पाप भोगतो आहे कुठले ? समजत नाही
सुख आताशा चुकूनसुद्धा फिरकत नाही
कैसे झेलू मी काळाचे वार सारखे ?
मजपाशी आता दैवाचे चिलखत नाही
जिवंत आहे तुझ्यामुळे मी आज, अन्यथा
समईसुद्धा बिनतेलाची तेवत नाही
भेदभाव तू 'मनुष्य' जातीकडून शिकला
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही
अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही
मी मरताना, हळहळलेले तिला पाहु दे
यमा 'प्राण ने' खुशाल नंतर, हरकत नाही
वैभव फाटक ( १६ सप्टेबर २०१२)
केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि..[२]
छोटा सुमो आता अण्णा-सुमो नसून केजरीवाल-सुमो आहे.
अण्णा आणि केजरीवाल , तुमच्या प्रत्येकासमोर आता असे १०० अगडबंब सुमो कुस्तीसाठी उभे आहेत. आणि ते तुमच्याकडे या चित्रातील सूमोप्रमाणेच 'बच्चा है' अशा आविर्भावात पाहाताहेत हे नक्की.
केजरीवाल, तुम्ही राजकारणात उतरण्याचे ठरविल्यापासून तुमच्याकडे तर ते अधिक निर्विकारपणे पाहाताहेत, कारण तुम्ही त्यांना हव्या असलेल्या जागी कुस्तीसाठी आपणहून गेलेले आहात.
"आय एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,
स्त्रोतः http://timesofindia.indiatimes.com/india/Defence-nuclear-units-were-on-K...
Defence, nuclear units were on Karnataka terror radar
NEW DELHI: Vital Army, Navy and nuclear installations in south India were on the terror radar of the suspects arrested in Bangalore and Hubli for allegedly plotting to target MPs, MLAs and journalists in Karnataka. During interrogation, they apparently said Saudi Arabia-based handlers of these terrorists are Pakistanis and Indians.
बर्याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.
भारतातील जाती, उगम, तंत्र व प्रसार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १९१६
Castes in India, Their Mechanism, Genesis and Development
हा निबंध डॉ अ अ गोडेनवायजर ह्यांच्या मानववंशशास्त्र परिषदे मध्ये , कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका येथे ९ मे १९१६ मध्ये वाचण्यात आला.
टीप : माझे डोळे नुकतेच उघडलेत. सर्वांचे उघडावेत या सदिच्छेपोटी हा लेखनप्रपंच. उपरोध, उपहास या प्रकाराशी माझा संबंध येत नसल्याने सर्व लिखाण नम्रतेने वाचावे.
शाळा शिकून जे शिकलो त्यामुळे नोकरीचे विचार सतत मनात घोळत असतानाची गोष्ट. कुणी सरकारात गेला, कुणी मल्टीनॅशनल मधे गेला कुणी नुकत्याच जम बसलेल्या आयटी क्षेत्रात गेला तर कुणी मनपा, रेशन कार्ड, जमीन महसूल खाते अशा ठिकाणी गेला. ज्याला कुठेच काही संधी मिळाली नाही त्यांच्याशी काही वर्षे संपर्क राहीला मात्र त्यांच्या अडचणींची जंत्री वाढत गेल्याने सगळेच सेटल्डस त्यांना टाळू लागले. सहानुभूती मात्र होतीच !!
आर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा ..
विशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्यांसाठी ..
काही सोसायट्यांमध्ये अकाउंट्स बनवण्याचे काम आउटसोर्स केले जाते, असे ऐकण्यात आहे. ज्याला outsource केले जाते तो टॅलीमध्ये अकाउंट्स मेंटेन करतो. तो जेव्हा गरज पडेल तेव्हा सोसायटीच्या पदाधिकार्यांना भेटून आवश्यक माहिती देतो/ घेतो. (म्हण्जे कायम स्वरूपी सोसायटीच्या कार्यालयात बसत नाही).
माझ्या भावाच्या सोसायटीत अशा व्यक्तीची नेमणूक करायची आहे. अशा प्रकारे अकाऊट्सचे काम करणारी व्यक्ती माहित असल्यास क्रूपया सांगा. सोसायटी माहिममध्ये आहे.
इंग्लिशमधे रीडर्स किंवा कम्पॅनियन बुक्स ही एक फार मस्त सोय असते. कितीही किचकट, गहन विषय असला तरी त्या विषयाची सहज पण अचूक तोंडओळख करून देणारी पुस्तके (पाठ्यपुस्तके किंवा गायडं नव्हेत), तीही त्या विषयातील कुणी अधिकारी अभ्यासकाने लिहिलेली/ संपादित केलेली. ही परंपरा मराठीत जवळजवळ नाहीच. आपल्याकडे कलाशाखेची (भयाण दर्जाची) पाठ्यपुस्तके सोडता सर्वसामान्यांना आकलन होईल अशा समाजशास्त्रीय विषयांवरील पुस्तकांची वानवा आहे. मुळात स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे समाजशास्त्रज्ञ अगदी मोजकेच आहेत/ होते.