समाज

खळ्ळं खट्याक .. एक तरी रिक्षा पेटवायची आहे.

Submitted by Kiran.. on 8 October, 2011 - 00:58

नुकतंच रिक्षावाल्यांविरूद्ध खळ्ळ खट्याक आंदोलन झालं. त्या आंदोलनाच्या श्रेयावरून महाभारतही झालं. ईसकाळच्या बातमीमधे श्रीराम वैद्य नामक एका वाचकाची प्रतिक्रिया वाचली... फार छान झालं. मला पण एक तरी रिक्षा पेटवायची आहे. ही प्रतिक्रिया प्रातिनिधीक आहे का ? प्रतिक्रिया पटते का ? असल्यास का ? अशा प्रकारे लोकांनी कायदा हातात घेणं योग्य आहे का ?

रिक्षावाल्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे ?

विषय: 

माहिती हवी आहे : सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र, प्रार्थनास्थळाचे नाव

Submitted by गजानन on 3 October, 2011 - 11:01

नमस्कार,

मला खालील खालील धर्मांची [सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र , प्रार्थनास्थळाचे नाव] ही माहिती हवी आहे. कृपया माहीत असल्यास लिहा / चुकीचे असल्यास दुरुस्त करा. धन्यवाद.

जैन :
सण : पर्युषण
धार्मिक ग्रंथ : आगम
तीर्थक्षेत्र : श्रवणबेळगोळ, मांगी-तुंगी, गिरनार, शत्रूंजय (?), पालिताना (?)
प्रार्थनास्थळाचे नाव : मंदिर / बस्ती / देरासर

पारशी :
सण : जमशेद नवरोझ ( न्यू इयर)
धार्मिक ग्रंथ : झेंद अवेस्ता
तीर्थक्षेत्र : ??
प्रार्थनास्थळाचे नाव : अग्यारी

ख्रिश्चन :
सण : नाताळ
धार्मिक ग्रंथ : बायबल
तीर्थक्षेत्र : जेरुसलेम

तेजस्वी - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 27 September, 2011 - 00:33

विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्‍या स्त्रियांची थोडक्यात माहिती इथे संकलित करूयात.

ही माहिती आपल्या मुलामुलींना आवर्जून वाचायला द्या / वाचून दाखवा. समाजात फार काही आदर्श राहिलेले नाहीत. या आणि अशा काही ठिणग्याच आपल्या मुलामुलींकरता मार्गदर्शक ठरतील.

विषय: 

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

Submitted by जागोमोहनप्यारे on 26 September, 2011 - 10:18

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

दृष्ट कशी काढावी?

Submitted by जागोमोहनप्यारे on 23 September, 2011 - 05:54

दृष्ट कशी काढावी?

लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? )

संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी Happy ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते.

दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते.

दिवसाकाठी रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर ???

Submitted by Sanjeev.B on 22 September, 2011 - 01:29

मित्रांनो,
कालच पेप्रात वाचलं नियोजन आयुक्तांचे मुक्ताफळ. शहरी भागा मधे दिवसा काठी ‍रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर येतो. विशेष म्हणजे ह्या अहवालावर आपले पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग ह्यांचे स्वाक्षरी आहे.

नियोजन आयोगानुसार श्रीमंतांचा रोजचा खर्च (स्त्रोत : आजचा सामना वृत्तपत्र)
डाळ : ५.५० रुपये
भात, चपाती : १.०२ रुपये
दुध : २.३३ रुपये
तेल : १.५५ रुपये
भाजी : १.९५ रुपये
फळे : ०.४४ रुपये
साखर : ०.७० रुपये
मीठ मसाला : ०.७८ रुपये
अन्य खाद्यपदार्थ : १.५१ रुपये
इंधन : ३.७५ रुपये

एका अहवाला नुसार देशातील ८०% लोकांचे रोजचे उत्पन्न ८० रुपयांपेक्षा ही कमी आहे.

विषय: 

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 September, 2011 - 04:00

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

( एवढाच विषय लिहिल्याने सुरुवातीच्या काही प्रतिसादांमध्ये लोकांचा गैर्समज झाला आहे.. हा विषय खरे तर असा आहे.... >> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही.)

बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
तारीख/वेळ: 
21 January, 2012 - 10:38 to 17:38
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा

हानामी (花見) : साकुरा

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 7 September, 2011 - 07:03

हानामी (花見) : साकुरा

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत, मित्र-परिवारासोबत जीवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

साकुरा

राहुल गांधी- एक औत्सुक्याचा (?) विषय....

Submitted by जागोमोहनप्यारे on 6 September, 2011 - 09:26

राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय....

हे मला ई मेलमधून ढकलपत्रातून आले...

राहुल गांधी : जे काही UP मध्ये घडले ते पाहून मला भारतीय म्हणवून घेण्यास लाज
वाटते.....

थांबा!!!! भारताच्या युवराजचे हे शब्द ऐकून तुम्ही लगेच UP शिव्या द्यायला
सुरुवात करू नका...

थोडेसे युवराज आणि त्याची आई यांच्या बद्दल जाणून घ्या....

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळ मिळून उत्तरप्रदेशवर कॉंग्रेसचेच
राज्य होते. फक्त आणीबाणी आणि काही बदली सरकार सोडून कॉंग्रेसच सत्तेवर होते
(१९३९ ते १९८९ याकाळामध्ये)
स्वातंत्र्य मिळाल्या पासून आत्ता पर्यंत झालेल्या १४ पंतप्रधानापैकी ८

Pages

Subscribe to RSS - समाज