अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...
"तुकाराम बोल्होबा अंबिले" या नावाचा कोणी येक या सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील देहूग्रामी होऊन गेला.
सद्यकाळात हाच तुकाराम "संतश्रेष्ठ तुकाराम महाराज" यानावाने ओळखला जातो त्याच्याच जीवनझुंजीची गाथा समजून घेण्याचा हा एक अल्पसा, बालकवत प्रयत्न - या झुंजाचे वर्णन शब्दात करु शकणे हे जिथे अवघड तिथे या झुंजाची सखोलता कोणाच्या सहज ध्यानी येईल हे तर अजून अवघड - कारण ही झुंज अगदी जगावेगळीच होती, त्या झुंजीची महता सांगायची तर ती पार आकाशाहून थोर झालेली आहे एवढेच म्हणता येईल ......
भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....
"भक्ति" या विषयाचा आवाकाच इतका अवाढव्य आहे की त्यात नुसते डोकवायचे म्हटले तरीही ती फार फार अवघड गोष्ट आहे. आणि ही भक्ति आचरणात, अमलात आणण्याचे म्हटले तर फक्त संतमंडळीच ती करु जाणे. कारण जनसामान्यांच्या भक्तिच्या कल्पना आणि संतांना अभिप्रेत असलेली भक्ति यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे.
तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....
फाल्गुन महिना सुरु झाला की वेड्या मनाला एक ध्यास लागतो तो तुकोबांचा. इतरवेळेस त्यांचे भावभरले अभंग मनात रुंजी घालतच असतात पण फाल्गुन जसा जवळ येतो तसे त्यांचे इतर अभंग जास्त जवळचे वाटू लागतात - ज्यात त्यांची प्रखर विठ्ठलनिष्ठा अशी काही उफाळलेली दिसते की त्यापुढे त्यांना प्रपंच पार पार नकोसा वाटतो आहे.... - अशा त्या धुंदीतच ते एकटेच या लौकिकाकडे पाठ फिरवून त्या भामगिरी टेकडीवर जात असतील ..... आणि तिथे काय विठ्ठलाशी संवाद साधत असतील का आत्मसंवादात लीन होत असतील ??
जगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.
आपल्या घरात,आप्तेष्टां मध्ये, आपण बर्याचदा लाहन मुले पाहतो जे डावरे असतात.अर्थातच त्याना खुप गोष्टिंना सामोरे जावे लागते.
१. आपला समाज.लगेच न विचारलेला फुकट्चा सल्ला,उजव्या हाताचि सवय करवा हान.त्यात मुलगि असेल तर विचारयलाच नको (माझा स्वानुभव).मि मात्र जिथल्या तिथे ठाम पणे सांगते, ति जशि आहे तशि आहे.अर्थात माझा नवरा नेहमिच माझि बाजु घेतो.
२.त्याना लिहिताना येणार्या समस्या.माझि मुलगि आता साडेतीन वर्षांचि आहे.जेव्हा आम्हि तिला लेखन शिकवु लागलो तेव्हा आम्हाला हि समस्या प्रकर्शाने जाणवलि.ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.
आजकाल लहान - लहान पोरांच्या प्रेम भावनेवर (तसेच इतर भावनेवर) मोठाले चित्रपट निघत आहेत... त्यातही त्याचे वातावरण ग्रामिण आहे तेव्हा शहरातले रितायर्ड म्हातारे अशा चित्रपटाचा खुपच आंनद घेत आहेत.... आज - काल चांगलं - वाईट असं काहीच राहलं नाही... कारण बाजार महत्वाचा.... पैसा मिळविणं महत्वाचं.... आपलं मत लोकांना पटवुन सांगता आलं की त्यातुन बरचं काही मिळविता येतं.... हे नविन कौशल्या बाजारात येत आहे.
.... कसं वातावरण होतं गावातल्या शाळेत विस-पंचविस वर्षापुर्वी.
आठव्या वर्गातली गंमत.
|| श्री ||
आशिषचा पांचवा वाढदिवस होता. पाच-साडेपाचलाच केक कापायचा होता. सकाळी सत्यनारायणाची पूजा घालून झाली होती. घरची घरची म्हणत बरीच माणसे जेवायला होती. आदल्या दिवशीपासून गावाहून नातेवाईक माणसे आलेली होती. शेजारच्या फ्लॅटचा हॉलही वापरायला घेतला होता. संध्याकाळी तर तुडूंब माणसे बोलावलेली होती. दरचवर्षी आशीषचा वाढदिवस थाटातच असायचा, मला प्रत्येक वर्षी सगळ्या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण असायचे.
|| श्री ||
आशिषचा पांचवा वाढदिवस होता. पाच-साडेपाचलाच केक कापायचा होता. सकाळी सत्यनारायणाची पूजा घालून झाली होती. घरची घरची म्हणत बरीच माणसे जेवायला होती. आदल्या दिवशीपासून गावाहून नातेवाईक माणसे आलेली होती. शेजारच्या फ्लॅटचा हॉलही वापरायला घेतला होता. संध्याकाळी तर तुडूंब माणसे बोलावलेली होती. दरचवर्षी आशीषचा वाढदिवस थाटातच असायचा, मला प्रत्येक वर्षी सगळ्या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण असायचे.
ऋतु - संधी
अलख गाजता शिशिराचा तो
तरुकुळ अवघे तल्लीन झाले
हिरवी-पिवळी वस्त्रे त्यागून
पुरेपूर ते निसंग झाले
पुष्पभूषणे नको उपाधी
दंड-कमंडलू हाती धरले
वैराग्याचे तेज झळकता
हस्त रवीचे मृदुमय झाले
उभे उभेचि लावी समाधी
श्वास निरोधन इतुके केले
जीवनरसही नको बोलुनी
धरणीमाते सचिंत केले
किती काळ ही लावी समाधी
द्विजगण अवघे व्याकुळ झाले
निष्पर्णशा त्या शाखांवर
गान तयांचे लोपून गेले
ऋतुराजाची येता स्वारी
ताम्रध्वजा त्या डोलु लागती
प्रसन्न हांसत डोलत शाखी
वृक्षकुळे त्यागती समाधी
गर्द हरित पालवी झळकता
पक्षीकुलांच्या कंठी गाणी
रंगांची उधळण होताना
बारीकराव...
एक होते बारीकराव
सदा त्यांची काव-काव
नक्को हे पोहे अस्ले
कोथिंबीर खोबरे किस्ले ???
पोळी-भात आवडेना
भाजी कोणती चालेना
अजून होती बारीक बारीक
सग्ळे म्हण्ती आली खारीक
बारीकराव बसले रुसून
आई सांगे त्यांना हसून
पोळी-भाजी, भात ताजा
सग्ळे खावे माझ्या राजा
कोशिंबीर करकरीत
फळे मस्त रसरशीत
मजेत खावे सग्ळे मस्त
सोडून सारे वेडे हट्ट
घट्ट - मुट्ट होशील बघ
कोण कशाला चिडविल मग .....
-----------------------------------------------------