरणे इथे देतोच. ही अगदी ताजी म्हणजे गेल्या वर्षभरातलीच उदाहरणे आहेत.

१) एका कुटुंबात ३ लहान शाळकरी मुले. तिघांची शाळेत जायची घाई. तिघांचे डबे भरणे, त्यांना अंघोळीला पाणी देणॅ, ब्रशला पेस्ट लावून देणे एवढे सगळे करण्यात आईची धावपळ उडालेली असते. यावेळी स्वतःची पाण्याची बाटली देखील, मुले भरुन घेत नाहीत. मी यावरुन छेडल्यावर १०/१२ वर्षाच्या आसपासची मुले म्हणतात, आईचे कामच आहे ते. आम्ही का करायचे ? एवढ्या सगळ्यात मुलांच्या वडलांचे मोजे रुमालच नव्हेत तर बूट देखील, तिने पायाजवळ आणून ठेवायचे.

२) लग्नाच्या वयातला माझा मित्र. माझ्यासाठी मुलगी बघ म्हणून माझ्या मागे लागलेला. काय अपेक्षा आहे असे विचारल्यावर, आम्ही भाऊ भाऊ बोलत असताना, तिने मधे बोलता कामा नये. हि मुख्य अट. ( भावाभावात विळ्याभोपळ्याचे सख्य ) मी म्हणालो होतो, माझ्या परिचयातल्या कुठल्याही मुलीला मी तूझ्याशी लग्न करु देणार नाही. तो अजूनही अविवाहित आहे.

३) लग्नाला २८ वर्षे झालेले एक जोडपे. आमची पार्टी ठरलेली. मी भाभीला मदत करतोय. त्यावेळी नवरा येऊन म्हणतो मला प्यायला पाणी दे. ( फ्रिज हाताशी, ग्लास फ्रीजवरच तरी.) भाभीच्या डोळ्यातले पाणी ती माझ्यापासुन लपवते.

दिनेशदा, तुम्ही सांगताय तशी परीस्थिती काही घरातून बघितली आहे. त्या रोलिंग बाईंना 'house elf' ची कल्पना भारतीय स्त्रियांवरून मिळाली की काय असे अनेकदा वाटून जाते Sad

आईने संस्कार करायला पाहिजेत असे ज्यांना वाटतेय त्यांच्यासाठी -
'आई' च पोरावर सगळे संस्कार करते हा 'श्यामची आई' ने पसरवलेला मोठ्ठा भ्रम आहे. संस्कार हे आजुबाजुच्या वातावरणातून आपोआप होत असतात. बाप दारू पितो , आईला मारतो हे बघून पोरगा तेच करणार. यात 'आई' काहीही करू शकत नाही. एकाच आई ची २ मुले अतिशय वेगवेगळी निपजू शकतात. अगदी निरूपा रॉय च्या अमिताभ आणि शशि कपूर सारखी .

Rape Prevention Education

या सारखे कार्यक्रम गल्लोगल्ली, बोळांतून, कार्यालये, रस्ते, स्टेशन्स, पार्क्स, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणे, कॉलेजेस, वस्त्या, वाड्यांतून झाले - होत राहिले तरच आशेची किंचित धुगधुगी आहे.

रेप (बलात्कार) प्रतिबंधक उपाय :

१. स्त्रियांच्या अन्न-पेयांमध्ये मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ मिसळू नका.
२. एखादी स्त्री जेव्हा रस्त्याने जात असेल तेव्हा तिला एकटेच जाऊ द्या, तिची सोबत - पाठपुरावा करायचा किंवा तिला अडवायचा प्रयत्न करू नका.
३. एखाद्या स्त्रीचे वाहन नादुरुस्त झाले व ती रस्त्यात थांबली तर तिच्यावर बलात्कार करायचा नसतो हे लक्षात ठेवा!
४. तुम्ही लिफ्टमध्ये असाल व त्यावेळी अन्य कोणी स्त्री लिफ्टमध्ये शिरली तर तिच्यावर बलात्कार करायचा नाही हे लक्षात ठेवा!
५. एखादी स्त्री झोपलेली असेल तर सर्वात सुरक्षेचा मार्ग म्हणजे तिच्यावर बलात्कार न करणे!
६. स्त्रीच्या मार्गात दबा धरून बसणे, तिच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार करणे, तिला एकटे गाठून तिच्यावर जबरदस्ती करणे हे टाळाच!!
७. स्त्रिया रिकाम्या पार्किंग लॉटमध्ये आपली वाहने पार्क करायला जातात, बलात्कार करून घ्यायला नव्हे, हे लक्षात ठेवा!
८. जर तुम्हाला स्वतःची खात्री वाटत नसेल तर तुमच्या एखाद्या विश्वासू मित्राला कायम जवळपास ठेवा, जो तुम्हाला बलात्कार करण्यापासून परावृत्त करेल!
९. जवळ बलात्कार-स्पेशल शिट्टी ठेवा.... तुम्हाला जर वाटले की तुम्ही कोणावर बलात्कार करू जाणार आहात तर ती शिट्टी जोरात वाजवत राहा - मग कोणीतरी येऊन तुम्हाला थांबवेलच!
१०. प्रामाणिकपणा बाळगा. एखाद्या स्त्रीबरोबर तुम्ही कुठे जात आहात, तिला बाहेर नेत आहात, तिच्याबरोबर काम करत आहात, तर तिला सरळ सरळ सांगून टाका - की तुम्ही नंतर तिच्यावर बलात्कार करणार आहात म्हणून!!! जर तुम्ही तुमचा हेतू तिला सांगितला नाहीत तर तिला वाटेल तुम्ही तिच्यावर बलात्कार करणार नाही म्हणून!

११. तुम्ही जर बलात्काराला जवळून पाहिले/ अनुभवले/ ऐकले असेल तर तुम्हाला बलात्कार कसा टाळावा याच्या टिप्सची गरज नाही. ती गरज आजूबाजूच्या लोकांना, समाजाला व संस्कृतीला आहे हे नक्की!!!

साभार : Rape prevention tips

PLEASE FORWARD THIS TO EVERY MAN YOU KNOW:

Fifty Ways Prevent Yourself from Being a Rapist:

1. Do not think you have the right to rape a woman.

2. Do not rape a woman. Do not rape a man.

3. Learn what rape is.

4. Rape is forcing someone to have sex with you when they do not want to.

5. Most rapes are committed by men who know the women they are raping. If the woman you are forcing to have sex with you happens to be your girlfriend, your neighbor, your cousin, your sister, or your wife, it is still RAPE.

6. When someone says no to you, that means you have no right to force yourself on them.

7. When someone pushes you away, or otherwise indicates, verbally or with physical movement that they do not want to have sex with you, and you force yourself on them, that is rape.

8. If you see a woman in a parking lot, don't rape her.

9. If you see a woman walking alone at night, don't rape her.

10. If you see a woman in a short skirt, don't rape her.

11, If you see a woman with long hair, don't rape her.

12. If you see a woman walking down a dark street at 4 AM, naked, don't rape her.

13. If you see a woman who is not carrying pepper spray for self protection, does not know karate, does not have a gun, and is not even holding an umbrella to ward you off, still don't rape her.

14. If you see a woman who has a sign on her head that says "I Want Sex", you don't have the right to force sex upon her.

15. If you're at a party, and a girl is drunk, and she wants you to kiss her and touch her but then she wants you stop, STOP.

16. If you're on a date with someone and they want to go so far, but then stop, you STOP. If you don't stop, it is called rape.

17. Rape is a crime, whether you go to prison for it or not, whether it is reported or not, whether you're convicted, or whether anyone believes the woman you rape, or whether you get a goddamn medal of honor for all the rapes you got away with committing, IT'S A CRIME and it's a crime against humanity, which has more to do with your conscience and morals and the rights of women to live as human beings on this planet without having to be in fear their bodies will be violated, than it laws and prison sentences. If you are a rapist, you have violated a person's right to simply live. News Flash - you do not have the right to do that. Neither does any other man or woman you know.

18. Rape is about power. It is not about sex. Do something else with your misogyny than rape a woman. Try, say, reading a book. Or committing suicide to rid you from the planet so we will have one less rapist walking around.

20. Men are the people who can stop rape. Not women. For proof of this fact, look at statistics on rape for a second. It happens every minute of every day, and it is usually not ever reported so statistics on it are always underestimates. Women have been trying to prevent themselves from being raped for a few centuries. IT HASN'T WORKED YET.

21. Rapists destroy lives in a way that murderers do not. If you rape a person, you are as inhumane as a murderer.

22. Before you decide to rape someone, go to visit an emergency room one night, and ask the nurse on duty at the triage, how many raped women have been there that evening. Then ask about the rape kits they did on the women, the DNA evidence they collected. Then spend a few years of your life talking with women who were raped and see how it has affected them every single day of their lives. You might reconsider rape after that, if you're actually human. If you're not human, please kill yourself before you rape someone.

23. Note that you are living in a patriarchal society which is the only reason why committing rape will occur to you as something you have a right to do in the first place. Note that, despite this fact, you STILL DO NOT HAVE THE RIGHT TO RAPE ANYONE EVER.

24. Know that a few million human beings on this planet right now want you dead, if you're a rapist, because we're sick and tired of you walking around, and our self protection mechanisms haven't worked, and you're not about to be a real popular guy if anyone finds out you are a rapist, unless, you are hanging around other rapists.

25. Know that whether anyone ever finds out you committed a rape or not, you are still a repulsive, weak, pathetic, disgusting, grotesque, inhumane, repulsive, worthless, twisted individual if you rape someone, and this fact will remain true, and you will remain guilty forever, whether she tells anybody or not. And you can be the one to live with that; if you have a conscience.

26. If you don't have a conscience, go murder yourself instead of raping a woman.

27. Read Ms. Magazine instead of Playboy

28. Stay away from pornography. Most rapists love it. That should be a danger sign.

29. Cut your hands off. You won't be able to use them. That will help matters.

30. Cut your penis off. Or ask me to do it for you; I'll be happy to, if you're considering committing a rape.

31. Stay away from women.

32. Stay away from little girls.

33. Stay away from boys.

34. Stay away from the human race.

35. You are not the superior sex, never will be, never were, never are. Women are equal to you, and sometimes women will be smarter than you. This is called life. Deal with it.

36. Sometimes women will not like you. That is our right. See above.

37. Sometimes women will rebuff your advances. In other words, we don't always want to have sex with you. Note, no one has any duty to have sex with anyone, ever. You are no exception.

38. Sometimes women will think you are stupid, will make fun of you, will not treat you well, will fire you from a job, will laugh at you, will refuse to go out with you. Just like men can do these things, so can women. This does not mean you have a right to commit rape.

39. If a woman has sex with you one day and doesn't want to have sex with you the next, that is her right. You do not have the right to rape her.

40. If a woman has sex with you and one hour later does not want to have sex with you again, that is her right. You do not have the right to rape her.

41. If a woman has sex all the time, with lots of men, and you think she is a slut for it, you still don't have the right to rape her. Women have the right to have sex with who they choose, when they choose, wherever they choose if it is consensual. Just like men.

42. No woman has ever, will ever or does ever ASK to be raped. No woman LIKES being raped. No woman INVITES you to rape her. No woman has EVER ASKED FOR IT. Try to remember that.

43. You don't have a right to rape your wife, your daughter, your granddaughter, your best friend, your girlfriend, a girl you met at the grocery store, your boss, your coworker, your student, your professor, your niece, your next door neighbor, a woman you do not know, or ANYONE ELSE. Ever. Period. End of Story.

44. Do not forward around emails to people telling them what women should do to prevent themselves from being raped. Women have never, and will never be able to stop the phenomena of rape, even as women do a good job of trying to, because we are not the ones with penises. Very simple. You are the only person who can prevent you from raping me or any other woman. You. Not me. You. Not any woman. You. You must stop you from being a rapist. It is YOUR job. Take responsibility for it for a change. I'm tired of giving out the 1-800-656-HOPE number to women who have been raped. I WANT TO GIVE OUT A HOTLINE TO YOU. 1-800-STOP IT NOW
But that hotline does not exist.

45. Go build a crisis center to stop yourself and every other man you know from becoming a rapist. Get funding for it, which will require a lot of work on a daily basis. Hire counselors. Hold group therapy and individual therapy sessions. Try, again, to get funding for it because it will be difficult to do so. Women have been doing this for decades. They're called rape crisis centers and we have too many of them. They should not have to exist at all.

46. When you converse with your male friends, be sure to warn them to NOT RAPE ANYONE if they are going out late at night, or if they are going out with a new girl, or if they are doing anything at all where rape might be an issue of concern. Women do this all the time, warning their friends to be careful, warning their daughters, their sisters, their mothers to be careful, to watch out, to lock their doors, to keep their doors locked, to carry pepper spray. We have all sorts of advice we give each other based on our very rational fear of rape. Why don't you try giving every man you now advice on how to prevent rape?

47. If you know someone who is a rapist, do something about it. Do not ignore, tolerate, pretend you don't know or don't care, or congratulate him. DO SOMETHING about it, such as, telling him he is the scum of the earth, reporting him to the police, beating him up, or put up a billboard with his picture, his name and the word Rapist in bright red letters on his front lawn.

48. If you're a rapist, go to therapy for a few years, perhaps the rest of your life, spend some time in a psychiatric hospital, perhaps dozens of times, perhaps years, and try to figure out how to live with yourself and what you did, which is exactly what many women who are raped by people such as you must do.

49. Donate money to RAINN, since you haven't succeeded in stopping rape from happening yet, so we still need these sexual assault centers, and maybe you should try being the person who donates money to them, rather than the people who were raped. http://www.rainn.org 1-800-656-HOPE . Or donate money to your local sexual assault crisis center. Or donate money to one of the women you know who has been raped so she can go to therapy, because statistically, there is little chance that you do not know several rape "survivors".

50. SEND THIS TO EVERY MAN YOU KNOW. And when you get the next email telling every woman on the planet what to do to prevent herself from being raped, and it says, "forward it to every woman you know", don't do it.

@नानबा
कायदा पाळला जावा, केस पटापट सोल्व व्हाव्यात, योग्य ती शिक्षा मिळावी ह्याकरता आग्रह धरणं.
>>
इतर सर्व मागण्यांबरोबरच आंदोलकांनी संपूर्ण भारतातील प्रलंबित राहिलेल्या सर्वच्या सर्व बलात्काराची प्रकरणे रोजच्या रोज सुनावणीस घेऊन तीन महिन्यांच्या आत त्यांचे निकाल लागले पाहिजेत असा आग्रह धरावा. म्हणजे याबाबत कायदा काम करायला लागला आहे असा एक संदेश या हलकट लोकांना जाईल. त्याशिवाय गुन्हेगारांना शिक्षा होईल या दिशेने पोलिस काम करतात की नाही याचीही एक तपासणी होऊन जाईल. त्यांच्या कामामधील ढिलाई देखील प्रकर्षाने समोर येईल.
नव्या दुरुस्त्यांमध्ये कोणकोणत्या दुरुस्त्या करायला हव्यात यासाठीही यांचा उपयोग होईल.

Alka | 22 December, 2012 - 08:07
जो परेन्त या नराध्माना फाशि दिलि जात नाही तो परेन्त आपण स्वस्थ बसता कामा नये.कारण कायद्यात याना मुभा मीळते.फाशि ची अम्लबजावणी 20 वर्शा नन्तर होते
<<
२० वर्षांनंतरही फाशी होत नाही तर त्यांना राष्ट्रपतींकडून दयेचा लाभ होऊन जीवदान लाभते.

Pages