कायदा

कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2014 - 13:48

"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"

आता धागा सुरू करूया,

१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.

वडिलांच्या नावे असलेले घर विकून अपत्याच्या नावे घर घेणे

Submitted by zoom on 16 November, 2014 - 09:23

खालील व्यवहारात कायदेशीर / योग्य मार्ग कोणता?

सध्याचे घर वडिलांच्या नावावर आहे. ते विकून दुसरे नवे (थोडे मोठे) घर विकत घ्यायचे आहे.
नवे घर हे [वडलांच्या सध्याच्या घराच्या विक्रीतून आलेली रक्कम ] + [कमावत्या अपत्याची आर्थिक भर] अशी जुळणी करून घेण्यात येणार आहे.
नवे घर वडील (स्वेच्छेने) थेट अपत्याच्याच नावे करू इच्छितात.

या व्यवहारात-
१. वडिलांना घराच्या विक्रीतून आलेल्या रकमेवर (कसल्याही प्रकारचा) कर भरावा लागतो का?

विषय: 

हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत.

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

स्वतःच स्वःतच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस करणे हे योग्य आहे का?

Submitted by कासव on 5 November, 2014 - 11:11

पंडीत नेहरु आणि इंदीरा गांधी यांनी स्वतःच स्वतःच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. असे ऐकीवात/वाचन्यात आले. त्याबद्दल सत्यता पडताळुन पाहणे गरजेचे आहे का? आणि हे सत्य असेल तर ते कितपत योग्य आहे.

सोर्सः विकि
http://en.wikipedia.org/wiki/Indira_Gandhi#Awards

शब्दखुणा: 

संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 31 October, 2014 - 07:26

आज सर्वत्र चिंतामणी प्रदर्शित होत आहे. एक जाहिरात तुमचं आयुष्य बदलू शकते का? हे वाक्य या चित्रपटाच्या प्रसिद्धीत ठळकपणे समोर येत आहे. चित्रपटात नेमकं काय आहे हे मला ठाऊक नाही, पण या वाक्यावरून सुमारे तीन दशकांपूर्वी आकाशवाणी पुणे केन्द्रावर रात्री ऐकलेले एक नाटक आठवले. ह्या नाटकाचे कथासूत्र मला लक्षात होते पण नाटक जसेच्या तसे पुन्हा कधीच कुठेही पाहायला / वाचायला / ऐकायला मिळाले नाही. माझ्या आठवणीत असलेल्या कथासूत्रानुसार मी पुर्वीच यावर एक स्वैर रुपांतरीत कथा लिहीली आहे.

औषधे उदंड, नियंत्रण शून्य

Submitted by शांताराम०१ on 24 August, 2014 - 14:12

आयुर्वेदीक व होमियोपॅथीवर ओरड करणारे ठरावीक लोक नेहेमी सांगत असतात की अ‍ॅलोपॅथीचीच औषधे ही
प्रमाणित, संशोधित आणि खात्रीशीर असतात,

येथेच जर एखादा सदस्य भेंड्याच्या औषधी गुणाबद्दल सांगतो तेंव्हा काही डॉक्टर मंडळींना लोकांच्या आरोग्याचा उमाळा येतो आणी ते म्हणतात असे काही प्रयोग करु नका, कराल तर जिवाला मुकाल !!!

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 01:59

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

अविवाहित मुलीला निवर्तलेल्या वडीलांची पेन्शन मिळणे सबंधी कायदा

Submitted by हर्ट on 8 August, 2014 - 15:38

मागिल महिन्यात माझा भाऊ गेला. त्याला पहिल्या पत्नीपासून २४ वर्षाची एक मुलगी आहे आणि दुसर्‍या विवाहाची पत्नी. तो गेल्यानंतर त्याची पेन्शन ह्या दोघींना अर्धी अर्धी मिळावी असे आम्हा सर्वांना वाटत आहे पण आपले कायदे नक्की कसे आहेत हे माहिती नाही. मी एकदा पेन्शनच्या कार्यालयात प्राथमिक चौकशी केली. ते म्हणालेत अविवाहित मुलीला फक्त वय २४ असे पर्यंतच पेन्शन मिळते त्यानंतर मिळत नाही. बायकोला मात्र आयुष्यभर पेन्शन मिळते. मला हा कायदा खूप ईलॉजिकल वाटला. वयाची अट २४सच का कळले नाही. निदान मुलीचे लग्न होईपर्यंत तिला पेन्शन मिळेल इतपत तरी कायदा असायला हवा होता. असो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कायदा