गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्याच वेळा हाकललं आहे.
या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.
तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार
चितौडचा इतिहास
इसवी सनाच्या ७ व्या शतकात मौर्य घराण्याने चितौड वसवले. पौराणिक मेवाडी नाण्यांवर आढळणार्या चित्रांगद मोरी यांचे नावावरून त्याचे नाव चित्रकूट असे ठेवलेले होते. बाप्पा रावल यांनी इसवी सन ७३४ मधे चितौड जिंकून घेतल्यावर त्यास मेवाडची राजधानी केले. त्यानंतर अकबराने १५६८ मधे जिंकून घेपर्यंत चितौडच मेवाडची राजधानी राहिले. त्यानंतर मग मेवाडची राजधानी उदयपूरला हलवण्यात आली.
सोमवार, गुरुनानक जयंतीची सुट्टी नि त्रिपुरी पौर्णिमा असा चांगला योग जुळून आला नि नेहमीप्रमाणे आदल्या रात्री अचानक "त्र्यंबकेश्वर - ब्रम्हगिरी- हरिहर ट्रेक" करण्याचे ठरले ! मी नि ऑफिसमधील माझे तीन मित्र असे चार जण तयार झाले नि रविवारी रात्री नाशिक गाठले !
सध्या एकामागुन एक ट्रेक्स झाले.. त्यामुळे ठरवले होते लांब कुठे जायचे नाही.. रविवार् नि सोमवारी रमझान ईदची सुट्टी लागुन आली होती तरीही कुठे जावेसे वाटत नव्हते..! त्यात हा ऑक्टोबर हिट सालाबादाप्रमाणे सप्टेंबरमध्येच सुरु झाला.. पण झाले काय.. अख्खा रविवार कंटाळा करण्यात गेला नि अजुन सोमवार बाकी होता नि सांजवेळेस पुन्हा ट्रेक्सचे विचार मनात येउ लागले.. मित्रालाही समस पाठवला तर रात्री कळवतो म्हणुन आशादायी प्रतिसाद आला.. पण जायचे कुठे हा प्रश्न्न होता.. आता पुन्हा कर्जतला तरी जावेसे वाटत नव्हते.. कुठेतरी जवळपास वेगळ्या ठिकाणी जायचे ठरवले.. नि नेट ऑन केला.. क्षणात विरार्-पालघर आठवले..
पेठ (कोथळीगड) -
जेव्हा भीमाशंकर केले होते तेव्हा तिथुन पेठचा किल्ल्याचे दर्शन झाले होते.. याचा शेंड्याचा आकार हा छोटा पेला उलटा करुन ठेवल्यासारखा दिसतो.. त्यामुळे हा किल्ला ओळखणे सोप्पे गेले होते.. रविवारी पुन्हा वेळ मिळाला नि ट्रेक मेटस या ग्रुपबरोबर इथे जायचे ठरवले.