ईतिहासात कुणी आणि का रमावं ?

Submitted by असो on 18 January, 2011 - 04:39

एक प्रश्न विचारतो..

खालीलपैकी कशासाठी आपण स्वेच्छेने वेळ द्याल ? किंवा कोणता विषय आपल्या विशेष आवडीचा आहे ?

१. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या जन्माबाबत असलेल्या वादामधे योगदान देणे
२. रामजन्मभूमीच्या जागेवर मंदीर/मशीद/ बुद्धविहार यापैकी काय होते हे शोधून काढणे
३. आर्य भारतात कुठून आले यावर झगझगीत प्रकाश टाकणे
४. प्राचीन भाषा संस्कृत कि तमीळ कि प्राकृत याबाबत नवे पुरावे सादर करणे ..
५. इत्यादि इत्यादि

या प्रश्नाला जोडूनच एक उपप्रश्न स्वाभाविकरित्या विचारावासा वाटेल आणि तो म्हणजे

आपलं योगदानाचं स्वरूप काय राहील ?

१. मुलभूत संशोधन करणे, इतिहासाची साधनं, चिन्ह यांचा उपयोग करून कोडी सोडवणे
२. आधी झालेल्या संशोधनाचं विश्लेषण करणे
३. इतर ईतिहासकारांचे लेख, पुस्तके वाचून स्वतःला अपडेट ठेवणे..
४. नेटवर किंवा खुल्या मैदानात समोरासमोरच्या चर्चांमधे सहभाग घेऊन आपल्या ज्ञानाच्या जोरावर समोरच्यास अस्मान दाखवणे. माघार न घेता मुद्दे मांडत राहणे आणि वेगवेगळ्या लिंक्स देत गोंधळ घालणे..
५. इत्यादि इत्यादि..

एक आठवड्यापूर्वी माझ्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच स्नेहसंमेलन होतं. आम्ही खूप वर्षांनी जमत होतो. एकमेकांना ओळखूही येत नव्हतो. ज्या सरांनी पुढाकार घेऊन हे स्नेहसंमेलन घडवून आणल त्यांच्याकडे प्रत्येकाची अद्ययावत माहीतीही होती. कॉलेजमधून शिकलेल्या आणि जीवनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषणं ऐकणं हे एक भाग्यच असतं.

एक माजी विद्यार्थी खूप लांबून आलेले आणि आवर्जून भाषण करायचंय म्हणत होते. खूप साधे वाटत होते. त्यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरूवात केली.
ते कॉलेजला लोणावळ्याजवळच्या एका खेड्यातून येत असत. डोंगरद-यांचा भाग. सकाळची पहिली लोकल गाठून कॉलेजला पोहोचले कि पावणेनऊ वाजलेले असायचे. पहिलं लेक्चर पावणेअकराला असायचं...

त्यांनी परवागी काढून ड्रॉईंग हॉल उघडून घेतला. सकाळच्या त्या वेळात ते तिथं जाऊन अभियांत्रिकी ड्रॉईंग्ज करीत बसत. याच पद्धतीनं इतरही विषयांचा अभ्यास ते करीत. ते म्हणतात मी हुषार कधीच नव्हतो. पण मेहनतीच्या जोरावर मी शिकलो.

नेहमी कान आणि डोळे उघडे ठेवण्यामुळं ते नोकरीत न रमता व्यवसायात पडले. आज महाराष्ट्रात इन्फास्ट्रक्चरच्या क्षेत्रात त्यांना मोठा मान आहे. एका प्रसिद्ध कंपनीचे ते मालक आहेत. त्यांच्या कंपनीच्या आयपीओ कडे खूप जणं डोळे लावून आहेत. त्यांचं नाव इथं देत नाही , इतकंच सांगतो दोन प्रमुख शहरांना जोडणा-या एका महामार्गाचं सहापदरीकरण करण्यासाठी आणि त्याच्या टोलसाठी त्यांनी शासनाला २१०० कोटी रूपयांचा एकरकमी चेक दिलाय. खेड्यातल्या या मुळाची ही झेप थक्क करणारी आहे. (मायबोली प्रशासनाची अनुमती मिळाल्यास त्यांची मुलाखत घेऊन इथं प्रसिद्ध करता येईल ).

दुसरं उदाहरण मित्राचं.

त्याच्या आईने रस्त्यावर भाजी विकली. एक भाकरी आठ जणात खाल्ली अशी परिस्थिती. भाऊ नोकरीला लागला. हा धाकटा. एकदा वाचलेलं लक्षात ठेवणारा.. पण पुस्तकी किडा नाही. सतत इंजिनियरिंग वर्कशॉप्स, कारखाने इथं त्याचा वावर असायचा.

एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीत नोकरीस लागला. त्या निमित्तानं खूप लोकांशी परिचय झाला. एका मारवाड्यानं त्याला नोकरी सोडण्याबाबत सुचवलं. तुझं डोकं आणि माझा पैसा अशी भन्नाट ऑफर दिली. तरी याणे चार वर्ष नोकरी करून व्यवसाय केला. या दरम्यान झोप केवळ चार तास. इतर वेळी फक्त काम ..!!!

पुढं ते वर्कशॉप फायद्यात आल. दोघांच्यात मतभेद झाले तरी याने नोकरी सोडून स्वतःच्या बळावर व्यवसाय केला. मायक्रोअलाईड स्टील मधे इआरडब्लू स्टीलच उत्पादन सुरू केलं. आज दोन हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे. तो वाढणार आहे.. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्याच्या स्टील ट्यूबला मागणी आहे. अभिमानास्पद कामगिरी वाटली त्याची..

आणखी दोन मित्रं अभ्यासात मागे असायचे. कॉलेज संपल्यानंतर खूप खस्ता खाल्ल्या. कष्ट घेतले. आज पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेत. जंगली महाराज रस्त्यावर एका स्वतंत्र आणि देखण्या इमारतीत त्यांच कार्यालय सुरू आहे..

असे खूप जण भेटले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणारेही बरेच जण भेटले.

समाजाचा एक हिस्सा आज फक्त विकासाच्या मागे आहे. त्यातून स्वतःचा, कुटूंबाचा आणि समाजाचा आणि पर्यायाने देशाचाही विकास होतोय. या लोकांना इतिहासात रमायला वेळ नाही. आज आणि उद्या हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर उर्वरीत समाजाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यांच्यापुढं या विद्यार्थ्यांचा आदर्श असायला हवा आणि संधी मिळताच ते सिद्धही होत आहे. इतिहासातल्या ज्ञानाचं कुणालाच काही पडलेलं नाही. या यशस्वी लोकांची मानसिक जडणघडण या प्रकारची आहे. चुकांमधे अडकून पडण्यापेक्षा भविष्यात चुका होणार नाहीत याकडे त्यांचा कटाक्ष आहे.

या उलट पुढच्या बाकड्यांवर बसणारी मुलं आज खूप चांगल्या हुद्यांवर निरनिराळ्या कंपन्यांत आहेत. गलेलठ्ठ पगार आहे. त्याचा त्यांना अभिमानही आहे. पण हे आयुष्य कुणालाच प्रेरणा देऊ शकत नाही. सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळं मग अशा वर्तुळात केवळ बुद्धीला खाद्य म्हणून ईतिहासात रमणं सुरू होतं. (हे विधान सरसकट सर्वच पुढच्या बाकड्यांवर बसणा-या विद्यार्थ्यांना उद्देशून नाही. तसं म्हणणं अन्यायकारकच आहे.. )

मागे एकदा आगाऊ यांना त्यांच्या पोस्टचे कॉपीराईटस मागितले होते. दिले असते तर कायदेशीर रित्या ती पोस्ट वापरता आली असती.. आता बेकायदेशीर रित्या वापरावी लागेल याच वाईट वाटतंय.

एक गोष्ट इथं स्पष्ट कराविशी वाटतेय.

सहजरित्या गप्पा म्हणून अशा विषयांबद्दल बोलणा-यांबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. माझा आक्षेप आहे तो आपला प्रोफेशन ईतिहास या विषयाशी संबंधित नसताना त्यावर अधिकाराने वाद घालण्याच्या वृत्तीला !! एखाद दुसरेवेळी ते ही ठीक आहे पण काही जण वारंवार त्याच त्याच विषयावर तेच तेच तुणतुणे वाजवताना दिसतात. ज्याच्या पोस्टस जास्त तो जिंकला असहि काहींना वाटत असावं किंवा एखाद्याने उत्तर देण्याचं टाळलं म्हणजे आपला युक्तीवाद बिनतोड होता असंही काहीजणांना वाटत असावं. ही सर्व मंडळी सुशिक्षित ..उच्चशिक्षित आहेत.

समाजाचा एक मोठा भाग असा आहे ज्याला या वादांमधे काडीचाही रस नाही. पूर्वी बेरोजरागार तरूणांच्या भावना भडकवण्यासाठी या वादांचा वापर होत असे. आता त्यांनाही त्यात रस वाटत नाही. स्वार्थ असेल तरच आजचा तरूण अशा तंबूंमधे दाखल होतो. स्वार्थ साधता येत नसेल तर सरळ दुस-या तंबूचा रस्ता धरतो.. महापुरूष / देव / धर्म यात सकारात्मक तेच घेण्याकड लोकांचा कल असतो. चांगल ते घ्या आणि कामाला चला हा त्यांचा साधा मंत्र आहे. असे लोक यशस्वी म्हणता येतील .. या लोकांना प्रॅक्टीकल लोक म्हटलं जातं.

नेटवर सर्वत्र चाललेले वाद हे बहुतकरून ऐतिहासिक विषयांवरच होतात आणि शेवटी जातीय वळणावर संपतात. प्रत्यक्ष जीवनात आपण इतके जातीयवादी असतो का ? पण हे वाद निष्कारण डोकं खराब करतात. ऑफीसच्या वेळेत, ऑफीसच्या खर्चात वाद घालून विविध प्रश्नांवर प्रशासन काय करतंय असा सवाल करणा-यांबद्दल तर बोलायलाच नको.
.
ईतिहासात कुणी आणि का रमावं ?

आज इतिहास म्हणजे काही संघटना आणि पक्ष यांचं दुकान आहे. ईतिहासकारांनी त्यात रमण्याबद्दल काहीच ना नाही. उलट फक्त त्यांनीच त्यात लुडबूड करावी असं माझं प्रामाणिक मत आहे. इतरांनी त्यात संशोधनपर भाष्य करण्याऐवजी स्वतःच्या क्षेत्रात इतिहास घडवावा.

विठठल कामत, डी एस कुलकर्णी, रतन टाटा इ . यांची आपल्या पहिल्या परिच्छेदातील प्रश्नांबाबत मतं कधीच ऐकण्यात / वाचनात आली नाहीत. या लोकांना कसलीच माहीती नाही किंवा त्यांचं वाचन नाही असा अर्थ कुणी काढू नये. मग माझ्यासारख्यांनाच या वादात आपलं मत जोरजोराने मांडावंस का वाटतं ? मला हा प्रश्न नेहमी सतावतो.

अर्थात, जी भूमिका इथं मांडलीये तिला दुसरीही बाजू असू शकते जी अल्पमतीच्या मर्यादेमुळं विचारात घेता आली नसावी. ती बाजूही समजून घ्यायला नक्कीच आवडेल..

धन्यवाद.

- अनिल सोनवणे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या होतं काय कुठल्यातरी अभ्यासवर्गात जाऊन कधी कानावर न पडलेलं ज्ञान कधी दुस-यांना दाखवतो अशी घाई झालेली मंडळी सर्वत्र उच्छाद मांडत आहेत. एक आपल्यालाच आता ब्रह्मज्ञान झालेलं आहे आणि इतर सर्व अज्ञानी पामर आहेत या अविर्भावात मग गरज नसताना त्या बिच्चा-या मेकॉलेचा उद्धार करूनच चर्चेत उडी घेतली जाते. मेकॉलेला इतकं झोडपलं जातं कि बस्स !

पैलवान, जोशी, मास्तुरे ... कायम मेकॉलेला बडवणारे .. दोन गेले... अ‍ॅडमिनच्या आशिर्वादानं एक अद्याप टिकून आहेत...

एक छान मनोरंजन, थोडासा किंवा खुपसा गर्व. ज्यांच्यावर अन्याय झाला म्हणजे ज्यांच्या मागील पिढ्यांवर झाला त्यांना सूड घेण्याचे साधन. ह्यापलीकडे माणूस फारसा काही शिकला नाहीये. असे असते तर अजूनही इतकी युद्धे आणि धर्मावरून भांडणे झाली नसती आणि अजूनही कोणीही फारसे शिकते आहे असे वाटत नाहीये. तसे असते तर आपल्या राजकारांण्यानी सामान्य लोकांच्या भल्याचा थोडा विचार केला असता. उलट इतिहासातून दुसऱ्याचा कसा जास्त तोटा आणि आपला फायदा कसा होएईल हे जास्त शिकायला मिळत असावे. सध्या दर्डा वगैरे लोकांना आवर घालायला कोणी पुढे आला असता पण असे काही होत नाही. त्यामुळे ज्याला जे जे वाटते त्यासाठी इतिहास शिकावा किंवा वाचवा.

मायबोलि वर मि नविन आहे.इथे खुप काहि वाचायला मिलते आहे.
मि साध्य जापान ला मुलिकदे आहे.जापान खुप प्रगत देश आहे.स्वछ्,सुन्द्रर्,सपन्न या देशाचा इतिहास जानुन घेन्याचा
प्रयत्त्न केल्यस गुगल वर जापान की उन्नति का मूल हा निबंध वाचन्यत आला तो इथे देत आहे.

जापान की उन्नति का मूल

सम्प्रति जो दशा भारतवर्ष की है ठीक यही दशा सन् 1850 से पूर्व जापान की थी। भारत में जिस प्रकार वर्ण व्यवस्था है। उसी प्रकार जापान में चार वर्ण माने जाते थे जिन के नाम इस प्रकार हैं- (1) कोवेत्सु (2) शीनवेत्सु (3) बामवेत्सु और (4) समुराई? इन में में ऊँच नीच का भी खूब विचार था। परस्पर एक दूसरे को घृणा की दृष्टि से देखा करते थे। कोवेत्सु अपने को सूर्य से पैदा बतलाते थे एवं शीनवेत्सु चन्द्रमा से। समुराई के अर्थ हैं समर करने वाले (क्षत्रिय)। ये लोग वे हैं जो भारतवर्ष से शंकराचार्य के प्रभाव से बौद्ध रूप में ही भाग गए थे और जापान में जा बसे थे। तब से जापान की सिविल और मिलिटरी में केवल समुराई वर्ण के लोग ही नौकरी किया किया करते थे। ये लोग अन्य वर्ण वालों को नहीं आने देते थे। इस के अतिरिक्त फौजों में लैफ्टिनेण्ट से लेकर कमाण्डर तक और डिप्टी कलेक्टर से लेकर गवर्नर तक समुराई वर्ण वाले होते थे। इन के अतिरिक्त जापान में अछूतों की तरह ईनिन, इत्ता और ह्यास्को भी थे। ये लोग भंगी और चमारों की तरह ग्राम और शहर से बाहर बसाए जाते थे। इनके मुख्य रूप से चार पेशे थे। चमड़े का व्यापार, जल्लादी, कबरें खोदना और मैला साफ़ करना-ठीक उसी तरह इनमें भी वही भेदभाव था जो आज छूत अछूतों का भारतवर्ष में है। ये परस्पर ऊँच-नीच का व्यवहार रखते थे और घृणा भी करते थे। इसी वर्ण-व्यवस्था के कारण चीनियों के हमले जापानियों पर प्रायः हुआ करते थे। फलतः सैकड़ों जापानी चीनियों के हाथों लूटे, मारे और फूँके गए। सन् 1852 में स्पेन के पादरी पहिले पहिल जापान में इस वर्ण व्यवस्था के ढंग को देख कर पहुँचे। उन्होंने जापान के अछूतों में अर्थात् ईनिन और इत्ता लोगों में ईसाई धर्म का प्रचार प्रारम्भ किया। बहुत से ईसाई हो भी गये-तब ठीक हिन्दुस्तान की तरह विदेशी मुसलमान ईसाई आकर अपना-अपना उल्लू सीधा करते रहे। जगह-जगह आपसी विरोध होकर बलवे होने लगे-पशु बध भी खूब होने लगा-यहाँ तक कि इन लोगों ने गाय मारने की भी सलाह दी। ईनिन और इत्ता लोगों के बुजुर्ग बौद्ध थे, इस लिए इन्होंने गाय मारने से तो स्पष्ट इनकार कर दिया। तब ईसाइयों ने मजबूर किया कि तुम लोग ईसाई हो गए हो, कोई हर्ज नहीं है। बहुत समझाने के बाद इन लोगों ने गोबध प्रारम्भ किया। परिणाम यह हुआ कि गाय आदि पशुओं के बध के कारण जापान में हिन्दुस्तान की तरह आए दिन खूब बलवे और मारपीट होने लगी। ईसाई लोगों की यह एक राजनैतिक चाल थी, जो हिन्दुस्तान में अभी जारी है। सावधान!!!दूसरी बात यह हुई कि सन् 1857 में हिन्दुस्तान में गदर हो गया और भारत तबाही की हालत में आ गया। इन दोनों का प्रभाव जापानियों पर विशेष रूप से पड़ा। जापानी लोग इन चालों को समझ गए। जगह-जगह बड़ी-बड़ी सभाएँ होने लगी। इन सभाओं में एक स्वर से जापान के वीर नेताओं ने आवाज उठाई कि जब तक इस व्यवस्था को मिटा कर तमाम कौमों को एक न कर दिया जाएगा-तब तक जापान आगे न बढ़ेगा। सचमुच जापान का सौभाग्य सितारा चमक उठा। जापान 286 राजाओं और सैकड़ों जातियों में विभक्त था। पहिले पहिल मत्ता प्रान्त के स्वदेश भक्त राजा ने अपना राज्य टोकियो के महाराजा मैकडो को सौंप दिया और एक काठ का मकान बना कर साधारण प्रजा की तरह टोकियो में रहने लगा। इसी भाँति थोड़े ही समय में सब राजाओं ने अपना राजपाट, लाव लश्कर मैकडो के सुपुर्द कर दिया। अब पहिले पहिल आज्ञा जो बुद्धिमान जापान नरेश मैकडो ने सन् 1868 में निकाली वह यह थी कि अछूतों की बस्तियाँ तोड़ दी जावें और ईनिन इत्ता लोगों को ऊँचे माने जाने वाले लोगों के बीच में बसाया जावे एवं जो इनसे छूतछात करे, उसको राज्य की ओर से कठोर दण्ड मिले। बस-इस आज्ञा के निकलते ही जापान में प्रचलित वर्ण व्यवस्था टूट गयी। फलतः कोबेत्सु, शीनवेत्सु बामवेत्सु और समुराई, एवं ह्यास्को, ईनिन इत्ता यह कृत्रिम वर्ण-विभाग टूट गये और जापान एक ‘जापानी क़ौम’ का पवित्र देश बन गया। इसके बाद सन् 1868 में ही जापान के दूरदर्शी नरेश मैकडो ने तुरन्त राजाज्ञा द्वारा समस्त जापान में अनिवार्य शिक्षा प्रचलित कर दी।

अनिवार्य शिक्षा के कार्य में जापान के कुबेर फ्रूबूजावा और हीटो ने प्रचुर धन राशि उदारता और प्रसन्नता पूर्वक प्रदान की। आज तक जापानी लोग इन दोनों महानुभावों को आदर पूर्वक स्मरण करते हैं। इन दोनों ने जापान की उन्नति में अपने करोड़ों रुपए व्यय कर दिए। आज भारत निवासी वर्ण व्यवस्था के बखेड़े में खंड-खंड हो रहे हैं। क्या भारतीय लोग अब भी उन्नति का मार्ग जापान की सच्ची कथा को पढ़कर समझेंगे? जापानी लोगों ने अछूतोद्धार करके अपनी शक्ति को दुगुना कर लिया। यदि ईनिन और इत्ता लोगों को जापानी लोग अपने अन्दर न मिला लेते तो ईसाई लोग अपनी शक्ति बढ़ा लेते परन्तु बुद्धिमान् और दूरदर्शी जापानियों ने समय की गतिविधि को समझा और खूब समझा। देखिए इन्हीं ईनिन और इत्ता लोगों में से एक बहादुर ने जापान के चार चाँद लगा दिये। सन् 1900 में जापान उन्नति करने लगा और सर्व प्रथम कैप्टन तनामा को दूत बनाकर मास्को (रूस) भेजा। तनामा बहुत ऊँचे क़द का आदमी था। साथ ही कुरूप भी था परन्तु मिलनसार और बुद्धिमान् प्रथम कोटि का था। वह मास्को में रूस के मिलिटरी अफ़सरों के साथ जुआ खेलने लगा और जान बूझकर हार जाता था। उसी धन से रूसी अफ़सर अपनी स्त्रियों के लिए हीरे और मणिओं के हार खरीदा करते थे। रूस की स्त्रियाँ तनामा को वर्दी पहिने जब देखतीं थीं तब उस पर मोहित हो जाती थीं। इस प्रकार बहुत स्त्रियों के साथ कैप्टन तनामा का पवित्र प्रेम हो गया। उन्हीं दिनों रूस की सरकार ने परम प्रसिद्ध पोर्ट आर्थर का क़िला बनवाया। उस क़िले में जापानी मजदूर काम करते थे-जो पढ़े लिखे और समझदार थे। इन्होंने सलाह करके क़िले को कच्चा चिन दिया। दूसरी ओर सरकार ने पोर्ट आर्थर में लड़ाई लड़ने के लिए चक्रव्यूह का एक नक़्शा गुप्त रूप से बनवाया और अपने दूत के पास जो जापान में रहता था भेज दिया। इस नक़्शे की नकल कैप्टन तनामा ने बुद्धिमत्तापूर्वक करवा ली और अपनी सरकार के पास जापान में तुरन्त भेज दिया। जब रूस के जापानी दूत को ज्ञात हुआ कि गुप्त नक़्शे की नकल जापान में पहले ही पहुँच गयी है तो उसने अपनी रूसी सरकार को बड़ी डाँट बताई और पूछा कि यह नक़्शा कैसे यहाँ पहुँचा। तब दूसरा नक़्शा तैयार किया गया। वह भी बुद्धिमान् तनामा ने किसी प्रकार हाथ में कर लिया। परन्तु यह भी छिपा नहीं रहा कि दूसरे नक़्शे की नकल भी जापान में पहुँच गयी। तब कैप्टन तनामा पर सबने सन्देह किया। अतएव रूस के जर्नल एब्लोन्स्की आदि अफसरों ने गुप्त कमेटी की और खूब विचार परामर्श के बाद एलोन्सकाया नाम वाली एक नर्तकी को भेजा जो तनामा के चरित्र को भ्रष्ट करके सब भेद लेवे। पहिले तो वह नर्तकी न गयी परन्तु खूब लोभ लालच और धमकी देने के बाद वह कैप्टेन तनामा के बँगले पर गई और उस को अपने साथ विवाह करने के लिए मजबूर किया। परन्तु देश भक्त तनामा तय्यार न हुवा। तनामा को धन का भी लोभ दिया गया-परन्तु उसने देश की स्वाधीनता को अक्षुण्ण रखने के लिए सब को तृणवत् समझ कर त्याग दिया, क्योंकि वह नर्तकी सब रहस्यों को जानने के लिए भेजी गई थी। अन्ततोगत्वा तीसरा नक़्शा तय्यार किया गया और बुद्धिमान् तनामा ने उसको भी प्राप्त कर लिया और तदनुसार जापान के अफ़सरों को लिख दिया कि डबल पलटनें एक महीना पूर्व तैनात कर दो हमारी जीत होगी। फौरन जापान की पलटनें रूसी पलटनों के आने के पूर्व ही भेज दी गईं और इधर कैप्टन तनामा को रूसिओं ने गिरफ़्तार कर लिया और गोली से उड़ा देने की आशा रूस के राजा निकोलन ने निकाल दी। वीर कैप्टेन तनामा आज्ञा सुनते ही तुरन्त अपने कोट के बटन पकड़ कर छाती खोल खड़ा हो गया। निदान उस स्वदेश सेवक तनामा ने स्वामी श्रद्धानन्द की तरह छाती पर गोलियाँ खाकर स्वदेश के लिए स्वर्ग का मार्ग स्वीकार कर लिया। इस घटना से जापानी लोगों में गहरी देश भक्ति का पता पाया जाता है। ऐसी-ऐसी घटनाएँ तो अनेक हैं परन्तु इस पुस्तक के लिए यह घटना प्रासंगिक है। अगर जापान में वर्ण व्यवस्था का पाखण्ड प्रचलित रहता और जापान की अछूत मानी जाने वाली जाति ईनिन और इत्ता की सत्ता बनी रहती तो जापान आज खंड-खंड होकर वर्ण व्यवस्था का घोर दंड भोगता होता। फिर कैप्टन तनामा जैसा अछूत कही जाने वाली इत्ता जाति का सरदार कैसे जापानियों का प्राण प्यारा बन पाता? न जापान से वर्ण व्यवस्था का प्रयाण होता और न जापानियों में से अछूतपन का प्लेग निकल पाता। जापानियों ने वीर तनामा को पाया। वर्ण व्यवस्था को विध्वंस करके। फलतः 1805 में जो भयंकर प्रसिद्ध लड़ाई पोर्ट आर्थर पर हुई उसमें जापान विजयी रहा। इस विजय की प्राप्ति में ईनिन और इत्ता आदि अछूत कही जाने वाली क़ौमों ने ही विशेष वीरता दिखाई। आज जापान में उस विध्वंसकारी वर्ण-व्यवस्था का नामोनिशान नहीं है और जापान एक महान शक्तिशाली राष्ट्र है। सब प्रकार की उन्नति जापान में हो रही है। क्या भारत निवासी अपने पड़ोसी जापान निवासियों से शिक्षा लेंगे कि वर्ण व्यवस्था का विध्वंस करके भी कैसे दुनियाँ में उन्नति हो सकती है। जापान से वर्ण व्यवस्था तो भाग गई-लेकिन Four Ms make the monarchey अर्थात् मिशनरी, मिलिटरी, मरचैन्ट, और मीनियल्स का वैदिक कर्म-विभाग (वर्ग-व्यवस्था) आज जापान में स्वतः प्रचलित हो गया है। इसी प्रकार यदि भारत-वर्ष प्रचलित वर्ण व्यवस्था का विध्वंस कर दे तो समय आने पर स्वतः ‘वैदिक वर्ग व्यवस्था’ कायम हो जाएगी। इसकी चिन्ता न करनी पड़ेगी। सावधान!!!

वेद में भी लिखा है-

क्षत्राय त्वं, श्रवसे त्वं, महीया इष्टये वंत, अर्थमिव त्वं-इत्यै।

(ऋग्वेद 1/11/3/6)

अर्थात् यह चार प्रकार की प्रवृत्ति ही वैदिक वर्ग-व्यवस्था है। इस मन्त्र में शूद्र के लिए ‘महीया’ आया है जिसका अर्थ पूज्य होता है।

अरे वा! रिजर्वेश्न , दलित सबलीकरण कायदे आल्यापासुन ऋग्वेदही बहुजनांना वंदन करु लागला.

आनंद आहे.

Pages