पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.
पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.
संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?
आत्ताच थोरल्याचा फोन आला की एक व्हीपीपी आली आहे, ५०० रुपये भरुन सोडवुन घ्यायला सांगत आहे, कुणा SSS Industrial Job Services कडून आली आहे, मी आत्ता पोस्टमनला परत पाठविले आहे, तुम्ही नेटवरुन माहिती काढाल का?
माहिती काढल्यावर त्या नावाच्या एक दोन साईट्स सोडता, बनावट कॉल लेटर्स/गार्बेजची व्हीपीपी पाठवुन होणार्या फसवणूकीच्या तक्रारींनी भरलेले गुगलचे पान नजरेस पडले. तत्काळ मुलास फोन करुन सांगितले की ती व्हीपीपी तू घेऊ नकोस, घेतलीस तर फुकाचा फसशील. जी गोष्ट "विकतची" म्हणून तू मागवलेलीच नाहीस, त्याकरता पैसे का भरतोस?
याच संदर्भात पुढील बातमी देखिल पहा
अजुन एक बातमी, अन सगळ्यांची चीडचीड. तारस्वरात ओरडणारे चॅनेल्सवाले आणि मग सरकारची कासवाच्या, किंबहुना अधिकच संथपणे काही प्रतिक्रिया. मागील काही दिवसात ह्या घटना पुन्हा-पुन्हा होत आहेत. या घटनांनी "बलात्कार्याला फाशीच" दिली पाहिजे असे म्हणणारेसुद्धा वाढत आहेत. पण खरच फक्त ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला तेच दोषी आहेत का? त्यांना त्वरीत पकडणे, खट्ला चालवणे, शिक्षा करणे, इतकं पुरसं आहे का?
मागील काही दिवसांच्या न्यायालयांच्या निवाड्याचा आढावा घेतला तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सरकारने (विशेषतः केंद्रसरकार) केलेल्या चौकशीतील लुडबुडी किंवा नियम धाब्यावर बसवुन दिलेले लायसन्स, इ. यामध्ये न्यायायलाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सिबिआयला स्वायत्तता देण्याबद्दल जवळजवळ आदेश दिला आहे, तर काही बाबतीत चौकशी स्वत:च्या अखत्यारीत चालु केली.
आजच लोकप्रतिनिधी जर गुन्हेगार साबीत झाला आणि किमान २ वर्षांची सजा झाली, तर त्याला त्याचे पद सोडावे लागेल आणि शिक्षा भोगावीच लागेल असा निकाल आज न्यायालयाने दिला. तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना आता निवडणुक लढवताच येणार नाही.
आजच्या सकाळला "शरीरसंबंध ठरेल कायदेशीर विवाह" ही बातमी वाचली. शरीरसंबंधावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने निकाल दिला की काय कुणास ठाउक.
पण यामुळे बलात्कार आणी शरीरसंबंध कमी होतील ?
माझ्या मित्राच्या गाडीला पहाटे ३-३.३० च्या दरम्यान स्विफ्ट गाडीने मुद्दाम धडक दिली. त्याच्या घराजवळच्या हॉटेलमधून दारू पिऊन निघालेल्या कारमधली लोक, वेडीवाकडी गाडी चालवता आहेत हे पाहून त्याने गाडी रस्त्याच्या एक्स्ट्रीम डाव्या बाजूला गाडी घेतली. तर त्यांनी मुद्दाम अंगावर गाडी आणली. हे पाहून हा थांबला, तर क्षणभर ते ही थांबले आणि नंतर जोरात रेस करून जाणून बुजून धडक दिली. फरफटवत नेली. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर आहे, आणि खूप मुका मार, पायांना दृश्य जखमा, सूज अशी अवस्था आहे. त्याच्या जीजाजींनाही लागलेय.
जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात
पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही मदतीसाठी थांबत नाही.
अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं. अपघात नुसत्या पहाणार्या लोकांना कमीत कमी काय करता आलं असतं.
आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे
शेपटात शेरबीर माळतात गाढवे
बोध आकलन खुमार कामयाब नाट्यमय
शब्द पाहिजेत ते विटाळतात गाढवे
ना गुरू सभोवती बघून भीड चेपली
गझललाथ झाडुनी पिसाळतात गाढवे
शेर दोन ओळ आणि ग्रंथ या प्रतिक्रिया
फुकट सर्व्हरामुळे उफाळतात गाढवे
इग्नरास्त्र मारल्यास गप्प राहतात ती
तेच तेच अन्यथा उगाळतात गाढवे
रहिवासी ईमारत, अपार्टमेंट ,वाडा ई. ठीकाणी असलेल्या सामाईक जागेत सर्व सभासदांच्या परवानगीशिवाय एखाद्या सभासदाने बांधकाम केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करता येतो का?
असे गुन्हे दिवाणी कायद्याखाली येतात कि फौजदारी??
हा दुवा सोसायटीचे नियम व कायदे विषयक असून, सोसायटीमध्ये राहणा:या अनेकांना अडचणी येत असतात. अनेकवेळा नाहक त्रस सोसावा लागतो. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास, योग्य सल्ला द्यावा. धन्यवाद.