अगणित शत्रू मिळून न केले
द्विगुणीत नुकसान मीच माझे
गरज पडता धावा केला देवाचा
ईप्सित साधता आठव फक्त स्वार्थाचा
असा मी माझीच झोळी फाडाया तत्पर झालो
विसर होताच तुझा, माझा "मी" मोठा झालो
मीच माझा ..... या अहंकारात गुरफटता
पुन्हा काठी बसली न आवाज करता
अकारण कारूण्य तुझे
ज्यामुळे मी भानावर आलो
तुझ्या चरणी माथा टेकता
सुखी अनन्य झालो
आपल्या घरात अडगळीच्या जागी आढळणारा आणि ज्याला पाहून ई .. ऽऽ असे तोंडातून आल्याशिवाय राहात नाही असा प्राणी म्हणजे झुरळ. हे झुरळ एक महिना अन्नाशिवाय जगू शकते. झुरळाला कितीही मारले तरी पटकन ते मरत नाही, असा अनेकदा अनुभव येतो. त्यांच्या शरीराची रचनाच अशा प्रकारची केलेली असते. एकंदर ४ हजार जाती असलेल्या झुरळांच्या फक्त तीसच जाती माणसांच्या सानिध्यात असतात. भारतातली बहुतेक सगळी झुरळे अर्धा इंच लांबीची असली तरी अमेरिकेतली झुरळे त्यापेक्षा दुप्पट लांबीची असतात. झुरळे कुठल्याही वातावरणात चिकाटीने राहू शकत असली तरी त्यांना ऊबदार वातावरण सगळ्यात जास्त आवडते.
वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास ! निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं.
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...
का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा!
मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा...
अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा!
आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते...
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा!
ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी...
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!
काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!
—सत्यजित
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी...
दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!
पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू...
जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी!
कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते...
रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी!
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी...
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!
काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली...
लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी!
—सत्यजित
डोंबिवलीत ‘निवडणूक’ संमेलन!
Maharashtra Times | Updated: Jan 24, 2017, 12:37 AM IST
नाद मेघांचाच दर्जेदार होता...
पावसाचा जोर फुसका बार होता!
ओल आहे काळजाच्या खोल रुतली...
स्पर्श त्याचा केवढा उबदार होता!
रात्र होती चंद्र होता गार वारा...
चांदण्याचा कवडसा अंगार होता!
सावल्याही हाय मज सोडून गेल्या...
की उन्हाचा रंग काळाशार होता??
सापडेना खंजिराची खूण कोठे...
काळजावर काजळाचा वार होता!
ओळखावे तू मला ही आस नव्हती...
हा तसा माझा नवा अवतार होता!
का प्रवासाला निघाला एकटा?तो...
सूर्य होता वा कुणी अंधार होता?
फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन...
आज बहुधा वाटते रविवार होता!
मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
काल एक प्रसंग घडला. असे प्रसंग माझ्या आयुष्यात काही महिन्यातून एकदा घडतातच. पण त्याचे मनावर इतके वाईट डाग पडतात कि अनेक दिवस त्यातून बाहेर येता येत नाही. ते आठवले तरी मनाची प्रचंड चरफड होते. एरवी ज्यांची आपले जोडे सुद्धा पुसायची लायकी नाही असले नीच आणि हलकट लोक आपल्याला सहजगत्या अपशब्द बोलून गेले आणि आपण काहीच करू शकलो नाही हे आठवल्याने मनाचा संताप संताप होत राहतो.
मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......
निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे