Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 October, 2011 - 05:30
'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!
Submitted by माध्यम_प्रायोजक on 12 October, 2011 - 01:38
अष्टपैलू अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांनी 'देऊळ'मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या अगोदर त्यांनी उमेश कुलकर्णी यांच्या 'वळू' या चित्रपटातही अभिनय केला होता.
'देऊळ'च्या निमित्ताने या चित्रपटाबद्दल, उमेशबद्दल आणि नाना पाटेकर, नासीरुद्दीन शाह या त्यांच्या सहकलाकारांबद्दल त्यांची मतं जाणून घेण्यासाठी मारलेल्या या गप्पा..
'देऊळ'बद्दल, त्यातल्या तुमच्या भूमिकेबद्दल काही सांगाल का?.
Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 October, 2011 - 00:16
गाव! गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात अनेक प्रतिमा. नदी. डोंगर. नदीकाठचं देऊळ. कुठे गावातला मारुतीचा पार. पारावर रंगलेल्या गावकर्यांच्या गप्पा. रंगवून सांगितलेले अनेक प्रसंग. आणि या प्रसंगांतून डोकावणारी गावातली माणसं. भोळी, बेरकी, इरसाल, मासलेवाईक, नमुनेदार! द. मा. मिरासदारांच्या नाना चेंगट किंवा बाबू पैलवानासारखी. पु.लं.च्या अंतू बर्व्यासारखी. पण ही झाली आपल्या नमुनेदार वागण्यानं, बोलण्यानं आठवणींत रुतून बसलेली काल्पनिक माणसं! तरी खरीखुरी, आपल्या आसपासची वाटणारी.