स्मशानात जागा हवी तेवढी
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?
तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?
जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?
कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
किनार्यावर नुसतेच कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय शोधतोय?
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन भोवर्यामध्ये गुरफटलो
कधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधले
कधी निसटणारी वाळू हातात घेतली
तर कधी चिखलाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय शोधतोय?
शेवटी दमून भागून जेव्हा किनार्याला लागलो
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा डोहाकडे पाहीले ....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या डोहामधूनच उगम पावलाय एक सोनेरी प्रवाह...
जो जातोय दूर, खूप दूर... क्षितीजापर्यंत...
मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या प्रवाहात...