अन्नधान्य स्वस्त आहे
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
हृदयात उगाचच धाकधूक का होते
येणार्या मरणा तुझी चूक का होते
या अनेक छोट्या छोट्या आनंदांची
मोठ्या दु:खांनो चुकामूक का होते
कोणी शर्थीने होईना अपुलेसे
अन् कुणी आपले आपसूक का होते
मी रडताना हसतात मला जे त्यांची
मी हसतानाही करमणूक का होते
कुठल्या स्वप्नांनी उगम पावते वेडी
ही नदी मुखाशी पूर्ण मूक का होते
'बेफिकीर' पुढची पिढी पाहुनी कळले
की म्हातार्यांना भूक भूक का होते
-'बेफिकीर'!
हिरवळ गंधित ओली माती
कसे बालपण मी विसरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
एक सदनिका विकत घेतली
तेच वाटते अमाप वैभव
वाडा, अंगण कसे कळावे?
खुराड्यातले ज्यांचे शैशव
अंगणातल्या प्राजक्ताच्या
गंधाला श्वासात भरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
खिडक्या दारांना पडदे अन्
आडपडदेही मनात नव्हते
सार्यांसाठी गर्द सावली
कुठलेही घर उन्हात नव्हाते
टीव्हीवरच्या मालिकांतले
मुळीच नव्हते कधी दुरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे
लुगडे घेता वहिनीसाठी
नणंद त्याची घडी मोडते
चापुन चोपुन नेसुन होता
सर्वांच्या ती पाया पडते
विभक्त इथल्या कुटुंबात हे
अजून माजले नव्हते
===============================
शरदाचे चांदणे रात्री सोनियाच्या दिनी दिसते,
हातातल्या घड्याळाचे बारा अजून वाजले नव्हते
गॅस गहू नि गुळ सारे किती महागले होते
भुकेलेल्या मिळे न काही अजून भाजले नव्हते
पाण्यासाठी दौरे झाले आश्वासनेही बहु मिळती
तहानलेल्या पाणी कुणीही अजून पाजले नव्हते
कामासाठी खोदून रस्ता कामही झाले नव्हते
खड्ड्याचे या खोदक मात्र अजून लाजले नव्हते
काहींची मुळी खोड सुटेना खुर्चीस चिकटूनी बसणे
बुड त्यांचे काही केल्या अजून खाजले नव्हते
शांतीचा संदेश देई शांतीदूत वृक्षाखाली
अज्ञानी या दंगलखोरा अजून समजले नव्हते
उमलला मोगरा मंद
उमलला मोगरा मंद, कसा बेधुंद
वेली पाचूच्या ....
वैशाखी काहिली दूर, करी कापूर,
शुभ्र ज्योतींचा ....
उष्म्याचा होत आघात, रोज आकांत
उसळला पुरता ....
हा भलताचि स्वच्छंद, परि नि:संग
रात्रीतून फुलता.......
माळिती कुणी या शिरी, धरिती का उरी
तनू शांतवायाला ....
ज्योत्स्नेचा सहचर खुळा, परि कोवळा
भुलवी जगताला ....
ऋतुराजाचा सांगाती, गुंगली मती
कितीदा या वानावे ....
घ्या भरुनि ओंजळीतुनी, गंध भरभरुनि
सुगंधी न्हाऊनी जावे.....
मनातील भावना...
मनातील भावनांचा
समुद्र आहे शांत ..
आठवणींच्या लाटा अशा
उसळवू नकोस..
स्वप्न बनून माझी
झोप उडवू नकोस ..
मनाला झाल्या आहेत
ब-याच जखमा..
स्वप्नात येउन
अस्वस्थ करू नकोस..
पुन्हा पाणी दे, पुन्हा पाणी दे.......
तगमग या जीवांची विलयाला ने....
पुन्हा पाणी दे........
वाट पाहताना सारे जग झाले जुने
कोरडेच नदीनाले, आभाळही सुने
सरीतून अमृताच्या संजीवन दे....
पुन्हा पाणी दे........
स्पर्श तुझा परीसाचा जणू नवलाई
थेंबांतून डोकावेल गर्द हिरवाई
सृष्टीला या चैतन्याचा नवा रंग दे....
पुन्हा पाणी दे.........
नको लावू वेळ, आता तुटेल ही आस
उरामध्ये उरलेला, शेवटचा श्वास
रूप मेघाचे धारूनी कृष्णवर्णी ये ....
पुन्हा पाणी दे........
१) कधीकाळचे दाटून येते
डोळा पाणी....
आठवणींची हळवी ओली
स्मरता गाणी....
२) माणूस नामक गर्दी मजला
वेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....
३) अवघडलेपण येते मजला
अशाच वेळी....
सांगायाचे जेंव्हा तुजला
सारे काही....
४) मला कळाले आज अताशा
कविते विषयी....
उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
नेहमी हृदयी....
- समीर पु.नाईक
कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर ....
कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे,
केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे,
क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ) ''सुपार्या'' वाजविणे...
एके रात्री चंद्र वेडा
माझ्या घरी आला
'रोज असतोच सा-यांचा...
आज फक्त तुझाय !!!' म्हणाला
कित्येक योनींचं अंतर
त्याने क्षणार्धात कापलं
निखळलेल्या ता-याला
कस रे मानलस आपलं ?
त्याच्या-माझ्या विश्वामधल्या
गप्पा-गोष्टी झाल्या
'आतातरी कविता तुझ्या
ऐकव काही' म्हणाला
करुन पाहिली चालढकल
थोडी-बहुत आधी
चंद्रापुढे काजवे सांग
चमकतात का कधी ?
तेव्हापासून रुसलाय वेडा
गेलाय दूरदेशी
एक कवडसा प्रतिभेचा त्याच्या
विसरलाय माझ्यापाशी