समाज

पुस्तक परिचय- 'द मिसमेजर ऑफ मॅन'

Submitted by लसावि on 1 April, 2013 - 23:48

सामान्य माणूस सहसा विज्ञान, वैज्ञानिक आणि एकंदरीतच शास्त्रीय प्रक्रिया याकडे एकतर जादूची कांडी (पुराणमतवादी असतील तर यक्षीणीची वगैरे!) किंवा अतीविशेष बुद्धी असलेल्या मोजक्या लोकांचे काम अशा दोनच टोकाच्या भूमिकेतून पाहतो. यात भर म्हणून ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’ आणि ’आमच्या लोकांनी हे सगळे आधीच शोधले होते’ हे दोन आत्यंतिक पवित्रे आहेतच. या सर्वांमुळे विज्ञानाकडे पाहण्याची स्वच्छ नजर तयार होण्यास अडथळे येतात. ’विज्ञान हे मानवी कार्य आहे- सायन्स इज ह्युमन एंडेव्हर’ या दृष्टीने सर्व शास्त्रीय व्यवहाराकडे पाहिले जाणे फ़ार गरजेचे आहे.

मन्ह्या गावन्या गप्पा!

Submitted by मी_आर्या on 30 March, 2013 - 03:35

नमस्कार लोकेसहो!
इब्लिसनी आठेनी पोस्ट दखीसन मन्ह्या गावनी याद उनी. काय याद दिधी भौ तु 'डोलची'नी! Happy तुम्ही बी लिखाच आते धुय्यानी धुयवडवर!
http://www.maayboli.com/node/42113

तर आपला गावन्या आठवनी लिहिन्याकरता हाई धागा काढा. तठा गप्पानां बाफ व्हावाडी देत, म्हनुन हाउ बाफ.:) तर लोकेसहो, तुम्हन्या गावना बद्दल काही याद उनी, काही लिखानं शे त आठे लिखानं.

सुरवात मी करस! मन्हं गाव धुळे. आते धुळवडना विषय निघेल शे तं त्यावर लिखस.

वेताळ आणि वेताळ

Submitted by झुलेलाल on 21 March, 2013 - 23:40

‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल..

संयुक्ता मुलाखत : अश्विनी कुलकर्णी, प्रगती अभियान, नाशिक

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 March, 2013 - 09:54

आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.

महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 20 March, 2013 - 02:18

दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले.

विषय: 

स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (उत्तरार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 19 March, 2013 - 20:28

चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर

रंगपंचमी - एक विनंती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..
holi_request.jpg(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)

विषय: 
प्रकार: 

वाड्यातिल भांडणे-भाग १

Submitted by अत्रुप्त आत्मा on 14 March, 2013 - 03:56

वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन Wink

चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥

का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे???
अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे

शब्दखुणा: 

अंत्ययात्रा

Submitted by सुवर्णमयी on 14 March, 2013 - 00:14

हळूहळू तुम्ही दिलेल्या
नकारांची संख्या
वाढत वाढत
तिने स्वर्ग गाठला असेल
एव्हाना..

अंत्ययात्रा दिसली की
मी वळून बघत नाही
राम नाम सत्य है
चा गजर डोक्यात
अविरत सुरुच आहे

तुमच्या
इमेजला धक्का
लागणार नाही
असेच वागा

पण
माझ्या आत्म्याचे दार
अजून उघडता आलेले नाही!

नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

Submitted by डॉ. बंडोपंत on 13 March, 2013 - 01:46

नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

नेत्रदान केल्याने गरजुला दॄष्टी देण्याचे महान कार्य होते हे महत्व पटुन अनेकांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. कित्येकांनी नेत्रदान केलेही आहे.
नुकत्याच वाचनात आलेल्या बातमी नुसार शासनाच्या पेढीतुन ७० टक्के बुबुळे निकामी झाली आहेत. काहीच बुबुळे दॄष्टीहीन व्यक्तीला बसविली गेली आहे. तर काही प्रयोगा दाखल वापरली आहे. असे शासनानेच जाहीर केले आहे.
असेच जर चालु राहीले तर भविष्यात नेत्रदानाला कितपत मह्त्व उरेल देव जाणे.
मध्यंतरी अशी बुबुळे कुठेतरी फेकुन दिल्याचेही वाचनात आले होते.

Pages

Subscribe to RSS - समाज