काव्यलेखन

म्हातारा गाव

Submitted by सुनीता करमरकर on 15 August, 2012 - 07:54

गावाकडे खूप वर्षांनी गेलो, पाहिले
गाव म्हातारा झाला होता.
मित्र गेले भरलेल्या शहरात,
गाव रिकामा झाला होता.

जिथे होता पार वडाचा ,झाला तिथे बार,
तिन्ही सांजेला, उघडते ज्याचे दार.
नेट काफे ने भरल्या गल्ल्या नि,
खेळ झाले होते हद्दपार.

नवीन काही झाली होती हॉटेल्स,
अन, गर्दीने वाहत होते मॉल.
मोबाईल कानाला लावून ,
लोक घेत होते कॉल .

धुळीचे रस्ते नि नागमोडी वाटा,
तुडवल्या ज्या कधी, त्या पुसून गेल्या.
रस्ते झाले होते, जरी गुळगुळीत,
आठवणी मात्र, माझ्या रुसून गेल्या.

जिथे कधी सगळ्या नजरा होत्या अपुल्या,
अनोळखी नजरा मला चावत होत्या,

शब्दखुणा: 

संपुर्ण जन-गण-मन

Submitted by उदयन.. on 15 August, 2012 - 02:42

नेट वर भटकंती करत असताना अचानक "जन-गण-मन" राष्ट्रगीताचे संपुर्ण गीत मिळाले..
आपण जे राष्ट्रगीत गातो ते फक्त पहिलच कडव आहे.. संपुर्ण गीत हे ५ कडव्यांनी मिळुन बनलेले आहे
या स्वातंत्र्य दिना निमित्ताने आपल्यासाठी. : .........
.

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे........!!

अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिंदु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी

माझं नाव जर दाद असतं

Submitted by Kiran.. on 14 August, 2012 - 11:36

ज्यांच्या शब्दांनी निर्भेळ आनंद दिलाय त्यापैकी काही प्रतिभावंतां प्रती थोडीशी कृतज्ञता :).

माझं नाव जर दाद असतं
हसले असते शब्द आणि
बनले असते ललित शुचिर्भूत होऊन
गाणं देही भिनलं असतं
गानभूलीत झुललं असतं

माझं नाव जर ट्युलिप असतं
अलवार शब्दांची मैफील माझ्या
झोपडीत भरली असती..
हळुवार ललित नि उत्कट कविता
रेगिस्तान मे बहार होती

जर मी असतो धुंद रवी
तरल असता किबोर्ड माझा
धुंद होतानाही आले असते डोळे भरून
आणि लगेच आसमंत
हसला असता पोट धरधरून

माझं नाव जर कौतुक असतं
अष्टपैलू ही ओळख असती
रहस्य हासू, विडंबनं, कविता
अवती भवती नांदत असते

अवचित

Submitted by अज्ञात on 14 August, 2012 - 11:26

झुलले मार्दव झरल्या अगणित; झुळझुळल्या पागोळ्या
एकांती निश्वासांचे झाले अवचित स्वर गोळा
ओठात कुणी पोटात कुणी हृदयात सजविल्या कुणी गंधमय रांगोळ्या
अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा

रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके
वडवानळ झाली पाणी जाळित अंतरातली ज्वाळा
पुंकरले बावरले आठवल्या निखार्‍यातल्या वेळा
पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा

..........................अज्ञात

"दिखाई दिये यु, के बेखुद किया - गाण्याचा अर्थ

Submitted by mansmi18 on 14 August, 2012 - 11:09

नमस्कार,

नुकताच खय्याम यांच्या गाण्यांवर आधारीत "एसेन्स ऑफ गंधार" हा कार्यक्रम पाहिला. त्यात "दिखाई दिये यु, के बेखुद किया.." हे बाजार चित्रपटातील लताचे गाणे ऐकले. या गाण्याचा अर्थ लिहाल का?
मी नेटवर शोधले त्यात काहीनी अर्थ लिहिला आहे..पण इथल्या "दर्दी" लोकांकडुन ऐकायला आवडेल.

धन्यवाद.

स्वप्नातले गाव

Submitted by प्रकाश कर्णिक on 14 August, 2012 - 03:46

निरभ्र निळ्या आभाळाच्या छताखाली
तेथे वसले होते एक छान गाव
त्याला द्या तुम्ही कोणतेही नाव

होती जात गावामधून अरुंदशी वाट
घेत असे ती आढेवेढे आणि मधूनच पळे सुसाट

प्रत्येक वळणावर असे सुंदर एक फुलझाडांची बाग
कुंपण नसलेल्या घरांभोवती सतत तिची जाग

दूर आकाशाच्या किनारी दिसे अवाढव्य डोंगर
त्याच्यावरच्या देवळामध्ये नेहमी असे जागर

एका बाजूच्याशेतामध्ये उभे मोठे चिंचेचे झाड
चंद्र त्याच्या आडोशाने म्हणे माझे चित्र काढ

हि तर आहे नदी वाहती तिच्या काठी औदुंबर
त्याच्या आश्रयाला आहे अनेक पक्षांचे माहेरघर

उसाच्या मळ्यातून चालते आहे पांढ ऱ्या बैलांची जोडी

शब्दखुणा: 

गुढ

Submitted by vedangandhaa on 14 August, 2012 - 02:23

दिवसेंदिवस वाढतेय
खर्‍या खोट्या
प्रश्नचिन्हांची जटिलता...
आयुष्याचे झालेले वाळवंट....
अन सुखाचा झालेला अंत.
सत्याला लागलेले ग्रहण
दुष्टांचा विजय..
अन सतीचा आकांत.
दु:खाची दि़क्षा
विस्कटलेले जीवन
विश्वासाने केलेला घात............
अन सीतेची अग्नीपरीक्षा....
करूणाघणही झाला पाषाण
डोळ्यातले आटलेले झरे
धर्मियांनीच अधमपणे
असत्याचे धरलेले
उंच उंच निषाण.....................

सौ.विनीता ल. पाटील.

कुणी मला हेटाळले कुणी मला फ़ेटाळले.

Submitted by सुधाकर.. on 13 August, 2012 - 14:15

कुणी मला हेटाळले कुणी मला फ़ेटाळले.
मनासाठी विरंगुळे, मी पुस्तकात चाळले.

घर माझे इथे जेंव्हा निंदकांनीच जाळले
अनाठायी सुख माझे, त्याच वणव्यात पोळले.

अशी काय झाली आज या उजेडाला बाधा
की,तमाच्या लोभाने, दिवे सारे विटाळले.

गेल्यावर सोडून तू एकाकीच मला येथे
नभानेही चांदण्यास, गा आसवांत ढाळले.

दूर कुठे दिठीआड, सुख माझे झोपलेले
मीच माझे दु:ख इथे, चंदनाशी उगाळले.

माणसाच्या ठायी मी दैत्य जेंव्हा पाहीले
माणसाच्या स्थळी अता, जाण्याचे मी टाळले

दिली तुला दान सारी माझी मी ही जिंदगी
तरी कसे दुज्यावरीच, खुळे मन तुझे भाळले.

वागू नकोस अशी तू माणसाच्या नियतीसम

शब्दखुणा: 

तुझे रंग..

Submitted by अमेलिया on 13 August, 2012 - 12:40

तुझ्या रंगांचं एक बरंय
ते झेलणारी फुले आहेत त्यांच्याकडे
स्वतःचं अस्तित्व विसरून
रंगच होऊन जाणारी..

आणि मग भिजली दवांत
की लाजणारी, जपणारी तुझ्या रंगांना
हळुवार पाकळ्यांत
डोलणारी, झुलणारी तुझ्या कवेत

मलाही होता आलं असतं
तुझ्या रंगांत न्हालेलं एक फूल
तर किती छान!

मग भेटले असते मी तुलाच
तुझ्यातून
अन हसला असतास तू
माझ्याच आतून

खरंच तुझ्या रंगांचं हे फार बरंय
अस्पर्श कळीलाही माझ्यामधल्या
भास देतात ते फुलाचा!

शब्दखुणा: 

येईल ती..

Submitted by भारती.. on 13 August, 2012 - 09:37

येईल ती..

येईल ती तुझ्या घरी
..यायचेच कधीतरी!
येईल ती दूरातून
भेटण्यास उराउरी

वाट तिची पाहत पण
घालू नको येरझार
विसर सखीचे येणे
विसर सखीलाही पार

विसरुनही सरते का
पुरतेपणी दु:ख जुने
असतेच सभोती ते
साथ करत मूकपणे

येणारच ठरले ना
येईल ती राहील ती
उशीर जरा करण्याची
सवय कुठे जाईल ती

जन्मदीर्घ-सा प्रवास
खडतरशा वाटेवर
शिणली तर त्यागीलही
जडशीळसा देहभार..

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन