विचार

ना ब औ ल खो - द्वितीय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 August, 2014 - 14:16

प्रथम इथे

दुसरा किस्सा क्रमांक २

छोटासाच किस्सा आहे, याचा संबंध शिर्षकाशी असल्याने एकाच लेखाअंतर्गत डकवले आहे परंतु पहिल्या किस्श्याशी याचा थेट संबंध जोडू नका.

डिसक्लेमर पुन्हा देतो - नाव-संदर्भ बदललेले आहेत.

विचार !!!

Submitted by ni3more on 17 September, 2013 - 00:39

मी नाही बोलत माझे विचार बोलतात
मी नाही बोलत माझे विचार बोलतात
माझ्या जगण्याला नेहमी माझ्या विचारांची जोड असते
विचारांची जोड असते !!!

शब्दखुणा: 

विचारा..

Submitted by रसप on 19 May, 2013 - 04:45

तुझी साथ वाटे मला शाश्वताची तुझ्यावर मला हक्कही वाटतो
तसे ह्या जगाशी जुळवले कितीही तरी रोज हटकून मी भांडतो

क्वचित एकदा तू असा मूर्त होऊन येतोस, होतोस अक्षरफुले
तुझा हाच दुर्दम्य विश्वास माझ्यात आशा उद्याची बनुन किलबिले

छुप्या पावलांनी कधी भ्याड हल्ले, कधी वार होतील पाठीवरी
लढू सोबतीने जगाशी, तुझ्या सत्यतेची असे ही लढाई खरी

विचारा, तुझ्यावर अजुन ठाम मी तू नको धीर सोडूस इतक्यात रे
प्रवासास आरंभ केला कधीचा नको थांबणे व्यर्थ अर्ध्यात रे

भारत किंवा भारतियांबद्दलचे असेच काही दुवे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

फेसबूक ईस्टाईल काही दुवे द्यायचा विचार आहे - भारतियांशी किंवा भारताशी संलग्न.
त्यावर अधीक विचार लिहायला आवडतील. वेळेअभावी कसे/किती जमेल ते पाहुया.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सचिनचे क्रिकेट

Submitted by रणजित चितळे on 30 November, 2012 - 10:53

..नमस्कार ..ब-याच दिवसांनी येथे येत आहे. आता रेग्युलर राहीन. माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी माबो वर नव्हतो..............

नकाशा

Submitted by स्वातीपित्रे on 29 November, 2012 - 00:24

विचारांचे चक्र आणि चक्राकार विचार कधीकधी डोके भंडावून सोडतात. हे सर्व का कशासाठी? कोणासाठी? कधीपर्यंत? चिचार आणि भाषा खरे तर आपणच तयार केलेली, आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजून घेता यावा आणि त्याप्रमाणे आपल्याला क्रिया करता यावी, आपले निर्णय घेता यावेत, सर्वांशी संवाद साधता यावा आणि तोही दर्जेदार, म्हणून. पण कधीकधी आजूबाजूला इतके काही घडत असतं- गोष्टी, बातम्या , शब्द ह्यांचा भडीमार होत असतो को त्यातले अचूकपणे काय घ्यावे आणि काय सोडावे समजत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

Submitted by बस्के on 11 September, 2012 - 06:49

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा!

गंध...

Submitted by rar on 25 April, 2012 - 11:34

गेल्या दोन महिन्यात घडलेल्या असंख्य घडामोडी आणि धावपळीनंतर आत्ता कुठे तिला जरा शांतता, फुरसत मिळाली होती. म्हणजे अजून तसा प्रवास संपलेला नाहीच आहे. पण तरीही सकाळपासून रेल्वेचा प्रवास, मग एअरपोर्टवर सिक्युरिटी वगैरे नाटकं संपवून पॅरिसच्या 'चार्ल्स डे गॉल' विमानतळावर ती पुढच्या विमानाची वाट पाहात थांबली होती. दगदग, गडबड होती तरी हातात घेतलेली सगळी काम यथायोग्य पार पडली या विचारानीच तिला शांत वाटत होतं. असं दमून-भागून शांत, स्वस्थ झाली की कायम बसल्या बसल्या 'काय काय घडून गेलं' याची उजळणी, त्यावर विचार करायची तिची नेहेमीची सवय.

गुलमोहर: 

जी-२

Submitted by राज जैन on 3 February, 2012 - 01:17

रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.

गुलमोहर: 

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

Submitted by रणजित चितळे on 28 August, 2011 - 23:43

जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.

अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही.
ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील.
क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत.
ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो. अण्णा हजारेंची मागणी अवास्तव आहे.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विचार