नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)
नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)
रात्री झोपायला उशीर झाला. (केला!) परिणामी तिस-या दिवशी सकाळी उशीरा उठलो. खिडकीतून हलणा-या पाण्याच्या ऐवजी एक भिंत दिसत होती. बोट कोणत्यातरी बंदरावर लागली होती. पटकन अवरले आणि डेक वर आलो. बोट तोवर समुद्रात घुसली होती. आजचा समुद्र थोडा अवखळ होता. एखाद्या बागडणा-या मुलासारखा. आज लाटा दिसत होत्या. एका बाजूला दूरवर जमीन आणि दुस-या बाजूला क्षितीजापर्यंत पसरलेले पाणी.
कृष्णगिरी उर्फ कान्हेरी... बोरीवली. मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग. म्हणतात की लोकल रेल-वे म्हणजे मुंबईची जीवनरेखा.. पण खरेतर हे राष्ट्रीय उद्यानच मुंबईची जीवनरेखा आहे. हे जंगल नसते तर मुंबई-ठाणे आणि आसपासच्या परिसराची प्रदूषणाची पातळी कित्ती वाढली असती ह्याचा अंदाज देखील येणार नाही. ह्या उद्यानात प्राण्यांच्या आणि माणसांच्या दृष्टीनेही उजाडायच्या आधी आणि मावळल्यानंतर प्रवेश बंद असतो. आत मध्ये राहायचा तर प्रश्नच नाही. असे असतानाही जर मी ह्या ब्लॉगपोस्टला हे नाव दिलेले पाहून तुम्हाला जरा आश्चर्याच वाटले असेल नाही???
नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)
सकाळी दहाला आम्ही धक्क्यावर पोचलो. ’हार्तिग्रुतेन’ तिथे आधीपासूनच आमची वाट पहात होती. बोट कसली एक शहर होते ते सातमजली. त्यात हॉटेल होते, चित्रपटगृह होते, रेस्टॉरंट होते, वाचनालय होते. (मला भावलेली गोष्ट म्हणजे वाचनालयात एक रंगपेटीही होती, चित्रे काढायची सोय होती), आणि सगळ्यात महत्वाचे खिडकीतून दिसणारे दृश्य प्रत्येक क्षणाला बदलत होते. कल्पनेपेक्षाही सुंदर होत होते. बोटीत प्रवेश करताच हे सारे पाहून मी तर भारावूनच गेलो.
भटक्या मायबोलीकरांचा भटकंती गटग करुया असे म्हणता म्हणता दोन तीन ट्रेक्स झाले.. पण सगळ्यांना एकत्र येण्यास जमेल तर शप्पथ.. असाच आतापर्यंतच्या आमच्या ट्रेक्सला मुकलेला पुण्याचा 'आशुचँप' आम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होता.. तो अचानक मुंबईत आला.. अचानक त्याचा फोन आला.. नि विकेंडला काहीच प्लॅन नसताना अचानक रविवारी सकाळी कुलाब्याचे "सागर उपवन" गाठण्याचे ठरले.. पण अचानक प्लॅन चेंज झाला नि शेवटी आदल्या रात्री ठरले बोरिवलीच्या "नॅशनल पार्क" (संजय गांधी उद्यान )मध्ये भेटूया.. साहाजिकच सर्वात जास्त आनंद बोरिवलीकराला झाला होता.. एकतर सकाळीच ६.३०-७ च्या सुमारास भेटण्याचे ठरले होते..
मार्च पर्यंतच सगळे महत्वाचे ट्रेक सुखरुप पार पडले होते... उन्हाळ्याच्या दिवसात सह्याद्रीतील ट्रेक म्हणजे फारच खडतर काम असते... तोरणा-राजगड करून महिना उलटला होता... संधन व्हॅली, उल्हास व्हॅली हे सोप्या कॅटेगीरी मोडणारा ट्रेक करायचा कट शिजला होता... पण शिजलेला कट उधळण्यास वेळ लागत नाही.
झाले ही तसेच... दिनदर्शिका चाळताना सोमवार १८ एप्रिलला चैत्र पौर्णिमा येत असल्याचे निर्दशनास आले... लगेचच मी शनिवार १६ अप्रिलच्या moonlight trekचे सुतोवाच भटकंती कट्ट्यावर केले... तरी जायचे कुठे या वर मात्र प्रश्णचिन्हच होते...
"गोरखगड!" तो प्रश्ण Yo Rocks ने सोडवला.
ह्या ठिकाणी काहीतरी लिहीण्याची संधी किंवा वेळ ही तब्बल ३ वर्षांनी येतीये :-), चालायचंच. गेली ३ वर्षे आयुष्यातल्या मोठ्या बदलाशी हातमिळवणी करण्यात गेली. Considering the total life span this seems negligible but as of now it is significant. मध्ये १-२ दा छोट्या छोट्या ट्रिप्स केल्याही पण लिहिण्याजोगं असं फारसं काही नव्हतं त्यामध्ये आणि माझ्यामते त्या ट्रिप्स नव्हत्याच. ट्रेकला जाउन तर तब्बल ६ वर्ष झाली आहेत. ह्यासगळ्यामुळे जीवाची नुसती घालमेल चालु होती. छोट्याश्या कारणाने राग अनावर होणे.
ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज
नमस्कार,