दिवाळीनंतर, गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. मुक्काम bambolin beach या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. तिथे जाणे-येणे बहिणीच्या कुटुंबा बरोबरच होणार, पण तिथे पाहाण्याजोगे काय?, जवळची ठिकाणे, हे ठिकाण येथे कुठे, असे अनेक बेसिक प्रश्न आहेत. तसेच लहान मुलांसाठी चांगली ठिकाणे कोणती? हॉटेल व्हेज- नॉनव्हेज इ.
जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
भेटीचे ठिकाण: कलावंतीण सुळका
दिनांक: १३ ऑक्टोबर २०१२
भटके: दोनच. मी स्वतः सपत्नीक.
पहाटे चारचा गजर झाला. आम्ही दोघेही झटकन उठलो...
....कुर्ल्याहून ५.०७ ची पनवेल लोकल पकडली आणि ६ च्या सुमारास पनवेलला पोहचलो. ठाकूरवाडी ला जाणारी बस ६.५५ ला होती. मात्र आम्ही ६.२० ची मोपाडा (मोहोपाडा असावी) ला जाणारी बस पकडून, २० मिनिटांत शेडूंग फाट्याला उतरलो. (रू.८/-एकाचे).
तिथून एका ऑटोवाल्याने आम्हाला पुढच्या दहा मिनिटांत ठाकूरवाडीला पोहोचवले. (रू. ८०/-दोघांचे).
माणसाने कितीही प्रगती केली ...तरी त्याला ह्या निसर्गा पुढे मान झुकवावी लागतेच ..हतबल ह्वावेच लागते...दुसरा पर्याय हि नसतो आपल्याकडे त्याच्या त्या भव्य दिव्य शक्तीपुढे ... ह्याचा प्रत्यय काल आम्हास आला .. पूर्ण तयारीनिशी कुलाबा किल्ल्याकडे आम्ही सगळे रवाना झालो. पहाटे ७ ची गेट वे वरून फेरी बोट पकडून ..
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट. ऑफिसच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आठवडाभर नाशिकमध्ये होतो. देवही आम्हा ट्रेकर्सच्या बाबतीत कधी कधी अगदी मेहेरबान होतो. यावेळी मेहेरबानी झाली ती प्रोजेक्टच्या ठिकाणावर! यावेळी कॉलेज होते ते अंजनेरी गावापासून जेमतेम दोन किमीवर! समोर अंजनेरी किल्ला! अगदी पहिल्याच दिवशी दिवसभर गडमाथ्यावर धुकेजलेले ढग होते आणि कॉलेजमध्ये मी बैचेन! कधी एकदा अंजनेरीला जाऊन येतो असे झाले होते. कॉलेजमधूनच गडाचे फोटो घेणे 'तत्त्वात' बसत नव्हते.
मित्रानो नमस्कार,
ट्रेकर्स आणि भटक्यांना वाईट धक्का देणारी बातमी आहे.
लवकरच म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये अलंग किल्याला शिड्या बसविण्याचा निर्णय वनखात्याने घेतलेला आहे...कोकणडा, रतनगडानंतर आता किल्ले अलंगवर हे संकट कोसळले आहे...!!!
मु. पो. तेर्से बांबार्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.. ! पुन्हा एकदा भेट ! गेल्यावर्षी उन्हाळ्यात जाउन आलो होतो नि इथे फोटो डकवले होते.. आता निमित्त होते गणेशचतुर्थीचे... गणपतीत गावी जायचे म्हटले की लगेच मन हलके हलके वाटू लागते.. कोकणातला बाप्पा तर तन-मनात भिनलेला असतो.. शिवाय डोळ्यासमोर भातशेतीचे लांबच्या लांब हिरवे पट्टे उभे राहतात... कानांमध्ये भजनांचा आवाज दुमदुमू लागतो.. एकदम आल्हाददायक वातावरण निमिर्तीचा भास होतो... उगीच नाही गणपतीला कोकणात जाणार्या गाडया फुल असतात..
पहिली आठवण ....इथे क्लिक करा
http://www.maayboli.com/node/38361
दुसरी आठवण
२)मनाला भेदरून सोडणाऱ्या त्या किकांळ्या आणि ती घबराट :
सिद्धगडहून भिमाशंकरला जाणारी ती जंगलातली पायवाट आणि त्या मार्गी जात असता घडलेला तो प्रसंग अजून लक्षात आहे....ताजा आहे .
आणि तेच आज मी तुम्हाला इथे कथन करणार आहे . ..सांगणार आहे .
तर मागील भागत आपण पाहिले ...कि कसे आम्ही वाट काढत काढत ...सिद्धगड च्या नेहमीच्या वाटेलां येऊन मिळालो.
तिथे ज्या निर्जन स्थळी जे काका भेटले त्यांनी आम्हाला गडावर जाणारी वाट दाखविली ...आणि ते स्वताहा काही अंतरा पर्यंत आमच्या सोबत आले .
इंग्रजी नवीन वर्षाची सुरवात आमच्या ह्या ट्रेक नि झाली .
१-२ जानेवारी २०१२ . हे ते दोन दिवस ...कधीही न विसरू शकणार असे.
ट्रेक ला आम्ही फक्त ४ जण.. यतीन , रश्मी , संपदा आणि मी ..म्हणजे दोन मुले आणि दोन मुली.
२ दिवसाचा अन एका रात्रीचा हा ट्रेक .
फक्त चौघे जण पण तरी हि हा ट्रेक खूप विलक्षण ठरला.
अनेक आठवणी दडल्यात ह्या ट्रेक मध्ये . खूप काही अनोख घडल खूप काही अनोख पाहिलं , खूप काही अनोख न रंजक अस ऐकल , प्रत्यक्ष अनुभवलं.
त्यातील काही आठवणी तुमच्या समोर पेश करत आहे .
निघोज येथील रांजण खळगे : भौगोलिक चमत्कार
गेली ३२/३३ वर्षं नगरलाच रहात असूनही निघोजला कधीच जाणं झालं नाही. निघोजबद्दल एकलं होतं खूप! पण शेवटी ऑगस्टमधल्या एका रविवारी मात्र सहकुटुंब निघोजला जाणं झालं. आणि इथे यायला आपण इतका उशीर का केला असंच वाटलं.
अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते. वाटेत झेंडूची नयनरम्य फ़ुलशेती लागते.
या गावात "श्री मळगंगा माउली"चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.