रात्र वैऱ्याची
Submitted by Asu on 25 November, 2018 - 22:21
दि.२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री कसाब व इतर पाकिस्तानी अतिरेक्यांनी समुद्र मार्गे मुंबईत प्रवेश करून मुख्यतः ताजमहाल हॉटेल, सी.एस.टी., कामा लेन परिसरात निरपराध लोकांचे बळी घेऊन जे मृत्यूतांडव केले, त्या तांडवाचे व त्या अतिरेक्यांशी दोन हात करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारी कविता -
रात्र वैऱ्याची
मुंबईच्या धुंद किनारी
वारा वाहे मंद सागरी
ओढून चादर रात्र अंधारी
शांत झोपली महानगरी
तटरक्षक दल घोरत पडले
मौका साधुनि दहशती घुसले
कुठून आले कुणा न कळले
समुद्र पिशाच्च जणू भासले
शब्दखुणा: