अनुदिनी: अक्षरधूळ Chandrashekhar's Marathi Blog http://chandrashekhara.wordpress.com/
अनुदिनीकार: चंद्रशेखर आठवले, पुणे
अनुदिनीची सुरूवातः जानेवारी १३, २००९ च्या सुमारास झाली असावी. कारण त्यावेळी लेखक लिहितात, “ गेली कांही वर्ष़, वेडेवाकडे कां होईना, मराठीतून कांहीना कांहीतरी लिहित आलो आहे. त्याचीच ही ब्लॉग साखळी. वाचकांना आवडेल अशी मनापासून इच्छा.”
शरीर दैनंदिन जीवनात अनंत ताणतणावांचा सामना करते. त्यांच्यातून मुक्ती मिळविते. न जमल्यास त्यांना शरण जाते. तेव्हा ते ताण, मान, खांदा, पाठ, कमर, गुडघे, घोटे इत्यादी आणि इतरही सर्व अवयवांमधून अवघडून राहतात. त्यांना मुक्तीची अपेक्षा असते. विशेषतः जे निदानित हृदयरुग्ण असतात त्यांच्यात तर ताणतणावांना शरण जाण्याची प्रवृत्ती घडत जाते. म्हणून रोगग्रस्त, अस्वस्थ, अवघडलेल्या स्थितीत कुठलेही इतर व्यायाम, प्राणायामादी प्रकार करण्याआधी शरीर पूर्णतः सैलावण्याची गरज असते. हे साधण्याच्या प्रक्रियेस प्रगतीशील शिथिलीकरण उपयोगी ठरते.
अनुदिनी: आनंदघन http://anandghan.blogspot.com/
अनुदिनीकार: आनंद घारे
अनुदिनीची सुरूवात: जानेवारी २००६
अनुदिनीची वाचकसंख्या: १ मे २००८ पासून वाचनसंख्या ६१५१८
अनुदिनीचे अनुसरणकर्ते: ७५
अनुदिनीतील एकूण नोंदी: ६७७
अनुदिनीकारांची ओळख: मी कोण? याबाबत अनुदिनीकार म्हणतात, "इंग्रजी भाषेतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कामाचे ढीग उपसता उपसता 'उत्कृष्ट वैज्ञानिक' उपाधि पदरात पडली. आता सरळ सोप्या मायमराठी भाषेत चार शब्द लिहायची धडपड सुरू आहे."
आपल्याला राग का येतो? आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसर्याच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसर्याचा राग का येतो? तर अहंकार दुखावला जाणे, घाई असणे, अपेक्षाभंग होणे आणि नकारात्मक विचारात तल्लीन असणे ह्यामुळे राग येतो. थोडक्यात हे चार प्रकार आहेत राग येण्याचे. म्हणजे तुमचा आमचा राग, ह्या चार प्रकारात मोडतो.
अहंकार
मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात. बहिणाबाई चौधरींनी मनाचे खूपच सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे. त्या म्हणतातः
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर । किती हाकला, हाकला फिरी येत पिकावर ॥
भावनिक बुध्दयांक......
कुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.
.
.
माबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अॅकेड्मीक हुशारीपेक्षाही EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही.
अॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.
आणि मग रिजेक्शन.....
आपल्या सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचे भूषण आणि संगीत क्षितिजावरच्या सूर्याचे- पंडित भीमसेन जोशी यांचे आज पहाटे निधन झाले..माझ्याकडे खरच शब्द नाहीयेत... सकाळी ऑफिसला येताना त्यांचेच भजन ऐकत होते आज.. आणि येवून पाहते तर ही बातमी.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...