अंगभर ल्या वस्त्र अन् झाका म्हणे ही नग्नता,
मी कशी समजून घेऊ ही अडाणी सभ्यता?
पाट ओल्या वासनांचे वाहती चहुबाजूनी
काय मी माझी जपावी कोरडी सौजन्यता?
जन्म का झाला तीचा येथून रण होते सुरू
साकडे देवीचपाशी घालते निर्लज्जता!
वाघ आम्ही पाळलेले चार भिंतींतून हे
तेच ते सैतान झाले उंबरा ओलांडता!
तीव्रता माझ्या मनाची व्यक्त करता येईना
कधीही उल्कापात व्हावी अक्षरांतील सौम्यता.
मी कुठे लपवून ठेवू गं तुला माझ्या पिला
पंख माझे तोकडे अन् भाबडी वात्सल्यता...
सुसंस्कृतांनो या इथे घेऊन चिंध्या फाटक्या
आज झाकायाची आहे संस्कृतीची भग्नता!
या इथे रोवून टाका दगड मैलाचा कुणी...
...
कुठे धागा मिळेल का शोधतोय
मग चालत राहता येईल निवांत
रस्ता मिळेल त्याप्रमाणे
...
कुठून चाललोय कुठे?
कोण कुणाला घडवतेय प्रवास?
शरीर तर शरीर, ही इंद्रियंही ठरवत नाहीत ना आपली दिशा
...
असंख्य चिलटं झालीत
फार वेळ झालीय
ह्या दिव्याखाली थांबायला नको आता
...
कविता म्हणजे घट कवी गोरा कुंभार
कल्पनांची माती तिंबून देतो त्यास आकार
कविता जर अभंग कवी साक्षात किर्तनकार
भावनांचे करुन निरुपण घडवतो जणु साक्षात्कार
कविता जणु पाउस कवी बनतो मेघ
चिंब करते अनुभुती कवितेतील प्रत्येक रेघ
मनाच्या खोल जखमा, कवि शल्य विशारद
टाके घालतो कवितेचे, फुंकर मारुनी अलगद
कविता असावी प्रकाश कवी काजव्यासम हवा
जगी अंधार दाटता स्वयंस्फुर्तीने दिपावा
©मंदार खरे
जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का?
मनातली चीड सांगायची होती... जरा लक्ष देशील का?
तुझ्याशी भरपूर भांडायचं आहे... डोळ्यात पाणी आणायचं आहे
माझ्या असण्याचा तुझ्या लेखी अर्थ काय?... विचारायचं आहे
हिशोब काही मांडायचेत, जुनेच पाढे गिरवायचेत...
आवाज चढवून थरथर कापत प्रश्न काही सोडवायचेत...
माझ्या डोळ्यांत डोळे मिसळून निखार माझा सोसशील का?
जरा अपॉइंटमेंट हवी होती... वेळ काढुन देशील का?
विचारायचेत खुप खुप जाब, कसलीच भीड ना कुणाची आब
नात्याच्या या पारतंत्र्यात, आज होऊदे इंकलाब!
घुसमट झाली पुरे आणि पुरे झाला अ-संवाद...
याच भिंतींच्या साक्षीनं आता उकरुन काढू सगळेच वाद!
तुला पाहिले बघत राहिलो
फार दिसांनी सुखावले मन
दोन निमिष मग हसत राहिलो
ओठांवरती शब्द न आला
देहाचीही भाषा सुंदर
अर्थबोध वेळेवर झाला
कुठली आशा तरळत होती
असे वाटले सगळे शाश्वत
स्वप्नेही कड पलटत होती
तुला पाहिले बघत राहिलो...
काल रात्री चांदण्याने हासणे नाकारले,
आणि मीही समजले हे सूख नाही आपले!
मीही असते तुही असतो तरिही का नसते हमी,
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!
आज ओल्या पावलांना बोचती का पाकळ्या,
सूखभरल्या या मनाला टोचती का पोकळ्या?
मी अशी हसते तरी हसण्यात का नसतेच मी
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!
ठेवलेला त्या क्षणी मी जन्म अवघा तारण
मी अशी का वागले... काहीच नव्हते कारण!
अजुनही उरलीच मज मी उधळण्याची खुमखुमी
तू आज हाती हात दे या साथिची सलते कमी!
ओंजळीमधल्या फटीतुन निसटले अस्तित्व माझे
ओंजळीभरल्या फुलांचे आणि उरले फक्त ओझे!
गंधला नाहीस तू अन् रंगले नाहीच मी
तू मेलीस म्हणून वाईट वाटून घ्यावे..
की सुटलीस एकदाची प्रचंड यातनांतून
म्हणून एक सुस्कारा टाकावा..
न कळण्याइतपत मन बधिर झालंय..
तुझ्या आत्म्याला शांती मिळेल का हा प्रश्न असला तरीही,
आमच्या आत्म्यांना देखील हि शिक्षाच आहे..
पावलो-पावली घडणाऱ्या बलात्काराच्या बातम्या वाचत
न्यायाची वांझोटी स्वप्नं बघत जगण्याची शिक्षा..
-शिल्पा
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...
माझं रडणं, माझं हसणं,
कधी खुप बोलणं तर कधी गप्प बसणं.
फुलासारखं कधी गदगदून बहरणं,
कधी गुदमरुन आतल्याआत झुरणं...
कुणालाच सांगायचं नसलं तरी स्वतःला ते सांगावं लागतं...
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...
एक फळ जेंव्हा झाडापासून तुटतं,
झाडावरुन नेमकं ते खालिच का पडतं?
चंद्र जेंव्हा पौर्णिमेला ऐन रंगात येतो,
समुद्र अंगात आल्यासारखा बेभान का होतो?
कमळाचं फुल नेहमी चिखलातच का फुलतं?
किरणांच्या हिंदोळ्यांवर सुर्यफुल का झुलतं?
सगळ्या प्रश्नांचं आपल्यापुरतं उत्तर आपण शोधावं लागतं,
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...
राजधानी
अंगणात विखरून माझ्या मंजिरी पडावी
तयांवरी वर्षा होता तुळस अंकुरावी
अशी ती हसावी आणि तशी ती रुसावी
उन्हां पावसाची तिजला तमाही नसावी
सूर्यदेव किरणे तिजला खेळण्यास देती
थेंब थेंब वर्षा ऋतूचे स्नान घालताती
सासुरासी जावी कन्या म्हणून लग्न केले
तुळशीच्या लग्नामध्ये फटाके उडवले
रूप मनी साठवले मी हळद माखलेली
लाडाची कन्या आमची जपून राखलेली
आणि अचानक तो शत्रू चाल करून आला
डुकरांनी साधून संधी घातलाच घाला
नाजूक मम रोपावरती धसमुसले पाय
तुळस चिखल होऊन जावी हाच तुझा न्याय?
-प्रद्युम्नसंतु