मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
समाज
लेडीsज (अँड जंटलमन) ऑफ द ज्युरी..
चार भिंतीतलं राजकारण
चार भिंतीतलं राजकारण- विद्या बाळ
"...घराघरातलं कुटुंबात शिजणारं आणि चालणारं राजकारण कुटुंबसंस्थेइतकंच जुनं आहे. आपल्याला ते जाणवत नाही, लक्षात येत नाही. याची दोन कारणं आहेत. कुटुंबाच्या गौरवीकरणात आपल्यावरच्या म्हणजे स्त्रियांवरच्या उदात्त संस्कारांची परंपरा फार मोठी आणि घट्ट आहे. त्यामुळे स्वार्थत्याग, समर्पण, वात्सल्य, सोशिकता यासारख्या ‘गुणांची’ मक्तेदारी स्त्रियांवर लादण्यात परंपरा यशस्वी झाली आहे. वास्तविक हे ‘गुण’ हे खरंच चांगले असतील तर पुरुषांमध्येही त्यांची रुजुवात का बरं करण्यात आली नसेल? ..."
- विद्या बाळ
पूर्ण लेख इथे उपलब्ध आहे. वाचनिय.
भारतिय रेल्वे आणि तॄतिय पंथी व ईतर
रेल्वेच्या प्रवासात बर्याचदा रिझर्वेशनचे तिकीट मिळाले नाही की, अगदी गितांजली असो की कोणतीही सुपरफास्ट एक्सप्रेस असो तॄतियपंथी लोंकांकडुन बर्याचदा पैसे मागितले जातात कधीकाळी ते त्यात समाधानी होते. लोकही अशा लोंकांना यथायोग्य देऊन मोकळी होत. परंतु आता त्रास जास्त वाढला आहे. हे लोक सरळ पुरुषांच्या मांडीवर येऊन बसतात (कधी कधी ते तॄतियपंथी असल्याचे जाणवत नाही कदाचित यात पैशासाठी काही बाया घुसल्या असल्या बाबत शंका येत) आणि पैशाची मागणी करतात. कमी दिले तरी त्रास देतात. नाही दिले तर मारतातही. नुकताच नंदुरबार जवळ अशी मारहान केल्याचे वाचले आहे. रेल्वे प्रशासनही यांच्याकडे दुर्लक्ष करते आहे.
सत्य कथा
गेली ती आज....मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली ,तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना, पण शेवटी तीसुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोच्क्याखाली दाबून धरावा लागला. धावत जावून लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणनारे पाय अंगठ्याने जमीन कोरु लागले, पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते. कित्तेक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी कित्तेक साहिले देखील होते. पण सगळे सगळे पडद्या आडून.
फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.
आमचे गोंय (भाग ९) : गोव्याची सांस्कृतिक जडणघडण
'सुजाण'तेची वयोमर्यादा
सगळ्यांना एव्हाना कळलेच असेल की दिल्ली बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन (आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने 'अजाण' ) ठरला आहे.
आमचे गोंय (भाग ८) - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
आनंदसागर
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे. तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात".आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य, आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!
आनंदसागर
सुरूवात ही तुझ्याकडून,
शेवट ही तुझ्याकडेच.
पण मधला प्रवासच भरकटलेला,
अशाश्वतात गुरफटलेला.
ह्या भरकटलेल्या वाटेवरती
पुन्हा गवसतो तोच गांव
विस्मरून ते पावन तत्व
अन् मीही मांडते तोच डाव.
खुणा, तुझ्या नि माझ्या साम्यत्वाच्या
इथे मिटवीते माया
ममतेचे कच्चे बंध
इथे निर्मिते काया
नसे अशक्य जरी मिळविणे