Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 29, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through June 29, 2006 « Previous Next »

Zakki
Wednesday, June 28, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादे वादे जायते .......

तर वरील बर्‍याच मोठ्या वादावरून अजून काहीच 'जायते' झालेले नाही म्हणून वाक्य तसेच सोडले. तर आता कुणी या वादाचे मॉडरेटर बनून समारोप करा! नि आम्हाला वाचवा!

Soultrip
Wednesday, June 28, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जायते म्हणजे काय हो? .. शहाणे की solution ? :-)

Lokhitwadi
Wednesday, June 28, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जन जाय (२ रा गण परस्मैपद) -- निर्माण करणे.

लालभाईला debate करत येत नसल्याने मी एक्तर्फ़ी तो थाम्बवत आहे. sorry , लालभाई आपल्याला व्यवस्थित वाद घालत येत नाही. उत्तरान्बद्दल धन्य्वाद.


Laalbhai
Wednesday, June 28, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहितवादी,

दोन्ही वाक्येबरोबर आहेत. पूर्वग्रह घेऊन वाद घालणार्‍यांशी वाद व्यवस्थित वाद घालणे, खरोखरच कठिण असते!


Zakki
Wednesday, June 28, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soultrip , वादे वादे जायते तत्वबोध: असे ते सुभाषित आहे. पण अजून काहीच तत्वबोध न झाल्याने मी तसे म्हंटले.

Peshawa
Wednesday, June 28, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाइ तो paper वनगिदाखल होता तुम्हाला तो कळला नसल्यास काही हरकत नाही. माझे भाश्य ऐकायचे असेल तर मात्र tution अनि fees दोन्हि द्यावे लागेल. अर्थात जे communist आहेत त्यान्चा बुध्यंक अल्प असतो असा माझा खुप घट्ट अपसमज आहे त्यामुळे tution आणी fees नेहमिपेक्शा पाच्पट आकाराव्या लगतील इतकेच. माझा स्वताचाहि बुध्यांक सुक्Sम असल्याने काहि काहि वेळ मी communist झाल्याचि भयानक स्वप्नेही पडतात... :-) असो विशय भरकटतोय

प्रश्ण, प्रश्ण आणी प्रश्ण: reservation मधुन शिकलेल्यानोकरी मिळालेल्या घरातून शिक्शणाविशयि किति अस्था रुजवण्यात आलि? त्या पहिल्या पिढिचि मुलेही reservation मधुनच शिकलि का? आणि तसे असेल तर तसे का? तसे जाणुन घ्यायच सरकारने प्रय्त्न केला का? केला असल्यास काय निश्पत्ति? नसल्यास का नाही केला?




Laalbhai
Wednesday, June 28, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा, म्हणजे तुम्हालाही तो पेपर कळला नाहीये तर. मग उगाच तोंडावर फेकायला लिंक दिली होती का?.. असो, विषय खरेच भरकटतोय. :-)

communist झाल्याचि भयानक स्वप्नेही पडतात

खरंय खरंय.. कॉम्रेड होणे सोपे नाही. वैयक्तीक स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो! मोठे व्रतच आहे communist होणे म्हणजे. बाकी मार्क्स काय आणि आणखी कुणी काय, नुसत्या शिव्या द्यायला कुठे बुद्दी लागते? (त्यामुळे तुम्ही तेही काम पुरेसे केलेत) चारपाच communism वर टिका करणार्‍या ओळी वाचला की त्याच ओळी repeat करायच्या. हे तुमच्याबद्दल म्हणत नाही मी. In general जी वृत्ती दिसते, त्याबाबत बोलतोय. असू द्या... तुम्ही नका मनाला लावून घेऊ.

Saurabh
Wednesday, June 28, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लालभाई,
तुमच्या काही विचार प्रवाहांबद्दलचे माझे आकलन बरोबर आहे का सांगा कृपया :
शिक्षणाबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी शिक्षणात आरक्षण -
पुढे शिक्षण मिळवल्यावर देखील नोकरीच्या पुरेशा संधी मिळत नाहीत, आणि मग शिकून काय उपयोग अशी अनास्था निर्माण होउ नये म्हणुन नोकर्‍यात आरक्षण -
अर्थात नोकरी लागल्यावरही पुरेसा पगार आणि पाहिजे तितक्या उच्चपदस्थ जागा मिळल्या नाहीत तर नोकर्‍या आणि पर्यायाने पुन्हा शिक्षण याबद्दल अनास्था निर्माण होउ शकतेच, म्हणुन बढत्यात आरक्षण -
.....

जो समाज काही हजार वर्षांपुर्वी शिकुन सवरून उन्नत झाला त्यांच्याकडुन सामाजीक बंधन पाळण्याची अपेक्ष होणार हे उघड आहे. जो समाज आरक्षणातुन उन्नत्तीकडे वाटचाल करु लागला आहे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडून हीच अपेक्षा असावी का? थोडक्यात त्या पिढ्यांनी आरक्षणाचा लाभ न घेता आपल्या जमात बांधवांना जस्त संधी द्यावी का?


Zakki
Wednesday, June 28, 2006 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना आज आरक्षण नाकारले जात आहे (कारण ते सवर्ण, ब्राम्हण वगैरे आहेत म्हणून)त्या लोकांनी कुठल्याहि आरक्षणाच्या कुबड्या न वापरता अनेक वर्षे अभ्यास नि अक्कल या जोरावर उच्च स्थान मिळवले. ब्राम्हणांचे राज्य होण्यापूर्वी मराठ्यांचेच राज्य होते की! मग पेशवे का सर्वसत्ताधारी झाले? त्यांना कुणि आरक्षण दिले? ते नुसतेच अक्कलवान नाही तर प्रसंग पडल्यावर लढवय्ये झाले. नि राज्य धरून बसले होते. त्या लोकांनी इतरांवर कसा अन्याय केला? इतर लोक काय उगाच त्यांचे ऐकत होते? त्यात त्यांना काही तरी पटण्यासारखे होते म्हणूनच ना ते ऐकत होते? त्यांच्यापैकी जे तोडीस तोड होते असे इतर जातीचे लोकहि तेव्हढेच सत्ताधारी बनले होतेच की!

त्यांच्यावर अन्याय झाला ही केवळ इंग्रजांनी नि कम्युनिस्टांनी उठवलेली थाप आहे! 'फोडा नि झोडा' ही इंग्रजांची कूटनिती प्रसिद्धच आहे.

कम्युनिस्टांना नाही तरी सगळीकडे उगीचच 'संघर्ष', 'क्रांति' पेटते ठेवायचे असतात. आजपर्यंत कम्युनिस्ट देशातल्या कुणाचेहि कुठल्याहि रितीने भले झालेले नाही. आता इतर विचारप्रणालि सुद्धा काही निर्दोष नाहीत हे नक्कीच, पण हे असले संघर्ष नुसतेच पेटवून पुढे काय?

अहो हे पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा भारतात आरक्षण आलेच होते. जेंव्हा प्रथम आरक्षण सुरू झाले तेंव्हा एका प्रसिद्ध पुढार्‍याने म्हंटले होते कि 'इतके दिवस आमच्या बायकांनी बामणांच्या घरी भांडी घासली, आता बामण बायकांना आमच्या घरी भांडी घासायला ठेवू!!
हीच का तुमची महत्वाकांक्षा? यालाच तुम्ही उद्धार म्हणणार का? शेवटी फक्त तसेच झाले काही ठिकाणी. पण अजूनहि हे खर्‍या अर्थाने 'नालायक' लोक आपले आरक्षण मागतातच आहेत! अजूनहि त्यांच्यात पात्रता नाही, म्हणून ज्यांच्याजवळ आहे त्यांचे काढून ज्यांच्याजवळ नाही त्यांना जबरदस्तीने द्यायचे? नि पुढे काय?
शेवटी पात्रता, जगातील अडचणींवर मात करण्याची हिंमत असेल तर कुणीहि कुठेहि यशस्वी होऊ शकतो (शकते). ज्यांना आज OBC वगैरे म्हणतात त्यातल्या कित्येकांनी पूर्वी काय कमी प्रमाणात यश मिळविले? आंबेडकर, इ.?

अमेरिकेतले काळे, मागून आलेले इतर देशातले लोक या कुणालाहि आत्ता आत्तापर्यंत काऽहिही आरक्षण मिळत नव्हते. ज्यांच्यात लायकी होती ते सरकारात गेले, निवडून आले, प्रसिद्ध बनले आणि ज्यांच्यात ते नाही, असे अनेक जण आपले उगीचच माफक यश मिळवून रडत बसतात 'भारतात बरय बुवा, नोकर मिळतात, स्वस्ताई आहे' असे.




Limbutimbu
Thursday, June 29, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा....!
झक्की, लाखातल एक बोललात!
पण मी सद्ध्या तरी सुरु होणार नाही!
चालू द्या!


Ajjuka
Thursday, June 29, 2006 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता आवरा बरंका या लाल्याला.

Moodi
Thursday, June 29, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात जाणारे सवर्ण भारतीय पैसा कमवण्याच्या उद्देशानेच जातात....

हो ना ते पैसा कमवायलाच जातात कुठल्याही आरक्षीत जागेत प्रवेश न घेता, स्वतच्या हिंमतीवर, मेहेनतीवर अन अपार कष्ट करुन जातात, पण जे राखीव जागेतुन निवडुन येऊन, भारतातल्या सरकारी दवाखान्यात स्वतसाठी नोकरीत जागा अडवुन, बाहेर परदेशात जाउन डॉक्टरकी करतात ते कशाला? स्वतच्या तुंबड्या भरायलाच ना? की स्वतच्या समाजाच्या उत्थानाकरता जातात?

http://www.loksatta.com/daily/20060625/mum01.htm .

कॉम्रेड होण्याकरता बराच स्वार्थत्याग करावा लागतो, मोठे व्रत आहे ते.

कित्ती कित्ती गं बाई हा स्वार्थ त्याग..

http://www.loksatta.com/daily/20060629/opd02.htm .



आतापर्यंत कुठल्याच सवर्णाने मित्र अथवा आंतर्जातीय विवाह करताना जात बघितली नाही, कुठल्याच डॉक्टरने रुग्णाची जात बघितली नाही. पण जेव्हा ५० ते ६० टक्क्यावर राखीव जागेत प्रवेश घेऊन दवाखाना थाटला जातो तेव्हा अतिशय हुशार अन कसब असलेला, आरक्षण नसलेला मुलगा डॉक्टर बनण्यासाठी आता १० ते १५ लाख मोजतो, पुढे दवाखाना थाटण्याकरता 5-25 लाख लागतात ते वेगळेच, नाही का?

मग जा की तुमच्याच जातवाल्याकडे, कशाला बघताय त्याचे मार्क अन त्याचे कमी शिक्षण? समाजाचे उत्थान हवे आहे ना? पुढे आणायचा आहे ना? मग कशाला बघता मार्कलिस्ट? त्याचा दर्जा? असेल हिंमत तर उतरा Healthy Competetion मध्ये राखीव जागेच्या आधाराविना, अन दाखवुन द्या आपली गुणवत्ता.

घ्या त्याच्याच कडुन तुमचे अन तुमच्या कुटुंबाचे उपचार करुन. दुवा देईल तो तुम्हाला, कारण गुणवत्ता नसुन डॉक्टर बनलेल्या माणसाकडे कुठलाच सुज्ञ माणुस स्वतचे उपचार करुन पायावर धोंडा नाही पाडुन घेणार. निदान तुम्ही तरी पोट भराल त्याचे..

लिंब्या शनी मंगळ कायमचेच बसलेत आपल्या राशीला...



Maudee
Thursday, June 29, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी किती दिवसानी दर्शन दिलेस:-)

अनुमोदन मूडी आणि अज्जुका


Moodi
Thursday, June 29, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माऊडे सुटले मी, आता पुढे ज्या पोस्ट येतील, त्याला नो उत्तर. हुश्श!!!

लोकहीतवादी खुप छान पोस्ट.


लिंब्याच्या खांद्यावर मायबोलीचे ओझे, मायबोलीचे ओझे...


Laalbhai
Thursday, June 29, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सौरभ,

तुम्हाला जे आकलन झाले त्यातला काही भाग बरोबर आहेच. काही चुकीचा आहे.

नुकताच, कालपरवा, न्यायालयाने निकाल दिला की हंगामी कामगारांना कायमस्वरुपी नोकर म्हणून घेण्यासाठी कंपन्यांवर सक्ती करणे न्यायालयाला शक्य नाही!

हे सरासर अन्याय आहे. कंपन्या बहुतेकवेळा या हंगामी कामगारांना कायम न करण्याच्या हजारो ट्रिक्स वापरत असतात. बिचारे कामगार कायम होण्याच्या आशेवर अवलंबून बसतात आणि termination ची कुर्हाड कोसळली का त्यांचे घर उध्वस्त होते.

ह्यात पुन्हा कुणी गुणवत्तेचा सवाल आणला तर त्याला खरी परिस्थिती माहिती नाही असेच म्हणावे लागेल.

अशा लोकांसाठी आरक्षण हा फार मोठा आधार होऊ शकतो. कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसू शकतो.

न्यायालयाच्या ह्या निर्णयाबद्दल तुमचे (सौरभ, तुमचे!) मत काय आहे? की तुम्ही तिथेही म्हणणार गुणवत्ता सिद्ध करा आणि कायम व्हा? तुम्हाला हंगामी कामगारांना कशाप्रकारे हाताळले जाते याची कल्पना असेल असे गृहित धरतो.


झक्की,

तुमच्या माहिती साठी सांगतो की OBC category मधी काही प्रदेशातल्या ब्राह्मण जाती पण येतात. याची आपणास कल्पना आहे का? नसल्यास तुमचे सगळे वरचे लिखाण baseless ठरते. एक आंबेडकरांचे उदाहरण देऊन तुम्ही सगळ्यांना तेवढ्याच योग्यतेचे मानता का? आणि "तितक्या" योग्यतेचे नाही म्हणून त्यांनी दारिद्र्यात खितपत पडायचे?

सौरभ आणि झक्की,

Don't take it personally पण तुम्हाला लहानपणापासून जे वातावरण आणि मार्गदर्शन मिळाले, ते जर मिळाले नसते, तर तुम्ही आज केली तितकी प्रगती करू शकला असता का? तुम्ही एकवेळ आंबेडकरांसारखे exceptionally हुशार असाल, पण आजुबाजुच्या लोकांकडे बघून सांगा!


Laalbhai
Thursday, June 29, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका.. ताकद आणि हिंमत असेल तर आवरून दाखवावे. दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूका ठेवून गोळ्या झाडू नका.

इच्छा असेल तर या मैदानात आणि (योग्य) मुद्दे मांडा.. उगाच तमाशे आणि थयथयाट नकोत!


Laalbhai
Thursday, June 29, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi,

maaphee kadhee maagataay??


Moodi
Thursday, June 29, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि. कॉम्रेड तुम्हाला मी आधीच उत्तर दिलेय, जर वाचता येत नसेल तर शिका नीट आरक्षणाच्या कुबड्या न घेता नाहीतर डोळे तपासुन घ्या.

Paul
Thursday, June 29, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाय लेनीन हा अत्यन्त फ़ालतु माणूस होता. भाऊ मेला म्हणून त्याने ज़ार चा सूड घेतला. त्याला ना कामगाराशी ना जनते शी घेणे देणे होते. आकाण्ड टान्डव करणे म्हजे विद्वान नव्हे. क्रान्ती नन्तर त्याने ना त्याच्या अनुयायानी रशीयात सुराज्य आणले. ढोन्गी होता तो.

खरंय खरंय.. कॉम्रेड होणे सोपे नाही

बरोबर आहे. अक्कल गहाण ठेवणे सोपे नाही.


Divya
Thursday, June 29, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय हो मुडी.
एक अनुभव सांगते. माझा सख्खा भाउ १२वीत असताना त्याच्या ३-४ मित्रांचा ग्रुप मरमर आभ्यास करायचा eng ला COEP ला जायची महत्वाकांक्षा होती. result लागल्यावर काही points नी टक्क्यानी पण नाही admission COEP ला मिळाली नाही पण दुसर्या चांगल्या कॉलेज मधे मिळाली. तशी रस्सीखेच त्या कॉलेजला जास्त होती म्हणुन कुणाला काही वाटले नाही पण त्याचा एक मित्र जो या आरक्षण वाप्रुन त्या कॉलेजात गेला होता आणि ज्याला आम्ही कधी पाहील नव्हत तो म्हणे मुद्दाम पेढे घेउन आला होता ज्यांना COEP ला मिळाली नाही त्यांना द्यायला. मी विचारले हे काय प्रकरण आहे तर कळाले की त्याने वर्षभर असाच माज केला होता सारख म्हणायचा अपुनको साला tension नही, अपुनको गॅरेन्टी है अपुन उसीच कॉलेजमे जायेगा. मुद्दाम पिक्चरला चाललोय म्हणायचा बघुन आल्यानंतर सुद्धा मुद्दाम तोन्ड फ़ाटे पर्यन्त स्तुती करायचा जाउदेत शेवटी काय अगदी खुप राग येउनही सगळे गप्प बसले.

अजुन एक उदा. म्हणजे ओळखीतले आहेत त्यांची मुलगी आरक्षणाच्या जोरावर MBBS ला गेलेली पण आभ्यासक्रम झेपला नाही शेवटच वर्ष खुप मानसिक frustration आल. वर्गातल्या बाकीच्यांच्या मानाने तिला खुपच struggle करायला लागल होत त्यांच्या पहिल्या year नंतरही ती २ वर्श घरीच होती. शेवटी शेवटी हे माझ्याच्यान होणार नाही म्हणुन रडायची. शेवटी ते तिने सोडुन दिले. काय करणार confidance च गेला तिचा. खर खुप वाइट वाटले आम्हाला पण चांगली मुलगी होती. शेवटी एका सवर्ण डोक्टर मुलाबरोबरच तिचे love marrage झाले. ठीक आहे पण ती जागा वाया गेली त्याचे काय?

आरक्षणाच्या जोरावर admission मिळेल पण ते शिक्षण घ्यायला असणारी लायकी(जाती वाचक या अर्थाने नाही तर गुणवत्तेच्या दर्ज्याने) कुठुन आणणार?

माझ्या मते कितीतरी OBC हे दोनवेळच्या खाण्याची मारामार असल्याने शिक्षण घेत नाहीत. त्यासाठी प्रथम बेकारी कमी करुन त्यांच्या पोटापाण्याची सोय सरकारने प्रथम करायला पाहीजे मग त्यांना शिक्षणात गोडी वाटेल आधी त्यांचे बेसीक प्रॉब्लेम सोडवा जे अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा तरी त्यांच्या भागल्या जातील ते आधी बघा तो पाया आहे तो आधी बळकट करा. आरक्षणाचे अमिष दाखवण म्हणजे तुमची कळसापासुनच सुरवात आहे पण पायाच बळकट नसेल तर ती वास्तु तग धरेल का? आज नाही १०० वर्षानी हेच म्हणाल की आरक्षण मिळुनही आमचा समाज उपेक्षित आणि गरीबच राहीला?
सरकारला राजकारणाशी देण घेण असाव म्हणुन हे आरक्षणाचे गाजर दाखवलय. उलट सगळ्यानी हे आरक्षण नको पण आमच्या मुलभुत गरजांकडे लक्ष द्या असे सरकारला सांगायला पाहीजे. त्यातच या समाजाची बेसिक तरी सुधारणा होइल.

आणि हो या मायबोलीवर जर सेवाभावी संस्थां विषयी लिहीलेल वाचलत ना तर या लोकांसाठी प्राथमिक शिक्षण द्यायला जिथे शाळा नाहीत तिथे शाळा बांधायला पैशाच्या रुपाने केलेली मदत ही सवर्णांकडुनच आहे, ती सुद्धा त्यांनी फ़क्त सवर्णांसाठी केलेली नसुन सगळ्या गरीब लोकांसाठी आहे. उगाच वर्णद्वेषाचे बळी तुम्हीच होत आहात.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators