संशोधन/अभ्यास

Research/Studies

आधी भौतिक !

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आमचे एक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. ते लय म्हणजे लईच भारी होते. ताडमाड भारदस्त व्यक्तिमत्व, तसलाच आवाज. छाप पाडणारे प्रकरण. दोन्हीही हातांनी वहीवर/फळ्यावर अगदी फास्टंफास्ट लिहायचे. फळ्यावर लिहिताना आपण फळ्याकडे तोंड करून लिहितो, तर हे वर्गाकडे तोंड करून उलट्या हातानेसुद्धा सरळ ओळीत फळ्यावर लिहू शकायचे. तिरके अक्षर आणि पल्लेदार फटकारे. कर्सिव्ह तर बघत र्‍हावे. त्यांच्या हाताच्या चिमटीत पेन एवढुसा दिसायचा. खडू दिसायचाच नाही.

प्रकार: 

जल............ नीर, तोय, उदक...........जीवन

Submitted by सेन्साय on 21 April, 2017 - 01:11

पाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.

‘पश्चिम’चा प्रवास (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 16 April, 2017 - 03:27

वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती.

विषय: 

‘पश्चिम’चा प्रवास (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 12 April, 2017 - 06:59

दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या एका प्रवासातील आठवणींचा हा लेखाजोखा...
-----

रेड लाईट एरियातलं तत्वज्ञान - गंगा जमुना !

Submitted by अजातशत्रू on 8 March, 2017 - 09:48

जमुनाबाई एकदम फाटक्या तोंडाची,
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..
तू बारा गावचे पाणी पिला असशील, मी बारा गावची लोकं पचवलीत."
असं सांगताना ती छातीवर तळहाताने ठोकत असते अन तिच्या चेह-यावर अनामिक अभिमान असतो.
या अभिमानाची वर्गवारी मला अजूनही करता आली नाही.
हातातल्या पंख्याने ओल्या झालेल्या गळ्यावर हवा घेत ती आधी पचकन थुंकते, पुढे बोलते,
"इथे कुठली गीता अन कुठला भगवान ?"

Pages

Subscribe to RSS - संशोधन/अभ्यास