पुण्याच्या पीएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहिलेल्या एका सूचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत राहा’ अशी सूचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिहिलेली असते. ही सूचना मागच्या दारातून येणाऱ्या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारातून उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.
ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरू होण्या अगोदरच सुरू होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सूचक आहे. वेगवेगळ्या पातळीवरून बघितले तर त्यातून केवढा बोध मिळतो.
मि तुझा विचार करतो
आणि तु मला जोडलि जातेस
तडफडणारं शरीर आणि
कातडि खाली वेदना देतेस
ताणलं नाही गं मि
लांब पर्यंत पसरत गेलो
माझं मन तुला सांगण्या साठी
भांडलो नाही गं मि
मान-अपमान विसरत गेलो
तुला परत मिळवण्या साठी
पण जे तुझ्यापशि सुरु झालं नाही
ते तुझ्यापशि संपलं ही नही
शेवटी राहीलं ते एकटे पण
आंधार्या विहिरी सारखं
घाबरवणारं, चिडवणारं
खोल नेउन बुडवणारं
डोळे उघडुन पाहिलं
तु दुरावताना दीसलिस
ते हि पाठमोरी फिरलेली
आणि हे पाठमोरेपण रहिलं मझ्याकडे
कायमचं...
वाड्यातल्या त्या काहीश्या अंधार्या, कोंदट, पोपडे उडालेल्या भिंती. आठवड्यापूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनीला शुष्कतेने पडलेल्या भेगा. धगधगलेल्या चुलीतून भसभसून निघणारा, ज्याला खिडकीपेक्षा खिंडार म्हणणे योग्य ठरेल अश्या मोठ्या भगदाडातून, मोकळा होण्यासाठी झेपावणारा काळा धूर. राधाक्काचा कोंडलेला, घुसमटलेला श्वास. ओली लाकडे पेटवताना फुंकणी फुंकून फुंकून कोरडा पडलेला घसा. तिच्या संपूर्ण जीवनाची धग दाखवत रसरसून लालबुंद झालेला चेहरा. भगदाडातून संधी मिळताच धुराला बाजूला सारत मुसंडी मारून घुसलेली सूर्याची किरणे. त्यांचा तयार झालेला धूमकेतूच्या शेपटीसारखा एक लांबलचक पट्टा.
शाळे बाहेरच्या शाळा - भाग १
नैसर्गिकरीत्या कसा कमी करायचा ह्याचे शिक्षण नसते. मनाची प्रसन्नता कशी टिकवून ठेवायची ह्याचे शिक्षण नसते. ह्या जगात ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे, तोच मनुष्य यशस्वी गणला जातो.
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाइन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे कीर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. कीर्तन दोन भागात असायचे पाहिल्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनांबरोबर कीर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुसऱ्या भागात सांगितलेल्या कथेचा मथितार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा पण वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुसऱ्याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे.
प्रास्ताविक
प्रसिद्ध ब्रिटिश सेनांनी फील्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करून राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -
आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
तद्नंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.
स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी.
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – पहिल्या भागात खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
हिंदू धर्म - विषय प्रवेश
मानवाचे अस्तित्व