आकाशाशी नाते जोडते ..
झाड वाट पहातय ..
सर्व पक्षी उडून जाण्याची .
एकही पक्षी नसल्याच्या
एकांताची ..
केव्हातरी उडून जातात काही पक्षी..
नवे येत रहातात काही .
नवेही जुने होतात ,घरटी बांधतात ..
नि ते ही जातात उडून
पण, झाड काही मोकळे होत नाही ..
येत रहातात नवे,जुने पक्षी पुन्हा पुन्हा ..
चुकून येते अशी वेळ कधीतरी ;
खूप पक्षी उडून जातात ..
मग उरलेले काही ..
नि शेवटचा पक्षीही फडफडवत पंख ..
आकाशगामी होतो.
झाड घेते मग खोल श्वास ..
नि सुस्काराही सोडते .
नि पकडू पहाते हवा असलेला एकांत ..
पुन्हा तेच होते ..
क्षणाच्या चिमटीतून निसटून जातो ..
एकांताचा पारा .
निश्वास बुजल्यासारखा अन श्वास थिजल्यासारखा
जो-तो इथे जगतो असा नुकताच विझल्यासारखा
देवा अश्या देवू किती अवघड परीक्षा सारख्या...
केव्हातरी वागव जरा मी पास असल्यासारखा
घुसमट नकोशी वाटते होईन म्हणते मोकळी...
तू ही बरस ना पावसा धरबंध सुटल्यासारखा
सावत्र बापासारखा का वागशी रे जीवना
केल्या चुका, झाल्या त्रुटी गावीच नसल्यासारखा
रेंगाळताना चांदवा दिसतो घरावर आजही...
धुंडाळतो प्रेमास त्या प्रेमात पडल्यासारखा
हातातल्या रेषेवरी आयुष्य ठरवावे कसे...
मृत्यू अचानक गाठतो भाकीत चुकल्यासारखा
-सुप्रिया.
प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे |
नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे ||
परमेश्वरा , अरे अनादी अनंत बसला आहेस तिथे .. हजारो , कोटी कोटी रूपे तुझी
प्रेमात पडलोय तुझ्या .. किती रुपात पाहू ? कसाही तुला जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तरी तू अपूर्णच भासतोस रे
तुझ्या प्रेमात पडायची हिम्मत केलीये ... जिथे तुकाराम, ज्ञानेश्वर , मीरा , शबरी यांचा कस लागला .. तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा
तुझी भक्ती करायची.. कशी.. काय .. काहीच ठावूक नाही रे .. मी अगदी नवखा आहे ..
तू नक्की आहेस तरी का , माझी प्रार्थना ऐकतोस का हे हि ठावूक नाही
जे कधीच नव्हते माझे, आले कळल्यावरती
बघ, झालो होतो सर्वांचा मी जळल्यावरती
हे जीवन म्हणजे नुसती शोभा नाही काही
हे कळेल केंव्हा? सारी गात्रे गळल्यावरती ?
दु:ख कुणाला होते तर होतो आनंद कुणा
बघ, ताव मारला जातो वड्यांस तळल्यावरती
वंशज एकदिलाने वावरले समोर माझ्या
अन वाटे पडले पाय जरासे वळल्यावरती
कुणी एवढे दु:ख कशाला सहन करावे ? का?
समजेल तुलाही 'अजय' स्वतःला छळल्यावरती
जे कधीच नव्हते माझे, आले कळल्यावरती
बघ, झालो होतो सर्वांचा मी जळल्यावरती
हे जीवन म्हणजे नुसती शोभा नाही काही
हे कळेल केंव्हा? सारी गात्रे गळल्यावरती ?
दु:ख कुणाला होते तर होतो आनंद कुणा
बघ, ताव मारला जातो वड्यांस तळल्यावरती
वंशज एकदिलाने वावरले समोर माझ्या
अन वाटे पडले पाय जरासे वळल्यावरती
कुणी एवढे दु:ख कशाला सहन करावे ? का?
समजेल तुलाही 'अजय' स्वतःला छळल्यावरती
गझल
फळे चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला फुलण्याचा!
घोट घोट मी अश्रू प्यालो, स्वाद समजला जगण्याचा!!
विरंगुळ्याला तुला नेमका हवाच होता कुणी तरी;
सोस तुलाही हसण्याचा अन् सोस मलाही फसण्याचा!
पंख मिळाले सोनेरी; पण...हाय, गगन मी गमावले!
वरदानाच्या वेषामध्ये शाप मिळाला झुरण्याचा!!
सांग पाखडू कसे सुखाला? सुखासारखे दु:ख दिसे;
पाखडताना पाठ वाकली, बेत बिनसला दळण्याचा!
वाचवणारा थिटाच पडला, बलाढ्य ठरला बुडणारा!
बुडणा-याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा!!
एक चेहरा, रंग परंतू किती त-हेने पालटतो!
घोर लागला त्यास केवढा, असण्यापेक्षा दिसण्याचा!!
उंदीरमामांची फजिती.......
उंदीरमामा चालले होते इकडेतिकडे पहात
धपकन पडले एकदम, नि चरफडले मनात
बघतात खाली चमकून ते आले काय पायात
टिकलीची डबी लाल निरखत घेऊन हातात
टिकल्या पाहून तोंडाला पाणी सुटले जोरात
खाऊ लाल वाटला त्यांना, घेऊन आले बिळात
दाताने उकरताना गेल्या एक्-दोन तोंडात
चावून चावून तुटत नाहीत काय करावे अशात
आतला खाऊ मिळेल कसा विचार केला मनात
घेतला एक दगड आणि फोडली पुढली जोशात
धाडधूम आवाज झाला छोट्याशा बिळात
मामा बिचारे घाबरुन आईकडे बघतात
अन्नपुर्णेश्वरी तुझी आरती गातो
घास मुखी घेताना तुझे नाम मी घेतो ||धृ||
व्याकुळलेली सृष्टी जेंव्हा निजदृष्टी दिसली
काशी तिर्थावरी तेंव्हा गौरी प्रगटली ||१||
चराचरावर आई तुझे कोटी उपकार
विन्मुख दिसता कोणी सत्वर होशी साकार ||२||
भुकेजल्या जीवांच्या मुखी भरवीशी घास
तुझ्या कारणे चाले अवघ्या अवनीचा श्वास ||३||
तू मायेचा सागर अवघे चैतन्य तूचि
शाम विनवितो आता सकळा सुख वैभव देशी ||४||
.......................................................................................
कधी काळ आपला नाही म्हणून
कधी लोक आपले नाहीत म्हणून
कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी आधार सापडले नाहीत म्हणून
कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून
कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून
कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून
कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून
कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी वारसा खोटाय हे समजलं म्हणून
कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून
कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून