तोतो तोतो करु या छान ......
चला चला लौकर तो तो करु
छान छान काजळ-तिटी लाऊ
रडायचं नाही बरं का गं बये
उग्गाच हसून दाखवते काये
डोळे मिटा पट पट पट
साबण लाऊ चट चट चट
नको गं रडू सोनू-बाळा
तो बघ गेला उडाला काव्ळा
आटपा लवकर जायचंय ना भूर्र....
किती बै चाल्लीये हिची कुर्कुर
"अगं ए बये चल लौकर
किती हा खेळ सार्या घरभर
स्कूलबस येईल इतक्यात बघ
वाजेल हॉर्न पँ पँ मग....
सोड त्या बाहुलीला ठेव खाली
तोतोचा खेळ खेळा संध्याकाळी..."
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३
मागील भागात आपण पाहिले की श्री ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. म्हणजेच इथे वाचकाच्या ह्रदयात सद्भाव असणे खूप गरजेचे आहे. भावपूर्ण, हळुवार अंतःकरणानेच हा ग्रंथ वाचावा, नव्हे तो अनुभवावा असे स्वतः माऊलींनीच सांगितले आहे.
आता माऊली किती रसिकतेने काय काय लिहितात ते पाहू ..... अध्याय पहिला - महाभारतकार व्यासांचे गुणगौरव माऊली करताहेत -
नाना कथारूपें भारती| प्रकटली असे त्रिजगतीं|
आविष्करोनि महामतीं| व्यासाचिये ||३२|| ...................(भारती = महाभारत)
म्हणौनि हा काव्यांरावो| ग्रंथ गुरुवतीचा ठावो|
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत
स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष न मावे
म्हणूनि वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे
अशा अतिशय सार्थ शब्दात पांवसच्या स्वामी स्वरुपानंदांनी माऊलींचे सुरेख वर्णन केले आहे. माऊली हे योग्यांचे योगी, विरक्त, तत्वज्ञ, संतश्रेष्ठ, गुरुंचे गुरु, सत्कविवर इतकेच काय प्रत्यक्ष भगवंतच....
अशा या अतिशय पवित्र माऊलींचे स्मरण करायचे ते ज्ञानेश्वरी वाचून, ज्ञानेश्वरी अभ्यासून .....
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सर्वसामान्य लोक "माऊली" या नावानेच हाक मारतात. तेराव्या शतकाच्या अगदी शेवटी ज्यांनी या महाराष्ट्रात जे अलौकिक असे जीवन जगून दाखवले त्यांच्या विषयी अजूनही सर्व भाविकांच्या मनात एक विलक्षण श्रद्धा आहे, आदर आहे.
याचे मुख्य कारण हे त्यांनी केलेले चमत्कार नसून संस्कृतातील भगवद्गीता मराठीत आणण्याचे जे थोर कार्य केले तेच होय. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो.
तीर्थ क्षेत्र
सद्गुरु दाविती | मार्ग तो नेमका | नेतसे जो निका | मोक्षालागी ||
करिता सत्कर्मे | टाकूनि अहंता | गोडी ती चाखिता | सगुणाची ||
द्वेष मत्सरादि | जातसे जळून | येतसे भरुन | सद्भावना ||
मनाचा आरिसा | होताचि निर्मळ | प्रगटे तत्काळ | आत्मबिंब ||
प्रकाशात त्याच्या | उजळे जीवन | कृतार्थ पावन | पुण्यरुप ||
तीर्थ क्षेत्र ऐसे | सहज लाभता | धावाधाव वृथा | सांडावी गा ||
व्हावे आपणचि | पावन ऐसेच | कळो आले साच | गुरुकृपे ||
बबडी माझी ....
बबडी माझी एक्टीची
नाही आणखी कुणाची
गाणी- गप्पा खूप मजा
दोस्त आहे बाबा माझा
गर्गर गर्गर फिरवताना
मस्त मज्जा चक्करताना
नक्कल करीत सांगतो गोष्ट
सुंदर परी, चेटकीण दुष्ट
पेन्सिल पेन घेऊन म्हणे
चित्र काढीन तुझे मने
डोळे तिरळे, नाक नक्टे
मलातर तू अशीच दिस्ते
चिडवतो इतके मला जरी
आवडते माझी बबडी भारी
“कही दबी दबी सी…कही छुपी छुपी सी….तेरी मेरी लव स्टोरी….कभी बारिशो में भीगी तो महक उठी….तेरी मेरी लव स्टोरी !!!”
सकाळी ऑफिसला जाताना अचानक तिचे लक्ष टीव्ही कडे गेले. स्टार प्लस वर एक नवीन सिरीयल सुरु होणार होती त्याच हे शीर्षक गीत होते. हे गाणे आणि त्या सिरीयलची जाहिरात तिला भयंकर आवडायची. तिने रिंगटोन पण याच गाण्याची ठेवली होती. एरव्ही “सिरीयल” या शब्दाने सुद्धा ती वैतागायची. पण “ऑफिसच्या कामाच्या गडबडीतून एकमेकांना दिलेली १० मिनिट” या concept मुळे ती या सिरीयल कडे आकर्षित झाली
बाळ उभा र्हायला .....
उभा उभा र्हाय र्हाय
आधाराला काय काय
टाका टाका एकेक पाय
मज्जा मज्जा येते काय
डुगु डुगु चाले कसा
छान छोटा बदकु जसा
पडे कसा बुदकन
हसु येई खुदकन
हितगुज दिवाळी अंक २०१३
लेखन पाठवण्यासाठी सूचना आणि नियम
१. आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा.
२. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य दिलेल्या तारखेला पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारा वाजेपर्यंत संपादक मंडळाकडे पोहोचायला हवे.
कृपया नोंद घ्या:
बाबा आणि सोनू........
---------------- || श्री || -------------
दिनांक १७ सप्टेंबर २०१३
पुणे.
प्रिय सोनू,
खरं तर तू एवढी मोठी झाल्यावर हे पत्र मी तुला लिहितोय याचे तुला आश्चर्यच वाटेल - कारण मी तुझ्याशी कायमच मित्रत्वाने आणि मोकळेपणाने बोलू शकतो. पण मग पत्राचे कारण काय ? खरंच, कारण नक्की काय आहे असे विचारले तर माझ्याकडे काहीच कारण नाही.... तरी पण ...
एक कारण जरुर आहे.