|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 6:01 pm: |
| 
|
लालभाई कृपया माझी ही पोस्ट नीट वाचा. मी जेव्हा सावनी हिचा उल्लेख केला, तेव्हा त्याचे कारण पूर्ण वेगळे होते. मागे आमच्यात काही गैरसमज झाले तेव्हा काही मायबोलीकरांनी त्या गैरसमजाची चेष्टा केली( माझे नाव अर्धवट घेऊनच), त्यामुळे मी मॉडरेटरना त्याची तक्रार केली होती. एका मुलीचे नाव तुमच्या आय डी जोडायचे काहीच कारण नव्हते अन नाही. तिला ही ते माहीत आहे, तेव्हा वारंवार त्याचा उल्लेख करु नका. मी तुम्हाला सावनी समजत नाही अन समजणारही नाही हे कृपया कायम लक्षात ठेवा. मी तुम्हाला कांबळी, कणेकर, सावनी किंवा बाकी कुणीही समजत नाही. ह्या व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या आहेत याची मला खात्री आहे. बाकी तुमचे लिखाण चालू द्या. I hope आता तरी तुम्हाला ते वाचल्यावर समजेलच. ही बघा ती पोस्ट. /hitguj/messages/46/111518.html?1150972536
|
Savani
| |
| Thursday, July 13, 2006 - 6:52 pm: |
| 
|
लालभाई, मी आहे सावनी. मूडीने जे उदाहरण दिले आहे त्यातली "सावनी" ती मीच बाकी मला इथल्या कुठल्याच वादात पडायचे नाही. फ़क्त कोणाचा काही गैरसमज असेल तर दूर व्हावा आणि पुन्हा याचा उल्लेख होऊ नये एव्हढचं.
|
Storvi
| |
| Thursday, July 13, 2006 - 6:54 pm: |
| 
|
>>आज जे लोक आरक्षणाला support करताहेत ते जर का ओपन वर्गातले असते तर आत्ता आपल्यासोबत भांडले असते आरक्षणाच्या विरोधात!! >>या भांडणात मला पडायचे नाही पण हे बाकी चुक हो. मी आरक्षण support करते, आणि मी "open category" मधली आहे.... अर्थात का वगैरे डीटेल्स देण्यात मला अजिबात स्वारस्य नाही, सो तुमचे चालुद्या पुनःश्च हरीओम! श्या हा ओम कसा लिहायचा राव?
|
Laalbhai
| |
| Thursday, July 13, 2006 - 7:01 pm: |
| 
|
मूडी, सावनी धन्यवाद. माझा एक गैरसमज दूर झाला आणि माझा, मी कोण आहे, याविषयी काहीच गैरसमज नाही. तेंव्हा... चालू द्या..
|
Zakki
| |
| Friday, July 14, 2006 - 2:40 am: |
| 
|
तुमचा एक महिना पूर्ण वेळ मला द्या आणि मी नेतो तिथे या. प्रत्यक्ष बघा काय परिस्थिती आहे ते आणि मग मते बनवा. (फक्त या एक महिन्यात प्रचंड शारिरिक आबाळ आणि मानसिक तणाव यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा!) इच्छा आहे का, माझ्याबरोबर महिनाभर मी नेतो तिथे यायची? घाबरलात का? त्यात घाबरायचे काय? नि तिथे नेऊन तुम्ही मला काय दाखवणार आहात? हुषार, कष्टाळू असून संधि न मिळालेले लोक, की अगदी गरीब नि दलित असे लोक? त्यात बघायचे काय नि घाबरायचे काय? तशी त्यांची दया येते कधी कधी, पण तरीहि, शेवटी या जगात रहायचे म्हणजे असे कुठल्याच बाबतीत कमी असणार्याचे काही चालत नाही. आता मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांना संधि, शिक्षण मिळाले पण म्हणून ते काही फार चमकले नाहीत. कारण मुळात हवे तेव्हढे कष्ट केले नाहीत, मनावर ताबा नाही, विचार नीट केले नाहीत इ. तेंव्हा उगीच फुकटच्या फाकट आरक्षण द्या म्हणून काही होत नाही, लायकी असलेलेच पुढे येतील, नि असे अनेऽक अनेऽक लोक जगात आहेत. आता तुम्ही पण एकदा इकडे येऊन बघा, लोक किती कष्ट करतात. बघूनच घाम येईल तुम्हाला. त्यांचे परिश्रम नुसते बघूनच फेफरे येईल तुम्हाला. रशिया, मेक्सिको येथून भणंग भिकारी असलेले लोक, ज्यांना धड इंग्लिश पण बोलता येत नाही, शिक्षण तर जवळ जवळ नाहीच, असे लोक केवळ दिवसभर कष्ट नि रात्री अभ्यास करून श्रीमंत बनतात, स्वतंत्र धंदा काढतात, चालवतात, यशस्वी होतात हे मी गेली कित्येक वर्षे बघतो आहे. त्यांना आरक्षण तर नाहीच, पण उलट वर्णद्वेषाला सुद्धा तोंड द्यावे लागते. तरी ते वर येताना मी बघतो. कसे पटावे मला आरक्षण? कित्येक भारतीयांनी सुद्धा दिवसा नोकरी नि संध्याकाळी कॉलेज करून चांगल्या नोकर्या नि धंदे केलेत. कित्येक गुजरात्यांनी मोडके तोडके इंग्रजी बोलून कित्येक धंदे नि मोटेल्स विकत घेतली, कारण त्यांनी अक्षरश: दररोज अठरा तास काम केले! तितके काम करायचे या कल्पनेनेच तुम्ही लोक रडाल! त्यांना कुणि आरक्षण दिले नाही. तेंव्हा आता उठा नि कामाला लागा, काल शिक्षणात आरक्षण मागीतलेत, आज नोकरीत मागताहात, उद्या इतरांनी मिळवलेल्या पैशातला हिस्सा मागाल, परवा जमिनी, घरे मागाल! असे करून एक दिवस सगळ्या भारताचे वाट्टोळे झाले की तुम्ही म्हणाल, आता सगळे समान! मग पुन: लायक लोक त्यातून वर येतील नि पुन: तुम्ही रडगाणे गात बसाल!
|
Yog
| |
| Friday, July 14, 2006 - 5:22 am: |
| 
|
वाह! याला म्हणता सौ(शम्भर) सुनार की एक झक्की की... आवडली पोस्ट. 
|
Iasanil
| |
| Friday, July 14, 2006 - 7:29 am: |
| 
|
अरे झक्की आरक्षन का आहे याचा कधि विचार केल आहेस का? आरक्षन आहे शैक्षनिक आनि सामाजिक मागास वर्गासाथि त्याना इतर समाजा सोबत आनवे हा मुल मुद्दा आहे. पन आता गरज आहे ति आरक्षन कोनाला द्यावे आनि कोनाला न द्यावे हे थरवायची गरज आहे ति जात या बाबिची नित व्याख्या करायची
|
Avinashi
| |
| Friday, July 14, 2006 - 7:31 am: |
| 
|
jhakki post aavadalii... ! swataache udaaharan chapakhal basaley.pan ekandarit malaa patale.
|
Iasanil
| |
| Friday, July 14, 2006 - 7:35 am: |
| 
|
maajhe akshar neet samjun ghyal ashi apeksha aahe. mi open aahe pan aarakshan he garaju aani garajunach dile pahije. aata garaju kon he sarkarch aani aaple kam aahe. karan govt jeva asa konta prastav aanel tyala lokanni khari maahiti dene aavaashak aahe. 2000 varshe aaplyatil kahi lokanna aapan pranyasarkhe vagavale aani aatta 50 varshat tyachi bharpai hoel ase tula vaatate kaay?
|
Iasanil
| |
| Friday, July 14, 2006 - 7:40 am: |
| 
|
avinaash aaraksha ka dile yacha neet vichar kar. aaj lok kkay magani kartat he nako paahus. aarakshan saglya lokat nikop spardha vhavi mhanun aahe. jyanchi mane aaj hi gulamgirit aahet tyana garaj aahech. aajhi dalit lok samajtat ka BRAHMAN lok he janmatach hushar astat. tyanchya manat hi kamipanachi bhavana aahe na ti kadhun takanyasathi aarakshan aahe.
|
Avinashi
| |
| Friday, July 14, 2006 - 8:03 am: |
| 
|
अनिल मान्य.. गुलामगिरी.. मनात आहे.. त्यात मराठे येत नाहित का!जे हजारो शेतकरि आत्महत्या करतात ते येत नाहित का?मी दोघि बाजुचे मुद्दे काहि प्रमानात मन्य करतो. पण मग bc. लोक जे पुढे गेलेत ते आपल्या बाध्वाना विसरतात आणि आर्क्षणाचा फ़ायदा फ़क्त त्या लोकांनाच मिळतो, खरे गरिब लांब राहतात. आर्क्षनाने फ़ायदा कसा होउ शकतो हे तुम्हि मला सांगा. मी आर्क्षनाच्या पुर्न विरोधात होतो पन लाल्भाइ चे विचार ऐकुन मला काहि गोष्टी पटतायला लागल्यात. private. sector मध्ये ब्रम्हन मंडळिंचा भ्रष्टाचार प्रचंड आहे.. कोट्यावधीने होतो..(आनि आप्ल्याल दिसतो चिरिमिरि मागणारा सरकारी करकुन) मी तीथे काम कर्तो मला माहित आहे मी मराठा म्हणुन मला या ब्र्म्हन मंडलींचा(त्यान्ची लोबि आहे प्र्य्वेट मढ्ये) भयानक त्रास होतो off मध्ये.. पण दुसरीकडे माझ्या बहिन जी विधवा झाली..(जिला ५ वर्शाचा मुलगा होता)तीच्याशी एका ब्र्म्हणाने जो unmarried होता लग्न केले. असे सुशिक्षित ब्राम्हन पन आहेत.जे इतर कुठल्याच जातित अशे लोक आज तरी आढळनार नाहित आनी झक्किन्चे म्हणने मला एव्हढ्यासाठी पटले की जात कोणतीही असो.. माणसा माणसात फ़रक असतो. तो मन्य केला पाहिजे आसपासचे जग बघुन आपण आपल्यात काय परिवर्तन आणले पाहिजे हे आपण ठरवायला हवे.. हे स कळण्यासाठिपन कहितरी केले पाहिअजे असे माझे म्हणने आहे.
|
योग, अनुमोदन! अविनाशी, तुमची पोस्ट बर्यापैकी पटली (एक्सेप्ट लालभाइ चे विचार....) तुम्ही ब्राह्मण लॉबीबद्दर जे बोलता ते व्हाइस वर्सा ब्राह्मणही निरनिराळ्या क्षेत्रान्बद्दल बोलु शकतील, अर्थात ते बोलणार नाहीत, त्यान्नी बोलुही नये! अनिल म्हणतो की कमीपणाची भावना घालवायला आरक्षण हवे! आरक्षणामुळे "कमीपणाची" भवना कशी काय जाईल ते मला कळले नाही! आणि अनिल, २००० वर्षे आणि प्राण्यासारखे वागवणे वगैरे अतिशयोक्तीपूर्ण टाळ्यान्ची वाक्ये किमान इथे तरी फारशी कुणावर प्रभाव पाडणार नाहीत अविनाशी, मी मागे पण कुठ तरी म्हणल होत, मराठा समाज वैचारीक गोन्धळातुन जातो हे आणि त्यान्चे पुढारी त्यान्ना अजुनच गोन्धळात पाडताहेत..... "मराठा - कुणबी" किन्वा तत्सम प्रकारे जात लावुन रिझर्वेशनचे फायदे घेण्याचे मनसुबे आणि प्रलोभने पुढे दाखवित आहेत... आणि हे असे होणारच होते यात आम्हाला तरी नवल वाटत नाही रहाता राहिला प्रश्ण अशाही परिस्थितीत ब्राह्मण समाज कशाप्रकारे वाटचाल करतो ते अभ्यासायचे सोडुन तरुणान्ची माथी भडकवुन उलट "हल्ला बोल" वगैरे अवसानघातकी कृत्ये करण्यात बरेचसे दलित आणि मराठा पुढारी धन्यता मानताहेत! समाजातल्या, तळागाळातल्यान्ना जरुर मदत व्हायला हवी पण ती "आर्थिक" निकषान्वरच! जात वापरुन रिझर्वेशन करणे हे जाती व्यवस्थेला अधिक बळकटी आणणारे आहे असे वाटत नाही का? आणि अशा प्रकारे वर वरच्या भुलभुलय्याला किन्वा सवर्णान्चा सूड घेतल्याच्या भ्रामक समजुतीत राहुन आरक्षणाचे फायदे जातीनिशी घेवुन नन्तरही "कमीपणाचीच" भावना जोपासणार ना? की कमीपणाची भावना, म्हणुन हक्क म्हनुन कमीपणा हे आभुषण असे तर होणार नाही ना? विचार करा! शेवटी प्रश्ण अस्मितेचा हे, अन दुसर्या कुणी जोजवुन अस्मिता फळत फुलत नसते, त्यासाठे आपण जे आहोत त्याचा अभिमानच असायला लागतो! आपण जे आहोत त्यात सातत्याने कष्टाने सुधारणा करीत रहावी लागते, आखाड्यात उतरुन कुस्ती खेळायची तर पैलवानाला आधी आखाड्यात घाम गाळावा लागतो, तिथे जसे रिझर्वेशनवर यश मिळत नाही तसेच अस्मिता बळकट करण्यासाठी देखिल रिझर्वेशनने काहीही होत नाही. मी अजुनही पुर्ण ताकदीने या विषयावर लिहित नाही हे! माझे चिन्तन मनन चालले आहे, तेव्हा मोड्स कृपया हा बीबी बन्द पडु देवु नका!
|
Laalbhai
| |
| Friday, July 14, 2006 - 2:50 pm: |
| 
|
कसे पटावे मला आरक्षण? तुमचे असे विचार असतील तर खरच कठिण आहे तुम्हाला पटणे. सर्व भूतलावरची परिस्थिती, कातडीचा रंग सोडला तर, सारखीच असते, असाच तुमचा ग्रह आणि समज असेल तर काय बोलणार? त्यातून सवर्णेतर समाजावर अन्याय झाला अशी अफवा ईंग्रजांनी उठवली आहे, असा सोयीस्कर गैरसमज तुम्ही करून घेतला आहेत. त्यावर काय बोलणार? म्हणजे उदाहरणच द्यायचे तर ज्ञानेश्वरांच्या काळात ईंग्रज होते का? त्यावेळेसही चातुर्वणावर घट्ट आधारलेली समाजव्यवस्था होती. त्याला विरोध म्हणूनच, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेणे, ही काल्पनिक घटना आली. रेडा जर म्हणू शकतो तर मनुष्य का नाही? ज्ञानेश्वरांनी त्याविरुद्धच लढा दिला. त्यासाठी अतोनात हाल सोसले. पण मी मागेच म्हटले तसे, समाज सुधारण्याची थोडी जरी लक्षणे असती तर आपल्या इतिहासातली समाजसुधारकांची चळत ही शोभेची वस्तू झाली नसती. असो! तात्पर्य असे की, सोयीस्कर समज करून घेऊन आपल्यापुरते प्रश्न सुटतात. समाजाचे नाहीत. कष्ट केले की सगळे मिळते, हा तुमचा समज, उत्तम आहे. पण तो परिपूर्ण नाही. भारतातल्या बहुतांश वर्गाला योग्य कष्ट कसे करायचे याचेही मार्गदर्शन (आणि संधी) आवश्यक आहेच. कष्ट तर आयुष्यभर खडी फोडणारेही करतात. असो. इथे मी तुमच्याशी(ही) वादविवाद संपवत आहे. चिडून, संतापून, त्रागा करून, तुच्छ लेखून का होईना, माझ्याशी काही काळ वाद घातलात याबद्दल धन्यवाद!
|
लाल भाई चालायचेच ...... मला 'याच' दर्जाच्या उत्तराची अपेक्षा होती ...... आणि हो >>>>>>>>>>>संबंध कोणाशी आहे हे कळले तर फेफरे येतील >>>>> घाबरलो हो तुम्हाला
|
Laalbhai
| |
| Friday, July 14, 2006 - 3:16 pm: |
| 
|
म्हणजे आपण खातोय ते शेण आहे हे माहिती असूनही तुम्ही शेण खाता का वठारकर? काय हे, तुमच्याकडून इतरांनी शिकायचे (असे लिंबूटिंबू म्हणतात हां!) तर तुम्हीच जाणून बुजून शेण खाता?
|
अरे परत तेच. तुम्ही असे डिवचले का जाताय ....... सांगितल ना एक्दा अपशब्दांचे प्रयोजन हे वैचारीक मुद्दे संपल्याचे लक्षण अस्ते
|
Yog
| |
| Friday, July 14, 2006 - 4:29 pm: |
| 
|
>>ज्ञानेश्वरानी रेड्याच्या...... काल्पनिक घटना.... ???? लालभाई तुमची "कल्पकता" फ़ारच महान आहे, no wonder you seem to conviniently neglect the reality around you. (उद्या म्हणाल ज्ञानेश्वरीच काल्पनिक आहे..)
|
Laalbhai
| |
| Friday, July 14, 2006 - 5:07 pm: |
| 
|
योग, Pray explain the reality around me. I am specifically saying about the reality which is "around me" and not the reality which is "around you". You know what I mean? अर्धवट वाक्ये घेऊन conclusion काढायची सवय तुम्ही कुठुन घेतलीत हो? काल परवाही, "हा विषय फूटबॉलचा नाही" अशी समज मला देण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून विचारले. आणि बॉंबस्फोट झाल्यावर मी त्या विषयावर लिहिले तर माझ्या timing (?!)विषयीच शंका घेतलीत. तुमचा problem काय आहे? I guess "laalbhai" is your porblem and nothingelse.
|
Laalbhai
| |
| Friday, July 14, 2006 - 5:22 pm: |
| 
|
I am quite sure उद्या काही मंडळी येऊन मी आरक्षणांना support करतो आणि ज्ञानेश्वरांची ही घटना काल्पनिक म्हणतो, यांचा संबंध जोडतील. तसाही मी आरक्षणांना support करतो म्हणून मी "कांबळे" आहे, अशी शंका घेतलीच आहे आधी. आता ज्ञानेश्वरांच्या रेड्याची घटना होईल. (आरक्षणांना support करणारे सगळे ब्राम्हणद्वेष्टे आहेत, म्हणून मी ज्ञानेश्वरांच्या "महान" कार्यावर शंका घेतो, असा आरोप होईल!) Any "learned" person around?
|
Ninavi
| |
| Friday, July 14, 2006 - 5:40 pm: |
| 
|
>>> त्यातून सवर्णेतर समाजावर अन्याय झाला अशी अफवा ईंग्रजांनी उठवली आहे, असा सोयीस्कर गैरसमज तुम्ही करून घेतला आहेत. लालभाई, हे तुम्ही कश्यावरून म्हणताय हो?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|