जलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.
उदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
पाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...
२८ नोव्हेंबर १६७० रोजी ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेत पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली.
९ सप्टेंबर १६७१ - इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायासंदर्भात पत्र लिहीले. पत्रात तो म्हणतो,"शिवाजीच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे."
"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"
७ सप्टेंबर१६७९ - सिद्दी आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यान्नी खांदेरी भोवती १ मी. उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
११ सप्टेंबर१६७९ - दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला. इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.
७ सप्टेंबर १८१४ - दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.
शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन...
दिनेशदा.. हो .. केला तर
दिनेशदा.. हो .. केला तर खांदेरी- उंदेरी च... फक्त भरती ओहोटीची वेळ जमवायची
दिनेशदा.. होय खांदेरी हे बेट
दिनेशदा..
होय खांदेरी हे बेट मराठ्यांनी ताब्यात घेऊन तिकडे जलदुर्ग बांधला.. तर सिद्दीने उंदेरी हस्तगत करून तिकडे किल्ला बांधायला घेतला होता. जवळ-जवळ असल्याने हे जलदुर्ग नेहमी जोडीनेच पाहिले जातात बहुदा.
अरे मला पण सांगा जाताना, मी
अरे मला पण सांगा जाताना, मी पण येईन.
रच्याकने, थळ माझं आजोळ आहे :), पण खांदेरी-उंदेरी लहानपणापासुन किनार्यावरुनच बघत आलोय. कधी जाण्याची संधी मिळालीच नाही.
मी बघतो काही ओळख निघते का ते!!!
मी बघतो काही ओळख निघते का
मी बघतो काही ओळख निघते का ते!!>> बघतो नाही चालणार.. आता ओळख काढूनच इकडे ये..
ओळख निघाली आहे... आता कधीही
ओळख निघाली आहे... आता कधीही जाता येईल..
Pages