मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
#कविता
अधुरं प्रेम
प्रेम नाही म्हणतेस मग गालात का हसतेस
जरा काही बोललं की रुसून का बसतेस
शब्द देतात नकार तुझे डोळे मात्र वेगळच बोलतात
सूर्याकडे पाहून जणू सूर्यफूल डुलतात
प्रेम नाही म्हणतेस मग लाडात का येतेस
लालचुटुक ओठांनी आमंत्रण का देतेस
कसं सांगू तुला किती प्रेम करतो मी
तुझ्या डोळ्यात पाहताच स्वतः ला विसरतो मी
दुःख जरी तुझं असलं डोळे मात्र माझे रडतात
तुला खुशीत पाहून माझे सुध्दा गाल हसतात
माझ्या इतकं प्रेम तुझा साजण तरी करतो का ग
तुझे आश्रु टिपण्यासाठी रुमाल तरी धरतो का ग
खूप झालं प्रेम आता दूर जायला हवं
एक कवी
नखशिकांत भिजतात पावसात वेदनांच्या
गुंफतात भाव-भावना मैफिलीत शब्दांच्या
एकांतात कुठे कुरवाळतात कवी दुःखाना
जाहीर प्रदर्शन मांडतात सभेत प्रेक्षकांच्या
वेळ त्यांचा संपूर्णपणे समर्पित एकांताच्या
चित्त त्यांचे सदा अधीन इंद्रधनू कल्पनेच्या
लेखणी वेगवान पळते पवनापरी जेधवा
मन घाली प्रदक्षिणा भ्रमरापरी वसुंधरेच्या
यत्न करुनी थकल्या मेनका नानापरीच्या
तरी न भंगते विश्वमित्रापरी कवींची तपस्या
निश्चल असते ध्येयाप्रती त्यांची मानसिकता
काय करणार तिथे अप्सरा स्वर्गलोकाच्या
© अक्षय समेळ
निशाणी
निशाणी
तुकडे करण्या आले तेव्हा पाणी झालो
गाडले तरी मी रत्नांच्या खाणी झालो
ती गळचेपी चालू होती स्वातंत्र्याची
मी पंचाहत्तरची आणीबाणी झालो
मीच महाराष्ट्राच्या कंठी कंठी वसतो
गोंड वऱ्हाडी मालवणी अहिराणी झालो
कर्मकांड करुनी धर्माचा श्वास कोंडला
खरा धर्म वदण्या संतांची वाणी झालो
संकटात शिकलेल्यांच्या हाती कॅमेरा
मदत तयांची करुनी आज अडाणी झालो
परंपरा अन् इतिहासाला जपण्यासाठी
सनवाराची , जात्यावरची गाणी झालो
अवघा भारत शिवरायांचा झाला जेव्हा
अटकेवरची भगवी एक निशाणी झालो
एक विलक्षण कविता - असाध्य वीणा / अज्ञेय
आषाढ
आधी आषाढीचा दिन
त्यात चंचल हे मन
लई घालीते गोंधळ
आवरता आवरे न
ढग काळे नभामधी
थेंब-थेंब पाणी बांधी
थेंब पडता धरणी
कशी सुगंधाने गंधी
गंध मनी दरवळे
मन पळ-पळ पळे
आता इथं आता तिथं
काय ते न मज कळे
ढग घालती सावली
किरणे सूर्याची ही आली
ऊन पावसाचा मेळ
असा पहा इथे चाली
कधी सूर्याचा ही पारा
अन पावसाच्या धारा
आषाढ मना भुलवते
खेळ ऋतूचा हा सारा
मनाचे खेळ..
कधी कधी वाटते आभाळ असावे
भरून आले तर कोसळुन जावे...
कधी कधी वाटते झाडाचे पान व्हावे शिशिर ऋतूत
गळून जावे..
कधी कधी वाटते पावसाचा थेंब व्हावे आणि
मातीत मिसळून जावे...
वाटते कधी कधी असतील का त्यांनाही भावना...
करत असतील का ते ही कल्पना...
असेल का त्यांनाही मन
की,
भावना,संवेदना,कल्पना ह्या फक्त आपल्याला देवाचे दान..
पण कधी कधी वाटते मन असणे हे अभिशाप की वरदान...
छोटेसे घरों में सपने...
पहिल्यांदा हिंदीत कविता लिहिली आहे.
व्याकरणात काही चुका असल्यास नक्की सांगा.
छोटेसे घरों में सपने ...
छोटेसे घरों में सपने अक्सर ही बडे होते है !
कुछ करके ही मानेंगे इस जिद पे अडे होते है !
आजादी के दिन झंडे हम उँचे तो रखते है ,
क्यों अगले दिन देखो तो रस्ते पे पडे होते है !
जल्दी में खरीद ना लेना ये दिल भी फलों के जैसा ,
जो उपरसे चमकिले अंदरसे सडे होते है !
अब झूठ के दर पर ही है भीड दिखाई पडती ,
सब सच के रस्ते पर क्यों मुश्किल से खडे होते है !
वाली
वाली...
का?आपल्यांनी चालल्या चाली पुन्हा !
पाठीस मीही बांधल्या ढाली पुन्हा !
दिसले तुला ते काल माझे हासणे,
सुकणार माझी आसवे गाली पुन्हा !
ठोठावते सुख आज माझे दार पण,
माझ्याच चुकचुकल्या बघा पाली पुन्हा !
माथी उन्हे पण झाड मी हिरवे जरी
झडणार मग त्या आतल्या साली पुन्हा !
जातो अता घेवून माझी वेदना,
शोधाल मग जखमेस त्या वाली पुन्हा !
सोहळा...
सोहळा
तो आरसा सांगे मला तू एकटा नाही अता !
नसते कधी जग आपले तू ये तुझ्या कामी अता !
ते वारही झाले जुने पाठीत मी जे सोसले ,
जखमांतही नाविन्य दे दे वेदना ताजी अता !
फसवायचे जर का मला नुसतेच तू कर एवढे ,
ढाळून खोटी आसवे हासून घे गाली अता !
ते आपले होते कुठे ? सोडून जे गेले पुढे ,
माझा मला मी सोबती चालावया राजी अता !
चोरी, दरोडे, खंडणी खोटेच त्याचे बोलणे ,
साधासुधा ना राहिला नेताच तो भावी अता !
ही आठ चाकी पालखी ही राजगादी पांढरी ,
भोगायचा आहे मला हा "सोहळा" शाही अता !