Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चष्मा

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » कथा कादंबरी » चष्मा « Previous Next »

Salil_mirashi
Friday, January 05, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यांवरचा चष्मा नीट करत कुमुदताईंनी खिडकीबाहेर पाहिलं. बाहेर पाउस क्शीणपणे भुरभुरत होता. इथल्या पावसाला आपल्या देशातल्या पावसासारखं भरभरून कोसळताना त्यांनी इथे असताना कधीच पाहिलं नव्हत.
"इथे असाच असतो पाउस" तिला नीताचं वाक्य आठवलं. इथल्या पावसाबद्दल नीताकडे तक्रार केल्यावर नीता म्हणालि होती. खिडकीत बसून अशा पावसाकदे पहाणं त्यांना कंटाळवाणं वाटत होतं. आपण इथे असताना इथ्ल्या पाउस निदान एकदातरी मनासारखा भरभरून कोसळावा असं त्याणां वाटून गेलं. पावसासोबत येणार्या आपल्या मायभूमिच्य आठवणींनी त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी खिडकीकडे पाठ फ़िरवली.
त्या येऊन टि.व्ही. समोर बसल्या. टि.व्ही. सुरु करण्याकरिता त्यांनी हातात रिमोट उचलताच दारावरची बेल वाजली. त्यांनी लगेच जाऊन दार उघडलं. नीताची मुलं शाळेतून परतली होती.
"नमस्कार आजी" दोन्ही मुलं तिला हात जोडून नमस्कार करित म्हणाली.
नीताच्या मुलांचे, इथे असूनही, आपल्या देशापेक्शा चोखंदळ असलेले संस्कार पाहून त्यांचं मन पुन्हा एक्वार, दररोजप्रमाणे समाधानाने आणि कौतुकाने भरून गेलं.
"या या या"कुमुदताईंनी त्यांना आत घेतलं.
मुलं आत आली. आपल्या छत्र्या-रेनकोट त्यांनी ठरल्या जागि नेटकेपणाने ठेवले. कुमुदताई कौतुकाने त्यांच्याकडी पाहत होत्या. सहा आणि आठ वर्शांची दोघं. णिषांत आणि सुहानि. पण त्यांच वागणं किती जबाबदार्पणाच होतं.
"आज षालेत काय झालं?" वगैरे विचारन्याच्या फ़ंदात त्य पडल्या नाहीत. कारण त्यांची उत्तरं आपल्या आकलनाबाहेर्ची असल्याचं कुमुदताईंना त्यांची उतारं ऐकताना वाटायचं.त्याऐवजी त्यांनी
"काय रे?....काही खाणार आहात का?...पोहे करु क गरमागरम?"वगैरे त्यांना विचारलं.
मग मुलांना त्यांनी खास भरतातून आणलेले पोहे तयार करून वाढले. मुलांनीही ते चवीने मागून मागून खाल्ले.मग मुलांबरोबर, त्यांचे लाड करण्यात, त्यांची कौतुकं करण्यात दिवस कसा गेला त्यांनाकळलच नाहीर्आत्रि मुल झोपल्यावर त्या अंथरुणात पडून सोबत आणलेलं 'दासबोध' वाचु लागल्या. पण त्यांच्या मनात एक खंत सतत अलू लागली होती.
कुमुदताई गेले चार दिवस मुलांबरोबर घरात एकट्या होत्या. जावई त्यांच्या कामानिमित्त दौर्यावर गेले होते आणि नीत ट्रेनिंगकरिता चार दिवसांसाठी दुसर्या शहरात गेलि होती. पण या चार दिवसांत कुमुदताईंना एक गोष्ट सारखी खटकत होती. आणी ती म्हणजे गेल्या चार दिवसात नीताच्या मुलांनी एकदाहि आईची आठवण काढली नव्हती. नीता त्यांना न सांगता गेली तेव्हा त्यांनी 'आई कुठे गेली' म्हणून त्यांना विचारलं नाही. पुढच्या चार दिवसातही, त्यांनी एकदाही दोघातल्या एकानेहि त्यांना 'आई कधि येणार?' अस विचारलं नाही. त्यांचं हे वागणं कुमुदताईंना जरासं विचित्रच वाटथोतं.
या गोष्टीवर अधिक विचार करणं थंबवून त्यांनी 'दासबोध' आणि 'रिदींग लाईट ब्संद केली' आणि त्या पलंगावर आडव्या झाल्या. आईसाठी सतत रडणार्या आपल्या मु
ंबईच्या नातवाची आठवण काढून त्या झोपी गेल्या. भोवती दाटलेल्या सुखद गारव्यात त्यांना लगेच गाढ झोप लागली.


Sas
Monday, January 08, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलिल पुढचा भाग असावा कदाचित कथेचा. टाक ना. छान लिहलय.

Paresh_joshi
Tuesday, January 09, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारच छान सलिल लवकर पुढ्चा भाग टाक


Sia
Wednesday, January 10, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

salil khup chan lihilay lavakar lihi pudhacha bhag.

Salil_mirashi
Wednesday, January 17, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुमुदताईंना सकाळी जाग आली ती नीताच्या आवाजाने.
"काय ग नीता?.... केव्हा आलीस??"कुमुदताईंनी उठून बसत विचारलं.
"केव्हाच.....तू कशि आहेस?"
"बरी आहे....तुझं ट्रेनिंग काय ते झालं का?"
"हो"
"झालीस ट्रेन नीट?"
"अगदी."
मायलेकी यावर खळखळून हसल्या.
"तुला काही मुलांनी त्रास वगैरे नाहि न दिला?" नीताने विचारलं.
"अजिबात नाहि"
"चांगले लाड करून घेतले असतील नाहि तुझ्याकडून?"
"नाही गं.....उलत मीच केले त्यांचे लाड.....एरव्ही तरी कोण करतय त्यांचे लाड"
"त्यांचा बाबा आहे ना...ंउसता डोक्यावर घेऊन नाचत असतो दोघांना"
"पण अजि कुठंय??"
"बरंअ बरंअ...खूप झाली नातवंडांची कौतुकं...ॅहल आता रेडी हो पटकन...उरलेल्या गोष्टी ब्रेकफ़ास्ट घेता घेता करुया."
कुमुदताईंनी मग पटापत आपली कामं उरकली. त्यांनी आनि नीताने मिळून मग मुलांना तयार करून शळेत पाठवलं आणि दोघी सवडीने ब्रेकफ़ास्ट टेबलावर बसल्या.
ब्रेकफ़ास्ट घेता घेता मग दोघ्यींनी इथल्या तिथल्या गप्पा.जुन्या आठ्वणींना उजाळा दिलांआतेवाईकांच्या सद्य परिस्थितिवर चर्‍चा झाल्या. विषय संपेपर्यंत दोघी बोलत राहिल्या. शेवटी मात्र न रहावून कुमुदताईंनी न रहावून नीतासमोर मनात टोचनी लावून राहिलेला विषय काढला.
"नीता...मी काय म्हणतेय...तुला वाईट नको हं वाटू दे....पण...."कुमुदताईंनी सुरुवात केली.
"काय ग आई??"
"मला बाई तुझ्या मुलांच जरा नवलच वाटलं."
"क गं??"
"तु गेल्यापासून.....गेल्या चार दिवसात..... त्यांनी तुझी एकदाही आठवण नाही ग काढली"
नीत यावर मंद हसत, डोक्याला अलगद हात लावून म्हणाली.
"एवढंच ना....मला वाटलं त्यांनी मोठं काहितरी केलं....ऽगंआ त्यांना सवय आहे अस एकटं रहायची.....काय ग बाई तू पण....घाबरवलसंच मला."
कुमुदताईही मग तिच्यासोबत बळेच हसल्या.
"अय्या...विसरलेच होते मी तर....बर झालं आठवलं."नीता झटक्यात उठली.


Salil_mirashi
Wednesday, January 17, 2007 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काय ग काय झालं?"
"अग तुझ्यासाठी एक सरप्रईज आणलय मी"म्हनत नीता धावत तिचा खोलीत

गेली आणि हातात कहितरि घेऊन परतली.
"हे घे"तेबलावर बसत तिने 'गिफ़्ट रॉप' केलेली एक वस्तू कुमुदताएंसमोर ठेवली.
"काय आहे हे?"कुमुदताई कुतुहलाने ती वस्तू उचलून तिला न्यहाळत म्हनाल्या.
"बघ तूच उघडून"
कुमुदताईंनी गिफ़्ट रॉपिंग उघडलं.आत एक लाकडी डबी होती.

कुमुदताईंनी त्या डबीवरची लहान्शी सोनेरी कदी उघडली. आत एख्याअद्या

दागिन्याअसारखा मखमलावर विराजमान एक चष्मा होता.
"कशाला ग हा???...ॅहष्मा आहे ग माझ्याकदे" कुमुदताई त्या चष्म्यावरून

नजर उच्यलून नीताकडे पाहत म्हणाल्य.
"मी कुठे नाही म्हंट्लं...ऽग पण तो जुना झालाअय आता."
"काही जुना वगैरे नाही.....विक्रांतने आत्ताच सोन्याचा करून आणला होता

वर्‍षभरापुर्‍वेई"
"मग?....तो जुना नाही का झाला?"
"जुनाआ ऽग नुसत वर्‍ष झालय."
"हो...पण तरिही"





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators