मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
संस्था
समस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक
समस्या आणि उपाय
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात. या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.
भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक
प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणूका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.
एक सोबर ३१ डिसेंबर....
चित्रपटसृष्टीतील दुर्लक्षित लोक
'शोले' मधला पहिला मालगाडीवाला सीन...ठाकूरशी बोलताना टपावर पायाचा आवाज येतो. त्या डाकूला उडवायला अमिताभ वॅगनमधे जमिनीवर आडवा पडून वरती गोळी मारतो. नंतर त्याचे काय झाले ते पाहताना वेगात चाललेली मालगाडी व त्यामुळे "मागे" पडणारा डाकू. तसेच शेवटी धर्मेन्द्र सर्वांना "चुन चुन के" मारायला जाताना मोठ्या खडकावर उभा असलेल्या एकाला गोळी मारतो. तो तेव्हा भरधाव घोड्यावरून जात असल्याने तो तेथून पुढे गेल्यावर वरचा डाकू खाली पडतो. 'शोले' कितव्यांदा पाहताना या गोष्टी जाणवू लागल्या ते आता लक्षात नाही, पण काय जबरी एडिटिंग आहे असे तेव्हा आम्ही म्हणायचो.
ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता
''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''
''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''
अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.
नाती....
आयुष्याच्या वळणांवर
उमलतात खरी !
भावनांचं खत, रक्ताचं पाणी
फवारुनही गळतात सारी !
नकळत अलवार
एक तरी फुलावं !
निरागस जाणिवांनी
तरारून डोलावं !
खोलवर रुजावीत
पाळं-मुळं !
मनभर पसरावं
आत्मीयतेचं जाळं !
जरासाच मिळता
विश्वासाचा टेकू !
हारून स्वतःला
तन-मन झोकू !
संशयाची अमरवेल
मूळापासून उपटावी
नात्याच्या वेलीला
फळं-फुलं लगडावी
-सुप्रिया.
सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
तसा वर्तमानपत्राचा आणि माझा संबंध फक्त मुंबई मध्ये जमिनीचे भाव काय झाले हे जाणून घेण्याइतकाच. बाकी असतेच काय? २-३ बलात्कार, ५-१० चोऱ्या, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, एखादा घोटाळा जनतेसमोर आणि बाकीच्या जाहिराती. पण त्या दिवशी दाभोळकरांच्या घटनेची बातमी वाचली. खरे सांगू, तर मलाही माहित नव्हते की ते नक्की होते कोण. नंतर थोडे वाचले, तेव्हा अंधश्रद्धा निर्मुलनासाठी त्यांनी केलेल्या कामाची माहिती मिळाली. अजूनही मला पूर्ण माहिती नाहीच पण म्हणून काय झाले? मला अंधश्रद्धा म्हणजे काय ते माहिती आहे. कारण तो माझ्या तुमच्या जीवनाचा एक भाग बनलाय.
विषय क्रमांक २ - प्रसिद्धीपराङ्मुख राजकारणी नेता - त्रिभुवनदास पटेल
कोण बरे हे त्रिभुवनदास पटेल? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आला असेल. अगदी बरोबर! मलाही हे कोण आहेत हे माहित नव्हतेच. मलाही हे माहित झाले ते एका लांब, वळणावळणाच्या वाटेनेच.
विषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना. "सहकार - एक चळवळ"
उपवास..
उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते तर त्यांच्यासोबत लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय' कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
Pages
