खळ्ळं खट्याक .. एक तरी रिक्षा पेटवायची आहे.
नुकतंच रिक्षावाल्यांविरूद्ध खळ्ळ खट्याक आंदोलन झालं. त्या आंदोलनाच्या श्रेयावरून महाभारतही झालं. ईसकाळच्या बातमीमधे श्रीराम वैद्य नामक एका वाचकाची प्रतिक्रिया वाचली... फार छान झालं. मला पण एक तरी रिक्षा पेटवायची आहे. ही प्रतिक्रिया प्रातिनिधीक आहे का ? प्रतिक्रिया पटते का ? असल्यास का ? अशा प्रकारे लोकांनी कायदा हातात घेणं योग्य आहे का ?
रिक्षावाल्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे ?