ह्या कथानकावर कोण किती विश्वास ठेवेल हे मला माहीत नाही, आणि ठेवावा असा माझा आग्रहही नाही. पण जे काही घडले ते माझ्या साठी नक्कीच अद्भुत होते. निसर्ग मनकवडा असतो का? Man Desires - Universe Conspires हे जे म्हणतात ते कितपत खरे आहे? अनेक प्रश्न आणि उत्तरे मात्र शून्य. इयत्ता ७ वी पासून मी अव्याहत हिंडतो आहे. पण गेली ५ वर्षे म्हणजे सुवर्णकाळ. गड, किल्ले, डोंगर, घाट हे जीवनातले महत्त्वाचे घटक झाले. रोटी, कपडा, मकान प्रमाणेच बॅकपॅकिंग आणि ट्रेक्स ही जीवनातली मूलभूत गरज झाली. जे मित्र भेटले ते ही सर्व असेच. पायाला सतत भिंगरी लागलेली. मग त्यातूनच Private Wilderness ही संकल्पना उदयास आली.
जलाशयांची रेलचेल असलेल्या लोणावळ्याच्या आसपास मुक्कामी डोंगरयात्रा करणार्यांना पर्वणी असलेले किल्ले आहेत, त्यापैकी लोणावळ्याहून ३०-३५ किमी. वर असलेल्या घनगड- तेलबैलाची रांग कित्येक दिवसांपासून चिन्मय व माझ्या डोक्यात होती.
प्रचि १
मुलुंडची चक्रम हायकर्स संस्था १९८३ पासून दर २ वर्षांनी सह्याद्रीरांग परिसरात ५ दिवस मनसोक्त भटकण्यासाठी 'सह्यांकन' मोहिम आयोजीत करते. या वर्षी सह्यांकनचा मार्ग होता, मोरोशीचा भैरवगड-नळीच्या वाटेने हरिश्चन्द्रगड- शिरपुंज्याचा भैरवगड- घनचक्कर- रतनगड. एवढा भन्नाट चान्स कोण सोडेल?..............
सह्यांकनबद्दल अधिक माहितीसाठी...
http://www.chakramhikers.com/activities/major.html
*************
आमच्या ५ व्या बॅचचे लिडर्स- विनय नाफडे व विनय कुलकर्णी
इथला पसंतीचा दर्शनसमय सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणताही आहे. मोबाईल फोनचित्रकास प्रकाशचित्रण शुल्कही नाही, इतर स्थिर आणि चल-चित्रकांस मात्र ते लागू आहे. जवळचे रेल्वेस्थानक हावरा आहे तर जवळचे मेट्रो स्थानक एस्प्लनेड. इथे श्यामबाजार, राजाबाजार आणि धरमतल पासून ६१, ६१अ, ६२ या सीटीसीच्या बसेसमधून पोहोचता येते. बघायला किमान ४५ मिनिटे वेळ तरी हवाच. वनस्पतीशास्त्रातील अभ्यासकांना मात्र कितीही वेळ असला तरी पुरेसा ठरेल अशी खात्री देता येणार नाही.