नका बांधू चौकटींनो मला उधळून जावू द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जावू द्या!
नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जावू द्या!
घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जावू द्या!
अशा बेरंग अश्रूंच्या कुठे उरती खुणा मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जावू द्या!
मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जावू द्या!
नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जावू द्या!
वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती.
शास्त्रीय नाव Nyctanthes arbor-tristis
मराठीत पारिजात, प्राजक्त, तर हिंदीत, हरश्रृगार/ हरसिंगार, तसेच संस्क्रुत मधे शेफालिका..
पारिजात.... नाव घेताच सुगंध दरवळतो ना! पहाटे चे मंद मंद आसमंत, गार वारा, कोवळे उन आणि त्यात अंगणात पडलेला
प्राजक्ताचा सडा...
आ हा हा! सारेच कसे सुखद, आल्हाददाई वाटते.
पारिजात हे खरोखर स्वर्गय फुल भासते... रंग, रुप, गंध, गुणधर्म सारेच कसे अनोखे..
साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!
जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!
एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?
फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!
सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!
—सत्यजित
नमस्कार मित्रांनो,
मला माझ्या मुलाचे नाव काही अक्षरांवरून ठेवायचं आहे.
ता, दु, ज्ञा, झा अशी अक्षरं आहेत.कृपया यापैकी आपल्याला माहित असतील तशी नावे सुचवा.
धन्यवाद!
पर्यावरण हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे..... त्यावर निसर्गातील सहजीवन जीवन अवलंबून आहे..... आजच्या आपल्या जीवनशैलीमुळे सर्वच बाबीत समतोल बिघडत चालला आहे व त्याचे परिणाम सर्वत्र जाणवू लागले आहेत.... त्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण संवर्धनाचे पर्याय निवडले पाहिजेत, हे तर सर्वच सुजाण नागरिकांना पटत असते मात्र नकी काय करायचे ह्याची माहिती व शास्त्र शुद्ध ज्ञान बरेचदा नसते. इच्छा शक्ती उत्तम असली तरी योग्य माहितीच्या अभावाने उचित कार्य घडत नाही व हताश उद्गार काढून हे विषय काळाच्या ओघात विस्मरणात जातात. ह्यासाठी आधी निसर्गाच्याच आपल्या छोट्या मित्रांची थोडी ओळख करून घेवूया.
मानवी जीवन अनेक कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्यांनीच भरलेले असते आणि ह्यातून विरंगुळा म्हणून कोणी न कोणी आपापल्या आवडीनुसार काही न काही छंद लावून घेतो... खरे तर उपजत आवडीनुसार ते छंद आपल्याला जडतात. अगदी काहीही छंद नसलेला माणूस विरळाच. हॉबी म्हटले की त्यात अनेक प्रकार आले आणि हौसेला मोल नसते त्याप्रमाणे प्रत्येक जण आपला छंद आपापल्यापरीने जपत असतो अन काही न काही त्यात नवनवीन शोध घेतच असतो. म्हणून एकाच टाईपचा छंद असलेली मंडळी एका छत्राखाली भेटली तर एकमेकांच्या अनुभवाबद्दल आणि नवनवीन प्रयोगांबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडेल. ह्यासाठीच हा प्रयास ... जो तुमच्या सहकार्याने पूर्णत्वास जाईल.
लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा...
तू मला भेटायला ये..एकदा येवून जा!
शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे...
तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा!
तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा...
पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा!
वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे...
या नदीला सागराची वा दिशा देवून जा!
सूर्य विझता रातही चालून येते नेमकी...
तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा!
—सत्यजित
व्हाट्स अप असो किंवा फेसबुक ....
कुठल्याही सोशल मीडियावर जेवहा वापरकर्ता काही अपलोड करतो,
तेव्हा ते पोस्टच्या टायमिंगसहित इतरांना दिसत असते.
हम्म ! बरं मग ?
त्यात काय एवढे विशेष.
अगदी बरोबर.
हि फक्त तंत्रज्ञानाने केलेली सोय असते.
पण हाच मुद्दा प्रश्नचिन्ह बनतो जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी लेट नाईट म्हणजे,
रात्री १२ नंतर Online राहत असेल तर..... आला कां प्रश्न !
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
मी आज तुम्हाला माझ्या काकांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.
माझे आजोबा, वडिलांचे वडील, गेले तेव्हा त्यांच्या पश्चात माझे वडील धरून सहा भाऊ, दोन बहिणी, आणि आजी होती. माझे वडील सगळ्यात मोठे. त्यामुळे साहजिकच बरीचशी जबाबदारी त्यांच्यावर पडली. माझे वडील तेव्हा वकील होते अमरावती कोर्टात.
त्यांचे मधले भाऊ -- त्यांचे नाव होते नरहरी वासुदेव पाळेकर (ज्यांना आम्ही नरु काका म्हणायचो)