मी सकाळी झाडाना पाणी घातलं की असे छोटे छोटे पक्षी जमतात आणि पानांवरचे पाण्याचे थेंब पितात त्यात अंग घासुन अंघोळ करतात
खाली साठलेल्या पाण्याकडे पहातही नाहीत
बागड़त असतात अगदी। अळू , सोनटक्का, ब्रह्मकमळ अशी पान त्यांची फेवरिट आहेत
एक दिवस उशीर झाला पाणी घालायला तर येऊन किलबिलाट करु लागले
उन्हाचा बोभाटा,...
उन्हामध्ये काम करणारांच्या
अंगातुन घामाच्या धारी असतात
मात्र उन्हामध्ये न जाणारांकडून
उन वाढीच्या तक्रारी असतात
जे काही पाहिलं तेच सांगतो
आम्ही उगीच बाता मारत नाहीत
काम करून घाम गाळणारे
घामाचा बोभाटा करत नाहीत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आदिम अवस्थेत समाज होता. पाण्याच्या नदीच्या आसपास छोट्या वस्त्या पाडे करून लोक राहत. दळणवळणाची/संवादाची काहीच साधने नव्हती. त्यामुळे लोक जवळजवळ एकाच ठिकाणी आयुष्य काढत (समाज म्हणजे एक मोठ्ठे "बिग बॉस" चे घरच होते जणू). स्वाभाविकपणे सोयरिकी सुद्धा आसपासच्या भागातच जमवत आणि लग्ने उरकून घेत असत. लग्न म्हणजे बंधन. एकदा ते झाले कि बस्स. त्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर मैत्री गप्पा म्हणजे सगळीकडे "ब्रेकिंग न्यूज" व्हायची. त्यातून भांडणे तेढ युद्धाचे प्रसंग कौटुंबिक शत्रुत्व सामाजिक कटुता इत्यादी निर्माण व्हायचे.
नैसर्गिक विध्वंस
नैसर्गिक आपत्तींची
नैसर्गीक पीडा आहे
नैसर्गिक नियमांना
नैसर्गिक तडा आहे
नैसर्गिक डाव-पेचांचा
नैसर्गिक कावा आहे
नैसर्गिक विध्वंसाचा
हा जाहिर पुरावा आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
वीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.
हातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.
मार्ग :
कल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे
भारतीय संस्कृती ही पर्यावरण विचारी आणि निसर्गसंवर्धक आहे. प्राचीन संस्कृत वाड्मयात त्याचे दाखले सर्वत्र मिळतात. वराहपुराणात सांगितलंय की -
यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठान्ति मेदिन्यां संतति, पुत्र पौतृकी ॥
म्हणजे जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, आणि सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. हे वाक्य प्रश्नार्थक झालंय ना?
ब्रिटनचे हवामान निराशाजनक आहे असे सांगणारे अनेक लोक भेटतील. वर्षभर कधीही पडणारा पाऊस, थंडी, वारे, क्वचितच घडणारे सूर्यदर्शन अशा प्रकारचे निराशाजनक चित्र आम्ही ब्रिटनमध्ये येण्याआधी खूप लोकांनी रंगवून सांगितले होते. त्यात आम्ही स्कॉटलंडला राहणार म्हणजे अजूनच उत्तरेकडे त्यामुळे अजूनच वाईट. आम्ही मनातून खूप घाबरलो होतो. ठरवले होते की एकच वर्ष राहू आणि मग दुसरीकडे जाऊ. पण जसेजसे आम्ही इथल्या लोकांशी, इथल्या संस्कृतीशी जुळवून घेऊ लागलो तसे इथल्या हवामानाशी पण जुळवून घेऊ लागलो . आणि आता तर इतकी वर्षे झाली; आम्ही स्कॉटलंडच्या प्रेमात आहोत.
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
नैसर्गिक बदल
कुणी शाब्दीक दोष दिले
कुणी भावनीक रोष केले
कुणी-कुणी तर म्हणाले
या निसर्गाचेच होश गेले
आपण काहीही म्हटलो तरीही
निसर्ग अनियमितता टिकवुन आहे
निसर्गाचा घडणारा प्रत्येक बदल
आता नैसर्गिकतेलाही ठकवुन आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३