छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !

Submitted by सेनापती... on 21 December, 2011 - 05:35

छत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल -
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग

गेल्या २ भागात आपण पाहिले की छत्रपति शिवरायांनी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून तिसरे बलस्थान जे 'प्रभुशक्ती' (कोश आणि सैन्य) ते क्रमाक्रमाने कसे वाढवले. सैन्य आणि कोश हे एकमेकांस पूरक आहेत हे सुद्धा आपण ह्याआधी पाहिले आहेच.

'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' या आज्ञापत्रातील ओळीवरुन हे स्पष्ट होते की गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य आवश्यक होते. थोडक्यात 'राजतंत्र' हे सर्वस्वी सैन्यावर अवलंबून असते. नवीन शत्रुप्रदेश जिंकणे, जिंकलेल्या भागाचे संरक्षण करणे, संरक्षित भागाचे संवर्धन करणे आणि अखेर त्याचे न्यायाने परीचालन करणे ह्या सर्व बाबींसाठी सैन्याची आवशक्यता असतेच. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात सैन्याची जमवा-जमव हा एक जटील प्रश्न होता. रोहिडेश्वर येथे स्वराज्य शपथ घेणाऱ्या शिवरायांनी पुढच्या काही काळात १ हजार सैन्य उभे केले होते. समोर असलेल्या परिस्थितिमधून मार्ग काढताना, नविन राज्यपद्धती रुद्ध करताना त्यानी एक नविन युद्धतंत्र प्रवर्तित केले. गरज वाढली तसे सैन्येचे संख्याबळ आणि त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्री उभी केली. लढ़ण्याचा ध्येयवाद त्यांच्यामध्ये निर्माण केला. सेतु माधवराव पगड़ी म्हणतात की,

"The Marathas fought for saving their homelands. It was cause worth Fighting & Dying for. They were led by a Man of No ordinary Skills & Calibre."

स्वराज्याच्या पहिल्या तपात माणसे जोड़णे, त्यांच्यात ध्येय निर्माण करून लष्करी आणि मुलकी व्यवस्था लावणे हे काम शिवरायांनी तडीस लावले. आवशक्यता असेल तेंव्हा स्वतः मोहिमेचे नेतृत्व करून सैन्यात उमेद आणि उत्साह निर्माण केला. लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते. या शिवाय 'माणूस ख़राब होवू नये' याची ते नेहमीच दक्षता घेत. ह्याचमधून निर्माण झाले मराठ्यांचे एक विलक्षण युद्धतंत्र. अफझलखान मोहिम असो नाहीतर पुरंदरची लढाई प्रकर्षाने हेच पुढे येते. माणूस ख़राब होवू नये म्हणजे सैन्य जाया होवू नये म्हणुन त्यांनी पुरंदरची लढाई थांबवून तह स्वीकारला.

फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये म्हणतो,
"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources & cousious about huge resources of his enemies. So took full advantage of every single weakness of enemy. He watched their movements & managed to corner them into difficult positions. Time & again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."

राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही." पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.

मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवर स्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिगंत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."

दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो -

'Quick Cavalry movements & excellent, well-paid intelligent services were the main cause of Shivaji’s success. He also mentioned about simplicity of Shivaji’s camp, absence of women, and lack of heavy baggage. He also observed that horsemen in cavalry were paid regularly & that they did not own horses. The horses were property of state. What a contrast to the slow moving, Mansabdari – ridden Mughal armies.'

“He also frequently surprised his enemies who thought him to be far off when he fell upon them. The families of these cavalries who belong to these parts were stationed in the lands of the west coast of India. This is what attached them to his service. This chief also paid his spies liberally who have given him considerable facilities for his conquest by the sure information they have supplied him.”

थोडक्यात मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय?..

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र

संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते.

"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."

पक्का ह्या दोन्ही नोंदी तू इथे लिहिल्यास त्याबद्दल तुझे विशेष आभार आणखी बलस्थाने वाचायला आवडतील. 'युद्धनीती' सारखी या सारख्या बलस्थानांचा उल्लेखही कर जमल्यास. त्याबद्दल जाणून घेण्याची जास्त उत्सुक्ता आहे.

सेनापती,

लेखमालिका उत्तम आहे. चालू लेखही अत्यंत वाचनीय आहे.

दुसर्‍या महायुद्धात हिटलरच्या अतिवेगवान चढाईचा (ब्लिट्झक्रीग) जनक गुडेरियन होता. मात्र मध्ययुगीन कालखंडात शिवाजीमहाराज तत्कालीन ब्लिट्झक्रीगचे जनक मानले पाहिजेत. त्यांनी अफझलखानाच्या वधानंतर जी चपळगती मोहीम उघडली होती ती अक्षरश: बिनतोड आहे. तिचं मूळ तुम्ही वर्णिलेल्या सैन्यव्यवस्थेत दिसून येतं.

आ.न.,
-गा.पै.

उत्तम लेखन.
अगदी पहिल्यांदा महाराजांनी कुठल्या मुद्द्यावर मावळ्यांना चेतवलं, त्याबद्दल काहितरी
साहित्य हवे होते. लिखित रुपात नसणारच, पण निदान लोकसाहित्यात तरी हवे.

चांगली माहिती. फक्त या वाक्यातील (मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती) दिवंगत शब्दाचा वापर चुकिचा वाटतोय. तुम्हाला दिग्गंत म्हणायचं आहे का?

छान लेखमाला Happy

[या टायपो दुरुस्त करायला हव्यात का बघा
>>> So tool full advantage of
इथे took असा शब्द हवाय का?

>>>> मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. <<<<
येथे दिगंत हा शब्द हवाय Happy ]

छान लेखमाला Happy

नियमीत वाचतेय, दिनेशदा अनुमोदन --- खरतर मला वाटते की एका प्रकारचे पर्सनालिटी डेव्हलपमेंट चे मराठमोळे क्लासेसच असतील ते Happy

लेख आवडला. मार्टिनच्या उतार्‍यांबद्दल अनेक आभार!

महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानी सामान्य नागरिकातून सैनिक तयार केले. शेतीच्या काळात हे सैनिक घरी जाऊन शेती करत असत तर दसर्‍यानंतर मोहिमांमधे सामील होत. त्यामुळे अपुर्‍या मनुष्यबळानिशी एवढा मोठा स्वराज्याचा डोलारा उभारणं महाराजांना शक्य झालं.

लेख आवडला , बराच अभ्यास केलाय हे सहज दिसुन येते !! निवडक १०त.

केरळात "कलरी पायत्तू" नावाची Martial Arts आहे, ही कला परशुरामा ने सुरु केली होती
असे समजतात. ह्या युद्द कले मध्ये तलवार बाजी, दान पट्टा चालवायचे शिक्षण देतात. असे बरेच कलरी
आखाडे पुरातन काला पासून केरळात काही ठिकाणी आहेत.

कलरी युद्द कलेत विविध हत्यारांचा वापर, हत्यांरा शिवाय प्रतिस्पर्ध्यावर मात करणे अश्या गोष्टी शिकवल्या
जातात. मु़ळात ही युद्द कला भारतीय असल्याने योग / सुर्य नमस्कार सारख्या व्यायामा वर आधारीत आहे.
त्यांचे प्रशिक्षण खुपच खडतर असते.

पुर्वीच्या काळात प्रत्येक आखाड्यात कलरी गुरु असत. कलरी मास्टर ( गुरु) हे युद्दकलेत निपुण असतच पण
ते कलरी-आयुर्वेदात व मर्म शास्त्रातही पारंगंत असत त्यामूळे ते जखमी सै न्याची सुश्रुशा करु शकत.
मर्मा शास्त्रामुळे अचुक निदान ते करु शकत पण त्याच वेळी शस्त्रा शिवाय शत्रूला शरण आणू शकत.

अश्याच एका प्रसिद्द कलरी आखाड्याच्या गुरुने TV वरील मुलाखतीत असे सांगीतले होते कि शिवाजी च्या
सैन्याला त्यांच्या आखाड्याने तलवार बाजीचे / दानप ट्ट्याचे प्रशिक्षण दिले होते.

राज्यांचे बरेच सहकारी हे समाजातील विविध स्तरातुन आले होते. तेली तांबोळी नाभीक अश्या सहकार्याना
त्वरीत युद्द कलेचे शिक्षण देण्या साठी राजांनी अश्याच एका कलरी गुरुची मदत घेतले असण्याची शक्यता
नाकारता येत नाही.