Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 10, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through May 10, 2007 « Previous Next »

Gobu
Tuesday, May 08, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
मला असे वाटते की ईस्लामी दहशतवादाविरोधात अशी कृती केली पाहीजे
१. पोलिस, गुप्तचर खात्याला काम करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप नसावा (मिडीयाचाही नको!), ही यन्त्रणा अधिक इफ़ीसिएन्ट होण्यासाठी सरकारने सढळ हाताने मदत करावी (पैसा, सामग्री, ईन्फ़्रास्ट्रक्चर,...) अद्ययावत टेक्नोलोजीचा जरुर वापर करावा (विदेशातुन घ्या!) त्याचबरोबर, अतिशय महत्वाचे म्हणजे
२. सर्वसामान्य जनतेमध्ये हिन्दु-मुस्लिम ऐक्य निर्माण होईल असे वातावरण तयार करावे, धर्मात तेढ निर्माण करणार्‍या व ज्वलन्त विचार मान्डणार्‍यावर कठोर कारवाई व्हावी
दहशतवाद करणारा व दहशतवादाला प्रोत्साहन देणारा कुठलीही व्यक्ती अथवा नेता यान्ची गय करु नये!

The golden rule is to deal with them with "iron fists"!!!
इथे झक्कीच मत अन्श्त्: पटतयही, पण ही कारवाई दोन्ही धर्माच्या समाजकन्टकावर झाली पाहीजे!
२ मुद्द्याची ऊपाययोजना आमलात आणली तर फ़रक होईल असे मला वाटते
(च्यायला!,
अरे प्रत्येक पोस्ट मध्ये डोळे झाकुन झक्कीना अनुमोदन काय देतोस?
बाय द वे, तुझे पोस्ट वाचुन फ़ार गम्मत वाटते)


Zakki
Tuesday, May 08, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, मला क्षमा करा. कुणाला उकिरड्यावरचे कुत्रे म्हणणे बरोबर नाही. हेच विचार मला सभ्य शब्दात मांडता आले असते. ते मी विसरलो.
गोबू यांचा पहिला मुद्दा चांगला आहे. फक्त वांदा असा की लोकशाहीत पोलीस काय करतात ते इतके गुप्त ठेवून चालत नाही, लोकांना नेहेमीच संशय येतो की ते काहीतरी गैर करतात. बातमीदार बनायचे तर नेहेमीच विरुद्ध बाजू मांडून खळबळजनक बातम्या लिहायच्या, खोट्या का असेनात!
गोबू यांच्या दुसर्‍या मुद्द्याबाबत एक लक्षात ठेवा, की त्यात मुसलमान मदरशात काय शिकवतात त्यावर लक्ष ठेऊन तिथे पण तोच कायदा लागू करा. फक्त हिंदूंनाच तो कायदा लागू नाही.
हे जरा कठिण आहे कारण मुसलमान नि त्यांच्या मतांसाठी त्यांचे पाय चाटणारे लोक भारतात खूप आहेत. ते कायम मुसलमानांच्या बाजूनेच (खोटे असले तरी) कांगावा करणार. व जमल्यास जाळपोळ करणार! 'सत्यमेव नव्हे, सत्तामेव जयते!परत त्याला विरोध करायला हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. ते काही येत नाहीत. नि त्यांना एकत्र करायला गेलेल्यांना वरील कायद्याने तुरुंगात जावे लागेल!


Bhramar_vihar
Tuesday, May 08, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, त्यांना हिंदु बनवुन घ्या म्हणजे नक्की काय? त्यांचे बळजबरीने धर्मांतर करा??? पण या धर्मांतारीत प्रजातिला बाकीचे हिंदु सामावुन घेतील?? आणि पाक मधिल हिंदु का नाही आले फाळणिच्या वेळेस ईथे?? त्यांची काय मजबुरी होती?

Vinaydesai
Tuesday, May 08, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज न्यूजर्सीत सहा लोक पकडले.

http://news.yahoo.com/s/ap/20070508/ap_on_re_us/fort_dix_plot

Chyayla
Tuesday, May 08, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देइल, आधी तु सान्ग हिन्दु म्हणजे काय समजतोस? जर तुला ते कळाले असेल तर तुझ्या प्रशान्चे उत्तर तुझ्याच जवळ आहे. आणी त्याना सामावुन घेण्याबद्दल हिन्दुन्नीच पुढे यायला पाहिजे त्यानी मानसिकता बदलली पाहीजे हेही मीच म्हटले आहे त्यासाठी आधी हिन्दुन्मधेच सुधारणा होणे आवश्यक आहे हेही मी म्हटले होते.

आयला जे आन्धळेपणाने दहशतवाद समर्थकान्चे मुद्दे मान्य करुन विरोधकान्चा कायम तिरस्कार करतात त्यानी दुसर्यान्चे लिखाण विनोदी म्हणने हाच एक मोठा विनोद आहे तरी आमचे लिखाण ईतके विनोदी असेल तर मोड ला विनन्ती करुन विनोदाच्या BB वर हलवा..

बरे चला ज्या प्रश्नान्च्या उत्तरान्ची वाट मी सुनील कडुन यायची पहात आहे त्याची उत्तरे द्या, मुद्दे व उत्तरे देता येत नाहीत म्हणुन द्वेश करायची ही कोणती पध्हत आहे?




Zakki
Tuesday, May 08, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकमधील हिंदू. जे श्रीमंत होते, शहाणे होते, मुसलमानांना 'ओळखून' होते, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यातले बरेच मारल्या गेले. जे आपणहून ययला निघाले नाहीत, त्यांना जबरदस्ती हाकलून लावले किंवा मारून टाकले. जे गरीब, अशिक्षित होते त्यांना पण पळवून लावले किंवा मारून टाकले.

इतके असून बरेच हिंदू उरले. ते बिचारे रहातात सगळे कायदे पाळून. मोठ्याने आरती करायची नाही. पूजा घरातल्या घरात, आवाज न करता. वगैरे.

मला दोन पाकीस्तानी हिंदू दहा वर्षांपूर्वी भेटले होते, जकार्ता मधे. त्यांनी सांगितले, एक भाऊ लंडनमधे, एक बहिण अमेरिकेत, एक भाऊ दक्षिण अमेरिकेत. आई वडिल त्यांच्यापैकी कुणाकडे. म्हणजे पाकीस्तानी आहेत याचा अर्थ त्यांचा पासपोर्ट पाकीस्तानी, वास्तव्य शक्यतो देशाबाहेर. कुणा तरी क्रिकेट खेळाडूला म्हणे धर्मांतर करून मुसलमान बनल्यावर मग संधि मिळाली.

त्यांच्या पेक्षा इथले मुसलमान किती सुखी.
ते भारत सोडून जाणार नाहीत, कारण त्यांचे इथेच सर्व काही सुरळित चालू आहे. आजूनहि भारतातून गेलेल्या मुसलमानांना एक वेगळे नाव आहे, नि त्यांना समाजात मान्यता नाही. मग कसे भारत सोडून जातील? नि का जावे त्यांनी? ते कायदेशीर नागरिक आहेत. फक्त त्यांना समान कायदा लागू करा.

माझ्या मते अतिरेकी पणा करणारे बहुतेक सर्व बेकायदेशीर रीत्या भारताबाहेरून आलेले, नि येणारे आहेत. त्यांना मात्र शोधून हाकलून दिले पाहिजे.


Bhramar_vihar
Wednesday, May 09, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, हिंदु म्हणजे काय ही व्याख्या सोपी आणि कठीणही आहे. म्हणजे मी हिंदु म्हणुन जन्मलो म्हणुन हिंदु की भारत माझा देश मानतो म्हणुन हिंदु??

हिंदु समाजात सुधारणा! अरे दलितांना जवळ न करणारा हिंदु समाज, धर्मातरीत मुस्लीमाना जवळ करेल??? हे सोपे नाहिये रे. त्यामुळे मुस्लीमांना हिंदु बनवा हा मुद्दा निकालात निघतो. जोवर धर्माचा प्रचंड पगडा, मुल्ला मौलविंचा अधिक्षेप जोवर आहे, त्यांचा वापर करणारे राजकारणी आहेत.. मग ते तुष्टिकरण असो वा द्वेष,जोवर त्यांच्यात सुधारणावादी सर्वमान्य नेतृत्व पुढे येत नाही तोवर हा समाज असाच वैफल्यग्रस्त राहणार. आणि त्याचा फायदा घेऊन अतिरेकी घडवले जाणार


Chyayla
Wednesday, May 09, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा, बस्स ह्याच उपायाबद्दल मी बोलत होतो शतकानुशतकान्च्या पगड्या मुळे हे कठीण जरुर आहे पण अशक्य नाही. तु निराशावादी दिसतोस पण मी मात्र आशावादी आहे, व प्रत्यक्ष कार्यावर विश्वास ठेवतो, आणी एवढ्यासाठीच काही वेडे हिन्दु सन्घटना अहोरात्र झटत आहेतच. आणी चान्गल्या कामाला विरोध हा होणारच, पण उलट दुसर्या बाजुने तीच त्याच्या यशाची पावती आहे.

सर्वान्नी आधीच म्हटले आहे की आधी हिन्दुन्नीच दुर्बलता त्यागुन व असलेले दोश काढुन टाकण्याचा प्रयत्न करणे हाच उपाय.. असो हाच निष्कर्श ईस्लामी दहशतवादावरील उपाय या BB वर काढण्यात आला होता. तु तिथली चर्चा नीट वाच म्हणजे लक्षात येइल.

पण ईकडे आपल्याला दोन्ही बाजुन्नी लढाई लढावी लागतेय. त्यामुळे दहशतवादाचा मुकाबला कठोरतेने केलाच पाहिजे. आपल्याजवळ पन्जाब मधील दहशतवाद सम्पवण्याचा चान्गला अनुभव आहेच. त्याबद्दल मी बातम्यान्चे / लेखान्चे सन्कलन यावर एक तरुण भारत मधला विचार करण्यासारखा लेख दीला आहे, तो जरुर वाच. त्यावरही तुझे विचार ऐकायला आवडतील.

तुझ्यासारखे लोक दहशतवादान्च्या त्यान्च्या समर्थकान्च्या प्रचाराचा बळी पडतात त्यात आश्चर्य काहीच नाही कारण आपलीच स्वघातकी अतिरेकी सहिष्णुता.

आणी हो माझ्या हिन्दुच्या व्याखेमधे देशभक्त मुस्लिम, ख्रिश्चनही येतात कारण हिन्दु हा सम्प्रदाय किन्वा Religion नाही तो एक जीवन प्रवाह आहे त्याबद्दल आपण पुष्कळ ठीकाणी उल्लेख केलेला आहे.

असो थोडे विशयान्तर झाले, त्याबद्दल क्षमस्व.


Bhramar_vihar
Wednesday, May 09, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु निराशावादी दिसतोस पण मी मात्र आशावादी आहे,

तुझ्यासारखे लोक दहशतवादान्च्या त्यान्च्या समर्थकान्च्या प्रचाराचा बळी पडतात त्यात आश्चर्य काहीच नाही कारण आपलीच स्वघातकी अतिरेकी सहिष्णुता.

नाही, मी निराशावादी बिलकुल नाही. फक्त मी वस्तुस्थिती मांडली. मुस्लिमाना हिंदु बनवण्यासाठी त्यांच्या मनातील हिंदु समाजाबद्दलची असुरक्षिततेचि भावना, जी काही धर्मांध अतिरेकी संघटना पोसतात, ती नष्ट करणं महत्वाचं. सरसकट मुस्लीम समाजाला अतिरेकी समजणं हे चूक नाही का? मित्रा, अरे जो गरीब मुसलमान आहे ना त्याला हे काहीच नकोय, त्याला आपली २ वेळेची भ्रांत आहे.

हिंदु समाजाची मानसिकता. मला वाटते की हा कदाचित आपल्या पुराणकाळापासुन चालत आलेल्या संस्कारांचा किंवा विचारांचा दोष आहे. कदाचित या माझ्या म्हणण्यावर लोक तुटुन पडतील. आपल्या पुराणात प्रत्येक संकटाच्यावेळी कुणितरी देव धावुन आला पाहिजे. पण धर्म भ्रष्ट होतोय म्हणुन धर्माच्या किंवा देवाच्या अनुयायांनी स्वत: शस्त्र उचलले असे कधी वाचल्याचे आठवत नाही. आपली श्रद्धा नेहमिच "संभवामि युगे युगे" यावर आहे. तो येईल आणि मग सुरळीत करेल. या उलट ईस्लाम ची जडण घडण बघितली तर आक्रमण हा त्याचा स्थायीभाव दिसतो. कदाचित ईस्लाम च्या स्थापनेपासून त्यांच्यावर झालेल्या आक्रमणामुळे असेलही. युगानु युगांची आपली मानसिकता बदलायला किती काळ जाईल रे??

अणि ज्या काही आक्रमक हिंदु संघटना आहेत त्या "मुस्लिमांची कत्तल हाच केवळ उपाय" अशा विचारसरणिच्या दिसतात.

पंजाबात दहशतवाद मोडुन काढला हे खरय. पण तिथेही कित्येक निरपराधांणा अतिरेकी म्हणुन ठार मारण्यात आलय. जर हिंसेने प्रश्न सुटणार असेल तर तिचा जरुर अवलंब केला पाहिजे,पण निरपराध मारला गेला तरी "साला मुसलमानच होता, बरं झालं एकने संख्या कमी झाली" ही विचार करण्याची पद्धत योग्य का?

मलाही वाटतय की विषयांतर होतेय! :-)


Gobu
Wednesday, May 09, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
मी अतिशय सोप्या भाषेत जे मुद्दे मान्डले त्याचा विचार करा
कारण या घडीला तोच अतिशय सोपा ऊपाय आहे
१. दहशतवादाला तोन्ड देण्यासाथी पुर्णपणे समर्थ व्हा
२. देशात धर्मनिरपेक्षता जागवा
बाकी इतर धर्माला हिन्दुत घेण्याचा विचार सोडा(हे असले धर्मान्तराचे लिखाण वाचुन मला जाम हसु येते हो असा विचार तरी कसा करु करतात लोक देव जाणे!!!)
अशक्य गोष्ट आहे ही (दिवसा स्वप्न पाहु नका, प्रेक्टिकल व्हा!!!)
"धर्मनिरपेक्षता" हीच आपल्या देशाची ओळख आहे
आपली सन्स्कृती आहे!!
आपली शान आहे!!!
आणि ती राखण्यासाथी दोन्ही धर्माच्या धर्मान्धाना आधी आवरा!!!
मोड्स,
कृपया या बिबिवर "धर्मान्तरा सारखे" विनोदी लिखाण करणार्‍याना जरा आवरा!!!
(विनोदाच्या बिबिवर हलवावे!!!)
माझी विनन्ती आहे हो


Santu
Wednesday, May 09, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा
धर्मांतरित प्रजतिला हिन्दु सामवुन घेतिल)))))नेताजी पालकराला शिवाजी महाराजानी सामावु घेतलेच ना?त्यावेळेच्या हिन्दु नी पण काय त्याला नाके मुरडलि
नाहित.उलट सामावुन घेण्याबाबत हिन्दु समाजासारखे सर्व समावेशक
धर्म नाहि.
शक हुण,झालेच तर ग्रीक याना याना हिन्दु नी सामावुन घेतलेच आहे नाअ.
आजचे जाट हिन्दु हे सुध्दा scithian जमातिचेच लोक आहेत
राहिले आहे का कोणाचे नामोनिषाण


Santu
Wednesday, May 09, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु
धर्मांतरा सारखे विनोदी)))))अरे यात विनोदि काहिच नाहि. उलट हिन्दु मुस्लिम एक्य हिच विनोदि व अश्यक्य प्राय कल्पना आहे.
आता हे पहा जी गोष्ट महत्मा गान्धी च्या बापाला
जमलि नाहि (शेवटि फ़ाळणि झालिच ना?)ती आपण सामान्य जन कशी करनार.
आता दोन धर्मात विरोधाभास म्हणजे
आपला हिरो शिवाजि तर त्यांच्या द्रुष्टिने तो पहाड का चुहा.
आपण रोज अंघोळ करणार तर ते जुम्मे के जुम्मा.
आपण एक पत्नि व्रति तर ते चार चार निका लावणार.
आपण बुत(मुर्ति) ची पुजा करणार तर ते बुत्शिकन(मुर्तिभन्जक)
आपण म्हण्जे हम दो हमारा एक तर ते
म्हनजे हम दो हमारे पचिस

त्यांचा हिरो औरंगजेब,अकबर,बाबर तर आपले हे शत्रु.
म्हणजे बघ कसे एक्य होणार


Chyayla
Wednesday, May 09, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमरा, अगदी योग्य बोललास तुझ म्हणण पटतय, की हिन्दु समाज अवताराची वाट पहात बसतोय पण काय रे मागचा अवतार होउन युग झाले त्यानन्तर इतक्या सहस्त्रकानपासुन भारतावर मुस्लिमान्चे आक्रमण झाले तेन्व्हा कोणता अवतार झाला होता असा मला प्रश्न पडला. एकीकडे सारे जग धर्मान्ध मुस्लिम वा ख्रिश्चन यान्च्यातच त्यान्च्या जिहाद, व क्रुसेडमुळे विभागले आहे. आपण वाचलो हे कसे शक्य झाले.

आणी धर्मान्तर म्हणजे काय अरे या सन्स्कृतीत मिसळुन जाणे, सन्तुनी छान उदाहरण मान्डले आपण शक, हुण, पारशी, ज्यु ईतकेच काय आपल्याच देशात आपण जैन, बौद्ध असे विविध मतावलम्बी एकत्र कोणताही सन्घर्श न होता रहात आहे ना? मग तु हे कसे समजतो की हिन्दु सन्स्कृतीत मिसळुन जाण्यास असुरक्शितता आहे? ईथे धर्मान्तर म्हनजे गोबुनी स्वता:च्या मनाप्रमाणे समजुत करुन घेतलेली दीसतेय. मी पण वस्तुस्थितिच मान्डतोय. ही काही कल्पना नाही. आणी हे केवळ हिन्दु सन्स्कृतीतच शक्य आहे मला एखाद्या जिहादी सन्स्कृतीतले असे उदाहरण दे म्हणजे मग तुझ्या एकतर्फ़ी मुद्याला अर्थ राहील.

धर्मनिरपेक्षता हिन्दुन्ना शिकवण्याची गरजच नाही ती तर त्यान्च्या रक्तातच आहे, पण ही अशीच धर्मनिरपेक्षता एका तरी मुस्लिम देशात आहे का? त्यान्ची कमालीची असहिष्णुता हीच सगळ्यात मोठी अडचण आहे, मुख्य अडथळा हिन्दु कधीच नव्हता आणी सध्याही नाही. आता राहीला प्रश्न हिन्दुत्ववादी सन्घटनान्चा, तशी कोणतीच सन्घटना, व्यवस्था ही परिपुर्ण नसते पण माझा निकश त्याचे उद्दात्त हेतु व त्यामागची प्रामाणिक तळमळ व प्रयत्न हा आहे. धर्मान्ध व कट्टर जिहादीना विरोध करताना तेवढा कणखरपणा येणारच, त्यात मिळमिळीत लेचीपेची भुमिका घेउन चालत नाही, महात्मा गान्धीही जीथे अपयशी ठरले तिथे ईतर उपायान्चा काय उपयोग आहे? ईतिहासापासुन एवढही शहाणपण आपण शिकु नये?
(तरी निरुपयोगी सन्घटना या BB वर पुर्वग्रह द्रुष्टीने गैरसमज पसरवण्याचा डाव सगळ्या आरोपाना योग्य व सडेतोड उत्तरे दील्या मुळे हाणुन पडला आहे, तुला पाहिजे तर तिथेही या सन्दर्भात मुद्दे मान्डु शकतोस.)

शिवाजी महाराजान्नी गनिमास कापुनच स्वराज्य निर्मिती केली ना एक मुसल्मान मेला ही समजुत तुमची आहे, कारण तुम्ही त्याला मनुष्य न समजता मुसल्मान समजता, गुन्हेगार हा गुन्हेगार पण ह्या सेक्युलर पिल्लावळीनी त्याला मुसल्मान, व हिन्दु बनवले ते आपण सोहराबुद्दीनच्या बाबतीत बघतही आहोत.

प्रतापराव गुजरान्नी एका मुस्लिम आक्रमकावर (नाव नाही आठवत) यान्च्यावर दया करुन सोडुन दीले तेन्व्हा शिवाजी महाराजान्नी त्याला चान्गलेच सुनावले व त्यापुढे ते सात मराठे वेडातच शत्रुच्या फ़ौजेवर धाउन गेलेत. हा ईतिहास आहे, अफ़जल खानाचा वध करुनच त्याचा दहशतवाद सम्पवता आला ना? आवश्यक तिथे हिन्सेने एका मर्यादे पर्यन्त निश्चित प्रश्न सुटतात हे वास्तव आहे आधी आणी हेच पन्जाबातील दहशतवादाच्या निखन्दनातुन स्पष्ट होते. आता का कोणी त्यावेळच्या कॉन्ग्रेस सरकारला दोष देत नाही तु म्हनतोस की त्यातही काही निरपराध मारल्या गेलेत. हे शक्य आहे सुक्यासोबत ओलेही जळतेच पण आज तोच पन्जाब शान्त, समृद्ध आहे ना? शरिरातील रोग दुर करायलाही शस्त्र्क्रिया करावीच लागते त्यामधे शरिराचेच भले असते.

तुला सेक्युलर पिल्लावळीचे हे उद्योग जसे धर्माच्या नावावर असमान न्याय, वागणुक, कायदे, आरक्षण ह्या गोष्टी पटतात का? खरा विरोध मुस्लिमाना असण्यापेक्षा अशा प्रकारे समाजात वीष कालवणार्याना आपल्याच लोकाना केवळ काही राजकिय लाभासाठी देशहीत तुडवणार्यान्वर आहे. आणी त्यान्च्या अपप्रचाराला ही सगळी वर मान्डलेली वस्तुस्थिती नाकारुन तु बळी पडतोस असे मी म्हटले होते.

मला तर महाभारतातील धनुश्य गळुन पडलेल्या अर्जुनाची स्थिती आठवते तो मोहित झालेला असतो कि कसे आपण आपल्याच गुरु बन्धुजन्नाना हिन्सेने मारणार. त्यावर भगवान कृष्णाने गितामृत पाजुन त्याचा भ्रम दुर केला या ठिकाणी धर्मासाठी ( Religion नाही) शस्त्र उचलण्याचे म्हटले. आजही तीच गिता करोडो केवळ हिन्दुचीच नव्हे तर समस्त मानव जातीसाठी प्रेरणास्थान आहे हीच गिता अध्यात्माचे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मान्डते. आजही हिन्दु समाजाची अवस्था त्या भ्रमीत झालेल्या अर्जुनासारखीच आहे. (आवश्यक तिथे मर्यादेपर्यन्त हिन्सेचे समर्थन गितेनेही केले आहे पण कुराणासारखा त्याचा उपयोग हिन्सा करण्यासाठी कुणी करत नाही तर अध्यात्मासाठी करतो हे ही लक्षात घ्या. जर कधी कुणी हातात गिता घेउन हिन्सा करतो म्हटले तर तो मुर्खातच निघेल.)

एक लक्षात घे ह्याच कृष्णाने आधी शान्तीसाठी हर तर्हेनी प्रयत्न केले होते, कृष्णशिष्टाई केली होती ते प्रयत्न फ़ोल ठरले म्हणुन शेवटी शस्त्र घ्यावे लागले. मला वाटत गान्धीजीन्च्या रुपाने आपण तोही प्रयोग करुन साफ़ फ़सलो आहोत. आता वेळ आहे बुद्धी, शक्तिनी हा जिहादी दहशतवाद निखन्दुन काढायची. अर्थातच यात मुस्लिमान्चा नायनाट अपेक्षीत नाही जे आपल्या सन्स्कृतीत मिसळुन गेला तो आपलाच भले मुस्लिम असो वा ख्रिश्चन. (त्यामुळे त्यानाही केवळ मुस्लिम आहे म्हणुन मारुन टाकायचे, हाकलुन लावायचे असे अतिरेकी शब्द वापरुन गैरसमज पसवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे)


Uday123
Wednesday, May 09, 2007 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतापराव गुजरान्नी एका मुस्लिम आक्रमकावर (नाव नाही आठवत)

च्यायला:
आदिलशाही सरदार बहलोल खान


Sanghamitra
Thursday, May 10, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू :-)
बरोबर आहे. धर्मांतर करू असं तुम्ही लाख म्हणाल ते कसे करू देतील? ते म्हणतील धर्मांतराने प्रश्न सुटत असेल तर तुम्हीच करा की धर्मांतर. खरं तर त्यासाठीच हे सगळे चालूय.
सामान्य जनतेला पटवणे सोपे असते. बहुसंख्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींनी अल्पसंख्य प्रभावित होतात. त्यांना सतत आपले वेगळेपण टिकवून ठेवायला लावले नाही तर आपण नामषेश होऊ ही भीती त्यांच्यातल्या बुद्धीवाद्यांना वाटत असते. त्यामुळे हे सगळे त्यांच्या द्रुष्टीने योग्यच असणार. आपण धडा घालून देऊ शकतोच की चांगल्या वागणूकीने. शेवटी आपण कुरापती करायच्या नाहीत आणि त्यांनी केल्याच तर सडेतोड प्रत्युत्तर द्यायचे हे शकतो की आपण.
खरं तर मायबोलीवरचा प्रसिद्ध " अनुल्लेख " वापरायला पाहिजे.
शत्रूने दुःस्वास करण्याऐवजी दुर्लक्ष केले तर त्यासारखा अपमान नाही. :-)
च्यायला शिवाजी महाराजांनी(ज.मा. तुमच्या सूचनेनुसार बदल केलाय.) तो मुस्लिम होता म्हणून नसेल हो केले तसे. अशा प्रकारची खबरदारी तो चाणाक्ष राजा प्रत्येकच शत्रूबाबत घेत असणार.


Bhramar_vihar
Thursday, May 10, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, मी एक स्पष्ट करु इच्छितो की मी तथाकथित सेक्युलर वाद, मुस्लीम लांगुलचालन, अतिरेक्यंयांसाठी अश्रुपात याचे समर्थन बिलकुल करत नाहिये. fake encounter चा निषेध मी केल्यामुळे कदाचित तसे ध्वनित होत असेल.

मुस्लिमाना हिंदु बनवण्यासाठी त्यांच्या मनातील हिंदु समाजाबद्दलची असुरक्षिततेचि भावना, जी काही धर्मांध अतिरेकी संघटना पोसतात, ती नष्ट करणं महत्वाचं. सरसकट मुस्लीम समाजाला अतिरेकी समजणं हे चूक नाही का?

यात एकतर्फी मुद्दा कुठे आला मित्रा?? मी म्हटले की अतिरेकी संघटना ही भावना पोसत आहेत.

कुठल्याही संघटनेबद्दल मला काही बोलायचे नाही. कारण ज्या हिंदु समाजाचे कल्याण करणार्‍या संघटना म्हणावतात त्यांचे, मुसलमान समाज हिंदु संस्कृतीत सामावुन घेण्याचे जे प्रयत्न चालतात त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. असे प्रयत्न होत असतिल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. संस्कृतीमधे मिसळुन जायचे म्हणत असशील तर कोकणात असे कित्येक मुसलमान आढळतील जे पिढ्यानपिढ्या तिथे राहतात, तिथलेच रीतिरीवाज पाळतात. पण जेव्हा राष्ट्रभक्त मुसलमान अशी नवी संज्ञा रुढ करु पाहण्यात आली तेव्हा त्यांनाही प्रश्न पडला की नक्की कस prove करायची ही गोष्ट? या मातीशी ईमान राखतोय पण ते दाखवायचं कसं?? कारण दाउद ने कारवाया केल्या तर लोक म्हणणर "तुम्हारे" दाउदने किया! सगळ्या मुसलमानांना पाकम्धे पाठवा ही मागणी तर नेहेमिच केली जाते. या बिबिवर ही ती करण्यात आलीये. त्यामुळे सरसकट सगळ्या मुसलमानांना देशद्रोह्याच्या नजरेने बघणे मला वाटते की चुकीची गोष्ट आहे.

सुक्याबरोबर ओलं जळतच पण त्या जळणार्‍या ओल्यामधे आपण असतो तर? हा विचार केलास का मित्रा?? न्याय्य हिंसा मी अमान्य करत नाही.

माझे मुद्दे भरकटल्यासारखे वाटले तर क्षमा असावि. मि प्रथमच v &C मधे भाग घेतोय, मुद्देसुद मांडण्याचि सवय नाहीये!




Jaymaharashtra
Thursday, May 10, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त मायबोलीकरांना!
एक नम्र विनंती.
कृपया शिवाजि महाराजांचे नाव घेताना जरा भान बाळगावे.ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानतो त्यांचा या बिबि वर एकेरी उल्लेख होतोय हे लक्षात घ्या.देवनागरी मधे लिहिण्यास वेळ जरुर लागतो हे मान्य पण म्हणुन महाराज हा शब्द लिहिण्यात कसुर करु नये.
इथे कुणीही त्यांचा एकेरी उल्लेख जाणुनबुजुन करत नाहि हे मान्य केले तरी त्यांच्याबद्दलचा आदर मनात बाळगुन या पुढे "महाराज" असे संबोधावे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Gobu
Thursday, May 10, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा,
अरे वेडा आहेस की खुळा?
मनाला लावुन घेवुन नको ते जे बोलतात ते
त्यान्च्या मताला विरोध केल्यानन्तर ते काहीही नावे ठेवतात, काहीही टिका करतात
इतर बर्‍याच जणाना हाच अनुभव आहे
त्याना जे म्हणायचेय ते म्हणु दे, तु तुला जे योग्य वाटतय ते लिही
जयमहाराष्ट्र,
अनुमोदन!
अतिशय योग्य मत दिले आहेस तु
पटले बुवा आपल्याला


Rajankul
Thursday, May 10, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु आणि भ्रमरा पुरोगामी महाराष्ट्राचा मान राखलात.
तुमचे विचार वाचुन थोडा तरी आशावाद जाग्रुत झाला.
भ्रमर गोबु बरोबर म्हणतोय इथे विरोधात एक वाक्य लिहिले तरी लाज काढली जाते या लोकांसारखे घाणेरडे बोला नाहितर इथे लिहु नका. असा सरळ सरळ लिहिणारे आहेत इथे.
gobu I am proud of you
भैताड झक्कि, संतु आणि च्यायला


Santu
Thursday, May 10, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
वा फ़ारच छान विवेचन केले आहेस.
व अभ्यासपुर्ण सुध्दा आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators