आवाहन : कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : पुणे
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com
नमस्कार,
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com
नमस्कार,
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com
नमस्कार,
आपण जरा बोलूयात का ?
एकमेकांशी ही स्पर्धा जरा वेळ थांबूयात का ?
ही स्पर्धा ना तुझी - माझी
ही स्पर्धा आहे इर्षेची
नकळत साचलेल्या अभिमानाची...
ही इर्षा हा अभिमान जरा
बाजूला ठेवूयात का ?
कधी तरी हात धरला होता,
तसाच हात पुन्हा धरुयात का ?
हात हातात होते
स्वप्नं डोळ्यात होते...
स्वप्नांमागे धावताना हात सुटल्याचे भानच नव्हते
एकमेकांसोबत बोलतांना
कधी शब्द मूके व्हायचे...
अव्यक्त होऊन सुद्धा
आपले हितगूज चालायचे...
हितगूज नाही पण
जरा व्यक्त होऊयात का ?
हरवलेले शब्द पुन्हा एकदा शोधूयात का...
तुझा - माझा दुरावा...
आपल्याला जाणवत नाही ...
आपल्यातला अबोला
रात्र झाली, सावलीचा राहिलो नाही
आपल्याही मालकीचा राहिलो नाही
कृष्ण झालो देवकीचा राहिलो नाही
राम झालो जानकीचा राहिलो नाही
एकटेपण वाढले गर्दी जशी वाढे
मीच माझ्या ओळखीचा राहिलो नाही
एव्हढी तर पातळी मी गाठली आहे
की जगाच्या पातळीचा राहिलो नाही
चार भिंतीआत माझी धावपळ चाले
पहुडलेल्या ओसरीचा राहिलो नाही
जाहला आहेस तू बंदिस्त गाभारी
मी म्हणूनच पायरीचा राहिलो नाही
तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही
चेहरा झाकायचा तर पाउले उघडी
तू दिलेल्या चादरीचा राहिलो नाही
स्मृतिपटलावर वार्धक्याच्या वेदनाच वावरते
सर्व चांगले विसरुन जाते, नको तेच आठवते
लिहून नुसते भाकरीवरी पोट कधी का भरते?
विद्रोही कविता का लिलया जळत्या भुकेत फुलते?
श्रीमंतांच्या श्वानांनाही खाद्य चांगले मिळते
मुले कुपोषित गरिबांची का? शल्य मनाला छळते
नको पसारा वृत्त, काफिया, लगावली, मात्रांचा
नवकवितेची आशयघनता छंद नसोनी भिडते
काळी लैला का आवडली? मजनूला ते ठावे
तर्क लढवुनी आपण म्हणतो "प्रेम आंधळे असते"
गातो कोकिळ तरी कोकिळा भाव खाउनी जाते
"गान कोकिळा" शब्द कसा मग? विचारायचे नसते
घरात एका अनेक भिंती नात्यानात्यांमधल्या
तिर्हाइतासम सर्व नांदती, कोण कुणाला पुसते?
पुरेशी येत नाही कल्पना त्याच्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची
बरे केलेस माझे कापले तू पंख आयुष्या
भरारी मारली होती खुल्या-ताज्या विचारांची
मजेने झोपला आहे नका जागे करू त्याला
जगाला वाट्ते धास्ती ख-या त्याच्या विचारांची
सरळ रस्ता पुढे होता जरी....उजवीकडे वळले
घरादारास वाटे मी तरी डाव्या विचारांची !
जगामध्ये तिच्या भोळ्या मनाच्या चिंधड्या झाल्या
हवेमध्ये विखुरली लक्तरे साध्या विचारांची
नकाराने छुप्या त्याच्या पुरी विच्छिन्ऩ झालेली
मनाने बांधली मोळी खुळ्या-सा-या विचारांची
-सुप्रिया.
तरही गझल ह्या धाग्यासाठी डॉ. कैलास गायकवाड ह्यांचे व ह्यावेळच्या मिसर्यासाठी वैभव कुलकर्णी ह्यांचे मनापासून आभार! माझा नम्र सहभाग खालीलप्रमाणे:
गझल अजून अपूर्ण आहे व कदाचित एक दोन शेर (जे मनात घोळत आहेत) ते ह्यात वाढू शकतील.
-'बेफिकीर'!
=============================
उजाडू लागली आहे अमावास्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची
पुन्हा वस्तुस्थिती देईल सल्ला पोक्त होण्याचा
पुन्हा भासेल टंचाई मनी तान्ह्या विचारांची
मनाचे बेट निमिषार्धात ठिकर्या होउनी उडले
तुझ्या डोळ्यात आली लाट जी खार्या विचारांची
मनाचे सर्व बिंदू टाकले कैदेत शब्दांच्या
खोटे हसणे जमले नाही काय करावे
येथे रमणे जमले नाही काय करावे
दु:खांना भिडलो आम्ही डगमगलो नाही
मागे हटणे जमले नाही काय करावे
इतका हरलो की जगण्याचे दडपण येते
डोळे मिटणे जमले नाही काय करावे
शब्दांचाही गुंता होता बावरलो मी
अलगद सुटणे जमले नाही काय करावे
समजत नाही मागायाचे कोणासाठी
नाती जपणे जमले नाही काय करावे
'स्वानंदा'चे झाले स्वागत सुरवातीला
शेवट करणे जमले नाही काय करावे
-----------------------------------------------
हा रिमझिम झरता श्रावण होतो भास तुझा
हा मातीचा गंध की दरवळला श्वास तुझा......
बहर फुलांचा येता भरते नभ गंधाने
हृदयी आठवणींचा दाटून सुवास तुझा......
ती उन्हात कुणा आधार तरूची छाया
भासत होता तैसा मज हा सहवास तुझा......
तू आता मज म्हण अपुला या झिडकार मला
राहीन बनूनी जन्मभरी मी दास तुझा......
दिशांनो सज्ज व्हा पेलायला ताज्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची
जश्या फुटतील पारंब्या तसे फोफावुनी झाले
मुळे रुजतात का पाहू सरळसाध्या विचारांची
फुलवणे रंग भरणे गंध भरणे ही तुझी किमया
फुले वाहू न शकलो मी फुलुनआल्या विचारांची
जसा चाले कुणी हत्ती तसे चालायला बंदी
मनाची चाल उंटाचीच तिरफाट्या विचारांची
मला बोलायचे थोडे.... तुलातर फार थोडेसे....
कधी जमणार गट्टी दोन मितभाष्या विचारांची
विकासाच्या सुगीमध्ये 'इमारत' होत गेल्याची
व्यथा अपुलेपणाला पारख्या 'वाड्या -विचारांची'
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची