स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
24वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धावा केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..>>
फेसबुकवर बराच काळ फिरत असलेल्या पोष्टीचा हा एक भाग. गुगल गेल्यास सगळी पोस्ट वाचता येईल. मुद्दामून इथे देत नाही.
सालाबादप्रमाणे नवीन वर्ष येतं अन संपत, कसं, ते कळतही नाही. अनपेक्षितपणे डॉ कन्ना मडावी व डॉ प्रकाश व डॉ मंदा आमटेच्या भेटीने दोन हजार चौदाची सांगता झाली अन त्या आठवणी आळवत असतानाच नवीन वर्षाची सुरुवात आवडत्या लेखकाच्या भेटीने झाली ... ... क्या बात है! आपलाच हेवा आपल्याला वाटावा. नाही, हा हेवा नाही तर 'ठेवा' आहे.
पंचवीस वर्षे झाली नागपुरात येऊन पण अगदी जवळपासची ठिकाणं पाहायला जमली नाही. त्यातले एक ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प व दुसरे पंचमढी! गाडी गाडी पे लिखा है घुमनेवाले का नाम , ताडोबाचा अनपेक्षित योग आला. आमचे मित्र रागीट ह्यांच्या मित्राचे येणे रद्द झाले अन आयत्या गाडीत आम्ही नागोबा नागीण बसलो अन एक अविस्मरणीय निसर्ग, सामाजिक व धार्मिक असं त्रिवेणी पर्यटन घडलं. संध्याकाळी सात वाजता नागपूरहून निघालो व ऊर्जानगर (चंद्रपूर)ला साडेदहावाजता श्री निंबाळकर (श्री रागीट ह्यांचे मित्र) ह्यांच्या घरी पोचलो. निंबाळकरांचे घर ऊर्जानगर गेटपासून शेवटच्या टोकाला, रस्त्यावर शुकशुकाट!
'श्रम ही है श्रीराम हमारा' असं कायम म्हणणारे मुरलीधर देविदास आमटे, म्हणजे बाबा आमटे अनेकांना माहीत आहेत ते 'महारोगी सेवा समिती'चे संस्थापक म्हणून. कुष्ठरोगी-अंध-अपंग-आदिवासी यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करणारी ही संस्था गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. बाबांचं कुष्ठरोग-निर्मूलनाचं, अंध-अपंग-आदिवासी यांच्या पुनर्वसनाचं, त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचं काम खूप मोठं असलं, तरी बाबांची तत्त्वं, त्यांची मतं ही त्यांच्या संस्थेच्या परिघात अडकून राहिली नाहीत.
मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का? ( http://www.maayboli.com/node/33327 ) या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन करीत आहे. प्रतिक्रिया तिथेच देता आली असती परंतु दोन कारणांमुळे स्वतंत्र ले़ख लिहीत आहे.
१. अदिती यांच्या मूळ ले़खापेक्षा माझा प्रतिसाद लांबलचक होण्याची शक्यता आहे.
२. मूळ ले़खात मांडलेल्या मुद्यांव्यतिरिक्त इतरही काही मुद्यांचा विचार करायचा असल्याने तिथे प्रतिसाद दिल्यास त्यावर "भरकटलेला" असा शेरा येऊ शकतो.
लहान असताना गणपतीचे दिवस अगदी खास असायचे. (आता देखील असतातच, पण त्या वयातली मजा आगळी.) टीव्ही अजून भारतात आलेला नव्हता. आणि आपलं मूल प्रत्येक activity मध्ये एक नंबरी असलं पाहिजे अशी पालकांची मानसिकता नव्हती. त्यामुळे शाळा सुटली की हुंदडायला पोरं चिकार असायची.
गणपतीच्या आधी टोळक्याटोळक्यानी सर्व मित्र मैत्रिणींच्या घरी जाऊन आरास करायची, गणपती यायया दिवशी घसा फुटेस्तोवर ‘गणपतीबाप्पा मोरया’ चा गजर करायचा आणि रोज संध्याकाळी जास्तीत जास्त घरांमध्ये आरतीला जाऊन प्रसाद चापायचा - हे नॉर्मल. सोसायटीअचं गॅदरिंग असायचं त्यासाठी नाटकं, नाच, नकला वगैरे बसवायचे. सगळ्यांच्या घरी जाम धमाल यायची.
स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?
अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !
मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जपानचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. : Grand Cordon of the Order of the Paulownia Flowers
भारत-जपान मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांत केलेल्या कार्यासाठी डॉ. सिंग यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. असा सन्मान दिला जाणारे ते पहिलेच भारतीय आहेत.